-
Atruptaa (अतृप्ता)
सिनेसृष्टीतील गाजलेले चित्रकार आणि संवेदनशील लेखक श्रीकांत धोंगडे यांनी मीनाकुमारीच्या जीवनावर ‘अतृप्ता’ हे नवे पुस्तक लिहिले आहे. खरं तर मीनाकुमारीच्या जीवनावर अनेक भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित झाली आहेत. परंतु, श्रीकांत धोंगडे यांचे हे पुस्तक लक्षणीय आहे. कारण तिच्या जन्मापासून अखेरपर्यंतचे हे शोधचरित्र आहे. मीनाकुमारी राहत असलेल्या दादर परिसरातील रहिमाबाई चाळीपासून श्रीकांतजींनी शोधकार्य सुरू करून सलग साडेतीन वर्षे तिच्या जीवनाचा धांडोळा घेतला आहे. अन् अनेक दुर्मिळ फोटो शोधून काढले आहेत. त्यामुळे या पुस्तकात एक हजार फोटोंचा दुर्मिळ साठा तिच्या चाहत्यांना पाहायला मिळेल. “शिवाय या पुस्तकात पेन, पेन्सिल व चारकोलने श्रीकांतजींनी केलेले मीनाकुमारीचे १६ पोर्टेटस् आहेत,” त्यांच्या काळजाला भिडलेली, मनात शिरलेली आणि मेंदुत भिनलेली मीनाकुमारी त्यांनी या पुस्तकात उभी केली आहे.
-
Mazi Shipaigiri (माझी शिपाईगिरी)
" गेल्या शतकात कोल्हापूर संस्थानातील शेतकरी कुटुंबातील एक मुलगा हिंदी लष्करातील सर्वोच्च अधिकारपदावर जातो, ही काही आपोआप सहजगत्या घडून आलेली घटना नसून तिला एक ऐतिहासिक व सामाजिक कारणपरंपरा होती आणि त्या परंपरेचा उद्गम बिंदू होता कोल्हापूरचा लोकराजा रावर्षी शाहू छत्रपती. त्यांच्या राजाश्रयाने वडगावच्या चिमणाजी पाटलांचा मुलगा, पांडुरंग, हा उच्चविद्याविभूषित झाला आणि भारतातील थोर कृषितज्ज्ञ म्हणून रावब. डॉ.पी.सी.पाटील या नावाने प्रसिद्धी पावला! या रावबहादुरांचे चिरंजीव शंकरराव म्हणजे प्रस्तुत चरित्र नायक ले.ज.एस.पी.पी.थोरात. हे सर्व इथं आठवले एवढ्यासाठी की सन १८९९ मध्ये शाहू छत्रपतींनी पांडुरंग पाटील नावाचा मुलगा मॅट्रिक पास झाल्याचे कळाल्यानंतर त्याच्या गावी खास घोडेस्वार पाठवून त्याला बोलावून घेतले नसते व पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केले नसते तर 'रावबहादूर डॉ.पी.सी. पाटील'च नव्हे तर जनरल एस.पी.पी. थोरातही देशाला मिळाले नसते. अशा ऐतिहासिक व सामाजिक घटनांची कारणपरंपरा इतिहास आपणास सांगत असतो. इतिहासाची खरी फलश्रुती हीच आहे." " गेल्या शतकात कोल्हापूर संस्थानातील शेतकरी कुटुंबातील एक मुलगा हिंदी लष्करातील सर्वोच्च अधिकारपदावर जातो, ही काही आपोआप सहजगत्या घडून आलेली घटना नसून तिला एक ऐतिहासिक व सामाजिक कारणपरंपरा होती आणि त्या परंपरेचा उद्गम बिंदू होता कोल्हापूरचा लोकराजा रावर्षी शाहू छत्रपती. त्यांच्या राजाश्रयाने वडगावच्या चिमणाजी पाटलांचा मुलगा, पांडुरंग, हा उच्चविद्याविभूषित झाला आणि भारतातील थोर कृषितज्ज्ञ म्हणून रावब. डॉ.पी.सी.पाटील या नावाने प्रसिद्धी पावला! या रावबहादुरांचे चिरंजीव शंकरराव म्हणजे प्रस्तुत चरित्र नायक ले.ज.एस.पी.पी.थोरात. हे सर्व इथं आठवले एवढ्यासाठी की सन १८९९ मध्ये शाहू छत्रपतींनी पांडुरंग पाटील नावाचा मुलगा मॅट्रिक पास झाल्याचे कळाल्यानंतर त्याच्या गावी खास घोडेस्वार पाठवून त्याला बोलावून घेतले नसते व पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केले नसते तर 'रावबहादूर डॉ.पी.सी. पाटील'च नव्हे तर जनरल एस.पी.पी. थोरातही देशाला मिळाले नसते. अशा ऐतिहासिक व सामाजिक घटनांची कारणपरंपरा इतिहास आपणास सांगत असतो. इतिहासाची खरी फलश्रुती हीच आहे."
