-
Perfect Reciepies(परफेक्ट रेसिपीज् )
स्वयंपाक रुचकर करणे ही जशी एक कला आहे. त्याचप्रमाणे तो झटपट व पाहणार्याच्या नजरेला आकर्षित करून घेणारा हवा, ही सुद्धा एक कला आहे. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन परफेक्ट रेसिपीज् मधल्या पाककृती लिहिल्या गेल्या आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीला फळफळावळ, धान्ये, मासे, मटण यांच्या खरेदीविषयी आणि टिकविण्यासंबंधी सांगितले गेले आहे. कोणत्याही पदार्थाची चव तिच्या ताजेपणावर अवलंबून असते, हे लक्षात घेऊन विशेषतः मासे, मटण खरेदीविषयी दिलेल्या सूचना स्वयंपाकात रुची असणार्या सर्वांनाच मार्गदर्शन करतील. मसाले, तेल, तूप यांच्या स्वयंपाकातील वापराविषयीच्या सूचनाही महत्त्वाच्या आहेत. डाएटसाठी करावयाचे पदार्थही रुचकर करण्यासाठी दिलेल्या सूचना डाएट करणार्या व्यक्तींना दिलासा देतील. व्हेज-नॉनव्हेज स्नॅक्स, भात, पुलाव, चटणी, कोशिंबिरी, भाकरी, परोठे, नान, पुर्या, डेझर्टस्, पक्वान्ने, फराळाचे गोड व चमचमीत पदार्थ, बेकिंग, आईस्क्रीम, ज्यूस, मिल्कशेक इत्यादी प्रांतीय व परप्रांतीय शाकाहारी पदार्थांबरोबरच मासे-मटण-चिकन, विशेषतः आजचे लोकप्रिय मालवणी पद्धतीचे मांसाहारी पदार्थ, चायनीज पदार्थ इत्यादी पाककृती या पुस्तकातून दिलेल्या आहेत. या पाककृतींचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक पाककृती स्वतःबनवून बघितल्यानंतर तिचा परफेक्ट स्वाद जमल्यानंतरच त्या-त्या पदार्थांत वापरलेल्या वस्तूंचे प्रमाण लक्षात घेऊन ती-ती पाककृती लिहून काढली आहे, नव्याने स्वयंपाक शिकू पाहणार्या तरुणींनाही पाककृती करणे/शिकणे सोपे जावे म्हणून वाटी-चमच्यांची मापे दिलेली आहेत. स्वयंपाकाविषयीचे हे परफेक्ट पुस्तक सुगृहिणींना तसेच स्वयंपाक शिकणार्या सर्वांनाच मोलाचे साहाय्य करेल असा विश्र्वास आहे.
-
Annpurana(अन्नपूर्णा )
विद्वान लेखक कै. स. आ. जोगळेकर यांच्या कन्या आणि प्रसिद्ध साहित्यिक अच्यत बर्वे यांच्या पत्नी. माहेरची माणसे चवीची चोखंदळ, तशीच सासरचीही. त्यामुळे नित्य नवनव्या पाककृती आत्मसात होत गेल्या. थोडे वैविध्य हवे, म्हणून केटरिंग कॉलेजचे शॉर्ट कोर्सेस्ही केले. गेली अनेक वर्ष निरनिराळ्या मासिकांतून आणि वर्तमानपत्रांतून विविध प्रकारच्या पाककृतींविषयी सातत्याने लेखन. महिलांच्या वेगवेगळ्या संस्थांमार्फत आणि नियतकालिकांतर्फे भरलेल्या पाककलास्पर्धामध्ये परीक्षक. याच विषयावर इतरत्रही लेखन व प्रात्यक्षिके. विषयाचा प्रदीर्घ व्यासंग, विस्तृत अनुभव आणि कणाकणाने गोळा केलेले ज्ञानाचे समृद्ध भाण्डार यांच्या आधाराने सिद्ध झालेला हा ग्रंथ नव्या-जुन्या गृहिणींनी सतत हाताशी ठेवावा, असाच आहे.
-
Swa-gat(स्व-गत)
नाना तर्हेच्या लोकांची विविध आयुष्यं कधी एकमेकांत गुंतत, तर कधी सुटीसुटी धावत असतात. त्यांतलंच नशिबी आलेलं एक आयुष्य पकडून धावणार्या आणि वाटेत भेटणार्या इतर आयुष्यांविषयी मनात असंख्य प्रश्न मांडणार्या आणि त्यांची उत्तरं हरवून बसणार्या शिवनाथ हरबा ओटवणे याचं हे स्व-गत.
