-
Modi 3.0 Avval,Uttung,Abhedya (मोदी ३.0 अव्वल,उत्त
मोदी ३.0 अव्वल ,उत्तुंग,अभेद्य प्रदीप भंडारी अनुवादक - रोहन अंबिके दिलीप राज प्रकाशन पुणे दिलीपराज घेऊन येत आहे.रिपब्लिक भारत, झी न्यूज, इंडिया न्यूज चे ज्येष्ठ पत्रकार, जन की बात चे संस्थापक आणि बेस्टसेलर लेखक प्रदीप भंडारी यांचे नवीन पुस्तक आयोद्ध्या मतदारांचे मर्मस्थळ.२०२४ च्या निवडणुकीचे संपूर्ण विश्लेषण.मोदींचा करिष्मा आणि भारताची पुढील वाटचाल जाणून घ्या.
-
Rang Tya Nabhache (रंग त्या नभाचे)
पुनः प्रत्यय देणाऱ्या आश्वासक कथा डॉ. नितीन करमरकर यांचा पाच कथांचा संग्रह 'रंग त्या नभाचे' या नावाने प्रकाशित होत आहे. याआधी त्यांचा 'समर्पण' हा पुरस्कारप्राप्त कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्या संग्रहातील आणि यातील अशा दोन्ही कथांचा विचार केला तर या कथांची प्रकृती दीर्घत्वाकडे झुकणारी अशी आहे. म्हणजे या कथा एका अर्थाने दीर्घ स्वरूपाच्या आहेत. त्यांना आपल्या कथांमधून जाणिवेपेक्षा अधिक काही वेगळे, अलक्षित असे सांगायचे असते, ते विस्तृत स्वरूपात सांगायचे असते, असे त्यांच्या कथा वाचून ठरवता येईल. मानवी जगण्याचे, सत्याचे दर्शन सर्जनात्मक पातळीवरून घडविणे हा सर्जनशील लेखकाचा धर्म असतो. आणि या धर्माला जगणारे लेखक म्हणून डॉ. नितीन करमरकर यांच्याकडे पाहावे लागते. आपल्याला आलेली अनुभूती ते कथेच्या माध्यमातून सांगता सांगता जीवनाच्या काही अलक्षित, काही लक्षित बाबींकडे, प्रश्नांकडे वाचकांचे लक्ष वेधतात. त्या प्रश्नांची आच आपल्याला कशी आणि किती लागली, याचे पुनःप्रत्यंतर ते आपल्या लेखनातून दर्शविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यामुळे ही कथा आपली वाटते, आपलीशी वाटू लागते. हेच या कथांचे खरे मर्म आहे, असे म्हणावे लागते
-
Ek Patra Aaicha (एक पत्र आईचं)
जगायचे व लढायचे बळ देणारा मध्यमवर्ग ही माझ्या वैचारिक लेखनाची प्रेरणा आहे. सत्त्वपरीक्षेच्या क्षणी मूल्यसंस्कार निग्रहाने जपणारी आई-वडिलांची पिढी मी अनुभवली आहे. गरिबीतही स्वाभिमानाची श्रीमंती मला आई-वडिलांकडून मिळाली. त्यांच्या कष्टांचे सार्थक करणे हीच ईश्वरपूजा, हे मला संतांच्या साहित्याने शिकवले. श्रेष्ठ साहित्यिक, थोर कलावंतांनी मानवतेचा विचार दिला. अपार कष्टाला पर्याय नाही हे सांगणारे चरित्रग्रंथ नंदादीपाप्रमाणे आयुष्यात आले. माझ्या लेखनामागे आणि जगण्यामागे बळ आहे ते त्या चिरंतन मूल्यश्रद्धांचे ! म्हणूनच 'एक पत्र आईचं!' हे माझे पुस्तक खरे तर 'एक पत्र लेखकाचं!' असंही आहे. हे लेखन आपल्या हाती सोपवताना आपणास होणाऱ्या आनंदातून पत्रोत्तर मला मिळणार आहे! आपला प्रवीण दवणे
-
Soulmate (सोलमेट)
सातासमुद्रापार राहणारा, २/३ वर्षातून कधीतरी फक्त ३/४ दिवसांसाठी भेटणारा, कधीही फोन म करणारा असं एक कुणी माझ्ह्यासाख्या मध्यमवर्गीय स्त्रीचा सोलमेट असू शकतो ? केवळ तोकडे कपडे घातले म्हणजे आम्ही मुली यांच्यासाठी उपलब्ध असतो का ? पण मग आईवडिलांनी मुलांची काळजी करायचीच नाही का ? कोण चूक आणि कोण बरोबर ? काहीही असले तरी आयुष्यातली सुरवातीची १३-१४ वर्ष आम्ही एकत्र काढली आहेत. आता आयुष्याच्या उत्तरार्धात हा एकटेपणा सहन करण्यापेक्षा तिला परत घरी बोलावून तिच्याबरोबर राहायला काय हरकत आहे ?