-
Ethiopiyi Suras Katha (इथियोपियी सुरस कथा)
आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस’ या जागतिक मानवतावादी संघटनेतल्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले उमेश कदम यांचा ‘इथिओपियी सुरस कथा’ हा कथासंग्रह. कामाच्या निमित्ताने दहा वर्षं ते आफ्रिकेत होते. त्यांपैकी अडीच वर्षं ते इथिओपियात वास्तव्यास होते. या कथासंग्रहातल्या कथा त्यांच्या तिथल्या वास्तव्यातल्या अनुभवांवर आधारित आहेत. कथासंग्रहातल्या कथा त्यांच्या तिथल्या वास्तव्यातल्या अनुभवांवर आधारित आहेत. ‘भुतांची टेकडी’, ‘मेंगेशा’, ‘इथिओपियी कांद्यांची गोष्ट’, ‘चिन्मय आफ्रिका’ यांसारख्या एकूण पंधरा कथा त्यात समाविष्ट केल्या आहेत. सर्वच कथांमधून इथिओपियन संस्कृती, दैनंदिन जीवन आणि त्या अनुषंगाने सर्व गोष्टींचं चित्रण आढळतं. त्या संदर्भातले विविध उल्लेख अगदी बारकाव्यांसहित येतात. इथिओपियातलं दैनंदिन जीवनच या कथांमधून वाचकांना भेटत राहतं. लेखकाच्या स्वानुभवांवर आधारित असलेल्या या सर्वच कथांमधून त्याच्या परिघातल्या सर्व माणसांचं भावविश्वही उलगडतं. उमेश कदम यांनी सत्य घटनांना कल्पिताची जोड देऊन लिहिलेल्या या कथा अतिशय ओघवत्या शैलीत आल्या असून त्या वाचकांच्या मनाचा ठाव घेतात.
-
Draupadi Indraprasthachi Samradyni part -3 (द्रौपदी इंद्रप्रस्थची साम्राज्ञी भाग ३)
आपल्या रजःस्वला बहिणीला केसांनी ओढून नेऊन तिची सार्वजनिक विटंबना केली जाते, हे कळल्यावर द्रौपदीचा भाऊ, उत्तमौजस, काय प्रतिज्ञा करतो? द्रौपदीचे माहेरघर तिच्या आयुष्यातील सर्वांत वाईट परीक्षेत तिला कशी साथ देते? द्रौपदीची लाज राखणाऱ्या साडीचं पुढे काय झालं? वनवासाच्या काळात पांडवांच्या साथीनं तिचं अनोळखी आणि धोकादायक वाटांवरून मार्गक्रमण करणारं रूप, एक साम्राज्ञी, प्रेमळ पत्नी आणि प्रेमळ आईपासून ते एक शूर तलवारधारी होऊन तिच्या शत्रूचा नाश करणाऱ्या तिच्या या रौद्र अवतारावर मंत्रमुग्ध होण्यासाठी तयार राहा. राक्षसांच्या कुळांमध्ये जातीय दंगल उसळू नये म्हणून हिडिंबा आणि मौरवी यांच्याशी सखोल संबंध प्रस्थापित करताना त्यांच्या सुसंस्कृत राजकीय मुत्सद्देगिरीचे साक्षीदार व्हा. सोनाली राजे यांनी लैंगिक शोषणाची विकृती आणि प्रवृत्ती कशी ठेचून काढली, हे महाभारतातील द्रौपदी-कीचक आणि अर्जुन-उर्वशी या पीडित-अपराधी जोड्यांच्या माध्यमातून, आपल्या प्रकरणांत अधोरेखित केली आहे. कर्मठ आणि निर्भय अशा योद्ध्या राणीला भेटा; जी स्वाभिमान राखण्यासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोणत्याही पुरुषाची वाट पाहत नाही. स्वतः साठी आणि आजूबाजूच्या इतर स्त्रियांच्या सन्मान रक्षणासाठी द्रौपदी खंबीरपणे कशी उभी राहते ते पाहा. तिच्या आयुष्याच्या नीचांकात तिच्याबरोबर पावले उचला.
