-
Mahamandi Samjun Ghetana (महामंदी समजून घेताना)
आर्थिक संकल्पना नेहमीच क्लिष्ट असतात आणि महामंदीसारखा विषय तर त्याहून जातील असतो असं आपल्यापैकी बहुतेक जणांना वाटत . सहाजिकच महामंदीचा फटका सोसूनसुध्दा त्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी तो बहुदा अयशस्वी ठरतो . २००८ साली सुरु झालेली जागतिक महामंदी नक्की कशामुळे आली , ती दूर करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे होते आणि प्रत्यक्षात काय प्रयत्न झाले , महामंदीचा भारत , अमेरिका आणि युरोप इथं काय परिणाम झाला , या पुढे काय घडण्याची शक्यता आहे , या सगळ्यांविषयीची महत्वाची माहिती जागतिक पातळीवरच्या घडामोडीचे अघ्यायवत संदर्भसहित या पुस्तकात दिली आहे .
-
Osamachi Akher Aani Jeevanala Bhidlela Vidnyan (ओस
साहित्य,कला आणि विज्ञान, माणसाचं माणूसपण सिध्द करणाऱ्या त्याच्या प्रतिभेचे तीन रम्य आविष्कार .तीन वेगवेगळ्या क्षेत्रांमधले . तरीही सर्जनशील नवनिर्मितीचा धागा त्यांना एकत्र गुंफून टाकणारा आहे . असं अजूनही सहसा या तीन क्षेत्रांमध्ये फारसं सख्य , सौहार्द असल्याचं दिसून येत नाही . नवनिर्मितीच्या विविध आविष्कारांमध्ये कृत्रिमरीत्या तयार केलेली हि दरी कायम राहण माणसाच्या सांस्कृतिक विकासाच्या आडच येणारी आहे , पण हि दरी पार करण्याचा चंगच आता वौज्ञानिकांनी बांधलेला आहे . साहित्य, कला ,दैनंदिन जीवन यांच्या अनेक पैलूंचा विज्ञानाच्या नजरेतून वेध घेतला जात आहे . त्यांचाच परिचय ललितगद्यचा धाटणीतून करून देणारा हा लेखसंग्रह .
-
Chandragupt..(चंद्रगुप्त)
हि गोष्ट आहे एका संघर्षाची,जीद्दची आणि देशाचं नशीब बदलणारा माणसाची! माणसाचा अतुलनीय त्यागाची! ज्या ज्या वेळी आता हिंदुस्तान संपला, येथील लोकांना काही भवितव्य नाही अशी हाकाटी सुरु होती त्या त्या वेळी एका नायकाचा जन्म होतो तो अवर्तीण होऊन सार चित्र पालटतो आणि परत एकादा आपल्या मातृभूमीला गतवैभव प्राप्त करून देतो. चंद्रगुप्त हि अशी आख्यायिक निर्माण करणारी व्यक्ती आहे. भगवदगीतेतील परित्राणाय साधूनाम विनाशायच दृष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगेयुगे हि उक्ती सार्थ करणासाठी उदयाला येणारा एका व्यक्तीची हि यशोगाथा आहे.
-
Zulichya Khali (झुलीच्या खाली)
' मानवी जगण्यातल्या विसंगती , गाव -शहरामधील रुंदावत चाललेली खाई जीवनसंघर्षातील घुसमट ,वृत्ती -प्रवृतींच विस्मयकारी रूप या कादंबरीतून लेखक सार्थपणे घडवितो. हे घडवताना त्याची लेखणी माणूस शोधू पाहते . माणूस शोधताना माणसासाठी व्याकूळ होणारी 'झुलीच्या खाली ' हि लक्षणीय कांदबरी आहे . एका शालेय शिक्षकाच्या जीवनावरील कांदबरी . आजच्या शिक्षणसंस्थांतील बाह्य दडपणे, शिक्षणातील तकलुपी नियम , नोकरीसाठी भ्रष्टाचार यांचे चित्रण आत्यंतिक प्रभावीपणे कांदबरीत उमटले आहे . शिक्षण त्याच्या भोवतालचा समाज , कौटुबिक समस्यांचा गिरगिट गुंता आणि शेतीप्रश्नांची नीटस मांडणी केल्यामुळे हि अतिशय प्रत्ययकारी कांदबरी झाली आहे .'
-
Swadesh (स्व..देश)
‘ब्रेनड्रेन’ऐवजी ‘ब्रेनगेन’ सुरू झाला आहे. अनेक अनिवासी भारतीय भारतात परतू लागले आहेत. त्यात मराठी माणसे आलीच. अशा पंचवीस, घरट्यात परतलेल्या व्यक्तींनी आपल्या कहाण्या या पुस्तकात कथन केल्या आहेत. त्यांचे विश्व वेगळेच आहे . त्यांना आपल्या या जगाशी जुळवून घ्यायचे आहे . त्यांचा तो प्रयास कहाण्यांमधून स्पष्ट दिसतो … … आणि म्हणूनच बहुधा त्यांचा एक प्रतिनिधी आणि या पुस्तकाचा संपादक भूषण केळकर म्हणतो , ''आपण भारतातील रहिवासी असू , अनिवासी भारतीय (NRI) असू वा Nest Returned Indians,आता , आपली 'नर्मदापरिक्रमा ' महाराष्ट्रात सुरु झाली तरी ती खऱ्या अर्थानं पूर्ण होणार आहे मिसिसिपी , कोलोराडो , नाईल, होहँगहो ,टेम्स आणि डॅन्यूबच्या पत्रांत ! या नव्या साप्तगंगांच्या जलोघन महाराष्ट्राच्या अन पर्यांयान भारताच्या यशाचा अभिषेक सिध्द करण्यास आपण सर्वांनीच एकोप्यान काम करायला हवं!''