-
J.R.D Tata Yanche Patra (जेआर.डी टाटा यांचे पत्र)
सध्याच्या वेगवान जगात ई-मेल्स ,सेलफोन, अशांसारख्या तत्पर संपर्कमाध्यमामुळे जग जवळ आणले आहे :पण एकेकाळी मुख्यत्वे पत्र या माध्यमातून संपर्क साधला जात असे पत्रांतून कामांच्या तपशीलाखेरीज आपुलकी व जवळीकही साधली जात असे . शिवाय हि पत्रे पत्रं त्या एका विशिष्ट कालखंडाचा दस्तएवज बनून इतिहास अभ्यासकांना व भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असत .पत्र हा कायमस्वरूपी माहितीस्त्रोत असतो . या पुस्तकातील सुमारे ३०० पत्र इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत . जे .आर. डी. टाटा या विलक्षण व्यक्तिमत्वाच्या चिकित्सक लेखणीतून उतरलेली हि विविध विषांयान स्पर्श करणारी पत्र तत्कालीन सामाजिक , राजकीय, आर्थिक, औघोगिक अशा अनेक क्षेत्रंच दर्शन घडवतात आणि विसाव्या शतकातील एक महान, बहुआयामी व्याक्तीत्वंच अनेकपदरी अंतरंग उलगडून दाखवतात .
-
Vadal Matha Te 1965 Bharat-Pak Yuddha (वादळ माथा त
२० नोव्हेंबर, १९६२ ला यशवंतराव चव्हाण भारताचे 'सरंक्षण मंत्रिपद' भुषविण्यासाठीच दिल्लीला गेले. 'हिमालयाच्या संरक्षणसाठी सह्याद्री' या शब्दात मराठी जानतेने त्यांना निरोप दिला. पण दिल्लीत दाखल झाल्यानंतर सह्याद्रिला काय मनोव्यथा सहन कराव्या लागल्या याची जाणीव जनतेला झाली नाही. यशवंतरावांनी सर्व व्यथा सहन केल्या व एका वर्षात पंडित नेहरूंचा विश्वास व दिल्लीत आपले विशिष्ट स्थान प्रस्थापित केले. चीन विरुद्ध १९६२ मधील युधातिल पराभवानंतर यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधेर्य उच्वान्यसाठी विशेष प्रयत्न केले, तसेच सैन्याला लागणारी सामुग्री, स्वयंचालित बंदुका, दारूगोळा व सर्व निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी कारखाने उभारण्याचे कार्य तत्परतेने पार पाडले त्यामुळे १९६५ च्या भारत-पाक युद्धामध्ये भारताला विजय मिळाला. ताश्कंदमध्ये सापडतील. या सर्व घटनांचा व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडी उहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे.
-
Pavitram (पवित्रम्)
"सोडून देतो मांझ काम.पण जसे जन्म होत राहतात,तसेच मृतयुही.मग त्या कलेवरांचं काय करायचं? कोण दशक्रिया करणार,अग्नि देणार?कारण ही कलेवरं जर अग्निरहित राहिली तर रोगराई पसरेल. प्रेत खालच्या जातीतलं की वरच्या ह्यांन काय फरक पडणार? सडताना जात दिसत नाही."सगळे स्तब्ध झाले. दत्तू पुजारी शांतपणे उठला... कालिंदी म्हणाली,"तुम्ही योग्य तेच केलंत.आत्तपर्यंत प्रत्येक शुभकार्यात मला टाळण्यत आलं.हीन वागणूक देण्यात आली.आता नदी पलीकडच्यांनीही मला टाळावं? शेवंताकडे बारसं होतं.मला नाही बोलावलं.ही एवदीशी होती शेवंता.जेव्हा हीला.वैद्य त्या वस्तीत यायला तायर नव्हते की तिला इथे आणलेलं त्यांना चालत नव्हतं.त्यांनाही आता पवित्र-अपवित्र जाणवू लागलं?" दाराआडून एकणारा गोविंदा मात्र दुखावला.जो त्रास वर्गातील मुलं आपल्याला देतात,तसाच त्रास ही मोठी माणसं आईबाबांनाही देतात? मग तयांचजवळ तक्रार ती काय करायची?
