Shetkaryacha Asud (शेतकऱ्याचा असूड )
थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांनी महाराष्ट्रात भयमुक्त, शोषणमुक्त व न्यायाधिष्ठित समाजरचनेचे स्वप्न पेरले. धर्मव्यवस्था व राज्यव्यवस्था यांच्या दुहेरी जाचात अडकलेल्या शेतकरी समाजाची दुर्दशा त्यांनी 'शेतकऱ्याचा असूड' या प्रबंधात मांडली. शेतकऱ्याच्या अधोगतीची सामाजिक व आर्थिक बाजू विशद करताना त्यांनी तत्कालीन व्यवस्थेवर कोरडे ओढले आणि शेतकऱ्यांच्या उत्थानाचे मार्गही सांगितले. १३७ वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले या ग्रंथातील विचार आजही प्रस्तुत आहेत, कारण शेतकरी आजही दैन्य चक्रातून बाहेर पडलेला नाही. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा याचा ढळढळीत पुरावा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा जोतीराव फुले अध्यासनाचे चेयर प्रोफेसर प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी या ग्रंथाचे संपादन केले असून आपल्या संपादकीयात वर्तमानाच्या उजेडात ग्रंथातील विचार उलगडले आहेत.