-
Balachi Chahul (बाळाची चाहुल)
"केशव तू उगाचच बाऊ करतोस बग. त्यात कठीन काय आहे? माधवरावांच्या पत्नीची रमाबाईची भूमिका तू उत्तम वथावली होतीस. त्या भूमिकेबद्दल तुला बक्षीशही मिळालं होतं.' "श्री हवं ते बक्षिस तुला घे. पण मला या नासत्या भानगडीत अदाकवु नकोस. माला जाऊ देत." "सारखं काय रे पळायला पाहातोस. सिनेमात सुध्हा पुरुष स्त्री पार्ट करताच ना. मग तुला के झाल?" "ए ते नाटक सिनेमातलं वेगळं असतं आणि ते लोकांना ठाउकही असतं. ते त्यांचाकड़े एक विनोद म्हणून पाहतात. पण इथे प्रत्यक्षात करायचयं लोक माझी टर उड़वतील. माझ जीवन बरबाद होइल रे श्री. हयात मला ओढू नकोस आधीच मला नोकरी नाहिये. त्यात माझ्या किशोरीला हे कळलं तर, तर ती मला मिळण्यापूर्वीच सोडून जाईल रे. ही तुझी अफलातून आयडीया तुझ्या जवालाच ठेव. माझं असं हसं करू नकोस रे."
-
Bhramjal (भ्रमजाल)
आपल्या आईच्या चारित्र्यावर कोणी गरळ ओकावी हे त्याला कधीच सहन झाल नह्व्त. पण सत्यही तो नाकारणार नव्हता. सत्य हे होतं की त्याच्या आईचे अशा पुरुषाशी संबंध आले होते की ज्यांच नाव ती कोणालाच सांगू शकत नह्व्ती. पृथ्वीराज चौहान. अतुल, तुझी आई पृथ्वीराज चौहानच्या प्रेमात पडली होती. आपल्या परींन ही गोष्ट कोणाला कळू नये याची ती खटपट करीत होती. पण ही गोष्ट मी ओळखली होती. अतुलन दोन्ही हातान चेहरा झाकला. छाती खुसमाटावी असा एक हुंदका त्यानं दिला. अखेरीस त्याच्या जन्मदात्या आईनेच त्याला फसवले होते. एक गुन्हेगाराचे रक्त त्याच्या अंगात खेलत होते. वान नाही पण त्याचा गुण त्याच्या रक्तात उतरला होता. अतुलने पनावालेले डोळे टिपले. कोणावर दोषारोप करायची वेळ केव्हाच निघून गेली होती. हा चरचरता व्रण सोबत घेउन त्याला जगावे लागणार होते.
-
Tiger Hevan (टायगर हेवन)
वाढती लोकसंख्या, जंगलतोड, वाढत्या लोकसंख्येला अन्न मिळावं यासाठी लागवडीखाली येणारी जमीन अशा मानवनिमिर्त समस्यांमुळे वन्य प्राण्यांचं क्षेत्र कमी होऊ लागलं आणि त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं. हिमालयाच्या पायथ्यापासून ते नेपाळच्या हद्दीपर्यंत पसरलेल्या दाट जंगलाचा आणि जंगली प्राण्यांचा विनाश पाहूनच एकेकाळचे शिकारी अर्जनसिंग यांचं मनपरिवर्तन झालं आणि त्यांनी प्राण्यांच्या रक्षणाकरता अभयारण्यच उभारण्याचं ठरवलं. शिकारी ते संरक्षणवादी असा त्यांचा झालेला विलक्षण प्रवास आणि त्या प्रयत्नांतून झालेली 'दुधवा अभयारण्या'ची उभारणी 'टायगर हेवन'मध्ये आहे. आज दुधवा राष्ट्रीय अभयारण्य दिसतंय ते केवळ अर्जनसिंग यांच्या अथक प्रयत्नांमुळेच. इंदिरा गांधींनी १९७२मध्ये व्याघ्रप्रकल्प व राष्ट्रीय उद्यान जाहीर करण्याआधीची ही कथा आहे. या पुस्तकात लेखक वाचकाला स्वत:बरोबर जंगलात घेऊन जातो. वन्य प्राण्यांच्या सवयी, लकबी, तेथील निसर्ग यांची ओळख करून देतो आणि जंगलसफरीचं अफलातून दर्शन घडवतो. मूळ पुस्तक मराठीतच लिहिलं असावं, असं वाटण्याइतकं ओघवतं भाषांतर विश्वास भावे यांनी केलं आहे. वन्य प्राण्यांचं संरक्षण व संवर्धन म्हणजे केवळ शिकारीवर बंदी नव्हे, तर त्यांचा अधिवास संरक्षित करणे. त्यांना लागणाऱ्या इतर गोष्टी म्हणजे पाणी, भक्ष्याचा पुरवठा, नरमादी गुणोत्तर आणि महत्त्वाचं म्हणजे माणसं आणि गुरांना संपूर्ण बंदी... खरंतर संवर्धन करणे म्हणजे एखाद्या जंगलात माणसाने 'काहीही न करणं'... निसर्ग आपोआप स्वत:ची काळजी घेतो... असं लेखक म्हणतो.