-
Swatantryasurya (स्वातंत्र्यसूर्य)
'स्वातंत्र्यसूर्य' या पुस्तकात नरगुंद राज्याचा राजा भास्करराव भावे आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी यांच्यातील नाट्यमय संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे. कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यांनी भास्कररावांना त्यांच्या नातेवाइकांपैकी एक मुलगा दत्तक घेण्यास परवानगी नाकारली. ते त्यांचे राज्य 'दत्तकविधान विरोधी कायद्या'च्या मदतीने स्वतःच्या अधिकारात विलीन करू इच्छित होते. मात्र, याला धूप न घालता भास्कररावांनी इंग्रजांवर हल्ला चढवला आणि त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांना त्यांचे राज्य परत मिळवता आले, की ब्रिटिशांनी आपल्या क्रूर शक्तीने बदला घेतला? अधिक जाणून घेण्यासाठी वाचा, निर्भयता आणि शौर्याची सत्यकथा.
-
Pitali Nondvahi - Aathavani Datatat (पितळी नोंदवही - आठवणी दाटतात)
देवकी जैन यांचे त्यांच्या 'दाटलेल्या आठवणीं'चे ग्रंथरूप 'द ब्रास नोटबुक' या नावाने, मराठीत 'पितळी नोंदवही' म्हणून प्रसिद्ध झाल्यामुळे एकूणच आत्मचरित्रात्मक साहित्यात लक्षणीय भर पडली आहे. लक्षणीय अशा अर्थाने की हे पुस्तक (आणि त्याचा अनुवाद) अतिशय धाडसी, मनमोकळ्या आणि विलक्षण ऊर्जा असलेल्या व्यक्तीचे चरित्र म्हणूनच केवळ नव्हे तर एक मोठा सामाजिक सांस्कृतिक पट आपल्यासमोर मांडते. मूळ इंग्रजी ग्रंथात जी चित्रमयता आहे आणि जो अनुभव-प्रवास आहे तो तितक्याच समर्थपणे अलका गरुड यांनी केलेल्या मराठी अनुवादात आला आहे. देवकी जैन यांचा जीवनप्रवास कर्नाटक ते दिल्ली व्हाया ऑक्सफर्ड आणि जगातील अनेक देश, भाषा आणि संस्कृतींमधून समृद्ध झाला आहे. शिक्षणप्रवासही विलक्षण झपाटलेला आणि तेजस्वी विशेष स्कॉलरशिप्स, फेलोशिप्स आणि सन्मान. पुढे विवाहही लक्ष्मीचंद जैन या निष्ठावान गांधीवादी विचारवंताशी. विद्यापीठांतील बुद्धिमान विद्यार्थिनी, अर्थशास्त्रात संशोधन करणारी महिला, स्त्री जीवनाचा साद्यंत अभ्यास करणारी विश्लेषक, काही नवे प्रबंध व सिद्धांत मांडून स्त्रीवादाचे परिपेक्ष्य बदलणारी विचारवंत, बंडखोरी करतानाही समतोल संभाळणारी पण बंडप्रवृत्ती न सोडणारी व्यक्ती, मनस्वी पत्नी आणि आई, चौकटीत राहूनही चौकटीबाहेर विचार करणारी व सक्रिय जीवन जगणारी स्त्री आणि कधीही उमेद वा आशावाद न सोडणारी व्यक्ती आणि वयाच्या ८७ व्या वर्षी आपले जीवन कॅनव्हासवर सापेक्षरीत्या चितारणारी सर्जनशील लेखिका ही त्यांची काही रूपे. अलका गरुड यांनी हा कॅनव्हास आणि ते जीवनचित्र यावरचे रंग तितकेच जिवंत ठेवले आहेत. देवकी जैन यांनीच हे मराठी 'ब्रास नोटबुक' लिहिले असावे, असे वाटण्याइतके प्रभावी आणि प्रवाही 'अनुवादांतर' केले आहे. स्त्री चळवळीत कार्य करणाऱ्या, पण मुख्यतः मराठी समाज/स्त्री जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देवकी जैन यांचे पुस्तक आणि अलका गरुड यांचे भाषांतर अतिशय प्रबोधनकारी ठरणार आहे.
-
Pashchim Aaghadivar Samsum (पश्चिम आघाडीवर सामसूम)
सत्यबोध हुदलीकर याने मूळ जर्मन भाषेतून मराठीत आणलेलीही कांदबरी 1932 साली प्रकाशित झाली. युद्धाची विफलता पटवणे हाच या कादंबरीचा हेतू आहे. या कांदबरीवरील चित्रपट कमालीचे लोकप्रिय झाले. 1930 पासूनच युद्धविरोधी सूर जगात उमटू लागले आणि त्याचाच परिणाम म्हणून इंग्लडमध्ये बर्ट्रान्ड रसेल यांनी अण्वस्त्र विरोधी व युद्ध विरोधी चळवळ सुरु केली. या चळवळीचे ब्रीदवाक्य ‘पुन्हा युद्ध नाही’ असेच होते. त्या चळवळीचा ‘पहिला हुंकार’ म्हणजेच ही कांदबरी. ही कादंबरी प्रसिद्ध होऊन 90 वर्षे झाली आहेत तरीही या कादंबरीचे महत्त्व कणभरही कमी होत नाही.
