-
Taksalatil Nani (टाकसाळीतील नाणी)
क गोष्ट मात्र निर्विवाद – मुकुंद टाकसाळे जे काही लिहितात, त्यावर विशिष्ट दर्जाचा ठसा असतो. काही वस्तूंच्या, पदार्थांच्या बाटल्यांवर त्यांच्या दर्जाची हमी देणारा ‘एगमार्क’ किंवा ‘इन्डियन स्टॅण्डर्ड इन्स्टिट्यूट’ चा ‘आय्.एस्. आय्.’ हे शिक्के असतात. टाकसाळे यांच्या विनोदी कथांवर ‘टाकसाळे’ हा दर्जाचा शिक्का असतो. अजून तरी तो उच्च दर्जाचा शिक्का आहे. तो दीर्घकाळ तसाच राहो ! ... मुकुंद टाकसाळे यांच्या कथा वाचल्यानंतर आणि त्या कथांतल्या निर्व्याज (इनोसंट) विनोद लुटल्यावर मला सतत असे वाटू लागले, की टाकसाळे हे चिं. वि. जोशी यांचे वारसदार होऊ शकतील. या संग्रहातील ‘सा रम्या आदिवासीनगरी’ किंवा ‘नावात काय नाही?’ या कथा मुद्दाम पाहाव्या. हे त्या कुळातलेच वाटू लागतात. – माझी ही भविष्यवाणी खरी ठरो ! जयवंत दळवी यांच्या प्रस्तावनेमधून
-
Hasnbadhh (हसंबद्ध )
जत्रेतल्या अंतर्गोल-बहिर्गोल आरशापुढं उभं राहिलं की आपलीच प्रतिबिंब आपल्याला हसायला लावतात. मुकुंद टाकसाळे यांनी ‘हसंबद्ध’मधील कथांच्या रूपानं आपल्या समाजासमोर असाच आरसा धरला आहे. आपल्या अवतीभोवती वावरणार्या व्यक्तिरेखांच्या या आरशात उमटणार्या प्रतिमा आपल्याला मनमुराद हसवतात. चित्रमय निवेदनशैलीमुळे टाकसाळ्यांच्या या कथा विनोदी लघुपट बनून गेले आहेत. साध्यासुध्या शब्दातून, लहानसहान प्रसंगातून टाकसाळे विनोदाला अनुकूल वातावरण निर्माण करतात. सामान्य व्यक्तिरेखांतला सामान्यपणा दाखवत किरकोळ घटनांतून फार मोठ्या आकाराचा फार्स ते आकारला आणतात. दत्तू बांदेकर, चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे यांनी निर्माण केलेली दर्जेदार विनोदी वाङ्मयाची परंपरा पुढं चालवणारा हा कथासंग्रह आहे.
-
Radhene Odhala Paay ... (राधेने ओढला पाय ... )
जागतिकीकरणानंतरचा मराठी मध्यमवर्ग हा अगदी वेगळाच मध्यमवर्ग आहे. व्हीआरेस, पोरांचे फुगीरतम पगार, परदेशवार्या, ऑरकुट-फेसबुचं मायाजाल, टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी पूर्णपणे व्यापलेलं जीवन आणि त्यामुळे वाचनसंस्कृतीची लागलेली वाट… अशा वाटेनं चाललेल्या या बदलत्या मध्यमवर्गाला मुकुंद टाकसाळे यांनी आपल्या ‘राधेने ओढला पाय…’ या कथासंग्रहात बरोब्बर चिमटीत पकडलं आहे. त्यांच्या नर्मविनोदी शैलीतल्या या कथा वाचताना अनेकांना आपण आपलंच प्रतिबिंब आरशात पाहतो आहोत असं वाटेल. आजची मध्यमवर्गीय कचकडी संस्कृती आणि तिचं हलकांडेपण पाहून वाचकाला हसूही येईल आणि काहीसं अंतर्मुखही व्हायला होईल. ‘चिं. वि. जोशी यांचा वारसदार’ असं सर्टिफिकेट जयवंत दळवी यांनी ज्यांना दिलेलं आहे, त्या मुकुंद टाकसाळे यांच्या आजवरच्या विनोदी लेखन-प्रवासातला मैलाचा दगड म्हणता येईल असा, हा एक पुढचा आणि महत्त्वाचा टप्पा – ‘राधेने ओढला पाय…’
-
Sakkali Sakkali (सक्काळी सक्काळी)
