-
Aadhunik Yugat Islami Jeevanshaili (आधुनिक युगात इ
आधुनिक युगात इस्लामी जीवनशैली आजच्या काळात वेगवेगळ्या धर्मांच्या लोक, वेगवेगळ्या राष्ट्रात नांदत असताना इस्लामचे धार्मिक नियम,उपासना-आराधना पद्धती राष्ट्रनियमांच्या विरोधात न जाता कशा पाळाव्यात,त्यात कालानुरूप बदल कसे करावेत याचे मागदर्शन करणारे पुस्तक. गणित, विज्ञान, खगोलशास्त्रे, आंतरराष्ट्रीय कायदे, वैद्यकशास्त्र अशा विविध ज्ञानशाखांची पायाभरणी इस्लामी विद्वानांनी केली आहे. इस्लामची मुलभूत तत्वे मानवतेच्या तत्वांच्या आधारावर उभी राहिली आहेत.त्यामुळे इस्लामी जीवनशैली मानवजातीकरिता आजही लाभदायक ठरू शकते, हे मनावर ठसवणारी मांडणी. इस्लाम आणि इतर धर्मातील प्रार्थना, उपासनापद्धती तत्वे यातील साम्य लक्षात आणून देणारे सहज, ओघाव्या शैलीतील विवेचन. 'उपासनानंद', 'आर्थिकानंद', 'सामाजीकानंद', 'उत्सवानंद', अशा चार विभागांतून इस्लामी जीवनाच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक अशा विविध बाजूंना स्पर्श करणारे लेखन.
-
Narhari-Navya Yugacha Preshit (नरहरी-नव्या युगाचा
नरहरीनं अश्वत्थ वृक्षाचं एक रोपटं लावलेलं होतं. त्या रोपट्याला कुसुमनं पाणी घातलं. त्यावेळी नरहरीनं एक प्रार्थना म्हटली. "मानवते ! तू स्वतःला ओळख. या पृथ्वीचं स्वतःमध्ये रुपांतर कर. तुमच्या सद्भावनेच्या बळावर सर्व समस्यांची उकल व्हावी. या विश्वाच्या भव्य मंदिरामध्ये तुमच्या अंतःकरणातील पवित्र जाणिवेची ज्योत प्रखर तेजानं तळपू दे. सर्व शारीरिक आणि मानसिक जाणिवांचा उन्नयन होऊ दे. ही पवित्र जाणीव अंतःप्रेरणेद्वारे अतिमानस स्तरावर जाऊ दे. या उदात्त जाणीवेमधून वैश्विक कुटुंबाचा उदय होऊ दे ! ओम !"
-
Aai..(आई)
"माणूस महत्वाकांक्षी जरूर असावा,परंतु मत्सरी असता कामा नये. प्रत्येकाची यशाचे मोजमाप करण्याची फुटपट्टी वेगवेगळी असू शकते. यशाच्या प्राप्तीमुळे लाभणाऱ्या अत्युच्च सुखाच्या काल्पनिक ध्यासासाठी अनेक तरुणांची मने धावत सुटलेली असतात. मग असे यश मिळालेला दुर्दैवी माणूस वैफल्यग्रस्त होतो. प्रामाणिकपणे प्रयत्न करून हवे ते पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न जरूर करायला हवा, पण अपयशाचीही मनाची तयारी हवी. ध्येय गाठ्ण्यापेक्षाही जास्त आनंद व समाधान आपण करत असलेल्या प्रयत्नात लाभते."
-
Chaha-Vyasan, Pilvanuk ani Samrajya (चहा-व्यसन, पि
चहा हा भारतीय नव्हे, तर जगातील नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ‘चला चहाला’, किंवा ‘चहा घेणार?’ हे शब्द भारतात सहज ऐकू येतात, इतका चहा आपल्या अंगवळणी पडला आहे. हा चहा प्रथम चीनमधून इंग्लंडमध्ये आला. तेथून तो भारत, श्रीलंका यांसारख्या ब्रिटीश वसाहती देशांमध्ये पोचला. तेथे त्यांची लागवड इंग्रजांनी सुरु केली. त्यासाठी मिळेल त्या मार्गाने मनुष्यबळ वापरले. आपल्याकडे वापरतात त्याला ‘काळा चहा’ म्हणतात. याचा इतिहासही काळा आहे. यात गरीब, लाचार मजुरांची मळेवाल्यांकडून होणारी पिळवणूक, प्रसंगी प्राण गमविणारे कामगार अशा गोष्टींची काळी किनार चहाला आहे. चहाचा इतिहास रॉय मॉक्सहॉक यांनी शोधला व तो पुस्तकातून जगासशोर मांडला. चहाचे व्यसन, साम्राज्य याची माहिती समजते. याचा मराठी अनुवाद आनंद अभ्यंकर यांनी केला आहे. यात भारतातील चहा, त्याचा इतिहास, लागवड, तसेच शास्त्रीय माहिती आहे.
