-
Mansavi (मनस्वी)
बाबुराव चंदावर यांचे आत्मकथन भारताच्या राजकीय इतिहासातील अत्यंत रोमहर्षक कालखंड आहे. आचार्य विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण तसेच जेपी आणि इंदिरा गांधी यांच्यातील व्यक्तीसंबंधांवर अधिकारवाणीने लिहिणारे बाबूराव हे एकमेव म्हणावे लागतील. बालवयात रागावून घर सोडले आणि बाबूराव सार्वजनिक कार्यात खेचले गेले. या प्रवासात उत्तुंग उंचीचे अनेक मार्गदर्शक भेटले आणि त्यांच्या छायेत बाबुरावांची प्रगती होत गेली. कधी आपल्या तत्वाबरोबर तडजोड करण्यास नकार देणारे बाबूराव, विनोबा आणि जेपी यांना सारखेच प्रिय होते. आपले अंतकरण दोघेही बाबूरावांसमोर खुले करत असत. 'आनंदवन' चे प्रेणेते बाबा आमटे यांच्याकडून स्थानिक गावकरयांनवर अन्याय झाला तेव्हा त्यांच्या बाजूने बाबुराव ठामपणे उभे राहिले. शासकीय यंत्रणा आणि सर्वोदयातील ज्येष्ठ मंडळींचा दबाव त्यांनी झुगारून दिला. अखेर बाबांनी तडजोडीला मान्यता दिली आणि गावकरयांना न्याय मिळाला. आणीबाणीच्या काळात विनोबा भावे यांचे एक-दोन निर्णय आवडले नाहीत म्हणून त्यांच्यावरही आक्षेप घेताना बाबूराव कचरले नाहीत. जेपी अमृतकोषाच्या संदर्भातही त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. गुरुजनांनी सांगितलेल्या तत्वानुसारच बाबुरावांनी मार्गक्रमणा केली. प्रसंगी त्यांनी तत्वाचा आग्रह धरताना गुरुजनांचेही ऐकले नाही. म्हणून 'मनस्वी' हा शब्दात त्यांच्या जीवनपटाचे सार सामवलेले आहेत. बाबुरावांचे आत्मकथन हा भारताच्या राष्ट्रीय इतिहासातील एक अमोल दस्तऐवज आहे.
-
Antrang (अंतरंग)
प्रभाकर घरतांचं 'अंतरंग' हे आत्मकथनही नाही वा केवेळ काळाची जंत्रीही नाही. ती एक संवेदनशील माणसाची अदभूत कांदबरी आहे त्यांच्या सहज अघोवत्या भाषेमुळे ते एक 'ललित लेखन' आहे असे वाटते असे आलेले अनुभव, घडलेल्या घटना, त्यातले योगायोग, त्यांना भेटलेली माणसं हे सर्व सत्यापेक्षा विलक्षण आहे ही कल्पित जीवन-गाथा भासतेऽनि मग वास्तवात ही कल्पितापेक्षाही विलक्षण असते याची जाणीव होते. त्यावेळेच्या जास्त खपाच्या, 'नवशक्ती' व 'मुंबई सकाळ' दैनिकातून अन्यायाविरुद्ध कुणाचीही पर्वा न करता ते सडेतोड टीका करत होते. पुढे ते राजकरणाकडे वळले. निवडणूक लढविली आणि जिंकलीही. पण सृजनशील कलांवत राजकारणातल्या ठराविक चौकटीत घुसमटतो. त्यांचा खरा पिंड समाजकार्याचा आजपर्यंत ते त्यातच कार्यरत आहेत. प्रभाकर घरत यांचा जीवन -प्रवाह एखाद्या चालत चित्रासारखा आहे त्यांनी लिहिलेला प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडत आहे असं वाटतं त्यांना भेटलेल्या अनेक ढंगांच्या, अनेक वृत्तीच्या व्यक्ती आपल्याला कुठंतरी भेटल्या आहेत असं जाणवतं. कल्पना करता येणार नाहीत असे विलक्षण योगायोग चित्रपटात वा कादंबरीतच आढळतात. म्हणून घरांतचं 'अंतरंग' ही अदभूत ही कांदबरीच आहे.
-
Cinematala Shivaji Te Neta (सिनेमातला शिवाजी ते ने
चित्रपटविषयक लेखन करणारे ज्येष्ठ स्तंभलेखक इसाक मुजावर यांचे हे पुस्तक. "सिनेमातील शिवाजी' या लेखनापासून सुरू होणाऱ्या या पुस्तकातील शेवटचा लेख "पडद्यावरचा नेता, पडद्यामागचा दाता' हा निळू फुले यांच्यावर आहे. सिनेमात शिवाजी महाराजांचे चित्रण कसे झाले याचा अभ्यासपूर्ण आढावा पहिल्याच लेखात घेण्यात आला आहे. यातील सर्वच लेख वाचनीय तर आहेतच; शिवाय चित्रपटसृष्टीची सखोल आणि अपरिचित अशी माहिती देतात.
-
Trikalsandhya ( त्रिकालसंध्या)
ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक. त्यांचा लहानपणापासूनचा प्रवास यात आहे. पत्रकारितेतील अनुभव, त्याचबरोबर अनंतराव भालेराव, बाबा दळवी यांच्याकडून कसं शिकायला मिळालं, ते लिहितानाच या दोघांचंही व्यक्तिचित्र नेमकेपणानं मांडलं आहे. पत्रकारितेत आलेले अनुभव सांगताना न्यायालयीन खटले, विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांचं वागणं, याबाबत विस्तारानं लिहिलं आहे.
-
Audumbar (औदुंबर)
वाचकाला पकडून, खिळवून, बांधून, अडकवून, गुंतवून, भुलवुन,आपल्या बरोबर तय कथेतल्या विश्वात न्यायच आणि तिथला शब्द, तिथला स्पर्श, तिथला गंध आणि चक्क तिथल्या चवीची सुद्धा त्याला अनुमति द्यायची म्हणजे कही सोपी गोष्ट नाही. गायात्रिच्या कथामध्ये हे सगळ ओतप्रोत भरलेले आहे. तीच व्यक्तिच,स्थळाच चित्रण वाचताना तिचं निरिक्षण किती सूक्ष्म आहे हे जनावत .
-
Chokar (चोकर)
स्त्रीच्या वेदना स्त्री चांगली जाणू शकते... कारण ती तिची नुसती सवेंदना नसते टार सहवेदना असते... पण जेव्हा जेव्हा पुरुष स्त्रीची वेदना जाणतात, वेदनेला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा माझे मन आनंद्चिंब होते; कारण स्त्रीचं दुःख, तिच्या मनाची तडफड, तिची कुचंबना जाणणारा, टीप कागद अजुनही इथे तिथे अस्तित्वात आहे जो स्त्रिसाठीकही सुखाचे क्षण घेउन येणार आहे ही जाणीव त्या त्या क्षणी मनात नव्याने जन्म घेत रहते आणि आशेचे किरण पुन्हा पुन्हा मन पुलकित करीत रहातात. संजीव पाध्ये ह्यांनी रंगविलेल्या सर्व कथानायिका काल्पनिक असल्य तरी त्यांची घुसमट, त्यांची कोंडी मात्र काल्पनिक नाही. ते सार्वत्रिक सत्य आहे. प्रत्येकाने अवर्जुन वाचावे असे हे पुस्तक आहे.