`सक्काळी सक्काळी’ सारखं चौफेर हातपाय पसरणारं मोकळंढाकळं सदर आणि तेही रोजच्या रोज सादर करणं हे येर्यागबाळ्याचे काम नव्हे. मुकुंद टाकसाळे यांचा विनोद सदैव ताजातवाना, सहज, निर्मळ आणि निकोप असतो. तो सवंग नसतो. म्हणून सर्वांनाच तो लोभावतो. त्यांच्या लोकमान्य लिखाणामागे एक संवेदनाक्षम, धीरगंभीर, प्रागतिक, चिकित्सक दृष्टी आहे हे नि:संशय. मुळात त्यांची वृत्ती आशावादी आहे. हा आशावादी सूर या ना त्या रुपात पुढच्या त्यांच्या सार्या लेखांमध्ये झिरपत राहतो. मला भावलेला त्यांचा आणखी एक वृत्तिविशेष म्हणजे जे जे नित्यनूतन त्याचे स्वागत करण्याचा त्यांचा भाव. त्यांच्या आशावादी वृत्तीला त्यांच्या कुशल, चित्रमय आणि साहित्यिक शैलीची जोड मिळालेली आहे. रोजच्या रोज सदर सादर करण्याच्या खटाटोपात त्यांच्या लेखनाची प्रसन्नता ढळत नाही. (प्रा. राम बापट यांच्या प्रस्तावनेतून) समाजकारण, राजकारण, संगीत, साहित्य अशा नानाविध क्षेत्रात `सक्काळी सक्काळी’ फिरवून आणणारे वाचनीय लेखन.
-
Aankhin Gamatigamatit (आणखी गमतीगमतीत)
मुकुंद टाकसाळे हे आजच्या विनोदी लेखकांपैकी एक लोकप्रिय लेखक. त्यांचा विनोद आजच्या पिढीला अधिक जवळचा वाटतो. कारण तो निर्मळ तर आहेच, परंतु तो या पिढीच्या दैनंदिन जीवनातला आहे. `रविवारच्या लोकसत्ते’मधील `गमतीगमतीत’ या गाजलेल्या सदरातल्या निवडक लेखांचा हा संग्रह `आणखी गमतीगमतीत’ या नावाने दुसर्या भागात प्रसिद्ध होत आहे. सरत्या शतकाच्या किंवा सहस्रकाच्या अखेरीस सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक महाराष्ट्र कसा होता याची विनोदी अंगांनी लिहिलेली ही बखरच म्हणता येईल.
-
Undaravlokan (उंदरावलोकन)
2004 साली दर रविवारी `रविवार सकाळ’च्या सर्व आवृत्त्यांतून - `सण्डे का फण्डा’ हे सदर प्रसिद्ध होत होतं. त्या सदरातील निवडक लेखांचा हा संग्रह - `उंदरावलोकन’. `सदर’हू काळात `शायनिंग इंडिया’ ही कॅम्पेन जोरात होती. `रालोआ’ सणकून आपटली आणि सोनिया गांधी यांना `तुम्ही पंतप्रधान व्हा’ असं कॉंग्रेसजन म्हणू लागले, तोच हा काळ. सुषमा स्वराज रागानं बेभान होऊन मुंडण करायला निघाल्या होत्या आणि पंतप्रधानपद न स्वीकारून सोनिया गांधींनी भाजपच्या मुखंडांना धोबीपछाड घातली, तोच हा काळ. मोठा मजेचा काळ होता तो. या हलकांड्या काळातल्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक घडामोडींचा हलक्याफुलक्या शैलीत घेतलेला हा समाचार. या काळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल, मॉल, मिडिआ, मल्टिप्लेक्स, मल्टीनॅशनल अशा अनेक `म’कारांची या काळात एकदमच चलती झाली. त्याच बरोबर शेतकर्यांच्या आत्महत्यांनाही याच काळात मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. मॉलची उंची वाढत गेली आणि सामान्य माणूस छोटा छोटा होत गेला – अगदी उंदराएवढा – तो याच काळात. सामान्य माणसाच्या दृष्टीतून त्या काळाचं केलेलं हे अवलोकन – म्हणूनही `उंदरावलोकन’ !
