-
Vegali Nazar (वेगळी नजर)
'वेगळी नजर' या रहस्य कथा संग्रहातील प्रत्येक कथेतील स्त्री-पुरुष व्यक्तिरेखा अंतर्यामी काहीतरी विशिष्ट हेतु मनांत बालागुनाच अगदी टोकाची भूमिका घेत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. या कथा वाचतांना वाचक चक्रावून जातो आणि यातील रहस्य उलघदे वाचताच राहतो! यातच प्रत्येक कथेचे रहस्य व यश दडलेले आहे..
-
Travelling To Infinity My Life With Stephen ()
'ब्रीफ ऑफ हिस्ट्री या अडीच कोटी प्रतींच्या विक्रीचा विक्रम केलेल्या शास्त्रीय पुस्तकाचे लेखक प्रोफेसर स्टीफन हॉकिंग. त्यांची पहेली पत्नी जेन हिने या पुस्तकांत त्यांच्या असाधारण वैवाहिक जीवनाचे अंतरंग उलगडून दाखवले आहे. स्टीफन आपल्या बुद्धिबळावर गगनाला गवसणी घालत असताना 'मोटार- न्युरॉन' या मज्जासंस्थाच्या महाभयंकर रोगाचे प्राणघातक हल्ले, मात्र त्याच्या शरीराला जखडून ठेवत होते. आपल्या विकलांग पतीची दिवस- रात्र, अष्टौप्रहर सेवा करणे आणि त्याच वेळी आपल्या वाढत्या कुटुंबाची काळजी वाहणे या दोन्ही कर्तव्यांचा समतोल राखण्यासाठी जेनने केलेले अथक परिश्रम, सोसलेले आघात यांचे तिने अतिशय प्रमाणिकपणे केलेले वर्णन; जे अशा कुटुंब अशा प्रकारच्या रोगाशी सामना करीत असेल त्यांच्यासाठी अतिशय उपयोगी आणि त्यांचे मनोबल वाढविणारे, त्यांना स्फूर्ती देणारे ठरेल. पतीची साधारण प्रज्ञा, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याने पादाक्रांत झालेली यशशिखरे आणि त्यासाठी जेनने स्वतःच्या आंतरिक शक्तीचा दिलेला बळकट आधार यांची ही कहाणी खरोखरच अविश्वसनीय वाटावी अशीच आहे. त्यातून मी अत्यंत निडर अशा प्रमाणिकपणे सांगितलेली आहे. त्यांच्या पंचवीस वर्षांच्या वैवाहिक जीवनाची क्लेशकारक अशा घटस्फोटात झालेली परिणती, त्याच्या सेवेतील एका नर्ससाठी स्टीफनने जेनला दिलेली जेनला दिलेली सोड चिठ्ठी आणि जेनने एका जुन्या मित्राशी केलेला विवाह - या सा-याच प्रसंगातून लेखीकाच्या स्पष्टवक्तेपणाचा प्रत्यय येतो.
-
Shadow Man (शॅडो मॅन)
एफबीआयसाठी स्पेशल एजेंट म्हणून काम करणारी स्मोकी बरेट एकामागून खून करणार्या खुनांच्या माग काढण्यात तरबेज होतो; पण एका खुन्याने मात्र तिचं आयुष्या कायमचं उध्वस्त केलं. तिच्या पतीला आणि मुलीला थार मारून तिच्या चेहरयाबरोबर आत्म्यावरही एक खोल जखम केलि. ज्याच्यासाठी जगायचं; ते सगालं संपलं होतं... आता काय करेल स्मोकी? रिव्होल्वरच्या नळीचा थंडगार स्पर्श ओठांनी अनुभवून; झटकन चाप ओढून सगालं एकदाचं संपवून टाकेल की तिच्या मानगुटीवर रहस्यमय अस्तित्वाची दहशत ठेवणार्या, बुध्हिमान पण विकृत मनोवृत्तिच्या 'त्या सावली' चा शोध घेउन छडा लावेल?
-
Chehare (चेहरे)
'चेहरे' या पुस्तकात फोटोग्राफ्स तर आहेतच त्याचबरोबर किस्से, निरीक्षणे, कॉमेंट्स आणि लेखही आहेत. या पुस्तकात 70 व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. त्यात चित्रपट सृष्टीतील कलावंत तर आहेतच पण जेआरडी टाटा, रतन टाटा असे उद्योगपती, भीमसेन जोशींसारखे दिग्गज गायक, सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर असे जागतिक स्तरावरील खेळाडू आणि सॅम माणेकशॉ यांच्यासारखा सेनानाही आहे. चित्रपट क्षेत्राबरोबरच, उद्योग, कला, क्रीडा, संगीत अशा विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचे मिश्रण "चेहरे'मध्ये बघायला मिळते.
-
Junction (जंक्शन)
शेवटच्या डब्यातून हिरवा झेंडा दाखवणारा गार्ड, गाडीची चिरपरिचित शिट्टी, लोखंडी रुळांचे रस्त्यावर पसरलेले जाळे, अखंड जागे राहणारे प्लॅटफॉर्म आणि निरोपाचे हलानारे हात ! रेल्वेचं हे विश्व तसं आपल्या जवळचं. रेल्वेच्या या ट्रकवरुण धावताना नियतीने बदललेले सांधे स्विकारत, तोच ग्रीन सिग्नल मानून, एकेक स्टेशन ओलांडत, घातातुं चढत, वेड्या वाकड्या वळणांना पार करत जाणार्या एक अवलियाची ही सफ़र! इंजिनाच्या कर्णकर्कश सुरात आपल्या आयुष्याचा सुर मिसलूं आनंदाने जगानार्या या इंजिन ड्राइवरच्या आठवणींचे हे 'जंक्शन'.
-
Shrimati Ramabai Ranade Vyakti Ani Karya (श्रीमती
श्रीमती रमाबाई रानडे - व्यक्ती आणि कार्य - लेखक: माधव श्रीनिवास विद्वांस साहाय्यक सरोजिनी वैद्य - ‘’महाराष्ट्रात जुन्या-नव्या विचारांच्या सर्व हिंदू कुटुंबांमध्ये ज्यांचे नाव पूर्ण परिचयाचे झाले होते, ज्यांची मधुरवाणी, गोड स्वभाव, कडक शिस्त, असामान्य कर्तृत्वशक्ती, पतीवरील असीम भक्ती, रावसाहेब रानडे यांच्या सर्व बाबतीतील ध्येयांशी समरस होण्याची उत्कटेच्छा… इत्यादी गुणांमुळे ज्या सर्वांस आदरणीय झाल्या होत्या, त्या परमपूज्य श्री. रमाबाई रानडे ह्यास 26 एप्रिल रोजी 1924 देवाज्ञा झाली… … पुणे सेवासदनची स्थापना आपल्या घरात करून त्या त्या संस्थेशी एकजीव झाल्या. रमाबाईंच्या सर्व प्रकारच्या सामर्थ्याचा विकास संस्थेच्या कार्यात झाला. इतरांची दुःखे आपलीशी करून ती हलकी करण्याचा प्रयत्न करीत असता, त्यांनी स्वतःचे दुःख बाजूस सारले. … त्यांच्या कार्याचा परिघ वाढत होता, कार्ये वाढत होती, त्याबरोबर त्यांचे सामर्थ्यही वाढत होते. साधारणपणे पंचवीस कर्तृत्ववान माणसांनी जे कार्य सहज व्हावयाचे नाही ते कार्य रमाबाईंनी एकट्याने करून इहलोकीची यात्रा संपविली.’’