-
Aadpaya (आडपाया)
श्री. बागल यांचा 'आडपाया' हां ग्रामीण कथा संग्रह आहे. ग्रामीण परिसर, ग्रामीण माणूस आणि ग्रामीण कुटुंब व्यवस्था यांच्याशी त्यांच्या कथा निगडित आहेत. या कथा संग्रहातील प्रत्येक कथा वाचल्यावर विसरली जात नाही. ती वाचकाला अस्वस्थ करते, अंतर्मुख करते. गावातल्या मातीत आणि माणसाला रमलेले लेखकाचे भाउक मन अनुभवही अधिक उत्कंटपाने साकाराताना दिसते. लेखकांनी पाहिलेली, न्याहाळलेली, अनुभवलेली, पारखालेली, ग्रामीण मानसे, त्यांचं, जगण, त्यातील त्यांची ओधाताण, तरीही ग्रामीण जगानारी मानसे श्री. बगालांच्या कथांतून व्यक्त होताना दिसतात.
-
Dukhri Nas (दुखरी नस)
हलक्या फुलक्या विषयांची दखल घेत मयुरेश वाटावे या तरुण, होतकरू पत्रकाराने 'दुखऋ नस' नेमकी पकडली आहे. वाटावे यांची शैली कधी उपरोधिक असते टार कधी चिंतानाची गंभीर किनार तिल असते. मात्र उपदेश, संदेश, लोकशिक्षण वा प्रबोधानाचा आव ते आगत नाहित अन् त्यातच त्यांच्या लिखाणाचे मर्म आहे.
-
Gomantak Sanskrutichya Paulkhuna (गोमंतक: संस्कृती
प्रस्तुत पुस्तकाच्या निर्मितिने गोमंताकातील रसिक मराठी वाचाकाना त्यांच्या लोक्संस्क्रुतिचा पुन: प्रत्यय घेता येइल. त्याच्याबरोबर महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रतील जीज्ञासु मराठी वाचाकाना गोमंताकातील लोकसंस्कृतीचा नव्याने परिचय करून घेण्याची संधी मिळेल. प्रस्तुत पुस्तकातील प्रतिपाद्य विषयाला डॉ. फळदेसाइ यानी विविध दृष्टीकोनतुन सदर केले आहे. त्यामद्धे जाशी विविधता आहे तशीच तत्संबंधीच्या भविष्य कालीन गरजाकड़े लक्ष वेधान्याची प्रयत्न आहे. प्रस्तुत पुस्तकांच्या रुपाने गोमंताकाच्या मराठी वाड्मयसृष्टीतील एक मोलाच्या ग्रंथाची भर पडलेली आहे.
-
Shesh-Vishesh (शेष-विशेष)
गंभीर जीवनदृष्टी असणार्या व्यक्तींच्या लेखनात त्याच्या जीवनदृष्टी निखळ प्रत्यय येत असतो. त्याच्या लेखनात आपोआपच ती कळत- नकळत पझारत असते. लिहणार्याला चकवूनसुद्धा ती कधी कधी लेखनात उपस्थित होते. लिहणार्यालाही ती अश्चर्याच्या धक्का देत असते. हे सारे विवेंचन एवढ्याठी की कोणताही लिहिणारा एक कृति करत असतो. त्या कृतीत त्यांची जीवनदृष्टी भूमिका या सार्याची जाणीवपूर्वक उपस्थित असते. लेखकाच्या त्या कृतिवारून तो समाजातल्या कोणत्या वर्गाचा बाजुच्या आहे याचा निर्णय क्षणार्धात लागत असतो. त्याच्या आस्थेच्या परिघचा विस्तार आणि जगण्याचा पैस आकालत असतो.
-
Adhuri Ek Kahani (अधुरी एक कहाणी)
काश्मिरी वातावरण, गूढ तसंच निसर्गरम्य अशी पार्श्वभूमी लाभलेल्यावेद राहींच्या काही कथांचा हा सरस प्रत्ययकारी अनुवाद.