-
Vijayache Mansshastra (विजयाचे मानसशास्त्र)
ज्या खेळाडूंना क्रीडाक्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करायची असेल, त्या सार्यांनाच हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. कारण यात बहुमोलाचे ज्ञान आणि संकल्पना दिलेल्या आहेत. म्हणून श्री. बाम यांनी हे पुस्तक लिहिले, हे फारच उत्तम झाले असे मला वाटते… राहुल द्रविड,क्रिकेटपटू श्री. बाम यांच्यासारखाच पराकोटीचा साधेपणा, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करण्याची अपेक्षा बाळगणार्या सर्वच खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी याचा अभ्यास करायला हवा म्हणजे क्षमता प्रगट करण्याच्या मार्गातले मानसिक अडथळे त्यांना दूर करता येतील. असामान्य प्रतिभेचा आविष्कार असलेले हे पुस्तक क्रीडाक्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येकाने वाचायलाच हहवे…. गीत सेठी, जागतिक अजिंक्यवीर बिलीयर्ड्स हे पुस्तक वाचताना माझ्या क्रीडा जीवनाचा संपूण7 पट डोळ्यांसमोर उलगडला गेला. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, अनुभवाच्या कसोटीवर पारखलेले हे ज्ञान आणि तंत्रे आता क्रीडाक्षेत्र गाजवण्याची अपेक्षा धरणार्या सार्याच खेळाडूंना या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध आहे… अंजली भागवत, जागतिक नेमबाजीत अव्वल क्रमांक ज्याला आपला खेळ उत्तम व्हावा असे वाटत असेल, त्याने हे पुस्तक वाचायलाच हवे. सनातन अशा योगशास्त्रातल्या तंत्रांचा खजिनाच श्री. बाम यांनी या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशात आणला आहे… प्रकाश पडुकोण, जागतिक अजिंक्यवीर, बॅडमिंटन कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करायची असेल, तर हे पुस्तक वाचायलाच हवे. हृदयाला आणि मनाला शांती देणारे असेच हे पुस्तक आहे. यशस्वी होण्याचे रहस्य त्यात साध्या, सोप्या आणि सुस्पष्ट भाषेत उलगडले आहे. कमलेश मेहता,आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू हे पुस्तक खेळांडूसाठी म्हणून लिहिलेले असले तरी त्यातली तंत्रे कोणत्याही क्षेत्रातल्या समस्यांना आणि आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी सक्षम बनवू शकतात. तेव्हा ते सर्वांनीच वाचावे आणि त्यातल्या तंत्राचा उपयोग करून पाहावा.
-
Mana Sajjana (मना सज्जना)
श्री. भीष्मराज बाम सुरुवातीपासून क्रीडा मानसशास्त्राचे व भारतीय योगशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यामुळेच विविध क्रीडाक्षेत्रांत विश्वविक्रम गाजवणारी नवीन सतेज पिढी मार्गदर्शनाकरिता त्यांच्याकडे आली व तिच्या साहसाला आत्मनिग्रहाची, अनुशासनबद्धतेची व यशसंपादनाची अचूक दिशा मिळाली. प्रस्तुत पुस्तकातील छोटेखानी लेखांमध्येही श्री. बाम यांच्यामधील त्याच शिक्षकाची तळमळ आपले लक्ष वेधून घेते. खेळ असो, की नेमलेले कोणतेही नित्यकर्म असो, त्यासाठी चित्ताला एकाग्रतेचे वळण लागले पाहिजे. ही एकाग्रता अंगवळणी कशी पाडून घेता येईल, हे सांगण्यासाठी योगशास्त्राचे विवेचन त्यांच्या उपयोगी पडले. `पातञ्जल योगदर्शन’ हा भारतीय मानसशास्त्राचा ग्रंथ आहे. त्याचा आधार जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त आहे, अशी त्यांची खात्री पटली. पोलीसखात्यात काम करताना या ग्रंथातील मूलगामी चिंतनाचा त्यांना लाभ झालाच, पण नवोदितांनी आपापल्या क्षेत्रांतील लहानमोठी आव्हाने स्वीकारण्यासाठीही त्यातील मार्गदर्शन त्यांच्या कामी आहे. `मना सज्जना’ या त्यांच्या प्रस्तुत पुस्तकात त्यांनी अशीच लहान-सहान जीवनभाष्ये लिहिली आहेत. त्यात नवोदित खेळाडूंना मूलगामी मार्गदर्शन आहे. सुभाषिते, बोधकथा यांच्या साह्याने मोठ्यांसाठी केलेला मनोबोध आहे. आणि लालित्याच्या वनराईत फेरफटका घडवून आणणारी स्फुटे, चिंतनेही आहेत.
