-
Marathi Rajyatale Marathiche Vartman (मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान)
मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान
-
Durg (दुर्ग )
महाराष्ट्रातील विविध दुर्ग यांच्या बद्दल माहिती
-
Chatrapati Shivaji Maharaj - Smrutigranth (छत्रपती शिवाजीमहाराज - स्मृतिग्रंथ)
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या बद्दल समग्र माहिती
-
Sange geeta (सांगे गीता)
* या पुस्तकात प्रत्येक अध्यायाचा गद्यात आणि पद्यात आशय मांडण्याचा, तोही प्रभावीपणे मांडण्याचा उपक्रम आशा भिडे यांनी 'सांगे गीता' या आपल्या पुस्तकात केला आहे. गीतेच्या जीवनोपयोगी तत्त्वज्ञानाचा तळागाळापर्यंत प्रचार नि प्रसार व्हायला हवा, या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि त्याचबरोबर गीता प्रवचनाचा उपक्रमही आरंभला आहे. - लोकसत्ता * घरातल्या सर्वांसाठी 'गीता' तीही साध्या सरळ भाषेत सहज सुलभपद्यात व गद्यात लिहिण्याचे मोलाचे कार्य आशा भिडे यांनी केले आहे. मूळ गीतेशी प्रामाणिकपणा राखून पद्याची शब्द रचना करणे कठीण असते. परंतु आशा भिडे यांना ते सहज जमून गेल्याचे दिसते. गीता आधीचे पूर्वसूत्र व निवेदनही रसपरिपोषक व गीता इतकेच समर्पक आहे. गीता नंतर गीतेवर केलेले भाष्यही वाचनीय आणि मार्गदर्शक आहे. - तरुण भारत * 'सांगे गीता' या पुस्तकात लेखिका आशा भिडे यांनी अध्यायामधला मुख्य आशय गीतरुपाने मांडला असून नंतर सूरस विवेचन केले आहे. इतर देशात भगवंतांचे प्रेषित येतात पण आपल्या भारत देशात भगवंतच अवतरतात या सूत्राला अनुसरून संपूर्ण महाभारतातील श्रीकृष्णाचे गीतापर्व उलगडून दाखवले आहे. व यात नवसंजीवनी देणारे गीता तत्त्वज्ञान हे गीतासूक्त आपल्या अंतविश्वात चैतन्य निर्माण करणारे आहे. नवशक्ती ★ गीतेवर आजपर्यंत अनेक लेखकांनी लिहिले आहे. आशा भिडे यांचे सदर लेखन ही या गीता साहित्यातील महत्त्वाची भर म्हणावी लागेल. विनोबांनी गीताईतून समश्लोकी भाषांतर केले. त्यानंतरही इतरांनी असे भाषांतर केले परंतु अध्यायाचे सार सांगणाऱ्या कविता आजवर वाचनात नव्हत्या. म्हणूनच या कविता हा या ग्रंथाचा विशेष आहे. प्रत्येक गीता प्रेमी वाचकांच्या संग्रहात व शैक्षणिक ग्रंथालयात हा ग्रंथ असायलाच हवा. सन्मित्र * 'सर्व घराघरांसाठी, घरातील सर्वांसाठी' असे एखाद्या जाहिरातीत यावे तसे, परंतु अत्यंत सार्थपणे तसेच असणारे पुस्तक ही आजच्या काळाची गरज आहे. या लेखनाची आधीच्या कोणत्याही लेखनाशी तुलना करू नये. ज्ञानेश्वरी, गीताई यांचे मोठेपण मान्य असले तरी, म्हणूनच 'सांगे गीता'चे यथार्थ प्रकाशन झाले. सामाजिक प्रबोधनाचा योग्य मार्ग चोखाळला गेलाय, त्याबद्दल लेखिका आणि प्रकाशकांचे अभिनंदन - ललित
-
Unbroken (अनब्रोकन)
संदर्भातल्या ठळक बातम्या तुम्ही बाचल्या आहेत, अफवा ऐकल्या आहेत. या साऱ्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रीकडून आता ही कथा ऐका. दि. २५ ऑगस्ट २०१५. इंद्राणी मुखर्जीसाठी आनंदाचा दिवस होता. घरात वाढदिवसाची जय्यत तयारी झाली होती. त्या दिवशी 'आनंद आश्रम' इथून त्या बाहेर पडल्या, तेव्हा मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या साध्या कपड्यांतल्या एका समूहाने त्यांना हटकलं आणि सारं चित्र बदललं. त्यांची मुलगी