-
Pu.L.Ek Sathavan
पु. ल. देशपांडे यांच्या उत्कृष्ट साहित्यातून निवडलेले सर्वोत्कृष्ट साहित्य विनोदी लेख / कथा / नाट्य / व्यक्तिचित्रे / प्रवासचित्रे / पत्रे / भाषणे यातले जवळजवळ निम्मे साहित्य पुलंच्या इतर कुठल्याही पुस्तकात प्रसिद्ध झालेले नाही. हे पुस्तक म्हणजे पु. ल. देशपांडे यांचा अभिरुचिसंपन्न, सुखद सहवास.
-
Srushtit Goshtit (सृष्टीत... गोष्टीत)
पहिल्यांदाच गोष्टी लिहायला लागलोय. जवळच्या टेकडी परिसरातील जंगलात फिरू लागलो. अचानक मला एक भाषा सापडली. तिच्यामुळे मी ओळखीच्या झाडांशी बोलू लागलो. नंतर कळलं, गवत, झुडपं सगळेही त्याच भाषेत बोलताहेत. मग काय नुसत्या गप्पा आणि गप्पाच. कधीतरी पक्ष्यांनी, किड्यांनीही येऊन बोलायला सुरूवात केली. आणि घरी आल्यावर वरचा पंखाही त्याच्या घसघस भाषेत म्हणाला, `काय माझ्याशी नाही बोलायचं वाटतं’. या सगळ्यांनी माझं जीवन काठोकाठ भरून टाकलंय. त्यांच्या गप्पांमधून निघालेल्या या काही गोष्टी.
-
Ek Asto Builder
ही आहे, एका बिल्डरची रोमहर्षक कहाणी. ह्यामध्ये उत्तुंग इमारतींमागची यशोगाथा आहे. त्याबरोबरच खंडणी, धमक्या आणि फसवणुकीची भयकथाही आहे. जीवनावर भरभरुन प्रेम करणारा हा बिल्डर, प्रत्यक्षात एक शेतकरी आहे. शेतातली उत्पादनं एक्स्पोर्ट करणारा एक व्यापारी आहे. तो कलांचा चाहता आहे आणि एका अखंड दानयज्ञाचा यजमानही आहे. ह्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचं नाव आहे, डॉ. सुधीर ग. निरगुडकर ! ‘मी कोणी असामान्य कर्तृत्त्वाचा माणूस आहे’ असा त्यांचा अजिबात दावा नाही. उलट त्यांचं असं म्हणणं आहे की ‘एक सामान्य माणूसही काहीतरी बरं काम करू शकतो. हे सांगण्यासाठीच हा लेखनप्रपंच.’
-
Idli, Orchid Aani Me
कामत ग्रुप'चे सर्वेसर्वा डॉ. विठ्ठल कामत यांचं हे पुस्तक उद्योजक बनण्याची प्रेरणा देतं. सर्वसाधारण खानपानवाला, ते ऑर्कीड'सारख्या पंचतारांकित हॉटेलचा मालक हा त्यांचा प्रवास या पुस्तकातून वाचक अनुभवतो. १९५० साली कामत यांच्या वडिलांनी चर्चगेट रेल्वेस्टेशनपाशी सत्कार हे हॉटेल सुरू केलं. आईनं दागिने गहाण ठेवून हे होटेल उभारायला मदत केली. याच हॉटेलनं पुढे इतिहास घडविला. 'सत्कार'पासून सुरु झालेला प्रवास दिमाखदार ठरला. 'पर्यावरणाचा तोल राखणारं सर्वोत्कृष्ट हॉटेल'चा मानही त्यांच्या हॉटेलला मिळाला. मराठी माणसाला उद्योजक होता येत नाही, ही उक्ती खोटी ठरवणारं कामत यांचं हे आत्मचरित्रपर लेखन वाचावं असेच आहे.
-
Chashak Aani gulab
भेण्डे यांनी युरोपच्या प्रवासात नुसतीच चैन केली नाही किंवा नुसत्या बघ्यासारखे देश पाहिले नाहीत. त्यांच्यातला अर्थशास्त्रज्ञ, ललित लेखक आणि चौकस सुशिक्षित महाराष्ट्रीय माणूस सतत आणि सर्वत्र जागरूक होता. शक्यतोवर त्यांनी तिथले लोक पाहिले. त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. त्यांच्या देशांची स्थिती, त्यांची सुखदुःखे जाणून घेतली. पुष्कळ ठिकाणी ते प्रवासी बस सोडून एकटेच स्वतंत्रपणे हिंडले. त्यामुळे `कंडक्टेड’ प्रवासी सामान्यतः जे पाहत नाहीत ते भेण्डे पाहू शकले.
-
Rajai
मी बर्याच कथा लिहिल्या आणि कुठलीही कथा परत आली नाही. एकीकडून मला विरोध होऊ लागला, पण दुसरीकडून मासिकांतर्फे होत असलेली कथांची मागणीही वाढू लागली. मग मी विरोधाची काहीच पर्वा केली नाही. मी `रजई’ लिहिली, तेव्हा मात्र बॉम्बस्फोट झाला. साहित्यिक आखाड्यात माझ्या चिंधड्या उडाल्या. काही लोकांनी मात्र माझ्या समर्थनार्थही लेखणी चालवली. तेव्हापासून माझ्यावर अश्र्लील लेखिका असल्याचा ठसा मारला गेला. `रजई’च्या आधी आणि `रजई’च्या नंतर मी जे काही लिहिलं, त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. मी लैंगिक विषयांवर लिहिणारी अश्र्लील लेखिकाच ठरले. अगदी आता आता गेल्या काही वर्षांपूर्वी नव्या पिढीने मला सांगितलं की, मी `अश्र्लील लेखिका’ नसून `वास्तववादी लेखिका’ आहे. मी भाग्यवान आहे की, माझ्या जिवंतपणी मला समजून घेणारे जन्माला आले. मंटोला तर वेडं ठरवलं गेलं. प्रगतिशील लेखकांनीही त्याला साथ दिली नाही. प्रगतिशील लेखकांनी मला ना ठोकरलं, ना डोक्यावर घेतलं. मंटो धुळीत मिसळला, कारण पाकिस्तानात तो कंगाल होता. मी पुष्कळच चांगल्या आर्थिक स्थितीत होतो. चित्रपटांमधून आम्हांला बर्यापैकी कमाई होत होती आणि `साहित्यिक मृत्यू वा जीवन’ यांची पर्वा नव्हती.
-
Colony (कॉलनी )
सिद्धार्थ पारधे हा मुलगा अशिक्षित समाजात जन्माला आला,पण प्रतिकूल परिस्थितीशी झगडून त्याने बी. कॉम पर्यंतचे सर्व शिक्षण घेतले आणि आपले सिद्धार्थ हे नाव सार्थ केले. त्याने केलेला सर्व संघर्ष मी पहिला आहे आणि त्यामुळे मी भराहून गेलो आहे. त्याच्या या चरित्राला माझ्या शुभेच्छा. - विंदा करंदीकर.