-
Gondan (गोंदण)
माणसामाणसांतले तुटलेले संबंध, परस्परांशी जवळीक साधण्यात त्यांना येणारे अपयश हा शान्ताबाईंच्याचिरंतन कुतूहलाचा विषय आहे. नजरेत भरलेले एखादे दृश्य, मनात रेंगाळणारे संदर्भ, निसर्गाची विशिष्ट रुपकळा, अबोध मनातली खोल गूढ चाळवाचाळव ह्याने शान्ताबाईंच्या मनात काव्य आकार घेऊ लागायचे त्याचा प्रत्यय यावा असा हा काव्यसंग्रह आहे. मात्र "शब्दांनीच परस्परांना भिडू बघतो आपण, लढू बघतो आपण" म्हणणर्यांना शान्ताबाईंना त्याची जाणीव आहे की, "शब्दांना शब्द भेटतीलच असे नाही-शब्दांनी शब्द पेटतीलच असं नाही". ठराविक वृत्तांबरोबरच त्यातून बाहेरही पडलेले शान्ताबाईंचे काव्य येथे वाचायला मिळते. शार्दूलविक्रीडितात लिहिलेली, पण आशयातील नावीन्य प्रकट करणारी अनेक सुनीते हेही ह्या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे.
-
Superstar Rajesh Khanna (सुपरस्टार राजेश खन्ना)
काकाने दत्तक घेतल्यानंतर तो मुंबईत आला व शाळेत जाऊ लागला. महाविद्यालयात स्नेहसंमेलन त्याने गाजविले. त्यातून तो चित्रपटाकडे वळला आणि मग इतिहास घडला. तो चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार बनला. तो म्हणजे राजेश खन्ना. राजेश खन्नाने संपूर्ण चित्रपटसृष्टी व्यापून टाकली. त्याने चित्रपटात रंगविलेला प्रेमवीर अनेकींच्या स्वप्नातील राजकुमार ठरला. 'दो रास्ते ', 'आराधना', 'हाथी मेरे साथी', 'बावर्ची ', 'सफर ', 'खामोशी'मधून त्याने वेगवेगळ्या भूमिका केल्या. त्या लोकांना आवडल्या. त्याच्या चित्रपटांची कथा, संगीत, गाणी हे सर्वच अप्रतिम होते. किशोरकुमार, राजेश खन्ना व राहुल देव बर्मन हे त्रिकुट जमले होते. तो यशाच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन याचा शिरकाव चित्रपटसृष्टीत झाला आणि नंतर राजेश खन्नाचा करिष्मा कमी होऊ लागला. तो का झाला, त्याचे वागणे - बोलणे, त्याच्या नायिका, त्याचे पत्रकारांशी संबंध, इतर सहकलाकारांचे त्याच्याविषयीचे विचार, अन्य क्षेत्रांतील महनीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया, हे सर्व संजीव पाध्ये यांच्या 'एकमेव सुपरस्टार'मधून वाचायला मिळते. डिंपल व त्याचा विवाह, नंतरचे सहजीवन व दुरावा, त्याच्या 'आशीर्वाद ' बंगल्याची कहाणी यात आहे.
-
Bhinna (भिन्न)
माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग भेद, आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित भेद... अशावेळी ’एड्स’सारख्या शारीरिक रोगानं पीडित, समाजाच्या विखारी आरोपी नजरांच्या विळख्यात आणि कुटुंबाच्या गिलोटीन खाली जगण्याचा प्रयत्न करणार्यांचं काय होत असेल? हे सगळे मिळून किती तर्हांनी डोकी ’भिन्न’ करतात. पण एका क्षणी अशांचं हे वेगळेपणच शक्ती, ऊर्जा, चेतना झालं तर? आयुष्याच्या एका टप्प्यावर जगणं निरर्थक वाटू लागलेलं असतानाच मरणंही निरर्थक आहे, याची पाठोपाठ झालेली जाणीव! अशावेळी आपल्या वाट्याला येणार्या प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा असं वाटणार्या, जगावंसं वाटणार्या, चांगलं जगावंसं वाटणार्या ’एड्स’ ग्रस्तांची ही कहाणी. माणसांना ’भिन्न’ करणार्या शकलित बुद्धीच्या माणसांपेक्षा या अशा प्रकारे ’भिन्न’ ठरलेल्यांची कहाणी-
-
Maza Motivatar Mitra (माझा मोटिव्हेटर मित्र)
माझा मोटिव्हेटर मित्र हे अगदी सरळ, सोपं, हलकंफुलकं परंतु तितकंच विचारपरिवर्तन करणारं आणि प्रेरणादायी असं आगळंवेगळं पुस्तक आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अग्रगण्य प्रशिक्षक अतुल राजोळी यांनी या पुस्तकात यशप्राप्तीचे ५० निरनिराळे मैत्रिपूर्ण कानमंत्र दिले आहेत. 'कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही वेळी, त्याला आवश्यक मार्गदर्शन व मोटिव्हेशन देंण' असा अतुलचा या पुस्तक मागील खरा हेतू आहे. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रभावी तंत्रं या पुस्तक मध्ये त्यांनी अतिशय सहज शैलीत मांडली आहेत. आपल्या आयुष्यात उत्तुंग प्रगती साधण्यासाठी, आपली वैयाक्तिक आणि व्यावसायिक स्वप्नं साध्य करण्यासाठी या पुस्तकातील परिणामकारक कानमंत्र नक्कीच मार्गदर्शक ठरतील. यशाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्यासोबत प्रत्येक क्षणी हा मोटिव्हेटर मित्र साथ देण्यासाठी तत्पर असेल.
-
Aaushadhbhan (औषधभान)
औषधसाक्षर होण्यासाठीचे ' रामबाण ' पुस्तक! औषधांचा अतिवापर, कमी वापर किंवा चुकीचा वापर टाळून योग्य पद्धतीने वापर व्हावा यासाठी संग्रही असायलाच हवे असे रामबाण पुस्तक. औषध तेच - जबाबदारीने वापरले तर अ[...]
-
Kshitij Jase Disate (क्षितिज जसे दिसते...)
संगीतकार- कवी-गायक श्री. कौशल इनामदार यांच्या संगीताइतक्याच समर्थ लेखणीचा अविष्कार.
-
Jagar (जागर)
श्री. दीपक चैतन्य मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र एक चांगले साहित्यिक म्हणून ओलखले जातात.त्यांचे आजपर्यंत अनेक कथासंग्रह, कविता संग्रह, नाटके, कादंबर्या प्रासिध्ह झाल्या आहेत. त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र शासनाने आणि अन्य संस्थांचे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ह्याचबरोबर त्यांनी विपुल वृत्तपत्रिय लेखनही केलं आहे. 'सकाळ' य लोकप्रिय दैनिकाच्या 'अँग्रोवन' या शेतीविषयक दैनिकाच्या रविवारच्या पुरवणित श्री. चैतन्य यांच्या 'जागर' या स्तंभात प्रासिध्ह झालेल्या लेखांचा हां संग्रह वाचकांना संग्राह्य असाच आहे.