-
Parmeshwar: Ek Sanketik Nav (परमेश्वर:एक सांकेतीक
बरेच जन असे मानतात की , विज्ञानाने मानुस व परमेश्वर यांच्यामद्धे मारून त्या दोघातील अंतर वध्ह्वत नेले आहे. कुठे आहे तो परमेश्वर? तो मृत्यु पवल आहे का? धर्म आणि श्रद्धा या केवळ अफुसारख्या आहेत. चारशे वर्षा पूर्वी विज्ञानाची प्रगती होऊ लागली. तोपर्यंत दैवी शक्तिचा प्रभाव जगावर सर्वत्र होता. पण नंतर हळूहळू माणसाचा देवावार्चा विश्वास ढळू लागला. देवीची जागा विज्ञानाने घेतली. परंतु खुद्द विज्ञान हा एक भ्रामक देव ठरला. परिणामी मानवजात निराश झाली. मणि भौमिक या शास्त्राज्ञाने 'एक्सायमर लेसर ' चा शोध लावला. डोळ्याचा चश्मा घालवण्याची शस्त्रक्रिया परमेश्वराचे अस्तित्व विज्ञानाच्या आधारे शोधायचा प्रयत्न केला. त्याची ही एक थरारक कहानी !
-
Tantradnyanachi Mulakshare Bhag-2 (तंत्रज्ञानाची म
माणसाचे निसर्गाशी जन्मतः च अतूट नाते आहे. निसर्गाच्या विविध रुपांचे अनुभव घेत माणूस उत्क्रांत होत गेला. आपल्या तल्लख बुद्धीचा उत्तम उपयोग करत त्याने या अनुभवाचा विशेष अभ्यास केला. चुकतमाकत अनेक छोटे-मोठे प्रयोग केले. हे प्रयोग म्हणजेच विज्ञान-तंत्राज्ञानाची पाउलवात होती. या पाउलवाटेवरून माणसाने दमदार पावले टाकली आणि स्वत:साठी शेकडो-हजारो साधने कशी निर्माण केली, याबाबतची तपशीलवार व सुबोध शैलीत लिहिलेली माहित म्हणजे 'तंत्रज्ञानाची मुलाक्षारे'.
-
Balnatika Ani Ekpatrika (बालनाटिका आणि एकपत्रिका)
"आज तुमच्यासाठी एक फर्मास भेट आणली आहे.दिलीप प्रभावळकर काकांनी लिहिलेल्या नाटिकांच्या आणि एकापात्रिकांच्या पुस्तकाची.अगदी बालवयापासून अभिनयाचा,लेखनाचा 'छंद' जोपासला.म्हणूनच ते आज नामवंत कलाकार,लेखक होऊ शकले.छोट्या दोस्तांनो !तुम्हीही तुमच्यातील कलागुण वाढवा आणि खूप खूप मोठे व्हा.आमचे तुम्हाला शुभाशीर्वाद ! "
-
Shortcut (शॉर्टकट)
लघुपट निर्मिती बद्दल एका अनुभवी दिग्दर्शकाने दिलेल्या प्रोडक्टीव्ह टिप्स.
