-
Sahavas (सहवास)
कॉलेजजीवनात आणि 'आकशवाणीवर'वर कार्यरत असताना कृ.द. दीक्षितांना जी गुणी,कलावंत माणसे भेटली. त्यांच्या सहवासात आलेल्या हृद्य, स्मरणीय अनुभवांना दिलेले 'सहवास' हे शब्दरूप आहे. ह्यात राजकीय नेते,सुरेल गायक,प्रतिभावंत संगीतदिग्दर्शक,थोर साहित्यिक आणि कर्तबगार अधिकारी व सहकारीही आहेत. गुणग्राही दीक्षितांनी आपल्या रसपूर्ण, वेधक शैलीत हि व्यक्तिचित्रे वाचकासमोर जिवंत उभी केली आहेत. ब्रिटीश काळापासूनची 'आकाशवाणी'ची कार्यपद्धती आणि तिच्यात झालेला बदल जाणून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चितच महत्वाचे ठरेल.
-
Ambedkaranche Satyagraha Ani British Sarkar (आंबेड
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रह चळवळीच्या संदर्भात सरकारची प्रशासकीय भूमिका कशी होती? किंवा डॉ. आंबेडकर ब्रिटीश धार्जिणे होते का? अशा स्वरूपाच्या उपस्थित होणारया प्रश्नांचा उकल होण्यासाठी ब्रिटीश सरकारच्या फौजदारी तसेच मुलकी अधिकारी यांच्या गोपनीय अहवालाच्या (कागदपत्रांच्या) आधारे लिहिलेला मराठीतील एकमेव ग्रंथ.
-
Ucchad (उच्छाद)
संस्थांनी कारभारातल्या कपट- कारस्थानांमुळे आयुष्य उध्वस्त झालेल्या सल्लागार चिटनिसांच्या - देसाईंच्या मुलाची 'उच्छाद' ही हृदयद्रावक कहाणी. चित्रकार आणि गुप्तहेरकथालेखक असलेला श्री कोवळ्या मनात बसलेल्या मानसिक धक्क्यांनी मनोरुग्ण झाला आहे. आत्मविश्वास आणि सहानुभूती ह्यांच्या अभावाने त्याचे आयुष्य भरकटलेले. कधी निराश तर कधी नको एवढे आक्रमक असे हे व्यक्तिमत्व मुलतः सत्प्रवृत्त आहे. त्याच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींच्या वर्तनाचा पाया लैंगिक अनुभवांत, असमाधानात किंवा विकृतीत दडलेला आहे. त्र्यं. वि. सरदेशमुखांचा सखोल मनोविश्लेषण करण्याचा प्रत्यय 'उच्छाद' या कादंबरीत येतो.
-
Vichar Vilasite (विचार विलसते)
आजवरच्या वाचनातून, चिंतनातून आणि अल्पजीवी अनुभवातून मला विचार मिळाले. विचार आले तसे ते तुटक अनुभव लुप्त झाले. तपशिलांप्रमाणे बरेच विचारही गहाळ झाले; परंतु त्यांनी आपल्यातील सार शिल्लक ठेवले. विचार गेले पण सरणी राहिली. व्यवहारात या तत्वांना मी माझी मते म्हणतो. ही प्रमेये चिरंतन आहेत. त्यांनी माझ्या मनाची व जीवनाची घडण केली आहे. यांनीच माझ्या अस्मितेला आकार दिला आहे. ही तत्वे आणि त्यांच्याभोवती गुंतलेल्या व गुरफटलेल्या माझ्या भावना हे माझ्या जीवनाचे मर्मबंध अहेत. त्यांच्या बळावरच मी जगात आहे.