-
Vishnumay Jag (विष्णुमय जग)
निवड केलेले अभंग अत्यंत भावपूर्ण आहेत. लेखक प्रा. मधुकर डो यांनी उपयोजलेली भाषा अभिव्यक्ती ही खूप सुबोध आणि लाघवी असून निरूपण केलेल्या भाषेला सर्वसामान्यांच्या हृदयाचा ठाव घेण्याचं मूल्य प्राप्त झालेलं आहे. लेखकाने निवडलेला शब्दसंग्रह आणि त्यातून अभंगगाथेतील काही शब्दांचा दिलेला अर्थसुद्धा उपयुक्त आहे. प्रत्येक अभंगाचे निरूपण करताना त्यांनी पहिल्यांदा स्वतःची दृष्टी त्या अभंगाबद्दलची व्यक्त केलेली आहे. नंतर अभंगाचे चरण दिलेले आहे. त्यानंतर अभंगाचा अर्थविस्तार केलेला आहे. परत एकदा शेवटी स्वतःचे मत मांडून त्याला वास्तवतेच्या स्वरूपामध्ये काय महत्त्व आहे हे स्पष्टीकरणासह मांडलेलं आहे. यामुळे वाचकांना या ग्रंथाचे वाचन करताना एक अद्वैत अनुभूती प्राप्त होईल. त्यातून संत तुकारामांच्या अभंगाचा अर्थबोध तर होईलच परंतु एका अभ्यासकाने मांडलेला बोधात्मक अर्थसुद्धा या ठिकाणी व्यक्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. - प्रा. डॉ. हरिदास आखरे ( मराठी विभाग )
-
So I (सो आय)
सो आय...' ही रहस्यमय कादंबरी एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या अत्यंत नियोजित खुनाच्या तपासात वाचकाला गुंगवून ठेवते. तपासाची सुई वेगवेगळ्या पण संबंधित व्यक्तींकडे वळते, तेव्हा सामान्यपणे संशय त्याच व्यक्तीबाबत बळावतो. तीच व्यक्ती हा खून करू शकते अशी खात्री पटू लागते, नव्हे पटते. कादंबरी जेव्हा अंतिम वळणावर येते तेव्हा तपासाचा वेग वाढतो. वाचकाच्या काळजाचे ठोकेही वाढतात, कथेतला गुंताही वाढतो... आणि जेव्हा उकल होते तेव्हा..... रहस्यमय कादंबरी मराठी साहित्यात अभावाने वाचायला मिळते. बाबा कदम, सुहास शिरवळकर या दिग्गजांच्या पिढीनंतर श्री. मकरंद विनायक सापटणेकर यांची या पद्धतीची साहित्यकृती हाताळण्याची हातोटी खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी पदार्पणातच जर या क्षमतेची रहस्यमय कादंबरी लिहिली आहे तर त्यांच्या भविष्यातल्या लेखनाबद्दल खूप अपेक्षा ठेवण्याची मराठी वाचकाची मानसिकता होते यात काहीही नवल नाही. श्री. सापटणेकर यांच्या भविष्यातल्या प्रत्येकच साहित्यनिर्मितीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा! त्यांच्या साहित्यनिर्मितीस मराठी वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळेल आणि त्यांनाही वाचकांचे प्रेम लाभेल यात शंका नाही. - संतोष हुदलीकर
-
Amrutahuni God (अमृताहुनि गोड)
संत नामदेव महाराज यांचे संपूर्ण चरित्र कादंबरी स्वरुपात
-
Raobahadur Dattatray Balwant Parasnis Charitra V K
आपण इतिहास वाचतो कारण इतिहासापासून शिकण्यासारखे बरेच असते. त्यापासून आपल्याला स्फूर्ती मिळते. इतिहासातील चुकांपासून आपल्याला काही शिकवण मिळते. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या काळात माणसाच्या गरजा मुळात कमी होत्या. सोयी कमी होत्या. फक्त माणसाच्या स्वप्ने पाहण्याला जशी मर्यादा नसते तशी त्या काळातही माणसे मोठी स्वप्ने पाहत असत. नुसती पाहत नसत तर ती पूर्ण करण्यासाठी झटत असत. पारसनीस याला अपवाद नव्हते. अगणित वस्तू आणि हजारो कागदपत्रे, जुनी चित्रे, नाणी याचा संग्रह असलेले भारतातील पहिले बहिले ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय. त्यांची अफाट जिद्द, असीम इच्छाशक्ती, आत्मविश्वास याच्या बळावर ते हे पूर्ण करू शकले. शिक्षण अपुरे होते म्हणून ते हातपाय गाळून बसले नाहीत. त्यांची इच्छाशक्ती मजबूत होती. तिला त्यांनी प्रयत्नांची साथ दिली. शिक्षण म्हणजे सर्वस्व नव्हे, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. जे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ते पूर्ण झालेले पाहिले. आलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. त्यांनी आपली कुवत जाणली होती त्याचबरोबर आपली ताकद ही पूर्णपणे जोखली होती. त्यांच्या ध्येयाच्या वाटेवर कोणकोणती आव्हाने आहेत? कोणते धोके पत्करावे लागतील? हे ते ओळखून होते. शिक्षणाची संधी जरी हुकली तरी, त्यांनी त्यांच्या इतिहासाच्या छंदाला मुरड घातली नाही. तो उत्तरोत्तर वाढतच गेला. संकटाचे संधीत रूपांतर करणे आणि आपली प्रगती करणे, ही शिकवण आजच्या युवा पिढीला त्यांच्या चरित्रातून घेता येण्यासारखी आहे.
