-
Itihasacha Anabhidnya Yatri (इतिहासाचा अनभिज्ञ यात
आतिश तशीर या तरुणाची हि एक विलक्षण कहाणी आहे. एक भावनिक आणि वैचारिक शोधासाठी केलेल्या एक रोमांचक प्रवासाचे वर्णन. प्रत्येक तरुणाने ज्यात स्वतःला शोधावे आणि भोवतालच्या समाजमनाला उमजून घ्यावे असे हे पुस्तक आहे. मनात काय आहे आणि वास्तवात काय आहे याची जोड संधू पाहणाऱ्या मनाची हि तगमग अहे. एकीकडे भविष्यात उड्डाण करायला मुभा देणारी स्वतंत्र मानसिकता आणि दुसरीकडे भूतकाळात खेचणारी संकुचित वृत्ती; या दुचाकीवर हि भ्रमणगाथा आपल्याला इस्लामिक जगाचा आधुनिक प्रवास घडवून आणते आतिशला घडलेला इतिहासाचा प्रवास आणि त्याच्या वैयक्तिक वाटचालीत त्याच्या अनुभवाला आलेले सत्य त्याच्या लिखाण्यात पानोपानी व्यक्त होते. ते सत्य म्हणजे, संस्कृती हि धर्मापेक्षा मोठी आहे; धर्म हा संस्कृतीचा केवळ एक भाग आहे. संस्कृती आपले जीवनविश्व दर्शविते.; धर्म फक्त श्रद्धास्थाने. हे साधे सत्य शोधण्यासाठी आतिशने एक अजब प्रवास केला आहे. त्याची आई एक टोक तर वडील हे दुसरे. या दोन टोकांवर बांधलेल्या धारदार दोरीवर चालणे ही एक दिव्य होते. तसे चालताना आतिशने केलेला हा मन हलवून टाकणारा अनुभव.
-
Jaitapurchi Batti (जैतापूरची बत्ती)
जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाची चर्चा, चिकित्सा करणारे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे; साहित्यिक फक्त वातानुकूल दालनात बसून सुखेनैव रंजक लेखन करतात, आजूबाजूच्या समाजाच्या सुखदु:खाशी ते संबंध ठेवत नाहीत, असे म्हणणार्यांना उत्तर म्हणून हे पुस्तक लिहिलेले नाही. एका भूमिपुत्र लेखकाने सामाजिक कर्तव्य म्हणून हे पुस्तक लिहिलेले आहे. माझी अणुऊर्जेच्या दुष्परिणामांबाबतची, विशेषत: जैतापूर प्रकल्पाबाबतची भीती नाहीशी होत गेली. माझे कोकण, माझा देश यांना या प्रकल्पापासून कोणतीही भीती नाही, याबद्दल माझी खात्री पटली. आणि आपोआपच माझ्या लेखनातून, प्रतिपादनातून प्रकल्पाच्या समर्थनाचा अंत:प्रवाह झिरपू लागला. अर्थात या अणुऊर्जेची घातक बाजू माझ्या ध्यानात आल्याशिवाय कशी राहील? किंचितही निष्काळजीपणा, बेपर्वाई ही ऊर्जा हाताळताना, अणुभट्टीचे डिझाइन करताना झाल्यास अपरिमित जीवितहानी, आर्थिक हानी झाल्याशिवाय राहणार नाही, हेही मला कळून चुकलेले आहे. पण हे सारे मानवनिर्मित आहे. माणसानेच, वैज्ञानिकांनीच या समस्येची सोडवणूक करावयाची आहे. अणुभट्टय़ांची पराकोटीची सुरक्षितता हा यापुढील काळात वैज्ञानिकांसाठी परवलीचा शब्द ठरणार आहे. भारतीय वैज्ञानिक इथे कुठेही कमी पडणार नाहीत, याचीही माझी खात्री पटलेली आहे. पण अणुऊर्जेला पर्याय नाही, हेही खरे आहे. माडबन-जैतापूरचे दीपगृह (लाइटहाऊस) ‘जैतापूरची बत्ती’ म्हणून ओळखले जाते. या बत्तीने आजवर समुद्रातील जहाजांना मार्गदर्शन केले. आता तिने भूपृष्ठावरील मानवी जहाजांना, त्यांच्या कप्तानांना सुयोग्य मार्गदर्शन करावे अशी माझी अपेक्षा आहे-त्यासाठीच ही ‘जैतापूरची बत्ती’.
-
Mudra (मुद्रा)
पायाने अधू असलेल्या निरांजनीची-निरुची कथा 'मुद्रा' तून उमटत जाते. आपल्यातील अपंगत्वापेक्षा अभिजात सुरांचा मिळालेला वारसा हीच तुझी खरी ओळख-सुरांसह आपल्या गायक वडिलांकडून मिळालेली हीही एक शिकवण. हा वारसा जपताना शारीरिक कमतरतेकडे अधिकाधिक तटस्थपणे पाहत,स्वतःला स्वरांतून वाढवत ओळखत नेणाऱ्या निरूचा हा अनोखा प्रवास-परंपरेचा,संस्कृतीचा,मानवी नातेसंबंधाचा दुसरीकडे शोधही घेणारा. आशा बगे यांच्या लेखनात सातत्याने गुंजणार संगीत...स्वरांचा दरवळ इथे ठळक पार्श्वभूमी होतो. संगीतासारख्या कलेच्या चिरांतानात्वाचा अर्थ मानवी जीवनाबद्दलच्या मुलभूत प्रश्नांच्या तळापर्यंत कसा झिरपत गेला आहे हे मांडत,नव्या परिमाणांसह 'मुद्रा' प्रकटत जाते. आणि उत्कट अशी सर्जनशील अभिजात कलाकृती वाचल्याचा दीर्घकाळ मनात रेंगाळणारा सात्विक आनंद वाचकांनाही बहाल करत राहते.
