-
Bhidu ( भिडू )
आयुष्याच्या विविध टप्यांवर मला जे मित्र भेटले, त्यांच्या जीवनातील भयाण वास्तवामुळे अस्वस्थ झालो. काही वेळा प्रभावित झालो. अशा भिडूंची ही जीवनकहाणी ! असेच काही भिडू प्रतिकूल परिस्थितीशी निकरानं झुंजून मार्ग काढत असले, तरी त्यांच्या अंतर्मनातदेखील खोल व्यथा-वेदना आहेत. ही इरसाल मंडळी पूर्वी कशी होती ? आज कुठे आहेत ? त्यांच्या भल्या-बुऱ्या अवस्थेला जबाबदार असणाऱ्या व्यवस्थेचा शोध घेण्याचा हा प्रांजळ प्रयत्न.
-
Kanosa ( कानोसा )
भारतीय समाजात स्त्री-पुरुष संबंध, म्हणजे जीवन-प्रजनन या अतिशय नाजूक, संवेदनक्षम व गुप्त गोष्टी मानण्यात येतात. परंतु डॉ. राणी बंग यांनी केलेल्या या अध्ययनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दोन खेड्यां-मधील स्त्रिया, त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक खाजगी, गुप्त गोष्टी अगदी मनमोकळेपणाने बोलल्या आहेत. त्यांचे हे समज-गैरसमज प्रातिनिधीक वाटतील...
-
Gangal 70 Granthali 35 ( गांगल ७० ग्रंथाली ३५ )
वाचकदिनी प्रसिद्ध झालेला महत्त्वपूर्ण दस्तावेज... दिनकर गांगल यांच्या सत्तरीनिमित्त त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्याविषयी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केलेले लेखन आणि दिनकर गांगल यांची प्रदीर्घ मुलाखत. सोबत, कुमार केतकर यांची प्रस्तावना व अरुण साधू यांची सांगता...
-
Niyatishi Karaar ( नियतीशी करार )
आजपर्यंत जे केलेत, त्यापेक्षा वेगळे काही करू लागलात, तर, आजपर्यंत जे मिळाले, त्यापेक्षा वेगळे काही मिळणार. मानवी धारणांत अंतर्बाह्य परिवर्तन घडून यावे आणि त्यातून समाजाचे सांस्कृतिक उत्थान व्हावे यासाठी ओघवत्या शैलीत केलेले हे परखड प्रतिपादन.
-
Morpis ( मोरपिसं )
‘अमेरिकन’ ही प्रवृत्ती आहे. जगातल्या ज्या ज्या व्यक्तीला आपल्यातला सुप्त शक्तीचा, सद्गुणांचा सर्वंकष उत्कर्ष साधायचा ध्यास आहे ती ‘अमेरिकन’ आहे. जगाच्या पाठीवर कुठेही राहत असा ध्यास घेतलेली व्यक्तीच संपन्न होत जाईल असा प्रभावी संदेश देणारा लेखसंग्रह.
-
Vivekijani Hya Maj Jaagvile
प्र.ब. कुळकर्णी ह्यांनी गेल्या पस्तीस-चाळीस वर्षांत वाचलेल्यांपैकी निवडक मराठी पुस्तकांच्या निमित्ताने केलेले हे लेखन. त्यांनी आजची समाजस्थिती, समाजसुधारणा या संबंधातले वाचन आणि त्यानिमित्तानेही लेखन येथे केले आहे. त्यामधून उभा राहतो याकाळातला विचारपट आणि त्यातले योग्यायोग्य. प्रत्येक सुबुद्ध वाचकास वाचायला आवडेल आणि वाचता वाचा अंतर्मुख करील असे हे वेगळे आगळेवेगळे पुस्तक.
-
Hatya ( हत्या )
एकेकाळचा नक्षलवाद आणि आताचा माओवाद... तर्हा एकच. नक्षलवादी जन्माला का येतात याची अनेक स्पष्टीकरणे वाचली गेली असतील परंतु त्यामागचा भावनातिरेक आणि तत्त्वज्ञानाचा आधार क्वचित कोणी असा उलगडून दाखवला असेल! तरुण पत्रकार मानव जगापुढे सत्य मांडावे म्हणून बंगाली वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश करतो. १९७०च्या दशकात नक्षलवादाचा छडा लावू पाहतो त्याला ज्या प्रकारच्या सत्यास सामोरे जावे लागते त्यामुळे त्याच्या मनात एका बाजूला वास्तव परिस्थितीविषयी आणि दुसर्या बाजूला प्राणीमात्र आणि निसर्ग यांच्याविषयी अनेक प्रश्न तयार होतात व तोच त्याची उत्तरे शोधत जातो.
-
One For Sorrow (वन फॉर सॉरो)
हे पुस्तक म्हणजे लेखिकेच्या आंतरिक ऊर्मीचा प्राजंळ आविष्कार आहे. या लेखनाला एका लष्करी उच्चपदस्थ अधिकार्याच्या पत्नीच्या अनुभवांची पोर्शभूी आहे. यातून लेखिका समाज-शासन यांना काही विचारू पाहते, काही सांगू पाहते, काही मोकळे करू पाहते.