-
Ek Kali Don Pane (एक कळी दोन पानं)
जगातील दोन नंबरचं पेव... पहिला नंबर अर्थात पाण्याचा. पावणे पाच हजार वर्षापासून मानवजात चहा पितेय, त्याच्या लागवडीसाठी अनेक भूखंड बळकावतेय, अनेक युद्ध लढतेय... अशा या चहाच्या मळ्याच्या पार्श्वभूमीवर रंगवलेली ही कादंबरी. ही कहाणी आहे एका संघर्षाची, स्वातंत्र्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या मजुरांच्या लख्याची! स्वतःच्या देशात मजूर म्हणून राबणारा गौरा साब क्रेग ब्रोडी भारतात येऊन एका चहाच्या मळ्याचा मालक बनतो आणि त्याचबरोबर वेठबिगार म्हणून राबणाऱ्या शेकडो जीवांचाही। कथानक फिरतं ते दोन प्रमुख पात्रांभोवती- ब्रोडीचा औरस मुलगा जेम्स आणि ब्रोडीलाही अज्ञात असलेला त्याचा अनौरस मुलगा जॉर्ज... एक असतो वसाहतवादी 'गोरा साहेब' आणि एक स्वतंत्र भारतातला 'काळा साहेब'. पिचलेले साचे मजूर बिरजू, भोला, सावित्री, गंगा, चंपा, मौनिमौसी एकीकडे आणि त्यांचे प्रश्न समजून घेणारी, त्यांच्या हक्कांसाठी प्रयत्न करणारी मिसेस ब्रोडी म्हणजेच जेन दुसरीकडे. ही सगळीच पात्रं चहाच्या मळ्यातील हा संघर्ष जिवंत करतात. कथानकाच्या ओघाने मजुरांना सोसावे लागणारे अन्याय, मानहानी, अपार कष्ट चहाच्या शेतीतील शोषणाचा इतिहास सांगून जातात.
-
Choices (चॉइसेस)
लिव्हसारखी अत्यंत संवेदनशील अभिनेत्री, तिचे आगळेवेगळे आयुष्य, त्यातले भावनांचे अनेक चढउतार, गुंतागुंतीची नाती - याबद्दल तिला नेमके काय म्हणायचे आहे, हे समजून घेऊन ते शब्दबद्ध करणे हे अत्यंत अवघड काम, पण मृणालने ते अप्रतिमरित्या पार पाडले आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते लेखन कुठेही अनुवाद वाटत नाही. मला तर हा मृणालने घेतलेला लिव्ह उल्मन या स्त्रीचा अनुभव वाटतो. एका अभिनेत्रीला, स्त्रीला, आईला, प्रेयसीला आणि व्यक्तीला जाणून घेताना, जणू परकायाप्रवेश करून मृणालने लिव्ह आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. - डॉ. मोहन आगाशे
-
Tathakathit (तथाकथित)
विजय तांबे हे गेली २०+ वर्षे अत्यंत निष्ठेने कथा लिहीत आहेत. 'तथाकथित' हा त्यांचा तिसरा कथासंग्रह. ते मूलतः एक प्रयोगशील लेखक आहेत. साहजिकच त्यांच्या कथा प्रामुख्याने 'अनुष्टुभ' सारख्या वाङ्गयीन नियतकालिकात प्रकाशित झाल्या आहेत. कथेमध्ये होणारे बहुतांश प्रयोग हे शैली, घाट आणि आशयाच्या अंगाने होत असतात. विजय तांबे ह्यांचं वेगळेपण असं की ते त्यांच्या कथांमध्ये सामाजिक भान आणि कपोलकल्पित ह्यांची सांगड घालायचा एरवी सहसा न आढळणारा प्रयोग करतात. लहानपणापासून सामाजिक चळवळींशी संबंध आल्याने त्यांची पात्रं, प्रसंग, एकूणच आशयद्रव्य हे त्यांची सामाजिक जाणीव दर्शवणारं असतं. मात्र सामाजिक आशयद्रव्य असणाऱ्या बहुतांश कथा जशा वास्तववादी ढंगाने लिहिल्या जाण्याची वहिवाट आहे ती सोडून ते त्यातून फिक्शन साकारण्याचा प्रयत्न करतात. हे करताना त्यांना उपयोगाची ठरते ती त्यांची दृक्भान असलेली कथनशैली. विजय तांबे ह्यांचे कल्पनाचक्षू खूपच ताकदीचे आहेत. ह्या संग्रहातील 'तथाकथित' ही शीर्षककथा त्यादृष्टीने पुरेशी बोलकी ठरावी. ही कथा त्यांच्या कल्पनाचक्षूनी