-
Aisa Dustar Sansar
मनुष्य रोज भोवताली अनेक गोष्टी पाहत असतो, ऐकत, वाचत असतो. त्यातून त्याचे आयुष्य पुढे चाललेले असते. जीवनात येणारे अनुभव, आठवणी यातून माणसाच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न भारत सासणे यांनी ‘ऐसा दुस्तर संसार’मध्ये केला आहे. यातील सात दीर्घकथांमधून विविध स्तरातील माणसांचे झगडणे, जीवनात पुन्हा उभे राहणे व भोवतालच्या परिस्थितीतून जगण्याचे मार्ग शोधणे हे व्यक्त होते. यात त्यांनी वेगळे प्रयोग केले असल्याने वाचकाला नवीन काही वाचायला मिळते.
-
Sattantar
काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच, तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते. तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो. ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात. संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात ज्याना शस्त्रास्त्र माहीतच नसतात, ते सुळे, नख वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.
-
Gotavla (गोतावळा)
लेखकाच्या सहवासात आलेल्या आणि लेखकाला भावलेल्या व्यक्तींचा खास `कणेकरी’ शैलीत घेतलेला परामर्श
-
Veena's World-Of Beet Southeast Asia (वीणा'ज् वर्ल
बौद्ध संस्कृती व परंपरांचं जतन करणारा पॅगोडांचा देश म्यानमार (बर्मा), कोणत्याही युरोपियन राजवटीपासून स्वतंत्र राहिलेला आणि आज मनोरंजनाचा खजिना ठरलेला थायलंड, रेनफॉरेस्टस्पासून ते आधुनिक शॉपिंग मॉल्सपर[...]
-
Punyachi Apurvai (पुण्याची अपूर्वाई)
ओतुर या लहानशा बिनबिजलीच्या गावाहून मी झगमगत्या पुणे शहरात आलो. डोळे दिपले. पाय घसरले तरी सावरलो. नंतर खूप विद्वान भेटले, कलावंत भेटले. त्यांनी खूप शिकवलं. पण खरा रमलो ते पूर्व भागातल्या कारागिरांच्या जगात. त्या साध्यासुध्या मळक्या कपड्यांतल्या, धुळीने भरलेल्या लोकांनी ओढलेच मला त्यांच्यात. त्यांच्या कामातली मग्नता खूप आवडली. आणि एकमेकांशी असलेली संलग्नताही. नंतर कुतूहलाने भरलेले डोळे पुण्याच्या आणखीही काही भागांवरून फिरले. या सगळ्या जागा होत्या; तशी त्यातली माणसेही होती. आजच्या अफाट वाढलेल्या पुण्यात मी माझं पुणं असं जपून ठेवलं आहे.
-
Not Only Potels (नॉट ओन्ली पोटेल्स)
गुजराथी माणूस बिझनेसमध्ये हमखास यशस्वी होतो. इथे आणि परदेशातही! ह्याचं कारण काय? शोभा बोंद्रे ह्यांच्या साध्या सोप्या ओघवत्या शैलीतल्या चार सत्यकथा!
-
Tuesday's With Morrie (ट्युसडेज विथ मॉरी)
ALS नावाचा दुर्धर आजार जडल्यानंतर प्रा. मॉरी अतिशय शांतपणे आणि धैर्याने वास्तवाला सामोरे जातात. मृत्यूची चाहूल लागल्यानंतर त्यांच्यातला शिक्षक जास्त सजग होतो आणि स्वानुभवाच्या आधारे आयुष्याचं तत्त्वज्ञान ते आपल्या विद्यार्थ्याला सांगतात. प्रा. मॉरी श्वार्टझ् आणि त्यांचा विद्यार्थी मिच अल्बम यांच्यातील सुंदर, निर्लेप नात्याचा प्रत्यय देणारी कादंबरी.
-
K Five
कोकणातून प्रथमच मुंबईत आलेल्या कोवळ्या, भाबड्या, लाजर्या सुंदर फुलराणीची – जुईलीची. हिंदुस्तान बेचिराख करण्यासाठी पाकिस्तानातून मुंबईत आलेल्या ‘राकट, दणकट, विकृत, प्रशिक्षित अतिरेकी रहिमतखानाची.भारतीय कमांडो युनिट कोब्रा थर्टीनच्या निर्दयी, भावनाहीन, मानवी कत्तलखाना असलेल्या कमांडो के फाईव्ह याची.... दंगलीच्या पार्श्वभूमीवरील मन गोठवून टाकणार्या थरारनाट्याचा पुन:प्रत्यय तितक्याच दाहकतेने देणारी, संवेदना गोठविणारी विलक्षण कादंबरी....