-
Sanskar (संस्कार)
समाज हा डाळींब्याच्या दाण्यांसारखा असतो. डाळींब फोडलं तरी सगळे दाणे सैरावैरा पळत नाहीत. कुटुंब, शासन, शिक्षण, न्याय, अर्थ अशा विविध समाजिक संस्थांनी मानवी समाज एकत्र बांधलेला असतो. यासंस्थांच्या बळकटीवरच समाजाचं अस्तिव आणि समृद्धी अवलंबून असते; आणि त्यासाठी काही संस्कार आवश्यक असतात. वैज्ञानिक संशोधनातील नेत्रदीपक कारकीर्द बाजूला ठेवून वि. गो.कुलकर्णी यांनी शिक्षण अध्यापन संशोधनाचं क्षेत्र आपुलकीन आपलंसं केलं आणि बघता बघता होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचा वटवृक्ष महाराष्ट्र सारस्वाताच्या प्रांगणात सळसळू लागला. या सा-या प्रक्रियेत 'वि. गो. उर्फ वि. जी. के.नी केलेली ही निरीक्षणं आणि काही निष्कर्ष त्यांच्या सम्यक दृष्टीचा आवाका दर्शवतातच शिवाय त्यांचं थक्क करून टाकणारं अशा - सोष्टवही दाखवतात. अत्यंत प्रगल्भ विचार त्यांच्या भाषेत वाचताना साधा, सोपा, नि आपला कधी वाटू लागतो, याचा पत्तादेखील लागत नाही. प्रत्येक घराला, शाळेला आणि किबंहुना प्रत्येक पिढीला संजीवनी देण्याची क्षमता असलेलं हे संस्कारच अमृत...
-
Ringanabaherun (रिंगणाबाहेरून)
पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून एखादे क्षेत्र निवडून त्यात यशस्वी झालेल्यांपैकी रामदास भटकळ एक आहेत. ग्रंथव्यवसायात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. रिंगणात काम करतानाच त्यांनी राजकारण, रंगभूमी, संगीत या क्[...]
-
Don Dhurvanvar doon pavel ( दोन ध्रुवांवर दोन पावल
पर्यटनाला जायचं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर भारतातील प्रसिद्ध ठिकाणे वा भारताबाहेरील अमेरिका , सिंगापूर, लंडन अशी मोजकीच नाव येतात. पण अंटार्क्टिका वा आर्क्टिक ही नावं पुढे येणं याची सुतराम शक्यता नाही किंवा अशा प्रकारच्या प्रवासाला जाण्याची इच्छा बाळगणार्यांकडे आपलं भारतीय मन जरा संशयानं पाहते. कारण ह्या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी पैसा व धाडस या दोन्हीची आवश्यकता असते. बांधकाम व्यवसायात कार्यरत असलेल्या सुहास मंत्री ह्यांनी मात्र हे धाडस केलं.मुळातच प्रवासाची आवड असणार्या मंत्री ह्यांनी या दोन ध्रुवांची सफर करण्याचा निश्चय केला आणि तो यशस्वीपणे पूर्ण केला. आणि त्यातूनच हे पुस्तक आकाराला आले. या पुस्तकात पेंग्विन, हिमनग तसेच इतर अनेक गोष्टींची माहिती वाचायला मिळते. आर्क्टिकवरील ट्रॉम्सो गावातील नॉर्दर्न लाईट्सचा प्रत्यक्ष अनुभव लेखकाला स्तिमित करून टाकतो.सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असताना भर दुपारी गाव दिव्यांमध्ये कसे उजळून निघते याचे मनोहारी वर्णन लेखकाने केले आहे. या दोन्ही ध्रुवांवरील निसर्गाची किमया अनुभवताना लेखकाचे मन अचंबित होऊन जाते आणि त्यांनी केलेल्या अनुभवाच वर्णन वाचताना वाचकालाही ते अचंबित करून जाते. या पुस्तकातून वाचकाला दोन्ही धृवाची सफर घडेल हे निश्चित.
-
Yugant. (युगान्त)
मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन हे विफलाच असायचे, हां धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना, असे सारा वेळ वाटते. मनावांचे प्रयत्न, आकांक्षा, वैर, मैत्री-सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उड़विलेल्या पाचोळयासारखी क्षुद्र, पोरकट भासतात; पण त्याच बरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले, आकांक्षा बाळगल्या, त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात. प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट परिपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तीलाही तो जाणवला असला पाहिजे, हे महाभारत वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवते की, त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वत:ची व्यथा होते. त्या व्यक्तिच्या द्वारे संबध मानवतेचे दू:ख आपल्याला खुपत रहते.