अशी काही देखिली आणि रेखिली आहे की वाचणाऱ्याला एक प्रतिसृष्टी नजरेसमोर साकार व्हावी. ह्या प्रदीर्घ कथेत त्यांनी केवळ कल्पनेने जे काही बारकावे दिले आहेत ते चकित करणारे आहेत. ह्या संग्रहातील त्यांच्या कथांमध्ये सामाजिक भानाच्या तुलनेत कल्पकता अधिक जाणवते. अर्थात 'भीतीचा मॉल' ह्या कथेत एका गरोदर मातेला तिला होणारे बाळ सुदृढ असेल की नाही ह्या भीतीने तिच्या आत अंधश्रद्धांचे जे थैमान चालते, त्याचे अनेक कंगोरे इतक्या बारकाईने आलेत की त्यातून त्यांची समाजातील आक्षेपार्ह गोष्टींबाबतची निरीक्षणशक्ती अधोरेखित होते. प्रयोगशील लेखकांच्या कथा वाचकांपर्यंत पोहोचणे हे साहित्यसंस्कृतीच्या सकस जोपासनेसाठी अत्यंत आवश्यक असते. ह्यासाठीच विजय तांबे ह्यांची कथा न केवळ अधिकाधिक वाचकांपर्यंत, तर उदयोन्मुख, होतकरू लेखकांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. वास्तववादाच्या आहारी गेलेल्या मराठी साहित्यासाठी ह्या कथा एक अभ्यासाचा असा वस्तुपाठ ठरू शकतात.
-
Eklavya (एकलव्य)
दुमदुमत्या आसमंताला निठेपुढं झुकायला लावणारा, स्वअध्ययनान धनुर्विद्या मिळवणारा, कुळभेदाच्या जाचक भिंतींना तोडून सर्वश्रेष्ठ धनुर्धर होणारा निषाधराजा एकलव्य ! महाभारतातलं असं एक पात्र जे कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये असतं तर त्या युद्धाचं चित्र कदाचित बदललं गेलं असतं. एकलव्यानं गुरुदक्षिणेत अंगठा गुरू द्रोणाचार्य यांना दिला, त्याच्या निष्ठेनं सर्वांना भुरळ घातली. अशी गुरुदक्षिणा देऊन साहस, त्याग, निष्ठा व समर्पणाच्या जोरावर परत पर्वतासारखा उभा राहून एकलव्यानं आदर्श निर्माण केला. भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात फक्त आवाजाच्या दिशेनं बाण मारून लक्ष्यवेध करणारा एकलव्य बाणावर इतकं नियंत्रण असणारा महाभारतातला एकमेव धनुर्धर म्हणजे एकलव्य! तो एक बुद्धिमंत हुशार राजा होता, त्यांनीही अनेक युद्ध लढली. युद्धात कृष्णालाही नमायला लावणारा तो एक शक्तिशाली धनुर्धर आणि योद्धा होता. एकलव्य ही कादंबरी वाचल्यावर आपल्या मनाजवळ असलेला राजा. एकलव्य आपल्याला निश्चित सापडेल.
-
Marathi Saatasamudrapar (मराठी सातासमुद्रापार )
मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या मेघना साने यांचा कलाप्रवास प्रथम व्यावसायिक नाटकांतून अभिनेत्री म्हणून सुरू झाला. पुढे त्या लिहित्या झाल्या. कथा, काव्य, ललित, बालसाहित्य अशी त्यांची एकूण बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'कोवळी उन्हें' हा स्वलिखित कथाकथनाचा एकपात्री प्रयोग करत त्यांनी देश-विदेशांत दौरे केले. मराठी भाषा व संस्कृतीचे जतन करण्यासाठी परदेशातील मराठी बांधव कसे झटून योगदान देत आहेत हा त्यांच्या कौतुकाचा विषय राहिला. या विषयावर संशोधकवृत्तीने लिहिलेले 'मराठी सातासमुद्रापार' हे पुस्तक मराठी भाषेच्या कालप्रवासात अतिशय महत्त्वाचे ठरते. साहित्य, शिक्षण व कला या क्षेत्रांत संस्मरणीय कामगिरी केलेल्या महाराष्ट्रातील काही व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा परिचयही त्यांनी या पुस्तकातून करून दिला आहे.