-
Chandanvishayi (छंदांविषयी)
लेखक म्हणून माहीत असलेल्या अनिल अवचट यांनी स्वतःच्या अनेक छंदांविषयी या पुस्तकात लिहिले आहे. चित्र, शिल्प, ओरिगामी, बासरी, फोटोग्राफी व स्वयंपाक हे छंद त्यांनी कसे जोपासले, त्या त्या माध्यमांचा त्यांन[...]
-
Gandhinantarcha Bharat
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा इतिहास. असंख्य जाती-जमाती, वर्ग, भाषा आणि धर्म यात विभागलेला, प्रचंड हलाखीच्या परिस्थितीत जीव व्यतीत करणारा आणि यादवी संघषार्थ बुडालेला हिंदुस्थान स्वातंत्र्यप्राप्तीनंत[...]
-
Aarogyasampanna Adhunik Jeevanakarta Ayurveda
रस्त्यावर उघडयावर तयार होणारे नानाविध खाद्यपदार्थ (फास्ट फूड), आधुनिकतेच्या नावाखाली मैदा, मार्जरीन- बटर, दुधयुक्त भाज्या / फळे इत्यादी घटक असलेल्या पदार्थांचे सेवन, व्यायामाचा अभाव, वेळेच्या अभावामुळे कौटुंबिक सुसवांद साधण्यात अडचणी, कम्प्युटर- दूरदर्शनचा जीवनात नको तेवढा शिरकाव- या सर्वांतून मानसिक ताणतणाव, समस्यांमध्ये वाढ झाली आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न जीवन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सखोल, सर्वसमावेशक तसेच आधुनिक, सुलभ, रंजक, शास्त्रीय परिभाषेत सर्व स्तरावरच्या वाचक/ अभ्यासकांच्या शंकांचे निराकरण करणारे व एकूणच नवी आगळी वेगळी तथा पूर्ण व्यवहार्य दिशा दाखवणारे मार्गदर्शक पुस्तक.
-
Thevnitlya Chija
भूत आणि भविष्य या जीवनाच्या दोन फांद्यांवर बांधलेल्या काळाच्या हिंदोळ्यावरील झोके म्हणजे या ठेवणीतल्या चिजा. शान्ताराम तथा के. ज. पुरोहित यांच्या`व्रात्यस्तोम’, `मी असता’ आणि `आठवणींचा पार’ या पुस्तकांसारखेच, पण त्यांच्या कितीतरी पुढे वाचकाला घेऊन जाणारे असे हे ठेवणीतल्या चिजा’ हे पुस्तक. रूढार्थाने हे आत्मचरित्र नव्हे; ते आहे एका मोठ्या संवेदनशील लेखकाच्या आत्म्याचे चरित्र. कधी गंभीर; कधी खुसखुशीत; कधी विचारगर्भ तर कधी विनोदी; कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणार्या;कधी अंतर्मुख करणार्या; कधी छाकट्या तर कधी सरळ; मराठी गद्याचे ललित वैभव प्रकट करणार्या `मालगुडी ते ब्रह्मपुरींपासून’ तो `स्वप्नस्थ वास्तव’ पर्यंतच्या या ठेवणीतल्या चिजा.