-
Jagacha Etihas Ek Drushtikshep (जगाचा इतिहास एक दृ
गेल्या दोनशे ते अडीचशे वर्षांच्या काळात जगाच्या इतिहासात घडलेल्या महत्वाच्या घटनांचा सदर पुस्तकात मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या कालावधीत अमेरिका व युरोपात अमेरिकेची क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, नेपोलियनचा उदय, शीत युद्ध, सोविएत संघाचे विघटन आदी ठळक घटना घडल्या. यातील घटना अठराव्या, एकोणिसाव्या व विसाव्या शतकात घडलेल्या आहेत. या घटनांविषयीची माहिती व त्यांचे जगाच्या इतिहासातील महत्व वाचकांना कळावे या दृष्टीने या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे. हे पुस्तक सामान्यवाचक, अभ्यासक, शिक्षक, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. या पुस्तकात नमूद केलेल्या घटनांचा परिणाम जगाच्या इतिहासावर कळत नकळतपणे झालेला आढळतो. त्यामुळे या घटनांचा अभ्यास करणे उपयोगी ठरणार यात वाद नाही.
-
Talkies Chi Goshta (टॉकीज ची गोष्ट)
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण पूर्वीचे फिल्म दीवाने आपण कोणता पिक्चर कोणत्या थिएटरमध्ये किती पैशाच्या वा रुपयाच्या तिकीटात एन्जॉय केला याही आठवणीत रमत. मी गिरगावात लहानाचा मोठा होताना दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सचा हुकमी 'स्टॉलचा पब्लिक ' होतो. मिडियात आल्यावर यातील काही चित्रपटगृहात मिनी थिएटर असल्याचा अनुभव घेतला. थिएटर डेकोरेशनपासून चित्रपटाचे यशापयश यात या 'मेन थिएटर'च्या गोष्टी खूपच रंजक. अशाच कुलाब्यापासून ताडदेवपर्यंतच्या थिएटर्सचा इतिहास जाणून घेतला, अनेक थिएटर्स इंग्रजकालीन आहेत, अनेक आठवणी देत बंदही पडली आणि याच थिएटर्सचे माझे बहुरंगी, बहुढंगी अनुभव म्हणजेच हे 'टॉकीजची गोष्ट' पुस्तक. आपल्यालाही आपल्या आठवणीत नेण्याचा प्रयत्न.
-
Madam Commissiner (मॅडम कमिशनर)
‘प्रामाणिक, सक्षम, निष्पक्ष योद्धा’ ज्युलिओ रिबेरो ‘लक्षवेधक’ ट्रिब्यून ‘सिस्टीम समोर धडाडीने उभी राहिलेली पहिली महिला पोलीस अधिकारी’ शोभा दे ‘एक अद्भुत, निराळी कथा’ सायरस ब्रोचा ‘वाचायलाच हवे, असे महत्त्वाचे पुस्तक’ इंडियन एक्सप्रेस भारतातील सर्वांत प्रामाणिक, निडर पोलीस अधिकाऱ्यांपैकी एकाची अतुलनीय गाथा भारताच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीमधून पदवी प्राप्त करणाऱ्या मीरां चढ्ढा बोरवणकर या १९८१च्या बॅचमधील एकमेव महिला. अकादमीतून बाहेर पडल्यावर आपल्या कारकिर्दीत कित्येक संवेदनशील आणि वादग्रस्त प्रकरणांची एक लांबलचक मालिका त्यांनी अनुभवली. भ्रष्टाचार आणि भेदभाव यांना तोंड देत, विविध गुन्ह्यांसाठी एकत्रितपणे लढा देत असताना त्यांनी आपल्या आंतरिक सचोटीशी कधीही तडजोड केली नाही. अंगभूत कौशल्यांबरोबरच सातत्यपूर्वक प्रयत्नांमुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला जिल्हा पोलीस प्रमुख, तसेच पहिल्या महिला पोलीस आयुक्त बनल्या. त्यांनी ‘सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ आणि मुंबईच्या क्राईम ब्रँचमध्ये वरिष्ठ भूमिकाही सांभाळल्या. अखेरीस ‘ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’, ‘नॅशनल क्राईम अँड रेकॉर्ड ब्युरो’च्या महासंचालक म्हणून त्या निवृत्त झाल्या. कायद्याचे राज्य स्थापन करण्याच्या ध्येयाने प्रेरित असलेल्या मीरां, या