Na Sangnyajogi Goshta (न सांगण्याजोगी गोष्ट)
१९६२. साम्यवादी चीनबरोबरच्या त्या वर्षीच्या युद्धात आपला दारूण पराभव झाला. जगभर त्यामुळे आपली मानहानी झाली. म्हणून ती ठरली 'न सांगण्याजोगी गोष्ट'! तथापि आपली राष्ट्रीय संरक्षणसिद्धता वाढवायची असेल,तर 'त्या' पराभवाची परखड कारणीमिमांसा करायलाच हवी. 'त्या' शोकांतिकेला कोणकोण जबाबदार होते? चीनवर नको तेव्हडा विश्वास टाकणारे भोळेभाबडे राज्यकर्ते? कि राणा भीमदेवी थाटात 'फॉरवर्ड पॉलिसी' आखणारे सेनाधिकारी? या युद्धात नेमके काय घडले? त्या पराभवाल एखाद दुसरी तरी रुपेरी कडा होती का?या आणि अशा इतरही असंख्य प्रश्नांची साधार,तपशीलवार उत्तरे देणारा ग्रंथ म्हणजे युद्धाशास्त्राविषयक मराठी साहित्यात मोलाची भर आहे. प्रत्यक्ष राणक्षेत्राची व व्युहरचनांची कल्पना देणारे २५ नकाशे हे या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. एक रणझुंजार सेनानीने इतिहासकाराच्या भूमिकेतून लिहिलेला हा ग्रंथ देश्हीताबद्दल कळकळ असणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवा.