Mavaltichi Unhe (मावळतीची उन्हे)
जयश्री थत्ते-भट ह्या पाश्चात्य देशात – कॅनडात स्थायिक झाल्या आहेत. तेथील समाजात भावनांपेक्षा विचारांना महत्त्व अधिक. साहजिकच लेखिकेच्या लेखणीची बैठक वैचारिक आहे. परिणामी कथांमध्ये भावविवशता कमी आहे. त्याचबरोबर पाश्चात्य व पौवार्त्य समाजातील वैचारिक आणि सांस्कृतिक तफावत दिग्दर्शित करण्याची, त्यावर मार्मिक प्रहार करण्याची आणि हंसक्षीरन्यायाने त्यातील भलेपणा टिपण्याची अचूक हातोटी लेखिकेने हस्तगत केली आहे. सारांश, भारतीय व पाश्चात्य समाजाच्या सीमारेषा उकलून सांगणार्या या सर्व कथा नावीन्यपूर्ण असल्याने त्या स्वागतार्ह आहेत.