-
Vikasachi Rupresha ( विकासाची रूपरेषा )
अज्ञान व अंधश्रध्दानिर्मूलनातून (एनलाइटमेंट) समाजाला विकासाभिमुख करत, समतेचं शिक्षण देत देश विकसित करण्याकरता समाजशास्त्रज्ञांनी, सामाजिक नेतृत्वानं पुढे यायला पाहिजे, अन् तेही बाह्या सरसावून! मूल्यशिक्षणाची आवश्यकता प्रतिपादन करणारे हे विचार.
-
Sthanabhrashta ( स्थानभ्रष्ट)
मुलांवर अतिविश्वास ठेवणाऱ्या माझ्यासारख्या भोळ्या (बावळट) वृद्धांना त्यांच्या जीवनाची अंतिम वर्षे दुःखात भिजून जाऊ नयेत, यासाठी सावध राहण्याचा मी सल्ला देतो. 'जे न देखे रवी ते देखे कवी' त्याच्यापुढे जाऊन म्हणावेसे वाटते, की 'जे न देखे कवी ते देखे अनुभवी!' म्हणून मला आलेल्या अनुभवांना शब्ददेह देऊन मी जिवंत उदाहरण समाजासमोर ठेवत आहे. हे कथन असले तरी ही कथा नाही. काही स्वजनांच्या बर्यावाईट कृत्यांची नोंद केल्याविना ते सादर होऊ शकत नाही, म्हणून त्यात तशा काही प्रतिक-प्रसंगाचे सविस्तर आलेखन आहे. ते केवळ वास्तवदर्शन घडवण्यासाठी आणि माझ्या सल्ल्यास वजन प्राप्त करून देण्याच्या हेतूने केले आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे स्मरून मी भविष्यातील वृद्धांचे जीवनमान बिघडू नये, या हेतूने ही 'ठेच'; नव्हे, अनेक ठेचा सादर केल्या आहेत. आपल्या मुलांवरील प्रेमापोटी कमी-अधिक चुका प्रत्येकाकडून घडतात, पण या चुकांचा अतिरेक मुर्खपणा ठरतो. आपल्या मुलाची पत्नी वा मुलीचा नवरा यांच्या, आपल्याच मुलांना वश करण्याच्या क्षमतेस कमी लेखू नये. शक्य तो पायाखालची सरावाची जमीन सोडू नये.
-
Khel Sadeteen Takkyancha (खेळ साडेतीन टक्क्यांचा)
कोणत्या माणसांच्या संस्कृतीबद्दल आपण बोलत असतो ? कोणाच्या साहित्यकलांबद्दल आपण बोलत असतो ? मूठभर मंडळी भरल्या पोटाने आपल्याच जगण्या-भोगण्याचे चित्रण करत राहणार. त्यात इतरांना गौरव वाटावा असे काय आहे ? त्यात त्यांनी अभिमान बाळगावा असे तरी काय आहे ?
-
Bharatacha Arthsankalp (भारताचा अर्थसंकल्प)
या पुस्तकात भारतीय अर्थसंकल्पाविषयीच्या ऐतिहासिक माहितीचा पट लेखकाने मांडला आहे. यात अर्थसंकल्पाबाबतच्या काही स्मृती व घटनाही नमूद केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या अर्थमंत्र्यांपासून ते सध्याच्या अर्थमंत्र्यांपर्यंत सर्व अर्थमंत्री आणि त्यांनी सादर केलेले अर्थसंकल्प यांची माहिती तक्त्याच्या रूपात आहे. अशी एकत्रित माहिती वाचकांना संदर्भासाठी उपयुक्त ठरावी.
-
Nondi dayarinantarchya (नोंदी डायरीनंतरच्या )
लोकसत्ता मधील स्तंभामुळे प्रवीण बर्दापूरकर हे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. नंतर हाच स्तंभ बर्दापूरकरांनी "लोकप्रभा" साठी लिहिला त्यावर आधारित हे पुस्तक. मराठवाड्याच्या दूरच्या मागास खेड्यात दारिद्र्याचे चटके सोसून मिळतील ती कष्टाची कामे करीत, रोजगार हमी योजनेवर खडी फोडत विधवा आईच्या पाठिंब्याने शिक्षण घेत आंतरिक ओढीने पत्रकारितेत शिरले. विविध वृत्तपत्रांमधून पणजी-चिपळूणपासून ते पुणे, औरंगाबाद , नागपूर इत्यादी ठिकाणी काम करून त्यांनी लोकसत्ता दैनिकाचे नागपूरचे शहर मुख्य वार्ताहर, मुख्य संपादक व स्थानिक संपादक अशी मजल मारली. तीन दशकाच्या पत्रकारितेच्या आयुष्यातील अनुभव "नोंदी डायरीनंतरच्या" या पुस्तकात संकलित केल्या आहेत.
-
Videshi Khichadi (विदेशी खिचडी)
पुस्तकाच्या नावातून सूचित होते. त्याप्रमाणे हा संमिश्र संग्रह आहे. लेख, लघुनिबंध, प्रवासवर्णन अशा विविध बांधणीच्या लेखनातून प्रकट होतो. जीवनाचे विशाल दालन उघडून दाखवणारा आकृती बंध.