-
Jawaharlal Nehruche Netrutva-Ek Sinhavalokan (जवाह
भारत स्वतंत्र झाल्यावर जवाहरलाल नेहरूंचे पुरोगामी, संवेदनाक्षम आणि द्रष्टे नेतृत्व लाभले म्हणूनच संसदीय लोकशाहीची सुदृढ पायाभरणी होऊ शकली आणि धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था स्थिरावू शकली. या दोन्ही बाबतींतील नेहरूंचे योगदान न विसरता येण्याजोगे आहे. अर्थात काश्मीरचा रेंगाळलेला संघर्ष, चीनबरोबरचा चिघळलेला सीमावाद अशा अनेक समस्यांचे ओझेदेखील त्यांच्या चुकांमुळेच आपल्याला अजूनही वाहावे लागते आहे. तथापि जमाखर्चाचा हिशोब मांडायचाच झाला, तर नेहरूंनी दिलेल्या देणग्यांचे पारडे निश्चितच जड आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या उत्तुंग नेतृत्वाच्या प्रदीर्घ कारकिर्दीचे सिंहावलोकन आहे.
-
Ishwar Dot Kom ( ईश्वर डॉट कॉम )
ही आहे एक धमाल कहाणी . ती घडते देवनगरीत म्हणजे तुमच्या आमच्या सभोवती. आपण डोळे उघडून बघायला मात्र हवं. देव ,धर्म , संस्कृती अन परंपरेच्या व्यापारीकरणात हृदयातला ईश्वर हृदयात हरवतो. उतार आधुनिक काळात तरी आपण विवेक हा तारणहार, समता हा ईश्वर आनं प्रेम ही सर्वात टिकाऊ परंपरा हि त्रिसूत्री मानणार आहोत का? निकोप समाजजीवन अण्णा अन विवेकशील नागरिकत्व डोळसपणे अंगात ?मुरवणार आहोत का ? गमतीजमतीतून नवोत्तर युगातील धर्मचिकित्सा करणारी हसत-हसवत,गुदगुल्या करत वाचकांना विचारप्रवण करणारी कादंबरी
-
Sur-Sangat (सूर-संगत)
गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी या जयपूर अत्रौली घराण्याचा घरंदाज वारसा जपनाऱ्या गायिका. या घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खाँसाहेब यांच्या सहवासात गाणं शिकण्याची संधी धोंडूताईना लाभली. या घराण्याचे चार मातब्बर कलाकार उस्ताद भुर्जी खाँसाहेब, लक्ष्मीबाई जाधव आणि ख्याल गायकीच्या अनभिषिक्त साम्राज्ञी केसरबाई केरकर धोंडूताईना गुरु म्हणून लाभले. संगीताच्या क्षेत्रात ' घराणी हवीत कशाला '? असे सूर उमटत असतानाच्या काळात ' घराणी हवीतच ' असा बाणा जपनाऱ्या आणि जयपूर गायकीची विशुद्ध परंपरा सर्वस्व पणाला लावून पुढे चालवणाऱ्या धोंडूताईनी त्यांच्या गुरुंविषयी आणि सांगीतिक कारकीर्दीविषायी सांगितलेल्या आठवणी म्हणजेच - सूर-संगत
-
He Vishwache Angan (हे विश्वाचे अंगण)
चार दशकांपूर्वी भारतातल्या धूळवाटांतून येऊन अमेरिकेतल्या गगनमहलाला गवसणी घालणाऱ्या मराठी माणसाचे हे प्रांजळ आत्मकथन. वास्तुरचनेतून मानवी आयुष्य सुंदर, उन्नत करण्याचा निदिध्यास, कौटुंबिक एकात्मतेवर प्रगाढ़ विश्वास, स्वतःशीच चाललेला निरंतर संघर्ष अविरत विश्वभ्रमण उत्कट कलासक्ती, उदंड कर्तुत्व दातृत्व यांची प्रतिबिंबं यात दिसतील. नामवंत आंतरराष्ट्रिय विद्यमान वास्तुरचनाकारांच्या मालिकेत अग्रभागी विराजमान झालेले अनिवासी भारतीय सुधीर जांभेकर. मराठी माणसाला अभिमान वाटावी, तरुणाईला प्रेरक ठरावी अशी एका मनस्वी वास्तुरचनाकाराची ही आगळीवेगळी कहाणी. वैयक्तिकतेकडून वैश्विकतेचा रोमहर्षक प्रवास...
-
Romanchkari Railway (रोमांचकारी रेल्वे)
दळणवळणाचं मुख्य साधन म्हणून रेल्वेची निर्मिती झाली. यामुळे व्यापार-उदीम सोपा झालाच,पण प्रवासालाही गती मिळाली. आपल्या माणसामध्ये येण्यासाठी एक वेगवान मार्ग माणसानं निर्माण केला आणि रेल्वे माणसांच्या भावनांशी जोडली गेली. कशी निर्माण झाली ही धूर सोडणारी गाडी, तिचे मार्ग, तिची यातायात, देखभाल. हा संपूर्ण गाडा चालतो तरी कसा. याचं कुतूहल आजही तितकंच आहे, गावं आणि राज्यांमधून देशाला जोडणारी ही रेल्वे अद्याप नवेनवे प्रयोग करतेच आहे. अशा या भारतीय रेल्वेची गोष्ट सांगणार पुस्तक....