-
Prernadayi Antaralyatri Sunita Williams (प्रेरणादा
अंतराळयात्री सुनिता विल्यम्स हिने अवकाशात १९५ दिवस वास्तव्य करण्याची असमान्य कामगिरी केली. २९ तास १७ मिनटांच्या स्पेसवॉक करून तिने महिलांच्या अवकाश भ्रमणात स्व:ताचे विक्रमी नोंदवले. वंशाने भारतीय असलेल्या प्रेमळ पित्याच्या पाठींब्याने सुनिता स्पर्धात्मक आव्हानांना धैर्याने तोंड दयायला शिकली. आनंद सकारात्मक विचाराच्या प्रोत्साहनामुळेच ती पुरुषांच्या जगामध्ये निर्भयतेने वावरली. अमेरिकेच्या भूमीवर वाढली असूनही भारतीयत्वाच्या खुणा जपणा-या सुनीताच्या अपरिमित कष्टांची ही कहाणी. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या सुनीताने जागतिक अवकाश उपक्रमाला अमुल्य योगदान कसे दिले हे प्रत्येकाने अभिमानपूर्वक जाणून घ्यायला हवे. हे सचित्र प्रेरणादायी पुस्तक जीवनात काहीतरी वेगवेगळे करून दाखवण्याची जिद्ध आजच्या विद्यर्थांमध्ये निर्माण करील.
-
Alfred Hitchcock-The Man Who Knew Too Much (आल्फ्र
आल्फ्रेड हिचकॉक म्हणजे संदेहपटांच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट. अर्थात संदेहाशिवाय चित्रपटांतील इतरही अनेक तंत्रमंत्रांचाही तो ’मास्टर’ होता. त्याच्या सर्वच्या सर्व चित्रपटांचा आढावा घेत असताना त्या चित्रमहर्षीच्या बहुमिती प्रतिभेचा आस्वादक वेध घेणारे हे पुस्तक वाचले म्हणजे हिचकॉक हा खर्या अर्थाने चित्रपटसृष्टीतील अजोड असा ’द मॅन हू न्यू टू मच’ होता, याचा थक्क करणारा प्रत्यय येतो.
-
Nisargamitra ( निसर्गमित्र )
"ही सारी सृष्टि केवळ माणसासाठी निर्माण झाली आहे, असं मानंण वेडगळपणाचं ठरेल. माणुस नसेल, तर हे विश्व जेवढे अपूर्ण आहे , तेवढेच एखादा कीटक नसेल, तरीही अपूर्ण आहे. या विश्वाची रचना इश्वरांन सर्वांसाठी केली आहे. तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू दया, अशीच या विश्वाची धारणा आहे... आपल्या या अफाट देशात अनेक ठिकाणी घनदाट जंगल आहेत, त-हेत-हेचे पशुपक्षी आहेत, डोंगरदऱ्यां आणि कोसळते धबधबे यांनी आपला निसर्ग संपन्न आहे. परमेश्वरनं आपल्याला दिलेली ही निसर्गसंपत्ती पुढच्या पिढ्यांसाठी नीट जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे...." असं समजावून सांगणार्या एका अमेरिकन निसर्गमित्राची ही चरित्रकथा... पर्यावरणप्रेमी वाचकांना विचारप्रवृत्त करणारी आणि कार्याची प्रेरणा देणारी ...
-
Kharicha Vata (खारीचा वाटा)
एक निसर्गरम्य खेड. तिथ वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानी पाळलेली खार. सम्रुध्द निसर्ग, पिकपाणी, रानमेवा, जानवर, करामाती मित्र यांत रमलेला, गुंगलेला मुलगा. एके दिवशी गावाच्या नदीवर धरण बांधनारे मशिनारिची घरघर , थोड्याच दिवसात अख्खा गावगाडा हलतो. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथेच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली खरी गोष्ट.
-
3 Zakia Mention ( ३ झाकिया मॅन्शन)
भारतातील प्रत्येक राज्याची संस्कृती, बोली भिन्न आहे. तरी भारतीय म्हणून सर्व जातीधर्माचे लोक एकोप्याने राहतात. या विविधतेतील एकतेचा धागा अनेक लेखकांनी कादंबरीत गुंफला आहे. भारतीय लेखकांनी आपल्या देशातील संस्कृती इंग्रजी भाषेतील पुस्तकातून जगासमोर आणली. गौरी डांगे यांनी ‘३, झाकिया मॅन्शन’ या कादंबरीत अशीच कथा फुलविली आहे. यात करीम अली कुटुंब आणि मानस खरे यांची कथा वाचताना एक वेगळे विश्व आपल्यापुढे येते. याचा मराठी अनुवाद अनघा लेले यांनी केला आहे.
-
Chavadivarcha Diva ( चावडीवरचा दिवा)
चावडीवरचा दिवा' मधील लेखन केवळ आत्मपर आणि ललित रमणीय नसून त्याला संस्कृती चिंतनाचे परिणाम लाभले आहे. गतकाळातील ग्रामजीवन, ग्रामइलाखा त्याच्या रंग, गंध, रसेनसह साकार करतानाच हरवलेल्या लोकसंस्कृतीची मीमांसही डॉ. दत्ता भोसले यांनी केली आहे
-
Bhumi (भूमी)
माणसांचा स्वभाव, त्यांचे एकमेकांशी संबंध याला काही प्रमाणात परिस्थिती कारणीभूत ठरते. म्हणूनच कधी कधी रोज भेटणारी, जवळची माणसे यांच्याशी नाळ जुळत नाही, पण दूरच्यांशी स्नेह जुळतो. अशा मानवी स्वभावाचे कंगोरे 'आशा वगे' यांच्या 'भूमी' या कादंबरीतून दिसतात. २००४च्या 'सुनामी'मध्ये सापडलेल्या तामिळनाडूतील 'कडलूर' ह्या गावातील एका मुलीची ही कहाणी. आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून स्वतःचा शोध घेणा-या मैथिलीची ही कहाणी एक वेगळ अनुभव देते.
-
Shreekrushan Sathalyatra (श्रीकृष्ण स्थलयात्रा)
गीता आदिनाथ हरवंदे यांनी यापूर्वी देशातील विविध तीर्थक्षेत्रांची माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे. आता श्रीकृष्णाचे जिथे जिथे वास्तव्य होते त्या त्या ठिकाणी दौरा करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. श्रीकृष्णाचा पदस्पर्श झालेली ठिकाणे 9 राज्यांत विखुरलेली आहेत. आसाम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाना, केरळ, दिल्ली, बिहार या राज्यांतील विविध ठिकाणे आणि तेथील आताची स्थिती याबद्दल हरवंदे यांनी विस्ताराने लिहिले आहे. श्रीकृष्णाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ठिकाणाची माहिती ही कल्पनाच विलक्षण आहे. हरवंदे यांनी मथुरेपासून सुरवात करून इंद्रप्रस्थपर्यंतची सर्व माहिती आजच्या संदर्भासह देताना या स्थळाबद्दल असलेल्या आख्यायिका आणि दंतकथा याचीही थोडक्यात माहिती दिली आहे. भक्ती व यात्रा या दृष्टीनेच हे पुस्तक महत्त्वाचे आहे असे नाही तर ज्यांना इतिहास आणि भूगोल जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांच्यासाठीही हे पुस्तक महत्त्वाचे आहे.