-
The Escape Artist (द एस्केप आर्टिस्ट)
द एस्केप आर्टिस्ट: द मॅन हू ब्रोक आऊट ऑफ ऑशवित्झ टू वॉर्न द वर्ल्ड हे पुस्तक रुडी व्हर्बा यांच्या अद्वितीय धैर्याची आणि मानवतेविरुद्ध झालेल्या भयानक अत्याचारांशी संघर्षाची कथा साकारते. रुडी, एक युवा यहूदी, ऑशवित्झ कॅम्पमधील छळछावणी आणि नरसंहाराचा साक्षीदार बनतो, जिथे प्रत्येक क्षण जीव वाचवण्याच्या लढाईसारखा असतो. पण तो भयावहतेला सामोरे जातो. चाणाक्षतेचा वापर करून आपल्या मित्र फ्रेडीसोबत पळून जातो. त्याच्या साहसामुळे जगाला ऑशवित्झचं सत्य समजतं. जे ऑशवित्झ रिपोर्ट म्हणून इतिहासात अमर झालं. हे पुस्तक केवळ ऐतिहासिक नोंद नाही; ते धैर्य, निश्चय आणि मानवतेच्या प्रती सुसंगत न्यायासाठी उभे राहण्याच्या शक्तीची एक सजीव चित्रकथा आहे.
-
Gypsy (जिप्सी)
ही गोष्ट आहे एका फिरस्त्याची… दिशाहीन झालेल्या भटक्याची… स्वतःचा शोध घेत निघालेल्या एका तरुणाची… ही गोष्ट आहे एका प्रवासाची… या प्रवासातल्या भल्या-बुऱ्या माणसांची… ही गोष्ट आहे जिवलग मित्रांची… त्यांच्यातल्या अतूट नात्याची… ही गोष्ट आहे हातून निसटून गेलेल्या रिलेशन्सची… आणि पुन्हा नव्याने गवसणाऱ्या प्रेमाची… ही गोष्ट आहे तुमची-आमची… सगळ्यांची… तुमच्या-आमच्या आतल्या वाट चुकलेल्या एका जिप्सीची…!
-
Prasangik Prasad (प्रासंगिक प्रसाद)
उत्तम आणि वाचनीय पुस्तक आहे. पुस्तक वाचताना आपल्याला जाणवेल की हे प्रसंग आणि घटना आपल्याही आयुष्यात कधीतरी घडून गेल्या आहेत. प्रसादजींची भाषा सहज, ओघवती आहे आणि त्यामुळे ते आपल्यासमोर बसून बोलत आहेत,असे वाटते. निरिक्षण उत्तम आहेच पण निरिक्षणाचे लेखन समर्थपणे केले आहे. आपल्या घरात घडणारे प्रसंग, सौभाग्यवतीबरोबर होणारे संभाषण, परदेशातून कधीतरी येणारी कन्या, ती काही दिवसच रहाणार म्हणून जाणवणारी उद्विग्नता, नेहमीच्या कामवाली बाईने दिलेली दुसऱ्या प्रांतातील बदली कामवाली, बुफेमधील गमतीदार प्रसंग, सर्व आपल्या अगदी जवळचं वाटावं,असं आहे. चांगल्या वाचनाच्या शोधात असणाऱ्यांनी हे पुस्तक ( अर्थात विकत घेऊन) जरुर वाचावे आपल्या मित्रमंडळींना काही विशेष प्रसंगी भेट द्यायलाही हरकत नाही
-
Mithak Ani Natak (मिथक आणि नाटक)
लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर लिखित ‘मिथक आणि नाटक’ हे महत्त्वपूर्ण वैचारिक पुस्तक आहे. यामध्ये १९२०पर्यंतच्या मराठी पौराणिक नाटकाचा परामर्श घेण्यात आला आहे. डॉ. तारा भवाळकर यांच्या प्रबंधाचा उत्तरार्ध यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. विष्णुदास भावे यांच्या नाटकांपासून खाडिलकरांच्या पौराणिक नाटकापर्यंतच्या मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण यात स्पष्ट केली आहे. त्यासाठी या ग्रंथात पौराणिक नाटकाची संकल्पना, या नाटकाची आशयवस्तू असलेली पुराणकथा, तिचे स्वरूप, पुराणकथेचा नाटकनिर्मितीशी असलेला अन्योन्य संबंध यांची विस्तृत बैठक उलगडली आहे. प्रारंभीच्या विधिनाट्याकडून नाटकाकडे होत गेलेली ‘नाटक’ या वाङ्मयप्रकाराची वाटचाल लेखिकेने नाट्यवस्तू, नाट्यस्थळ, नट व प्रेक्षक अशा सर्व अंगांनी विशद केली आहे. त्यामुळेच, लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या कक्षा विस्तारणारे हे पुस्तक आहे. मिथकीय समीक्षादृष्टीतून अभिव्यक्त झालेले हे वैचारिक लेखन आहे.
