-
-
Modi 3.0 Avval,Uttung,Abhedya (मोदी ३.0 अव्वल,उत्त
मोदी ३.0 अव्वल ,उत्तुंग,अभेद्य प्रदीप भंडारी अनुवादक - रोहन अंबिके दिलीप राज प्रकाशन पुणे दिलीपराज घेऊन येत आहे.रिपब्लिक भारत, झी न्यूज, इंडिया न्यूज चे ज्येष्ठ पत्रकार, जन की बात चे संस्थापक आणि बेस्टसेलर लेखक प्रदीप भंडारी यांचे नवीन पुस्तक आयोद्ध्या मतदारांचे मर्मस्थळ.२०२४ च्या निवडणुकीचे संपूर्ण विश्लेषण.मोदींचा करिष्मा आणि भारताची पुढील वाटचाल जाणून घ्या.
-
Rang Tya Nabhache (रंग त्या नभाचे)
पुनः प्रत्यय देणाऱ्या आश्वासक कथा डॉ. नितीन करमरकर यांचा पाच कथांचा संग्रह 'रंग त्या नभाचे' या नावाने प्रकाशित होत आहे. याआधी त्यांचा 'समर्पण' हा पुरस्कारप्राप्त कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्या संग्रहातील आणि यातील अशा दोन्ही कथांचा विचार केला तर या कथांची प्रकृती दीर्घत्वाकडे झुकणारी अशी आहे. म्हणजे या कथा एका अर्थाने दीर्घ स्वरूपाच्या आहेत. त्यांना आपल्या कथांमधून जाणिवेपेक्षा अधिक काही वेगळे, अलक्षित असे सांगायचे असते, ते विस्तृत स्वरूपात सांगायचे असते, असे त्यांच्या कथा वाचून ठरवता येईल. मानवी जगण्याचे, सत्याचे दर्शन सर्जनात्मक पातळीवरून घडविणे हा सर्जनशील लेखकाचा धर्म असतो. आणि या धर्माला जगणारे लेखक म्हणून डॉ. नितीन करमरकर यांच्याकडे पाहावे लागते. आपल्याला आलेली अनुभूती ते कथेच्या माध्यमातून सांगता सांगता जीवनाच्या काही अलक्षित, काही लक्षित बाबींकडे, प्रश्नांकडे वाचकांचे लक्ष वेधतात. त्या प्रश्नांची आच आपल्याला कशी आणि किती लागली, याचे पुनःप्रत्यंतर ते आपल्या लेखनातून दर्शविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यामुळे ही कथा आपली वाटते, आपलीशी वाटू लागते. हेच या कथांचे खरे मर्म आहे, असे म्हणावे लागते
-
Ek Patra Aaicha (एक पत्र आईचं)
जगायचे व लढायचे बळ देणारा मध्यमवर्ग ही माझ्या वैचारिक लेखनाची प्रेरणा आहे. सत्त्वपरीक्षेच्या क्षणी मूल्यसंस्कार निग्रहाने जपणारी आई-वडिलांची पिढी मी अनुभवली आहे. गरिबीतही स्वाभिमानाची श्रीमंती मला आई-वडिलांकडून मिळाली. त्यांच्या कष्टांचे सार्थक करणे हीच ईश्वरपूजा, हे मला संतांच्या साहित्याने शिकवले. श्रेष्ठ साहित्यिक, थोर कलावंतांनी मानवतेचा विचार दिला. अपार कष्टाला पर्याय नाही हे सांगणारे चरित्रग्रंथ नंदादीपाप्रमाणे आयुष्यात आले. माझ्या लेखनामागे आणि जगण्यामागे बळ आहे ते त्या चिरंतन मूल्यश्रद्धांचे ! म्हणूनच 'एक पत्र आईचं!' हे माझे पुस्तक खरे तर 'एक पत्र लेखकाचं!' असंही आहे. हे लेखन आपल्या हाती सोपवताना आपणास होणाऱ्या आनंदातून पत्रोत्तर मला मिळणार आहे! आपला प्रवीण दवणे
-
Soulmate (सोलमेट)
सातासमुद्रापार राहणारा, २/३ वर्षातून कधीतरी फक्त ३/४ दिवसांसाठी भेटणारा, कधीही फोन म करणारा असं एक कुणी माझ्ह्यासाख्या मध्यमवर्गीय स्त्रीचा सोलमेट असू शकतो ? केवळ तोकडे कपडे घातले म्हणजे आम्ही मुली यांच्यासाठी उपलब्ध असतो का ? पण मग आईवडिलांनी मुलांची काळजी करायचीच नाही का ? कोण चूक आणि कोण बरोबर ? काहीही असले तरी आयुष्यातली सुरवातीची १३-१४ वर्ष आम्ही एकत्र काढली आहेत. आता आयुष्याच्या उत्तरार्धात हा एकटेपणा सहन करण्यापेक्षा तिला परत घरी बोलावून तिच्याबरोबर राहायला काय हरकत आहे ?
-
Sath Sath-The Silent Defenders (साथ साथ-द सायलेंट
Nation First, Duty First या आपल्या योद्ध्याने घेतलेल्या शपथेला मनापासून साथ देणं सैनिकपत्नीला जमलं तरच संसार सुखाचा होतो. आपल्यापेक्षा महत्त्वाचं, त्याच्या आयुष्यात आधीच काहीतरी आहे हे जाणणं आणि त्याबद्दल प्रेम, आनंद आणि अभिमान असणं हे खूप महत्त्वाचं. किंबहुना त्यामुळेच अधिकाधिक स्वतंत्र आणि खंबीरपणे एकटीने निर्णय घेणं आणि निभावणं हे जमू लागतं. कारणपरत्वे, न डगमगता काही दिवस, महिने किंवा काही वर्षांसाठी देखील एकटे राहणे, इतर कोणाच्या मदतीशिवाय आणि एकत्र असतानाही रोजच्या दिनक्रमात त्याला गृहित न धरता आपल्या मुलाबाळांसकट स्वतःचीही सकारात्मक वाढ करणे हे प्रशिक्षण होत जाते. म्हणूनच सैनिकांच्या पत्नींना army behind army, Silent Ranks, Rear Guards, Silent Defenders अशी अनेक संबोधने दिली जातात ती अगदी समर्पक वाटतात.
-
Tumchi Jaat Kay (तुमची जात काय)
कवितेचा 'आदिबंध' जपणारे जे काही निवडक कवी आहेत, त्यामध्ये शरणकुमार लिंबाळे यांचा समावेश करावा लागतो. त्यांच्या या पाचव्या संग्रहातील अवकाश 'खोलवर प्रतिक्रियात्मक' असा आहे. त्याचे रूप वर्तमानी आहे. वर्तमानात आपल्या प्रतिक्रियात्मकतेला घेऊन उभे राहणे आणि तत्त्वज्ञानाला सांस्कृतिक व्यवहारातील जागा उपलब्ध करून देणे हे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या प्रतित्यसमुत्पाद सिद्धान्ताचे मुख्य लक्षण. या कवितेतील आशयसूत्राचा मुख्य धागा तोच आहे. ही कविता आत्मचरित्रात्मक वाटत असली तरी फॅसिस्ट जातीय प्रवृत्तींबरोबर दोन हात करतानाचा स्वर मात्र समताधिष्ठित आहे. ८०-८५ नंतर मराठी कविता म्हणून थेट हिंदी कविता लिहिणाऱ्या अनेकांना लिंबाळे यांची ही कविता अनुकरणीय वाटायला हवी, असा ऊर्जास्त्रोत तिच्यात आहे.