-
Don Mhatare Ani Itar Katha (दोन म्हातारे आणि इतर क
धारवाड-हुबळी-हरिहर-गदग अशा उत्तर-मध्य कर्नाटकातील परिसरात या कथा घडतात. या भागातील निसर्ग आणि संस्कृती कवेत घेतानाच या कथेतील पात्र इथल्या माणसांची मानसिकता आणि श्रद्धा उराशी कवटाळून वावरताना दिसतात. कर्नाटक साहित्य अकादमी विजेते कथालेखक श्री. माधव कुलकर्णी समाजातील विविध स्तरांचे चित्रण करताना इथल्या सांस्कृतिक समृद्धीचाही दर्शन घडवतात. इथल्या जीवनाचे सत्य रंगवताना त्यातील कलात्मकतेला आणि चित्रमयतेलाही तितकेच प्राधान्य घेताना दिसतात. अनुवादित कथांचे दालन समृद्ध करणाऱ्या या कथा उमा वि. कुलकर्णी यांच्या ओघवत्या शैलीत.
-
Aashapurnadevinchya Nivdak Katha (आशापूर्णादेवींच
आशापूर्णादेवींच्या प्रचंड कथा भांडारातून निवडलेल्या या निवडक कथांचा संग्रह . सामान्य माणसाच्या भोवतीच नेहमी आशापूर्णादेवींच्या कथा विषय असतो . सर्वसामन्यांचे जीवन ,भावाभावांना , नातीगोती ,हे सारे त्यात सहजतेने येते . ' साध्याही विषयात किती आशय मोठे सापडे ' अगदी या अर्थाचेच त्यांचे लेखन नव्या जुन्या कथांचा हा संग्रह वाचक नक्कीच स्वीकारतील.
-
Aakalan Ani Aakshep (आकलन आणि आक्षेप)
साहित्यकृतीचे आकलन सामाजिक-सांस्कृतिक संदर्भाशिवाय होऊ शकत नाही आणि सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण समजून घेतल्याशिवाय साहित्यकृतींचे मूल्यमापन होऊ शकत नाही,हे भान 'आकलन आणि आक्षेप' या पुस्तकातील सर्वच लेखांमध्ये आढळते. साहित्य हे समाजजीवनाला वळण लावणारी शक्ती असते,आणि साहित्य हि सामाजिक जीवनव्यवहाराची निष्पतीही असते.साहित्य सामाजिक कारणांचा परिणाम असते. आणि साहित्य हेच सामाजिक परिणामांचे कारणही असते. साहित्य हे सामाजिक अंतःस्वत्वांचे निर्देशकही असते. समाजाच्या विचाराने आणि प्रेरणांतून साहित्य निर्माण होते;समाजाला विचार आणि प्रेरणा साहित्य देतही असते. साहित्य आणि समाज यांच्यातील अनुबंधाचा जेव्हा साहित्यकृतीला विसर पडतो,तेव्हा पोटतिडीकीने आक्षेप नोंदविण्याचे कार्य या पुस्तकातील लेखनातून केले गेले. सांस्कृतिक संदर्भाची वीण सूक्ष्मपणे उकलून, आशयद्रव्य तळामुळातून ढवळून काढून आकलनाचे प्रश्न सोडवणे आणि निःपक्षपणे व तर्कशुद्धपणे मूल्यमापन करून धीटपणे आक्षेप नोंदविणे हे या पुस्तकातील लेखनाचे सामर्थ्य होय.
-
Hirvya Vata (हिरव्या वाटा)
निसर्ग, प्रवास, पर्यावरणाची जपणूक, परदेशातील जीवन, अनुभव यांचा मिलाफ म्हणजे डॉ. विनिता आपटे यांचे हे पुस्तक. उत्तर कोरिया, नॉर्वे, मालदीव, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका आदी देशांमधील त्यांच्या भेटीत आलेले वेगळे अनुभव या पुस्तकात वाचायला मिळतात. स्कूबा डायव्हिंग, बीजिंगमधील दंड, व्हिएतनाममधील प्राणी, नॉर्वेतील पक्ष्यांचे आजोबा, नॉम - पेन मधील चिमणी पाखरं, चीनमधील ली नदी, जर्मनीतील त्या दोघी असे अनुभवविश्व छोटेखानी लेखांतून प्रगट होते. साधी - सुलभ ओघवती भाषा हे लेखनाची वैशिष्ट्य. पुस्तकाबरोबर एक सीडीही मोफत देण्यात आली आहे.