शीना बोरा हिच्या खुनाचा त्यांच्यावर आरोप होता. बातमी पसरून त्याबद्दलची अधिकाधिक माहिती उपलब्ध होऊ लागली. एका खळबळजनक खून खटल्याच्या तपासात इंद्राणी अडकल्या. संशयितांची यादी झपाट्याने वाढू लागली. एका भयंकर कारस्थानाची ती सुरुवात होती. बातमी सनसनाटी ठरणार होती प्रसारमाध्यमांना रक्ताचा वास आला होता. पाहता पाहता पत्रकार आणि टी. व्ही. अँकर यांच्या निष्ठठुर पकडीत इंद्राणी आल्या. त्यांचं नाव घराघरांत पोहोचलं. पोटच्या पोरीला ठार केल्याचा आरोप, मोडलेले विवाह, शक्तिशाली व्यावसायिक साम्राज्य, श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींचं हेवा करावंसं वाटणारं आयुष्य, सामर्थ्यशाली राजकारणी आणि गुंतागुंतीचं कुटुंब - सारंच होतं. खटला सुरू झाला. त्या संदर्भातल्या बातम्या आणि फोटो टी. व्ही. च्या पडद्यावरून देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले. उलटसुलट बातम्यांच्या आणि चक्रावून टाकणाऱ्या कथेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या या स्त्रीबद्दल लोकांचं कुतूहल दिवसागणिक वाढू लागलं. 'अनब्रोकन' या स्मृतिप्रवासात इंद्राणीने हातचं काहीही राखलं नाही. त्यांचं बालपण गुवाहाटी इथे गेलं, १९९०च्या दशकात त्या कोलकात्यात राहिल्या. पुढे स्वप्ननगरी मुंबईत मीडियाने त्यांना उच्चासनावर बसवलं. त्यानंतर भायखळाच्या तुरुंगात 'कैदी नंबर १४६८' म्हणून त्यांनी २४६० दिवस व्यतीत केले. त्यांचा हा संपूर्ण प्रवास त्यांच्याच शब्दांत, अगदी पहिल्यांदा समोर येत आहे. अत्यंत प्रामाणिकपणे कथन केलेल्या या स्मृतिप्रवासात इंद्राणी मानवी नातेसंबंधांच्या नाजूकपणाबद्दल, फसवणूक आणि शोक यांमुळे वाट्याला येणाऱ्या उद्ध्वस्त झालेल्या जीवनाबद्दल आणि माणसाच्या एकंदरीत काटक लवचीकतेबद्दल बोलतात. इतकं सारं घडूनही त्यांच्यातली स्त्री आजही मोडून पडलेली नाही, आजही ती आहे अभंग अनब्रोकन !
-
Pratyaksha Tatvamasi (प्रत्यक्ष तत्वमसि)
२०१५ मध्ये जेव्हा आय.एस.आय.एस. या अतिरेकी संघटनेने मोसूल शहरातल्या सरकारी ग्रंथालयातील अनेक दुर्मिळ आणि ऐतिहासिक हस्तलिखितांचा लिलाव केला. तेव्हा जगभरातील सरकारी संस्था, गुप्तचर संस्था, संग्रहालये आणि खाजगी संग्राहक रोमांचित झाले. लिलाव झालेल्या हस्तलिखितांमध्ये १८व्या शतकातल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याच्या नोंदी होत्या. त्यात अब्जावधी डॉलर्स किमतीच्या ऐतिहासिक कलाकृतीचे आणि युद्धाची निर्णायक स्थिती बदलू शकणाऱ्या घातक शस्त्राचे वर्णन होते. तसेच जनुकीय अभियांत्रिकीच्या सूत्रांचे वर्णन करणारे सुद्धा एक हस्तलिखित होते. जगातील अनेक संस्थांना माहीत होते की ह्या हस्तलिखितातली कलाकृती अस्तित्वात आहे. त्या सर्व संस्थांना वेगवेगळ्या वेळी 'इम्रीस ओल्डमन' नावाच्या एका व्यक्तीने मदत केलेली असते. आणि तिथून सुरू होतो इम्रीस ओल्डमन या व्यक्तीचा शोध. हा इम्रीस ओल्डमन नक्की कोण ? पृथ्वीराज चौहान, समुद्रगुप्त, महाराजा रणजित सिंग यांच्यासारख्या महान राजांनी आणि बाबर, औरंगजेब, नादीर शाह, अहमद शाह अब्दाली यांच्यासारख्या आक्रमणकर्त्यांनी आणि अगदी ब्रिटिशांनीही पाठलाग केलेली ती ऐतिहासिक वस्तू कोणती ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणारी ही कथा म्हणजे 'प्रत्यक्षं तत्त्वमसि'.