-
Chiranjiv (चिरंजीव)
मी दिग्विजय कर्ण, आज अखेरच्या क्षणापर्यंत मी माझ्या मनाशी लढतो आहे. तुम्ही मला कित्येक हजार वर्षांपासून ओळखता आणि मीही तुम्हाला जाणतो! माझ्या जीवनाचे वेगवेगळ्या रूपातले तुम्ही साक्षीदार आहात. तुमचे जन्म बदलले, तरीही माझ्याशी असलेली एकरूपता तीच आहे. हा कर्ण तुम्हा साऱ्यात आजही जगतो आहे. तुम्हाला ओळखीचा वाटणारा हा कर्ण तुम्ही रणभूमीवर पाहिलात परंतु आज मी माझ्या मनोभूमीवर अखंड तेवत ठेवलेले युद्ध तुम्हास सांगणार आहे. शेवटी रणांगण तेच आणि योध्येही!
-
O Henrychya Laghukatha (ओ हेन्रीच्या लघुकथा)
आनंद, कारुण्य, प्रेम, चौर्य, उन्माद, उत्कंठा, क्षमा, क्षालन, अशा अनंत भावभावनांच नितांतसुंदर मिनिएचर म्हणजे ओ हेन्री च्या लघुकथा साहित्याच्या उंबरठ्यावर पाश्चात्य आणि पौर्वात्य सीमांना जोडणारे पुस्तक. रसिकहो तुमच्यासाठी...
-
Digital Bharat (डिजिटल भारत)
पूर्वी तंत्रज्ञान व संलग्न तंत्रे फक्त मूठभर श्रीमंतांच्या हातात असत. बहुजन समाज त्यापासून लांबच होता. चैनीच्या गोष्टी म्हणून उपकरणांची संभावना एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी होत असे. घरोघरी मातीच्या चुली जाऊन स्मार्टफोन, संगणक आले. तरुण पिढीने ते लवकर आत्मसात केले. पण प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांनीही यापासून दूर जाऊ नये, आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला हर तऱ्हेने सक्षम, स्वतंत्र, स्वतःच्या पायांवर उभे राहायला मदत करेल. 'सबलीकरणाचा' हा एक नवीन दृष्टिकोन आहे, हे पुस्तक लिहायचा खरे तर हाच हेतू आहे.
-
Chala Thoda Common Sense Vapru Ya (चला थोडा कॉमन स
बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, कल्पनाशक्ती आणि विश्लेषणसामर्थ्य अशा अनेक देणग्यांनी समृद्ध असलेले आपण मनुष्यप्राणी… आपण आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये साधा कॉमनसेन्स का बरं नाही वापरू शकत? तुम्ही कधी स्वतःला हे प्रश्न विचारले आहेत का... आपण का वैतागतो? आपल्याला राग नक्की कशाचा येतो? आपल्या मनात अपराधीपणाची भावना का निर्माण होते? आपण खोटे का बोलतो? कधी विनाकारण बचावात्मक पवित्रा का घेतो? लोकांचा एकमेकांवर विश्वास का नसतो? स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारण्यासाठी आपल्याला धडपड का करावी लागते? बरेचदा आपण आपले आयुष्य गुंतागुंतीचे का करून ठेवतो? आपण एखाद्यावर टीका करण्यात तत्पर असतो, पण त्यासंदर्भात त्या व्यक्तीशी स्पष्ट संभाषण मात्र आपण कटाक्षाने टाळतो, असे का ? खरे तर निव्वळ कॉमनसेन्स वापरुन आपण आपल्या समोरील परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. हे पुस्तक, आपल्याला सर्वपरिचित अशा दैनंदिन परिस्थिती आणि घटनांकडे अधिक डोळसपणे पाहायला शिकवते. फक्त आपला दृष्टिकोन बदलून आणि थोडासा कॉमनसेन्स वापरून आपण आपल्या समस्या कशा सोडवू शकतो, किंवा निदान कमी करू शकतो यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. जीवनातील आनंद हिरावून घेणाऱ्या राग, निराशा, पश्चात्ताप, शोक, चिडचिड, दुःख आणि नैराश्य यासारख्या नकारात्मक भावनांना दूर ठेवायला शिकविणारे एक साधेसोपे सहज आचरणात आणण्याजोगे मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक काम करते.