-
Sandhivatache Dhukhane (संधिवाताचे दुखणे)
संधिवात म्हणजे काय, याची सविस्तर माहिती देत डॉ. श्रीकांत वाघ येथे या आजारावर काय उपचार करता येतील याची माहिती देतात. संधिवाताच्या आजाराचे स्वरूप, त्याची व्याप्ती याबद्दल शास्त्रीय माहिती देत 21 प्रकरणांमध्ये वाघ या महत्त्वाच्या आजारांकडे लक्ष वेधण्यात यशस्वी होतात. केवळ वाचकांनाच नाही, तर या क्षेत्रातील वैद्यकीय व्यावसायिकांनाही ही माहिती खूप मोलाची ठरेल. या आजारावरील औषधे व त्यासंबंधी घ्यावयाची दक्षता याबद्दल वाघ यांनी स्वतंत्र प्रकरण दिले आहे.
-
Laxmanresha (लक्ष्मणरेषा)
व्यंगचित्रात भारतीय माणसं दाखवायची म्हणजे आर. के. लक्ष्मण यांना मोठा जमावच काढावा लागे. गुजराती, मराठी, केरळी, बंगाली, मद्रासी, पंजाबी अशी वेगवेगळ्या चेहरेपट्ट्यांची, पोशाखांची माणसं काढायला वेळ लागे. व्यंगचित्र सादर करण्याची वेळ गाठण्यासाठी हळूहळू या जमावातील एकेका मंडळींना लक्ष्मण चाट देऊ लागले. अखेर एकच जण उरला. टक्कल असलेला, फुगीर नाकाचा, आखूड मिश्यांचा, धोतर व चौकडीचा कोट घातलेला आणि सदोदित चेहर्यावर भांबावून गेल्याचे भाव असलेला ’सामान्य माणूस’ (कॉमन मॅन). या देशातील कोट्यवधी मूक जनतेचं प्रतिनिधित्व तो करू लागला. लक्ष्मण यांच्या या आत्मकथेत त्यांचीही अवस्था कधी कधी या ’सामान्य माणसा’सारखी होते. कधी त्यांच्या व्यंगचित्रात आकडे लपले आहेत, असं समजून सट्टा खेळणारा व्यापारी त्यांना येऊन भेटतो, कधी न्यूयॉर्कमधील पार्क अॅव्हेन्यू भागात ते रेनकोट घेऊन गेल्यानं त्यांना चुकून मेक्सिकन समजलं जातं, तर एकदा मद्य पार्टीनंतर एवढी गाढ झोप त्यांना लागते की, आयुष्यातला एक दिवस ’कोरा दिवस’ ठरतो! जीवनाच्या कॅनव्हासवर लक्ष्मण यांनी रेखाटलेली शब्दचित्रं, टिपलेल्या घटना त्यांच्या व्यंगचित्रांइतक्याच मिश्कील, खट्याळ, खुसखुशीत आहेत.
-
Gokulgatha (गोकुळगाथा)
पाच लाख म्हशी. दोन लाख गायी. अठराशे कर्मचारी. असंख्य उत्पादक. चाळीस लाख ग्राहक. या साऱ्याचं नांदत कुटुंब म्हणजे कोल्हापूरचा दुधसंघ- 'गोकुळ'. आणि या 'गोकुळ'ला प्रगतीपथावर नेणारा नंदागोप म्हणजे अरुण नरके. सलग दहा वर्ष या संघाचं अध्यक्षपद भूषवणारे अरुण नरके म्हणजेच गोकुळ अन गोकुळ म्हणजेच अरुण नरके असं समीकरण सिद्ध झालेलं. म्हणूनच अरुण नरके यांनी सांगितलेलं आत्मकथन बनलंय, 'गोकुळगाथा'.
-
Lokmanya Te Mahatma (लोकमान्य ते महात्मा)
मान्यवरांचे काही अभिप्राय या ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतला आहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे कार्य त्यांनी एकटयाने पार पाडले, ही बाब खचितच गौरवास्पद आहे. - य. दि. फडके राजकीय इतिहासचित्रणाचा एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे ते पुराव्यांच्या बहुसंदर्भीय पध्दतीच्या मांडणीत! - दिलीप पुरुषोत्तम चित्रे भारतीय इतिहासातील एका तेजस्वी पण तणावग्रस्त कालखंडावर प्रकाशझोत टाकताना एक पूर्णपणे नवा 'पॅरेडाइम' देणारा हा महाग्रंथ फक्त प्रबोधनच करीत नाही, तर विचारी वाचकाला अंतर्मुखही व्हायला लावतो. - कुमार केतकर मानवी जीवनाप्रमाणेच बहुमिती असणाऱ्या इतिहासाचे सर्वांगीण दर्शन घडवणाऱ्या या विशाल ग्रंथाचा आवाका थक्क करून सोडणारा आहे. प्रा. सदानंद मोरे यांनी स्वातंत्र्यलढयातील निर्णायक कालखंडाची मौलिक चिकित्सा करून विलक्षण कामगिरी पार पाडली आहे. - प्रा. जे. व्ही. नाईक 'लोकमान्य ते महात्मा' हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे. - रा. ग. जाधव महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाची लखलखीत सप्रमाण मीमांसा करताना डॉ. सदानंद मोरे यांनी गुंतागुंतीच्या आंतरप्रवाहांची उकल व त्यांचा अनुबंध यांचा सूक्ष्म वेध घेतला आहे आणि महाराष्ट्रात गांधी हेच टिळकांचे राजकीय वारसदार ठरले, ही गोष्ट महाराष्ट्रधर्माला साजेशी व कालसुसंगत झाली, असा निष्कर्ष काढला आहे. - सदा डुम्बरे
-
Brainwaves (ब्रेनवेव्ह्ज)
एक प्रतिभावान शास्त्रज्ञ. त्याने पाहिले एक स्वप्न सर्व विश्वाच्या कल्याणाचे, मानवजातीच्या मंगलाचे, जगातील दुरिताच्या नाशाचे.या स्वप्नपूर्तीसाठी त्याने विज्ञानाची मदत घेतली आणि एक अद्भुत शोध लावला - विचारलहरींवरील नियंत्रणाचा! पण -हा शोध ताब्यात घेतला एका महत्त्वाकांक्षी, स्वार्थी, पाताळयंत्री व्यक्तीने. आणि मग काय घडले? विज्ञानाच्या सामर्थ्याच्या वापराबद्दल विचार करायला प्रवृत्त करणारी कादंबरी.
-
Thaki Ani Maryadit Purushottam (ठकी आणि मर्यादित प
आयुष्यभर केवळ आईची भूमिका निभावली तरीही आई फक्त आईच नसते! आईच्या ठोकळेबाज भूमिका करणारया अभिनेत्रीच्या आत्मचरित्राचं नाटक मांडणारी ही कादंबरी. नाटक पाहताना वाटत की हे खरं आहे आणि जगताना वाटतं की किती नाटकं करतात माणसं. खोटी असू शकते चापून आलेली बातमी आणि खरं असू शकतं एखादं स्वप्नदृश्य. घटना प्रत्यक्षात घडल्यात की कल्पनेत? आपल्या आयुष्यात की दुसरयाच्या? माणसांचं हे बिंब आहे की प्रतिबिंब? सत्य-असत्यामधली धूसर रेषा सारखी हलते का आहे? खरंच का... वास्तव असतं काल्पनिक?