-
Kanganam (कंगनम)
कंगणम् ही पेरुमाल मुरुगन यांची कादंबरी ग्रामीण तमिळ समाजातील लिंग असमतोल आणि त्याचे सामाजिक परिणाम यांवर प्रकाश टाकते. स्त्रीभ्रूणहत्या आणि मुलींची कमी संख्या यामुळे लग्न न होऊ शकलेल्या मारीमुत्तू या पुरुषाच्या जीवनाभोवती कथा फिरते. त्याच्या एकटेपणातून, मानसिक संघर्षातून आणि सामाजिक उपेक्षेतून ही कादंबरी पुरुषप्रधान समाजरचनेतील खोलवर रुजलेल्या समस्या, लैंगिक भेदभाव आणि मानवी वेदना प्रभावीपणे मांडते.
-
Jahanara (जहाँआरा)
शाहजहानची मुलगी जहाँआरा हिच्याबद्दल फारच कमी माहिती आहे. ती सर्व मुघल शाहजाद्यांमध्ये सर्वांत विद्वान होती. कुमारवयातही ती तिच्या सम्राट वडिलांना राज्यकारभार आणि मुत्सद्दीपणाने सल्ले देत असे. आधी आपला पती जहाँगीर आणि नंतर औरंगजेब यांचे कान भरून त्यांना एखाद्या कठपुतळीप्रमाणे नाचवणारी शाहजहानची धूर्त सावत्र आई नूरमहल हिची कारस्थाने हाणून पाडताना जहाँआराने सातत्याने शाहजहान, दारा शुकोह आणि औरंगजेब यांच्यात शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले. पर्शियन, संस्कृत आणि इतर अनेक भाषांमध्ये पारंगत असलेल्या जहाँआराने फक्त कुराणच नाही, तर वेद आणि पुराणांचाही अभ्यास केला होता. एके काळी बंगालच्या उपसागरात सागरी व्यापारासाठी सर्वाधिक जहाजांची मालकीण म्हणून तिची ख्याती होती. तथापि, तिचे आयुष्यही प्रचंड भावनिक उलथापालथीचे होते. राजपूत राजा छत्रसालच्या प्रेमात ती खोलवर बुडाली होती; पण तिचे आजोबा, सम्राट अकबर यांनी नियम घालून दिला होता की, मुघल राजघराण्यात जन्मलेल्या स्त्रियांना प्रियकर असता कामा नये, तसेच त्यांनी विवाहदेखील करता कामा नये. तिने एकाकी राहून आपल्या वडिलांची सेवा करत आणि पानिपत नावाच्या एका प्रामाणिक हिजड्याच्या मैत्रीवर अवलंबून राहूनच आयुष्य व्यतीत केले. सुकुमार यांची जहाँआरा आपल्याला अशी गोष्ट सांगते की, जिचा साक्षीदार पानिपत नावाचा हिजडा आहे. तिच्या वैयक्तिक रोजनिशीतून आपल्याला तिच्या भावांच्या संघर्षादरम्यान तिचे आयुष्य कसे नरकाच्या आगीत होरपळून निघत होते, याचे स्पष्ट चित्रण वाचायला मिळते.
-
Yogini (योगिनी)
"संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार भावंडं म्हणजे, मराठी अस्मितेचा मानबिंदू! त्यांपैकी संत मुक्ताबाई यांच्या जीवनावर आधारित ‘योगिनी’ संक्षिप्त चरित्रात्मक पुस्तक आहे. त्यामध्ये लहानपणापासूनची अल्लड-खेळकर मुक्ता ते संतपदापर्यंत पोहोचलेली ‘योगिनी’ मुक्ता हा संपूर्ण जीवनप्रवास उलगडला आहे. या पुस्तकात मुक्ताईचे अनेक स्वभावपैलू आपल्याला उलगडत जातात. तिच्या प्रचंड विद्वत्तेला लाभलेली मायेची झालरही या पुस्तकात चित्रित होते. या अनुषंगाने अनेक प्रसंग त्यात चित्रित झाले आहेत. मुक्ताईची लहान वयातली प्रचंड समज, विलक्षण बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि परिस्थितीला खंबीरपणे सामोरं जाण्याची क्षमता हे सर्व पैलू पुस्तकातून ज्ञात होतात. तिचा इतर भावंडांशी असलेला अनोखा अनुबंधही लक्षात येतो. या सगळ्यांमधूनच ‘संत मुक्ताबाई’पर्यंतचा तिचा जीवनप्रवास तिची खऱ्या अर्थाने ‘योगिनी’ म्हणून ओळख करून देणारा आहे. तसंच, ‘योगिनी मुक्ता’ म्हणून तिचं चिरंतनत्व अबाधित आहे, हे अधोरेखित करणाराही आहे"