देशाच्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेवर टीका करण्यास कधीही डगमगल्या नाहीत; प्रसंगी देशातील वरिष्ठ पदांवरील व्यक्तींनाही त्यांनी थेट आव्हान दिले. भारतीय कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आपल्या छत्तीस वर्षांच्या कारकिर्दीत मीरां यांनी कित्येक खळबळजनक प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे. जळगाव सेक्स स्कँडल, दागिन्यांच्या पेढीवरील लूट, महामार्गावरील दरोडे, जातीय दंगली, क्रूर हत्या, सामूहिक बलात्कार, बंदरातील चोरी, आर्थिक फसवणूक, इथपासून ते छोटा राजन, दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर यांसारख्या कुख्यात गुन्हेगारांशी त्यांची चकमक झडली. राज्य कारागृह प्रमुख या नात्याने, संजय दत्तचा तुरुंगवास, तसेच अजमल कसाब आणि याकुब मेमन यांच्या फाशीची देखरेख करताना त्यांनी आक्रमक प्रसारमाध्यमे आणि सरकारी दबाव यांचा अविचलपणे सामना केला आणि त्याद्वारे खाकी परिधान करण्याचे महत्त्व आणि त्यातील आव्हाने, दोन्ही अधोरेखित केले. चित्तथरारक अनुभूती देणाऱ्या, अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या आणि अखंड प्रेरणा देणाऱ्या या प्रामाणिक ‘मॅडम कमिशनर’चा हा जीवनपट म्हणजे भारतीय पोलीस सेवेतील एका महिला अधिकाऱ्याची संस्मरणीय यात्रा आहे. युनिफॉर्ममध्ये स्वारस्य असलेल्या सर्वांनी, तसेच कायदा-सुव्यवस्थेबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येक सुजाण नागरिकाने हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.
-
Jijamata (जिजामाता)
जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ ला सिंदखेडराजा या मेहकर तालुक्यातील व बुलढाणा जिल्हातील गावात झाला. यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे म्हाळसाबाई आहे.
-
Soulmate (सोलमेट)
सातासमुद्रापार राहणारा, २/३ वर्षातून कधीतरी फक्त ३/४ दिवसांसाठी भेटणारा, कधीही फोन म करणारा असं एक कुणी माझ्ह्यासाख्या मध्यमवर्गीय स्त्रीचा सोलमेट असू शकतो ? केवळ तोकडे कपडे घातले म्हणजे आम्ही मुली यांच्यासाठी उपलब्ध असतो का ? पण मग आईवडिलांनी मुलांची काळजी करायचीच नाही का ? कोण चूक आणि कोण बरोबर ? काहीही असले तरी आयुष्यातली सुरवातीची १३-१४ वर्ष आम्ही एकत्र काढली आहेत. आता आयुष्याच्या उत्तरार्धात हा एकटेपणा सहन करण्यापेक्षा तिला परत घरी बोलावून तिच्याबरोबर राहायला काय हरकत आहे ?
-
Sath Sath-The Silent Defenders (साथ साथ-द सायलेंट
Nation First, Duty First या आपल्या योद्ध्याने घेतलेल्या शपथेला मनापासून साथ देणं सैनिकपत्नीला जमलं तरच संसार सुखाचा होतो. आपल्यापेक्षा महत्त्वाचं, त्याच्या आयुष्यात आधीच काहीतरी आहे हे जाणणं आणि त्याबद्दल प्रेम, आनंद आणि अभिमान असणं हे खूप महत्त्वाचं. किंबहुना त्यामुळेच अधिकाधिक स्वतंत्र आणि खंबीरपणे एकटीने निर्णय घेणं आणि निभावणं हे जमू लागतं. कारणपरत्वे, न डगमगता काही दिवस, महिने किंवा काही वर्षांसाठी देखील एकटे राहणे, इतर कोणाच्या मदतीशिवाय आणि एकत्र असतानाही रोजच्या दिनक्रमात त्याला गृहित न धरता आपल्या मुलाबाळांसकट स्वतःचीही सकारात्मक वाढ करणे हे प्रशिक्षण होत जाते. म्हणूनच सैनिकांच्या पत्नींना army behind army, Silent Ranks, Rear Guards, Silent Defenders अशी अनेक संबोधने दिली जातात ती अगदी समर्पक वाटतात.
