-
Prabhavi Samvad (प्रभावी संवाद)
मुल जन्माला आले की त्याचा आईशी स्पर्शातून संवाद सुरु होतो. हळूहळू शब्द, भाषेचे ज्ञान झाल्यावर संवादाचे क्षेत्र विस्तारते. रोज बोलणारी भाषा अवगत असली तरी प्रभावी प्रभावी संवाद साधने सर्वांनाच शक्य होते असे नाही. त्यासाठी तयारी, सराव करणे गरजेचे असते. बदलत्या युगात जाहिरातबाजीच्या काळात तर संवादा शिवाय पान हलत नाही. सामान्यांपासून अगदी कोणतीही नोकरदार, व्यावसायिक यांना योग्य शब्दामधून प्रभावी संवाद साधने आवश्यक ठरते. यासाठी डॉ. प्रमोद जोगदेव यांनी 'प्रभावी संवाद' मधून संवादकौशल्याचे महत्व विशद केले आहे. संवाद साधण्यापूर्वी काय विचार करायला हवा, दैनंदिन जीवनातील संवादाचे स्थान, संवाद क्रांती, त्यातील अडथळे, विविध स्तरांतील संवाद, संवादकौशल्याची वाढ, आधुनिक संवादाविषयी मार्गदर्शन केले आहे. चित्रपट, नाटक, कथा, यामधील संवादाचे दाखले देत त्यांनी त्याचे महत्व, त्याचा प्रभाव व त्यानुसार संवाद कसा साधावा हे सांगितले आहे
-
Maitra Jeevache (मैत्र जीवाचे)
विदुर महाजन यांचा तरुण मुलगा, मैत्रेय मोटारसायकलच्या अपघातात आकस्मिक हे जग सोडून गेला. तो आघात पचवणंमहाजन कुटुंबास अशक्यप्राय झालं. त्यातून सावरण्यासाठी विदुर महाजन डायरी लिहू लागले. मग सुरू झाला एक शोध - जीवनमृत्यूचा, सुखदुःखांचा, मानवी अस्तित्वाचा व नात्यांचा आणि कलेचाही. तेच हे तत्त्वचिंतनपर ललितलेखन. म्हटलं तर विदुर महाजन यांचं व्यक्तिगत, पण प्रत्येक संवेदनाशील माणसाला अर्थपूर्ण जगण्यासाठी बळ देऊ केल असं.
-
Yene Bodhe Aamha | Aso Sarva Kal || (येणे बोधे आम्
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात सोनोपंत दांडेकरांचे कार्य अविस्मरणीय आहे. तत्त्वज्ञानासारखा विषय अभ्यासून सोनोपंतांनी सामान्य माणसाच्या संस्कृती कारणाशी अखंड नाते जोडले, त्यामुळे वारकरी संप्रदायात वर्तानाचे नवे भान आले. या भानाला पौर्वात्य आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची बैठक देणार्या सोनोपंतांचे रसाळ चरित्र.
-
Vimukta (विमुक्त)
संत्या फारच अस्वस्थ झाला होता. जातपंचायतीचा धमन्याने घोर अपमान केला आहे, असेच त्याला वाटत होते. तेथील सर्वच माणसांत कुजबूज सुरूहोती. एखाद्या हडळिणीकडे बघावे, तसे बायका, मुलं लच्छीकडे बघत होती. लच्छीच्या चेह-यावर मात्र समाधान दिसत होते. संत्या नीट सावरून बसला. खाकरून त्याने घसा साफ केला आणि निर्णय देऊ लागला, "धमन्या व लच्छीनं जातीला काळं फासाचं काम केलंय... जातपंच्यातीचा आवमान केलाय... गुलब्याचं पयसं घेतलं ती घेतलं... आणिक बायकूबी घरात ठिवून घितली... उंद्याच्याला आपल्या जातीत आसच व्हुया लागलं तर... येकमेकांच्या सबदावर कोण सुदीक इस्वास ठिवणार न्हाय.. परत्येक घरातील बाया, माणसं... मनाला यील तसं वागत्याली... ही जातीच्या हिताचं न्हाय... तवा धमन्यानं... आपलं पाल... आशील त्या... सामानसुमानासकट... गुलब्याच्या ताब्यात देवावं... आणिक आंगावरच्या कापडासकट आपल्या बायकु-पोरांस्नी घिवून कुटंबी जावावं... त्येचा आणिक त्येच्या बायकु-पोरांचा जातीशी आता कसलाच संबंध न्हाय." संत्याचा हा निर्णय ऐकताच तेथील सर्व माणसं उठली. लच्छी व धमन्या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन, तेथून शहराच्या दिशेने निघाले. तेथील बायका, पुरुष, मुलं त्या दोघांकडे आवाक होऊन पाहात होती. लच्छी व धमन्याच्या चेह-यावर मात्र वेगळेच तेज चमकत होते. त्यांची मुलं त्यांना बिलगून चालत होती. लच्छी व धमन्या दोघांनीही पालांकडे वा तेथील माणसांकडे ढुंकूनही पाहिले नाही. ते आपल्या जातीच्या आदिम परंपरापासून, दुष्ट रूढींपासून मुक्त झाले होते. जातीच्या, जमातीच्या बंधनांनाच नव्हे तर जाती-जमातीच्या चौकटींना कायमचा रामराम ठोकून, माणूस म्हणून जगण्यासाठी जात होते. त्याच वेळी सूर्य उगवत होता.