-
Nile Aakash Hiravi Dharati (निळे आकाश हिरवी धरती )
मंगोलिया ! हिमालयापलीकडचा अलांघ्य, अपरिचित प्रदेश. अथांग, हिरवीगार कुरणे. निळेभोर आकाश. गवताळ रानांवर स्वच्छंदपणे चरत असणारे प्राणी. कठोर हवामान. अवघड भूगोल. तरीही अद्भुत इतिहास. तिथल्या पशुपालक-समाजांचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्रज्ञ - लेखकाने केलेली भटकंती
-
Suvarnabhumi Cambodia (सुवर्णभूमी कंबोडिया)
कंबोडिया म्हटलं की, अद्भुत असा मंदिरांचा देखणा खजिना डोक्यांसमोर येतो, पण सुंदर वास्तुशिल्पांबरोबरच कंबोडियाला संस्कृतीचे अनेकविध तरल असे पदरही आहेत, कंबोडिया आणि भारत नागसूत्रानेही बांधलेले आहेत. तो संबंध लेखिका सीधतिनी नूलकर यांनी सोपा करून मांडला आहे. अखंड खळखळणारी मेकींग, तिचे महत्त्व, त्यातील दंतकांबरोबरच जलचरांचे महत्त्व, त्यांचे स्थलांतर व त्याबरोबरच नदीच्या सानिध्यात राहणाऱ्या मानवी जमाती यांचं निसर्गाशी असलेलं जवळचं नातं रंजक आहे. वास्तुकलेचा अप्रतिम नजारा आणि त्याच्याशी संलग्न तीनले सँप है गोडे सरोवर व तरंगत्या गावाची सफर आगळावेगळा अनुभव देते. कंबोडियातील खाद्यसंस्कृतीचा आढावा वेगळा असला, तरी शिरशिरी आणणारा आहे. कंबोडिया ही सर्वांगाने अनुभवण्याची जागा आहे. कंबोडियातील अंगकोरवाट, जलाशये, कालवे हा तपशील, स्थापत्यकला, वास्तुकला आणि नगरविन्यासाच्या अभ्यासाचा भाग आहे. लेखिकेच्या लेखनाचा भर कंबोडियाच्या प्रसिद्ध वास्तुकलेच्या अंगाने ख्मेर व इतर, सांस्कृतिक, आध्यात्मिक, पौराणिक, तात्त्विक व सद्यः परिस्थितीतील जीवनव्यवहार हा आहे. या सर्वांचा भारतीय संस्कृतीशी जोडणारा दुवा अलगदपणे मांडला आहे. लेखिकेचे हे पुस्तक वाचताना त्यामुळेच त्या देशाबद्दलचा, त्या देशाकडे बघण्याचा समतोल दृष्टिकोन जागृत ठेवतो. अंजली कलमदानी (वारसा वास्तू जतन-संवर्धनकार, वास्तुविशारद, नगरविन्यासकार)
-
Kalokhatil Kalokh (काळोखातील काळोख)
`काळोखातील काळोख' या दीर्घ कथासंग्रहातील ग्रामीण भाग, त्यांची राहणी आणि त्यातील भयावह वाटावेत असे प्रसंग शहरी लोकांच्या अंगावर काटा आणणारे आहेत. घडी घडीला चांगल्या-वाईट प्रकाराचे आश्चर्य वाचनातून अनुभवताना एकच विचार येतो की, जर हे सत्यात घडलं अथवा घडत असेल तर, त्या भागातील मानवजातिच्या संवेदनांचं काय होत असेल? या संग्रहात एक ‘चक्रव्यूह’ असतो.. पैसा आणि स्त्री-वासना असते.. शाळेतील मास्तर संस्कारांची उधळण करतो; पण त्याचा बळी जातो. संस्कारांचा `काळोखातील काळोख’ आपल्याला बघायला मिळतो तो स्त्रीयांच्या धंद्यातील चढाओढीत.. स्वत:चा पदर पाडणं आणि दुसर्यांना पाडायला शिकवणं यात प्रत्येक जण धंद्याच्या काळोखात खोल खोल जातो. वैचारिक ज्ञानाची `येल’ सगळीकडे खुंटलेलीच दिसते. ‘दलित’ ही फक्त एक जात? नाही ते एक शाब्दिक शस्त्र आहे व व्यापारी आणि दलित यांच्यातील वादात स्वत:चाही आर्थिक फायदा करून घेणारे गुरुजी हे नावाचे गुरुजी आहेत हेच बरं आहे... चला वाचू या..!