-
Tumchi Jaat Kay (तुमची जात काय)
कवितेचा 'आदिबंध' जपणारे जे काही निवडक कवी आहेत, त्यामध्ये शरणकुमार लिंबाळे यांचा समावेश करावा लागतो. त्यांच्या या पाचव्या संग्रहातील अवकाश 'खोलवर प्रतिक्रियात्मक' असा आहे. त्याचे रूप वर्तमानी आहे. वर्तमानात आपल्या प्रतिक्रियात्मकतेला घेऊन उभे राहणे आणि तत्त्वज्ञानाला सांस्कृतिक व्यवहारातील जागा उपलब्ध करून देणे हे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या प्रतित्यसमुत्पाद सिद्धान्ताचे मुख्य लक्षण. या कवितेतील आशयसूत्राचा मुख्य धागा तोच आहे. ही कविता आत्मचरित्रात्मक वाटत असली तरी फॅसिस्ट जातीय प्रवृत्तींबरोबर दोन हात करतानाचा स्वर मात्र समताधिष्ठित आहे. ८०-८५ नंतर मराठी कविता म्हणून थेट हिंदी कविता लिहिणाऱ्या अनेकांना लिंबाळे यांची ही कविता अनुकरणीय वाटायला हवी, असा ऊर्जास्त्रोत तिच्यात आहे.
-
Tisarya Parvakade (तिसऱ्या पर्वाकडे)
गेली साडेनऊ वर्षे भारतात 'मोदी पर्व' सुरू आहे. या काळात मोदींनी परराष्ट्र संबंध, सीमा सुरक्षा, ईशान्य भारतातील राज्यांच्या समस्या, सुरक्षा दलांतील सुधारणांबरोबरच गेली सत्तर वर्षे रखडलेले ३७० कलम, तोंडी तलाक यांसारखे प्रश्नही सोडवले. महिलांसाठी भरघोस काम, गरिबी, बेरोजगारीच्या क्षेत्रांतील आशादायक काम, शेतकऱ्यांच्या जटिल समस्यांचे निराकरण, यांबरोबरच शिक्षण, दळणवळण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्येही देशाच्या प्रगतीचा रथ सुसाट वेगाने धावतो आहे. या वेगाला आणखी एका पर्वाची संधी मिळाली, तर ती नक्कीच 'सुवर्णसंधी' ठरेल!
-
Maurya Chandragupta Te Samrat Ashok Parshwabhumi G
चंद्रगुप्त ते सम्राट अशोक पार्श्वभूमी, गाथा आणि वार इ.स.पूर्व ३२४ ते इ.स.पूर्व १८५ या काळात मौर्यांनी संपूर्ण भारतीय उपखंडावर कार्यक्षमतेने आणि राज्यववस्थापनातील कौशल्याने राज्य केले. ख्रिस्त-पूर्व सहाव्या शतकातील मगध साम्राज्याच्या उद्यापासून सुरुवात करून हे स्पष्ट विवेचक पुस्तक मौर्यांच्या काळातील नाट्य, मौर्यांच्या राजकारणातील कुटिलता, आणि गुंतागुंत चित्रित करते. मौर्य साम्राज्याचा पहिला, गूढ राहिलेला राजा चंद्रगुप्त याच्यापासून सुरुवात होते आणि चंद्रगुप्त याच्यापेक्षा अधिक गूढ म्हणून राहिलेला, चंद्रगुप्त याचा मार्गदर्शक / गुरू चाणक्य / कौटिल्य याचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे. चंद्रगुप्त याचा मुलगा आणि वारस बिंदुसार हा मौर्य.