-
Pradashin( प्रदक्षिणा)
व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेणं हा दळवींच्या एकूण साहित्याचा केंद्रबिंदू. माणसाच्या आयुष्यातील आत्यंतिक दु:खाचा संबंध बहुतेक वेळा दळवींनी स्त्री-पुरुष संबंधांशी जोडलेला आहे. लैंगिकता, वेड आणि वेदनेची विविध रूपं दळवी कादंबर्यांतून न्याहाळतात. दळवींच्या बर्याच कथा-कादंबर्यांतून दिसणारं विजोड संसाराचं चित्र हे त्यांच्या ऐकीव अनुभवांतून उभं राहिलेलं आहे. या संसारचित्रांतील स्त्री-पुरुष संबांधाचा विशेष हा की हे संबंधसुखाचे नाहीत, सुरळीत नाहीत, कुठेतरी काहीतरी बिनसलेलं आहे. मग ते संबंध विवाहपूर्व असोत; विवाहोत्तर असोत किंवा वैधव्यदशा वा विधुरावस्थेतले असोत! दोघांपैकी एकानं पुरतं उद्ध्वस्त व्हावं, दुसर्यानं ते उद्ध्वस्त होणं सुन्न मनाने बघावं, आणि बघताबघता अखेर त्या नजरेतील ओळख हरवून जावं, असेच या अनुभवांचे स्वरूप असतं. ‘प्रदक्षिणा’ या दळवींच्या कादंबरीतूनही मानवी नातेसंबंधातल्या गुंतागुंतीविषयी दळवी आपले निरीक्षण मांडतात. एका नाटककाराच्या आयुष्याविषयी- त्याचा कलंदरपणा आणि शेवटी त्याची झालेली शोकात्मिका याचे प्रभावी चित्रण या कादंबरीतून दळवींनी केले आहे. नाटककार आणि त्यांची पत्नी – त्यांच्यातील ताणतणाव, नाटककाराच्या मुलींच्या आयुष्याची झालेली परवड याचे सुन्न करणारे दर्शन इथे घडते. आणि हे सर्व घडत असताना अवतीभवतीचा समाज, त्यातल्या व्यक्ती, त्यांचे अंतर्गत ताणतणाव यांबद्दलचे दळवींचे भान कधी सुटत नाही, याचा प्रत्यय त्यांच्या ‘प्रदक्षिणा’ या कादंबरीतूनही येतो.
-
Mahananda (महानंदा)
महानंदा ! दक्षिण रत्नागिरी आणि गोमंतक या भागांतल्या देवळांभोवती देवदासींची किंवा भाविणींची संस्था अगदी कालपरवापर्यंत अस्तित्वात होती, अजूनही तिचे जुनाट अवशेष दिसत असले, तरी ती संस्था आता सुदैवाने नामशेष झाली आहे. परंतु ती संस्था होती, अस्तंगत होत होती त्या काळातली ही कथा आहे. सामाजिक बंधनांत जखडून गेलेल्या दोन जिवांची ही हुरहूर लावणारी प्रेमकथा ! या कथेत नाट्य आहे, पण नाटक नाही. हळवे प्रेम आहे, पण भाबडेपण नाही. किंबहुना ही प्रेमकथा असली, तरी ती एका ‘जुगारा’चीच चटका लावणारी कथा आहे, असे म्हणावे लागेल !
-
Chhanda Majha Vegala (छंद माझे वेगळे )
जन्मभर नाना छन्दांमागं धांवत राहिलों. पायांखालीं काय तेंही पाहिलं नाहीं. आतां शेवटपर्यंत हे छन्द सुटतीलसं वाटत नाहीं. एक मात्र झालं. आयुष्य बहुशः कधींच उबगवाणं वाटल नाहीं. हा छन्द, तो छन्द, असं स्वतःचं कौतुक पुरवीत राहिलों. त्या छंदांसवें वाटचाल करीत असतांनाचे हे कांहीं मोहरलेले क्षण!
