Pyar ka Raag Suno(प्यार का राग सुनो)
रोमान्स म्हणजे काय? प्यार, मोहोब्बत, प्रेम? कसा बदलला रोमान्स आपल्या सिनेमांमध्ये? देव आनंदला रोमँटिक हिरो म्हणून प्रचंड फॅन फॉलोईंग का मिळालं? आणि शाहरुखचं आजचं यश नेमकं कशामुळे आहे? हा एक सरळ रेषेतला प्रवास आहे का? मग मधले दुवे कोणते आहेत? आणि का आहेत? भारतातला सिनेमा बोलत नव्हता तेव्हाही त्यात रोमान्स होता. स्वातंत्र्यापूर्वी तर तो अधिक मोकळेपणाने व्यक्त होत होता. काळ बदलला, सिनेमा बदलला. मग प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती कशा बदलल्या? देव आनंद आणि शाहरुख खान यांच्या रोमान्समधलं साम्य, मधल्या काळातले शम्मी कपूर, राजेश खन्ना, ऋषी कपूर यांच्यासारख्या नायकांचा रोमान्स, अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅनने बदललेला कॅनव्हास, या रोमँटिक नायकांना मिळालेलं संगीत - गाणी, त्यांच्या नायिकांबरोबरची केमिस्ट्री या सगळ्याचा वेध घेण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे. यात अनेक सुरस किस्से तर आहेतच, पण भारताच्या सामाजिक परिस्थितीमुळे त्या त्या कालखंडावर केलेल्या परिणामांची चर्चाही आहे. द्वारकानाथ संझगिरी । मीना कर्णिक । हेमंत कर्णिक