-
Sath Sath-The Silent Defenders (साथ साथ-द सायलेंट
Nation First, Duty First या आपल्या योद्ध्याने घेतलेल्या शपथेला मनापासून साथ देणं सैनिकपत्नीला जमलं तरच संसार सुखाचा होतो. आपल्यापेक्षा महत्त्वाचं, त्याच्या आयुष्यात आधीच काहीतरी आहे हे जाणणं आणि त्याबद्दल प्रेम, आनंद आणि अभिमान असणं हे खूप महत्त्वाचं. किंबहुना त्यामुळेच अधिकाधिक स्वतंत्र आणि खंबीरपणे एकटीने निर्णय घेणं आणि निभावणं हे जमू लागतं. कारणपरत्वे, न डगमगता काही दिवस, महिने किंवा काही वर्षांसाठी देखील एकटे राहणे, इतर कोणाच्या मदतीशिवाय आणि एकत्र असतानाही रोजच्या दिनक्रमात त्याला गृहित न धरता आपल्या मुलाबाळांसकट स्वतःचीही सकारात्मक वाढ करणे हे प्रशिक्षण होत जाते. म्हणूनच सैनिकांच्या पत्नींना army behind army, Silent Ranks, Rear Guards, Silent Defenders अशी अनेक संबोधने दिली जातात ती अगदी समर्पक वाटतात.
-
Tumchi Jaat Kay (तुमची जात काय)
कवितेचा 'आदिबंध' जपणारे जे काही निवडक कवी आहेत, त्यामध्ये शरणकुमार लिंबाळे यांचा समावेश करावा लागतो. त्यांच्या या पाचव्या संग्रहातील अवकाश 'खोलवर प्रतिक्रियात्मक' असा आहे. त्याचे रूप वर्तमानी आहे. वर्तमानात आपल्या प्रतिक्रियात्मकतेला घेऊन उभे राहणे आणि तत्त्वज्ञानाला सांस्कृतिक व्यवहारातील जागा उपलब्ध करून देणे हे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या प्रतित्यसमुत्पाद सिद्धान्ताचे मुख्य लक्षण. या कवितेतील आशयसूत्राचा मुख्य धागा तोच आहे. ही कविता आत्मचरित्रात्मक वाटत असली तरी फॅसिस्ट जातीय प्रवृत्तींबरोबर दोन हात करतानाचा स्वर मात्र समताधिष्ठित आहे. ८०-८५ नंतर मराठी कविता म्हणून थेट हिंदी कविता लिहिणाऱ्या अनेकांना लिंबाळे यांची ही कविता अनुकरणीय वाटायला हवी, असा ऊर्जास्त्रोत तिच्यात आहे.
-
Narmada Parikrama Ek Antarmukh Yatra (नर्मदा परिक्
असं म्हणतात कि पूर्वजांची पुण्याई उदयास येते तेव्हा नर्मदा परिक्रमा घडते. गुरूंच्या आदेशाने आणि घरातील लहान थोर मंडळींच्या अनुमती नंतरच परिक्रमा उचलावी. संकल्प सोडताना सगळा भर नर्मदा माई वर टाकला आणि माईने आपल्या लेकराचा हात धरून चालवलं. तहानलेल्या वेळी पाणी पाजलं. भुकेच्या वेळी खाऊ घातलं आणि झोप आल्यावर मांडीवर घेऊन झोपवल. ज्यांना परिक्रमा करायची आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांनी केली आहे त्यांच्यासाठी देखील उपयुक्त पुस्तक.
