Ghar Kaularu
आपल्या आयुष्यात बालपण येतं आणि जातं ते पुन्हा परत न येण्यासाठी! पण बालपणाच्या आठवणींनी तो काळ मनात ताजा, लख्ख होऊन कायम राहिलेला असतो; नव्हे काळाबरोबर अधिक मुरून चविष्ट बनतो. लेखिकेचं बालपणातलं कोकणातलं घर आणि घराशी निगडित अनेक गोष्टी तिच्या मनात सतत पिंगा घालत असतात. त्यातलीच ही काही शब्दरूपं!