-
Vitamin Commonsense (व्हिटॅमिन कॉमन सेन्स)
मानवी जीवन साधे, सुंदर असते, आनंदी असते; पण मनुष्य झापडबंद ते क्लिष्ट, अवघड जीवन जगू लागला आहे. त्यातून दुःख निराशा वाट्याला येते. यासाठी डोळे उघडे ठेवून जग बघायला शिकायला हवे. जीवनात समोर येणा-या गीष्टींचा स्वीकार करून त्यातील वास्तव जाणल्यास जीवन खरेच सुंदर होते, असा संदेश राजेंद्र बिनीवाले यांनी 'व्हिटॅमिन कॉमन सेन्स' मध्ये दिला आहे. छोट्या छोट्या प्रसंगातून शिकत आनंदी कसे जगता येईल, हे यात सांगितले आहे.
-
Pakshi,Pashu Aani Daku (पक्षी,पशु आणि डाकू)
वीरप्पन हळुवार आवाजात उतरला : " मी हत्तींना मारल्याला अनेक वर्ष लोटली आहेत. पण माझ्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत." वन्यजीव छायाचित्रकार कृपाकर आणि सेनानी यांचं एका रात्री बंदीपुर अभयारण्याच्या सीमेवर सीमेवर असलेल्या त्यांच्या घरातून अपहरण केलं गेलं ते समजुतीच्या घोटाळ्यातून. हे अपहरण केलं होतं वीरप्पन या भयंकर डाकूनं. त्याची अशी समजूत झाली होती की छायाचित्रकार द्वयी म्हणजे महत्वाचे सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे त्याचा डाव असा होता की त्यांना ओलीस धरून भरघोस खंडणी आणि माफ़ी या दोन्ही गोष्टी वसूल करायच्या. वीरप्पन आणि त्याची टोळी या ओलिसांना घेउन जंगल तुडवत राहिली. बाह्य जगाशी त्यांच्या संपर्क होता तो एका जुन्या रेडियोद्वारा. ज्या वीरप्पनंन जवळ जवळ अडीचशे माणसांना मारल होत., तो सरकारनं आपल्या मागण्यामान्य कराव्या म्हणून वेगवेगळे डाव रचत असताना दोन्ही ओलीस मात्र कर्नाटक आणि तमिलनाडुच्या जंगलातील जैववैविध्याचा अनुभव घेत होते. त्याच्या बरोबर या प्रवासात विराप्पनाला जवळून बघण्याची संधी मिळाली तेव्हा त्याच्यामध्ये एकवटलेल्या क्रोर्य आणि माणुसकी या परस्पर विरोधी भवनांच्या दर्शनानं ते कोडयात पडले. कृपाकर आणि सेनानी यांच जग वीरप्पन आणि त्यांच्या टोळीपेक्षा पूर्णपणे वेगळें होत.पण तरीही या अपहरण नाट्यात अपहत आणि अपहरणकर्त यांच्यात एक अनामिक स्नेहबंध निर्माण झाला. ' पक्षी, पशु , आणि डाकू' हे पुस्तक म्हणजे कुप्रसिद्ध डाकू आणि त्यांच्या टोळीबरोबर असलेल्या नर्म आणि हृदयस्पर्शी अनुभवांच चित्रण करणारी सहसगाथा आहे.
-
Tatwachintak Charwak (तत्वचिंतक चार्वाक)
चार्वाक इंग्रजीतून तसेच भारतीय भाषांतून, विशेषता: मराठीतून विपुल लिखाण झाले आहे. त्यात एकतर चार्वाकाची इतिहाससापेक्ष मांडणी करताना चार्वाकाची भारतीय जडवादाशी सांगड घालून मांडणी करण्यात आली आहे. जयराशीच्या संशयवादाला - जी लोकयताची एक शाखा किंवा संप्रदाय मानता येईल - फारसे महत्वाचे स्थान दिले गेलेले नाही. तसेच शुद्ध तात्त्विक अंगाने चार्वाक दर्शनाची चर्चा फार थोडी झाली आहे. चार्वाकचर्चेतील ह्या गंभीर तृटी भरून काढण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.