-
Anandibai Raghunathrao (आनंदीबाई रघुनाथराव)
ध चा मा केला म्हणून इतिहासाने जिला कलंक दिला, त्या आनंदीबाईची आणि अटकेपार झेंडा फडकावून मराठी साम्राज्य भारतभर पसरविणाऱ्या रघुनाथराव पेशव्यांची कहाणी.
-
Corporate Aani Itar Katha (कॉर्पोरेट आणि इतर कथा)
मराठी साहित्यात ताज्या दमाचे आणि स्वतःची स्वतंत्र अभिव्यक्ती असणारे अनेक प्रतिभावंत पुढे येत आहेत. असे लेखन करणाऱ्यांत आता सुनील गोडसे हे नाव समाविष्ट करावे लागेल. हा लेखक मानवी मनाच्या विविध विभ्रमावस्थांचा काव्यात्म तरलतेनं हळुवार वेध घेत आपल्या कथांमधील पात्रांच्या मनात शिरून त्यांच्या व्यथा-वेदना आणि भाव-भावनांमध्ये वाचकाला स्वत:सोबत अलगद फिरवून आणतो. त्यातून एक जिवंत, रसरशीत अनुभव घेतल्याचा आनंद अवर्णनीय आहे. आजच्या जबाबदार लेखकांच्या पिढीच्या संवेदना अभिव्यक्त करणारा प्रतिनिधी म्हणून त्याची स्वतंत्र कथात्म शैली व जातकुळी वाचकांना भिडल्याशिवाय राहणार नाही!
-
Krutrim Paus(कृत्रिम पाऊस)
कृत्रिम पाऊस पाडण्याची शास्त्रीय प्रक्रिया, त्या प्रक्रियेचा मनोरंजक इतिहास, पर्यावरणविषयक संदर्भ, पूर्वापर पावसासंदर्भातील आपल्या अंधश्रद्धा, इत्यादी गोष्टींचा शास्त्रीय मागोवा घेणारे असे पुस्तक आजतागायत तरी मराठीत उपलब्ध नाही. विशेष म्हणजे विषय पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाचा असूनही कुठेही वाचताना कंटाळा येत नाही. याचे कारण हेच आहे. कि श्री. चंद्रसेन टिळेकर हे शिक्षणाने इंजिनियर असले तरी मराठीतले शैलीदार लेखक आहेत. मराठीतील संगणकावरची पहिली दोन पुस्तके त्यांच्याच नावावर आहेत. भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना व शिक्षकांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल ! - कॅप्टन सुनील मुळे
-
Hari Hari Vitthal Vitthal (हरी हरी विठ्ठल विठ्ठल)
अवती-भवती घडणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय घटनांचा परिणाम इतरांवर होतो तसा माझ्यावरही होतो. या घटनांवर मला काही बोलल्याशिवाय राहवत नाही. मी लेखनातून बोलतो. उदाहरणार्थ- 'लिव्ह इन रिलेशनशिप' म्हणजे तरुण- तरुणींनी लग्नाशिवाय कंत्राटी पद्धतीने एका छपराखाली राहणे. श्रीमंतांची किंवा राजकीय वरदहस्त असलेली तरुण पोरे दारू पिऊन, बेफाम वेगाने कार चालवून फुटपाथवरची माणसे चिरडतात, राजकीय लागेबांधे असलेले सावकार कुळांना नाडतात व त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आणतात. लग्नाची वचने देऊन पुरुष स्त्रीला फसवतात, शिकली-सवरलेली माणसे बुवाबाजीला बळी पडतात, कौटुंबिक वाद व गैरसमज यामुळे भांडणे धुमसतात व आत्महत्येपर्यंत पोहोचतात, चांगल्या घरातील मुले अपघाताने गुन्हेगारी विश्वात ओढली जातात, ऑफिसातील स्त्रियांची लैंगिक छळवणूक, स्त्री-भ्रूणहत्या, डॉक्टरांकडून होणारी सहकारी गृहसंस्थांची पिळवणूक अशा विषयांवरच्या बातम्या मी वाचतो, पाहतो व ऐकतो. हे विषय न संपणारे आहेत. १९९२ साली, नोकरीतून निवृत्त झाल्यावर साठाव्या वर्षापासून, या चिरंजीव विषयांवर, २०२३ या चालू वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या ९१ वर्षांपर्यंत मी कथा लिहितो आहे. माझ्या कथा कालबाह्य होत नाहीत. कारण गैरप्रकार वेष पालटून पुन्हा पुन्हा जन्म घेतात. माझ्या कथांची अखेर मी आनंददायी करतोच करतो. मला रडवणाऱ्या कथा लिहिताच येत नाहीत. ही माझी लेखनमर्यादा मला मान्य केलीच पाहिजे!