-
Rani Abbakdevi (राणी अब्बकदेवी)
पराक्रम,स्वाभिमान,क्षात्रतेजाची मूर्ती,कर्नाटकभुषिनी,जनहितकारिणी,दर्यासारंगिनी,अन्यायी शत्रूविध्वंसिनी,रणरागिणी,तेजस्विनी,तुळूनाड प्रदेशातील राणी अब्बकदेवी,जिने पन्नास वर्षे जुलुमी पोर्तुगीजांशी अखंड अविरत झुंज दिली तिची हि अमर कहाणी.
-
Lay Off (ले ऑफ)
'घराबाहेर पडून आर्थिक शाश्वती मिळवणाऱ्या ह्या स्त्रियांनी जगण्याच्या 'जाण्या वाटा' जरी निवडल्या असल्या तरी त्यांची प्रश्न सुटले नाहीतच. त्यांना काही नवेच भेडसावत आहेत. त्यांना आणि त्या ज्या समाजाच्या अविभाज्य भाग आहेत त्यांनाही. ह्या संग्रहातील ८०% स्त्रिया ह्या इंजिनियर आहेत. हा एक निव्वळ योगायोगच! बाकीच्यांनाही व्यवसाय वेगळा असला तरी काही प्रश्न भेडसावत आहेतच. त्याचा हा कथा स्वरूपात आढावा. नव्या दिशेने निघालेल्या त्या सर्व स्त्रिया आहेत. त्यांच्या समस्याही वेगवेगळ्या आणि नव्याच आहेत.
-
Hasyagharatil Aarse (हास्यघरातील आरसे)
जो आपल्याला या जगात घेऊन येतो,त्याला फादर म्हणतात आणि जो चित्रपट विश्वात घेऊन जातो,त्याला गॉडफादर म्हणतात. गॉडफादरच मुल्य खरया जन्मदात्या बापापेक्षा किती तरी जास्त असतं. म्हणूनच लायक-नालायक,गायक-वादक,नायक-खलनायक अशी सर्व प्रकाची फिल्मी मुले आपल्या खरया फादरला झुमरी तलैय्यात रडत-आक्रोशत सोडून,मुंबई च तिकीट काढतात आणि एका गॉडफादरचा शोध घेऊ लागतात. फिल्मी दुनियेत एका शब्दाची खूप चालती आहे. 'स्ट्रगल'. त्याचा अर्थच असा आहे, कि एका गॉड फादर चा शोध. स्ट्रगल चा अंतिम बिंदू आणि गॉड फडरचा आरंभ बिंदू एकच असतो.
-
Katlatil Jhare (कातळातील झरे)
सार्वत्रिक धारणा...पुरुष म्हणजे पाषाण, पुरुष कातळकठोर पण... भगव्या कपड्यातील असो कि सामान्य-शृंगारातील आदिम प्रेरणा खेचतेच पुरुषाला स्त्रीकडे. 'ती' चा सहभाग अनिवार्य,पण वाद्जनक. त्यातूनच कातळकडे दुभांगतात...' चिरफळतात, सुप्त व्यथांचे झरे उसळतात...,विखुरतात, छिन्नविछिन्न होत तृशार्तावस्थेत आटतात. कातळातल्या शुष्क होत जाणारया झऱ्यांच्या अर्थात पुरुषांच्या अवघे आयुष्य उधळून लावणाऱ्या व्यथा.
-
Na Sangnyajogi Goshta (न सांगण्याजोगी गोष्ट)
१९६२. साम्यवादी चीनबरोबरच्या त्या वर्षीच्या युद्धात आपला दारूण पराभव झाला. जगभर त्यामुळे आपली मानहानी झाली. म्हणून ती ठरली 'न सांगण्याजोगी गोष्ट'! तथापि आपली राष्ट्रीय संरक्षणसिद्धता वाढवायची असेल,तर 'त्या' पराभवाची परखड कारणीमिमांसा करायलाच हवी. 'त्या' शोकांतिकेला कोणकोण जबाबदार होते? चीनवर नको तेव्हडा विश्वास टाकणारे भोळेभाबडे राज्यकर्ते? कि राणा भीमदेवी थाटात 'फॉरवर्ड पॉलिसी' आखणारे सेनाधिकारी? या युद्धात नेमके काय घडले? त्या पराभवाल एखाद दुसरी तरी रुपेरी कडा होती का?या आणि अशा इतरही असंख्य प्रश्नांची साधार,तपशीलवार उत्तरे देणारा ग्रंथ म्हणजे युद्धाशास्त्राविषयक मराठी साहित्यात मोलाची भर आहे. प्रत्यक्ष राणक्षेत्राची व व्युहरचनांची कल्पना देणारे २५ नकाशे हे या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. एक रणझुंजार सेनानीने इतिहासकाराच्या भूमिकेतून लिहिलेला हा ग्रंथ देश्हीताबद्दल कळकळ असणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवा.