-
Yamunatiri anande (यमुनातीरी आनंदे)
सामाजिक विषयांबरोबरच या कथासंग्रहात गूढकथा आणि विनोदी कथा हे दोन प्रकारही समाविष्ट केले आहेत. त्यामुळे हा कथासंग्रह म्हणजे सकाळी उठल्यानंतर देवासाठी फुलं वेचत असताना आपण तबकात बकुळीची सुगंधित फुलं, फारसा वास नसलेली पण नियमित फुलणारी तगर, अजिबातच सुगंध नसलेली पण आकर्षक रंगाची जास्वंद, एखादी दूर्वांची जुडी, तुळशीच्या चार मंजिऱ्या, या सगळ्या स्त्रीलिंगी फुलांच्या जोडीला तो अनंत किंवा तो चाफा अशी आरास रचतो, तसा हा कथासंग्रह विविधरंगी, विविधगंधी आहे.
-
-
Modi 3.0 Avval,Uttung,Abhedya (मोदी ३.0 अव्वल,उत्त
मोदी ३.0 अव्वल ,उत्तुंग,अभेद्य प्रदीप भंडारी अनुवादक - रोहन अंबिके दिलीप राज प्रकाशन पुणे दिलीपराज घेऊन येत आहे.रिपब्लिक भारत, झी न्यूज, इंडिया न्यूज चे ज्येष्ठ पत्रकार, जन की बात चे संस्थापक आणि बेस्टसेलर लेखक प्रदीप भंडारी यांचे नवीन पुस्तक आयोद्ध्या मतदारांचे मर्मस्थळ.२०२४ च्या निवडणुकीचे संपूर्ण विश्लेषण.मोदींचा करिष्मा आणि भारताची पुढील वाटचाल जाणून घ्या.
-
Rang Tya Nabhache (रंग त्या नभाचे)
पुनः प्रत्यय देणाऱ्या आश्वासक कथा डॉ. नितीन करमरकर यांचा पाच कथांचा संग्रह 'रंग त्या नभाचे' या नावाने प्रकाशित होत आहे. याआधी त्यांचा 'समर्पण' हा पुरस्कारप्राप्त कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्या संग्रहातील आणि यातील अशा दोन्ही कथांचा विचार केला तर या कथांची प्रकृती दीर्घत्वाकडे झुकणारी अशी आहे. म्हणजे या कथा एका अर्थाने दीर्घ स्वरूपाच्या आहेत. त्यांना आपल्या कथांमधून जाणिवेपेक्षा अधिक काही वेगळे, अलक्षित असे सांगायचे असते, ते विस्तृत स्वरूपात सांगायचे असते, असे त्यांच्या कथा वाचून ठरवता येईल. मानवी जगण्याचे, सत्याचे दर्शन सर्जनात्मक पातळीवरून घडविणे हा सर्जनशील लेखकाचा धर्म असतो. आणि या धर्माला जगणारे लेखक म्हणून डॉ. नितीन करमरकर यांच्याकडे पाहावे लागते. आपल्याला आलेली अनुभूती ते कथेच्या माध्यमातून सांगता सांगता जीवनाच्या काही अलक्षित, काही लक्षित बाबींकडे, प्रश्नांकडे वाचकांचे लक्ष वेधतात. त्या प्रश्नांची आच आपल्याला कशी आणि किती लागली, याचे पुनःप्रत्यंतर ते आपल्या लेखनातून दर्शविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यामुळे ही कथा आपली वाटते, आपलीशी वाटू लागते. हेच या कथांचे खरे मर्म आहे, असे म्हणावे लागते
-
Ek Patra Aaicha (एक पत्र आईचं)
जगायचे व लढायचे बळ देणारा मध्यमवर्ग ही माझ्या वैचारिक लेखनाची प्रेरणा आहे. सत्त्वपरीक्षेच्या क्षणी मूल्यसंस्कार निग्रहाने जपणारी आई-वडिलांची पिढी मी अनुभवली आहे. गरिबीतही स्वाभिमानाची श्रीमंती मला आई-वडिलांकडून मिळाली. त्यांच्या कष्टांचे सार्थक करणे हीच ईश्वरपूजा, हे मला संतांच्या साहित्याने शिकवले. श्रेष्ठ साहित्यिक, थोर कलावंतांनी मानवतेचा विचार दिला. अपार कष्टाला पर्याय नाही हे सांगणारे चरित्रग्रंथ नंदादीपाप्रमाणे आयुष्यात आले. माझ्या लेखनामागे आणि जगण्यामागे बळ आहे ते त्या चिरंतन मूल्यश्रद्धांचे ! म्हणूनच 'एक पत्र आईचं!' हे माझे पुस्तक खरे तर 'एक पत्र लेखकाचं!' असंही आहे. हे लेखन आपल्या हाती सोपवताना आपणास होणाऱ्या आनंदातून पत्रोत्तर मला मिळणार आहे! आपला प्रवीण दवणे