-
Vegali Manse (वेगळी माणसे)
आपल्या आजूबाजूला किंवा इतिहासात अनेक अशी माणसं दडलेली असतात की ज्यांचं काम पुढील पिढीत अत्यंत प्रेरणादायी ठरतं पण ही माणसं प्रसिद्धी पासून लांब रहातात. त्यांची उपेक्षाही होते. या साऱ्यांचा परिचय नवीन पिढीसाठी करून दिला आहे
-
Sakshep (साक्षेप)
डॉ. रवींद्र शोभणे यांचे समीक्षालेखन म्हणजे सगळ्यातून सर्जनशील लेखनाचा शोध घेण्याचा प्रयत्न होय. या सर्जनाच्या पाठीमागे काही घटक असतात. काही स्रोत असतात. अशा घटकांचा, स्रोतांचा शोध घेणे हे खरे तर सर्जनशील समीक्षकांचे काम असते. आणि समीक्षक हा जर मुळात सर्जनशील लेखक असेल तर तो त्या अंगाने समोर असलेल्या कलाकृतीचा असा शोध घेत असतो. अर्थात हा शोध म्हणजे अंतिम सत्य नसते, पण त्या सत्याच्या वाटेवरून जाण्याचा तो एक मार्ग ठरतो. हा मार्ग, हा प्रवास सर्जनशील समीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या भूमिकेतून डॉ. रवींद्र शोभणे यांनी केलेल्या या समीक्षालेखनच्या) निमित्ताने वाचकांना पुन्हा नव्याने त्या त्या कलाकृतीकडे, लेखकांकडे जाता येईल. वाचकांना मिळणाऱ्या या पुनः प्रत्ययाच्या आनंदातच या लेखनाचे यश आहे.
-
Pravah (प्रवाह)
प्रवाह' ही कादंबरी वाचकाला जगण्याच्या प्रवाहाशी जोडून घेते. ह्यावं मुख्य कारण ह्या प्रवाहातल्या लाटा, भारती-ओहटी, भोवरे, बादळं, श्वास कोंडणं, किनारा दिसणं, निसटणं, कधी आनंददायी डुंबणं, तर कधी स्वतःच्याच मस्तीत स्वार होणं, कधी खोल गर्तेत जाणं... अशा अनेक भावावस्था प्रत्येकाला आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर एका वेगळ्या अर्थाने अनुभवायला वा पाहायला मिळतात. कादंबरी हा रूपबंध मानवी आयुष्याचा विशाल पट वाचकांसमोर उलगडत असतो. 'प्रवाह' कादंबरीचा हा पटफ्राईडच्या 'जगण्याच्या धडपडीकरिता कामवासनेचं सर्वव्यापी असणं, या सिद्धांताचा धागा आणि त्याचे अनेक रंग वाचकांसमोर आणतो. तारा ही व्यक्तिरेखा ह्या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. तिच्या भावविश्वातले, तिचे आणि तिच्या आयुष्यातल्या इतरांचे, अनेक क्षणांचे घटितार्थ एक टोकदार, जळजळीत वास्तव उमं करतात. ताराच्या आणि इतर व्यक्तिरेखांच्या भावजीवनातले कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि मानसिक अशा सर्व पातळ्यांवरचे प्रश्न दुर्देवाने अनुत्तरीतच राहतात. तथाकथित सांकेतिक, संयमित, सुसंस्कृत प्रतीकांचं आशयाला अवगुंठन न देता मानवी मनातल्या उल्या पालथींना ही कादंबरी अस्सल स्वरूपात व्यक्त करते. माणसाच्या जगण्याच्या प्रवाहात भूक आणि कामवासना ह्या आदिम प्रेरणा अपरिहार्य असल्याचं ती स्पष्टपणे सुचवते. जीवनाचं हे बिरूप दर्शन सुद्धा बाचकांना निश्चितच अंतर्मुख आणि अस्वस्थ करणारं आहे.