-
Mogara Phulala (मोगरा फुलला)
ही कहाणी आहे विश्वात्मक झालेल्या देवमाणसांची! म्हणजे निवृत्तिनाथाची, ज्ञानदेवाची, सोपान-मुक्ताईची आणि प्रात:स्मरणीय अशा त्यांच्या माता-पितरांची! त्यांनी लौकिकात जे भोगले, ते केवळ शब्दातीत आणि जे अ-लौकीक अनुभविले, ते तर ‘शब्देंविण’ संवादिण्यासारखे! अशांची चरित्र-चित्रे रेखाटण्यास कलाकाराची कल्पनाशक्ती आणि शब्दसिद्धी ‘अमृतातेंहि पैजा’ जिंकणारी असावी लागते. ‘भावार्थदीपिके’च्या सौम्य-शांत, प्रसन्न-मनोहर, जीवनोद्धारक प्रकाशात तीन तपांहून अधिक काळ न्हाऊन निघालेल्या गो. नी. दाण्डेकरांच्या कविमनाने अरूपाचे रूप ‘दावण्या’चा ध्यास घेतला. आजच्या कळाहीन जगात ‘ज्ञानेश्वरी’ जगू पाहणार्या एका विलक्षण जीवाची भावनोत्कट कहाणी त्यांनी या आधीच आपल्या ‘मृण्मयी’ या कादंबरीत सांगितली आहे. पण ‘वसुधैव कुटुंबकम्’ झालेल्या त्या मूळ कुटुंबाची कथा-गाथा गायिल्याविना त्यांचे कविमन कृतार्थ होऊ शकत नव्हते. आता ‘मोगरा फुलला’ आहे, फुले वेचिता कळियांसी बहर आला आहे; कल्पित पात्रांच्या मुखांतून अकल्पिताची कथा सांगण्याचे नवल वर्तले आहे. ह्या नवलगंधाने दाण्डेकर प्राणा-मनांतून फुलून आले आहेत, आणि मराठी कादंबरी-सृष्टीला एक नवलभेट देऊन कृतकृत्य झाले आहेत.
-
Tuka Akashaevadha (तुका आकाशाएवढा)
तुका झालासे कळस तुकारामबावांचे जीवन, म्हणजे मन आणि जनलोक या उभयतांसवें रात्रंदिवस चालणारा समरप्रसंग. त्यांची अभंगगाथा हा या समराचा त्यांनीं काढलेला आलेखच आहे. त्या अभंगांचे सूत्र कुठेंही सुटू न देतां, त्यांतील अन्त:प्रवाहांची नोंद घेत चितारलेलें बावांचे जीवनचित्र म्हणजे ‘तुका आकाशाएवढा’. त्यांचे नि:स्पृहपण, त्यांचा नि:संग स्वभाव, श्रीहरिदर्शनांचे त्यांचे आर्त, त्यांची उत्कटता, विठ्ठलप्रेमाच्या प्रवाहामध्ये त्यांचे स्वत:स झोकून देणें, त्यांची सामाजिक जाणीव हें सारेंच इथें चितारलें गेलें आहे.
-
Mrunmayi (मृण्मयी)
'मृण्मयी' मात्र केवळ शब्दकृत्य नव्हतं. तो एक आध्यात्मिक अनुभव होता. अशा तशा कुणाचा नव्हता, तो मीरेचा होता. मीरा जीवनाच्या उत्तरार्धात द्वारकेला जाऊन राहिली. राजाची राणी असल्यामुळं उणं कुण्या गोष्टीचं नव्हतं. तिच्या इथं जो येई. त्याला इच्छाभोजन मिळे. एके दिवशी एक तरणादेखणा जोगी येऊन उभा राहिला. त्यानं इच्छाभोजनाचं ऐकून मीरेला तिचं शरीर मागितलं. इवलं हसून नी म्हणाली, ‘‘बस? हेच मागितलंत? ते माझं उरलंच आहे कुठं? ते तर हरिनिर्माल्य आहे. हे माझं सखेसहोदर भवताली बसले आहेत. त्यांच्या समक्ष घ्या ते. विस्कटून टाका. इथंच अंथरुण मागवत्ये!’’ मनूनंही जोश्याला हेच म्हटलं- ‘‘-- हा तर आहे श्रीहरीच्या रूपावरून उतरलेला उतारा. माझी सत्ता तिळमात्र राहिली नाही यावर. तेव्हा हे घ्या. विस्कटा. टाका फाडून-’’ ‘‘मात्र जे कराल, ते या माझ्यांच्या साक्षीनं होऊ द्या. या माडांच्या झावळ्या डोलत असोत. रातांब्याची पालवी हालत असो. त्या अवघ्यांच्या कुशीत या शिवनिर्माल्याचं हवं ते होऊ द्या.-’’ हे ज्याला कळलें, त्याला ‘मृण्मयी’ कळली. ती प्रयत्नपूर्वक समजून घ्यायचा विषय आहे. केवळ पानं उलटायचा ग्रंथ नव्हे.
-
Vadalatil Deepstambha (वादळांतील दीपस्तंभ)
जो भगवी वस्त्रें त्याला नाहीं, तरी पण जो जन्मभर संन्याशाचें जीवन जगला – समाजाच्या कल्याणासाठीं जो चंदनासारखा झिजत राहिला, अशा एका योद्धयाची ही जीवनगाथा— पू. सरसंघचालकांच्या शब्दांत सांगायचे, तर `संघनिर्मात्याविषयीं लिहिलेली ही कादंबरी हें मराठी ललित साहित्यामध्यें एक वैशिष्ट्यच म्हणावें लागेल.’