-
Osamachi Akher Aani Jeevanala Bhidlela Vidnyan (ओस
साहित्य,कला आणि विज्ञान, माणसाचं माणूसपण सिध्द करणाऱ्या त्याच्या प्रतिभेचे तीन रम्य आविष्कार .तीन वेगवेगळ्या क्षेत्रांमधले . तरीही सर्जनशील नवनिर्मितीचा धागा त्यांना एकत्र गुंफून टाकणारा आहे . असं अजूनही सहसा या तीन क्षेत्रांमध्ये फारसं सख्य , सौहार्द असल्याचं दिसून येत नाही . नवनिर्मितीच्या विविध आविष्कारांमध्ये कृत्रिमरीत्या तयार केलेली हि दरी कायम राहण माणसाच्या सांस्कृतिक विकासाच्या आडच येणारी आहे , पण हि दरी पार करण्याचा चंगच आता वौज्ञानिकांनी बांधलेला आहे . साहित्य, कला ,दैनंदिन जीवन यांच्या अनेक पैलूंचा विज्ञानाच्या नजरेतून वेध घेतला जात आहे . त्यांचाच परिचय ललितगद्यचा धाटणीतून करून देणारा हा लेखसंग्रह .
-
Aagishi Kheltana (आगीशी खेळताना)
उत्तर प्रदेशातील नऊ सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेले हे लेखन आहे. त्यातील दोघी जनी पहिल्या फळीत, तर सात जणी गाव पातळीवर क्षेत्रकाम करणाऱ्या. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे या लेखनाला वेगळे परिमाण लाभले आहे. खूप वेगळे अनुभवविश्व त्यातून प्रगट होते. स्त्रीविषयक अनेक प्रश्न यांतून उपस्थित होतात. चळवळीतील कार्यकर्त्या स्त्रियांचे जग, त्यांची सामाजिक स्थिती, वैचारिक आंदोलने, स्वयंसेवी संस्था असे वेगळे जग समजते. 'आम्ही अबला नाहीच, पण अडाणी विचारशून्य याचकही नाही, ' हा विचार या स्त्रियांच्या लेखनातून समोर येतो. बोलीभाषेचा वापर, साधी - सोपी मात्र आशयगर्भ भाषा ही लेखनाची वैशिष्ट्ये आहेत.लेखिका कविता महाजन यांनी केलेला अनुवाद मूळ लेखन वाटावा एवढा सरस!
-
Natakvalyache Prayog (नाटकवाल्याचे प्रयोग)
हे एका नाटकवाल्याचे प्रयोग नाटकाचे प्रयोग आणि जगण्याचे प्रयोग. समाजाच्या आणि नाटकाच्या गाभ्यापर्यंत जाण्याचे प्रयोग नाटका इतकाच जिवंत आणि रसरशीत अनुभव.
-
-
Superhero-Dr.Prakash Aamte (सुपरहिरो- डॉ. प्रकाश आ
जिथे रस्ते नव्हते,वीज नव्हती,एव्हडंच काय,पण रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या साध्या सुविधाही नव्हत्या, अशा हेमलकशासारख्या अतिशय दुर्गम आदिवासी भागात जाण्याचा निर्णय डॉ. प्रकाश आमटे यांनी आपल्या वडिलांना -बाबा आमटे यांना- दिलेल्या शब्दाखातर, आयुष्याचं ध्येय म्हणून घेतला. हेमलकशाच्या आजूबाजूला असलेलं जंगल,जंगलातले विंचू, साप,अस्वल आणि जंगली प्राणी ,आदिवासींच भीषण दारिद्र्य आणि कुपोषण,भाषेचे प्रश्न अशा अनेक अडचणींची मालिकाच डॉ. प्रकाश आमटे यांच्यापुढे होती. तरीही हि दुर्गम वाट स्वीकारत पुढे जाणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे यांच्या अथक प्रयत्नांमधून आज हेमल कशात शाळा सुरु झाली. हॉस्पिटल उभारलं गेलं,शेती पिकू लागली आणि जे आज जगाच्या नकाशावर ठळकपणे आपली ओळख दाखवू लागलं आहे. डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याची दखल राष्ट्रीयत्व नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आणि त्यांच्यावर 'मगसेसे' सह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा वर्षाव झाला. मानवतेचा ध्यास घेतलेले डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या प्रत्येक पावलावर साथ देणाऱ्या डॉ. मंदा आमटे यांनी हेमलकशातले आदिवासी आणि तिथले वन्य प्राणी यांच्या आयुष्यात नंदनवन फुलवलं. म्हणूनच तर ते ठरतात सर्वार्थानं 'तुमचे आमचे सुपरहिरो!'
-
Udya (उद्या)
संख्या,सर!दोन अब्ज माणसांचा देश आहे. मी फक्त सर्वेलन्सच पाहतो, तरी आपण खूप कमी पडतो. आज कोणतीही फ्रेम पहा. नव्वद-पंच्याण्णव टक्के रागात,ताणात! आपण मेगा,टेरा,गिगा करत प्रचंड माहिती जनरेट करतो. ती तपासायचे प्रोग्राम्स रचतो. ते सांगतात नव्वद-पंच्याण्णव टक्के संभाव्य गुन्हेगार! अशा इंटर्नल कॉम्पिटीशननं सगळे तेजतर्रार राहतात. एकूण प्रोसेसच लीन आणि मीन होते. मज काई पाते नाई. आता मीन बोल्ल तं मतलब होते हरामी! आपल्या माणसानं कडक्या रोड्पनात जावं , स्वभावानं हरामी व्हावं. काऊन? चाकं पिल्लाच्या दोन्ही बाजूंनी गेली. तीही योजना पूर्वक नाही, तर सहज. पिल्लू उठून आईकडे पळाल. आज, आत्ता वाचलंही , उद्या...