-
Dhage Aadave Ubhe
ज्या ज्या वेळी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी मनात विचार येतात, त्या वेळी मी हे मानवसमूह नजरेसमोर आणतो; आणि त्या विचारांची स्वतःलाच लाज वाटू लागते. मी एखाद्या यंत्रमाग-कामगाराच्या पोटी जन्मलो असतो आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून वही-फणीच्या कामाला जुंपलो गेलो असतो, तर? किंवा कामाठीपुर्यातल्या एखाद्या वेश्येपोटी जन्मलो असतो, तर? या समूहांमध्ये जन्मणार्या बहुतेकांच्या वाढण्याला केवढ्या मर्यादा असतात! या थरात जन्मलेली हुशार, हुन्नरी मुलं जागच्या जागी जिरून जात असतील, बघता-बघता यंत्रमागावर हात किंवा पाय हलवणारे ते त्या यंत्राचा एक भाग बनून जात असतील. एखाद्याच्या निर्मितिक्षमतेचा, जगण्याच्या ऊर्मीचा नाश करणं हे मला त्या माणसाच्या खुनापेक्षाही भयंकर वाटतं.
-
Karyarat
अनिल अवचट यांचे `कार्यरत’ हे सोळावे पुस्तक. कार्यहीनता, भ्रष्टाचार, अविवेकी राजकारण यांनी काळोखलेल्या वातावरणात हे काही आशेचे किरण. या पुस्तकातील माणसे समाजातल्या प्रश्र्नांवर सर्वस्व झोकून देऊन काम करणारी. प्रसिद्धीच्या झोताबाहेर राहून समाजासाठी वेगळ्या वाटा शोधणारी.आदिवासींमधे काम करणारी सुरेखा दळवी, विंचूदंशावर इलाज शोधणारे बावस्कर, तुंगभद्रा नदीच्या पर्यावरणाच्या नाशाविरुद्ध लढणारे हिरेमठ, दुष्काळी भागात प्रतिसृष्टी निर्माण करणारे अरुण देशपांडे आणि काका चव्हाण, आणि गडचिरोलीतील आदिवासींमधल्या आरोग्याच्या प्रश्र्नांवर उत्तर शोधणारे अभय व राणी बंग, यांच्या कामाकडे, चारित्र्याकडे पाहिलं तर जगायची नवी उभारी येते. सर्वच काही संपलं नाही, याची ग्वाही, या पुस्तकातली माणसं पानापानावर, वाक्यावाक्यात देत राहतात.
-
Vanat Janat
जवळच्या टेकडी परिसरात फिरायला जायचो, तेव्हा तिथल्या झाडांशी, वेलींशी, पायवाटेशी मी मनातल्या मनात बोलू लागलो आणि त्याची गंमत वाटू लागली. या झाडांच्या, वेलींच्या, दगडांच्या, कोळीकीटकांच्या दृष्टीने जग पाहू लागलो. मी त्यांना शब्द दिले, संवाद दिले, ते माझ्याशी बोलू लागले. खरं तर मीच माझ्याशी बोलू लागलो होतो. लहान मुलांमध्ये जशी `फॅंटसी’ असते, तिने उतारवयात माझ्यात प्रवेश केला आणि मीही परत लहान झालो. या गोष्टींनी मला खूप खूप दिलंय. बालपण तर दिलंच. माणसांच्या सुखदुःखांकडे आजवर पाहत होतो आता त्या पलीकडच्या सृष्टीला काय म्हणायचंय तो आवाज ऐकू लागलो आणि भराभरा लिहीत गेलो. `सृष्टीत… गोष्टीत’ या पहिल्या गोष्टींना छान प्रतिसाद मिळाला. नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या या पन्नास गोष्टी. त्याही तुमच्यापुढे ठेवीत आहे.
-
America
अमेरिकेहून आल्यावर वाटलं, बरं झालं आपण जाऊन आलो ते. वेगळा समाज, वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. वेगळा पाया, वेगळे संकेत असलेला समाज अस्तित्वात असू शकतो. हे आधी जाणवलं नव्हतं. वाटायचं, आपल्यासारखंच तिथं. फक्त जरा श्रीमंती थाटाचं. पण तसं ते नव्हतं. ते वेगळंच होतं आणि ते पाहणं फार आवश्यक होतं. कारण ते आपल्याकडे येऊ घातलंय आणि तेही अधिक विकृत स्वरूपात. उद्या आपल्याकडे काय प्रश्र्न असणार आहेत, याचा अंदाज आजची अमेरिका पाहून लावता येतो.