-
Farasi Premik(फरासि प्रेमिक)
मायभूमीपासून दूरवर एका विलक्षण शहरात गेलेल्या एका स्त्रीच्या प्रेम आणि स्वातंत्र्यशोधाची कहाणी 'फरासि प्रेमिक' ही कथा आहे, नीलांजना मंडल या बंगाली तरुणीची. उपाहारगृहमालक अणार्या किशनलालशी विवाह झाल्यानंतर ती पॅरिसमध्ये येते. पॅरिसमधल्या किशनलालच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये नीलाला सोनेरी पिंजर्यात कोंडल्यासारखं वाटतं. लग्नानंतर तिच्या आशा-आकांक्षा पूणृ हाणं तर बाजूलाच, पण घरात केवळ मोलकरीण आणि शयनेषू रंभा... एवढंच तिचं स्थान पाहून तिचा जीव घुसमटतो. या कंटाळवाण्या, निराशेच्या गर्तेत निघालेल्या आयुष्यातून कुठं मोरपिशी वाट फुटतेय का ? यासाठी नीला आतुर असते आणि अशा वेळी तिच्या अयुष्यात येतो बेनॉयर ड्यूपॉन्ट... गोरापान, निळ्याशार डोळ्यांचा राजबिंडा फ्रेंच तरुण, नीला त्याच्या प्रेमात आकंठ बुडते. बेनॉयर तिची पॅरिसमधल्या रस्त्यांशी, कॅफेजशी, कलादालनांशी ओळख करून देतो... नीलासमोर जणू सर्वस्वी नवं विश्व खुलं होतं. बेनॉयरशी तिचे अगदी उत्कट शारीरिक, भावबंध जुळलेले असतात. हळूहळू इथंही तिला स्वत:च्या आशा-आकांक्षा गुंडाळून ठेवाव्या लागतात. अखेर बेनॉयरचं प्रथम प्राधान्य स्वत:ला आहे. त्याचं फक्त स्वत:वर प्रेम आहे... आपल्या प्रियतमेवर नाही, हे उमगल्यावर त्यांच्या संबंधांना पूर्णविराम मिळतो, पण तिच्या आत्मशोधाच्या मार्गाचा आत्ता तर कुठे प्रारंभ झालेला असतो... धाडसी संकल्पनेवर आधारलेली ही कादंबरी लेखिकेनं अतिशय ताकदीनं मांडलेली आहे. निष्ठुर जगात स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणार्या एका स्त्रीच्या मनोवस्थांचं वेधक चित्रण या कादंबरी आहे.
-
The Afghan(द अफगाण)
रेड फ्लॅग नोटिस जारी केलेल्या फोनवरून केला गेलेला एकच फोन, छापा मारल्यावर लॅपटॉप हातात पडू नये म्हणून त्याची मोडतोड करायचा प्रयत्न, स्वत: पकडले जाऊ नये म्हणून चौथ्या मजल्यावरून घेतलेली उडी ब्रिटिश आणि अमेरिकन इन्टेलिजन्स एजन्सीजची एवढीच खात्री पटते की, जगाला थक्क करेल अशा भयानक घातपाताचा कट अल काईदाने रचलेला आहे. पण तो कोणत्या स्वरूपाचा आहे, कधी घडणार आहे आणि लक्ष्य काय आहे याचा थांगपत्ता लागत नाही. अल काईदामध्ये स्वत:चा माणूस घुसवून कुठल्याही त-हेची माहिती काढणे आजपर्यंत त्यांना कधीही जमलेले नाही. अफगाण आहे इझमत खान, ग्वाटेनामो बे इथे पाच वर्षे तुरुंगात असलेला तालिबान कमांडर आणि अफगाण आहे इराकमध्ये जन्मलेला, पंचवीस वर्षे जगाच्या कानाकोप-यात लढल्या गेलेल्या युद्धांचा अनुभव असलेला कर्नल माईक मार्टिन. जबरदस्त पूर्वतयारी आणि दैवावरच भरवसा ठेवून, जिथल्या भीषण गोष्टींची कल्पना करणेही केवळ अशक्य आहे, अशा अंधा-या अरब जगतात अरब म्हणून इझमत खान म्हणून वावरत कर्नल माईक मार्टिन त्या कटाचा छडा लावू शकेल ?
-
The God Of Small Things(द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज)
पृथ्वीच्या गर्भातून उमटणारे साद-प्रतिसाद, ध्वनी-प्रतिध्वनी, अश्रू आणि हुंदके हे ह्या लेखनाचे प्राणतत्त्व ! मानवी अस्तित्वाला घेरून असणारी आदिम भीति आणि नियतीच्या पाशामधील अपरिहार्यता यांचे वेढे उलगडून पाहणार्या या अद्वितीय लेखनाला अदृश्य मानसिक पणाचे अस्तर आहे. अपरिमित प्रेम, द्वेष, मत्सर, विश्वासघात, तीव्र तिरस्कार, अपराधीपणाचा डंख, अशा अनेक भावभावनांचे पदर कोळ्यांच्या जाळ्या सारखे धावत राहतात. विणले जातात - त्या जाळ्यांच्या वेढ्यांमधून सुटता येत नाही. स्वत:त वेगळे करता येत नाही - कथानकाच्या शब्दाशब्दातून ठिबकणारा शोक, गूढ रहस्य आणि काळीज हलवून टाकणारी खिन्न्ता हे सारेच गूढ अजब चेटूक आहे - अश्या शब्दात जागतिक पातळीवर वाखाणल्या गेलेल्या ह्या 'बुकर पुरस्कार’ विजेत्या कादंबरीचा हा अनुवाद अपर्णा वेलणाकर ह्यांनी इतक्या समरसतेने केला आहे की त्यांनाही साहित्य अकादमीने त्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविले आहे.
-
Sukhad Balsangopan (सुखद बालसंगोपन)
बाललीलांतून बाळाचे मनोगत जाणून घ्या. बाळाची भाषा समजून घेऊन शिका. बाळाचे संगोपन सुखद करा. बाळासाठी आणि तुमच्यासाठीही!
-
Karvalo (कर्वालो)
सह्याद्रीच्या दक्षिण टोकाकडील निबिड अरण्यात चाललेल्या अद्भुतरम्य शोधयात्रेची रोमहर्षक कथा ! उडता सरडा ! एक दुर्मिळ प्राणी ! निसर्गाच्या कोट्यावधी वर्षांच्या वाटचालीत घडलेला एक 'अपघात' ! या उडत्या सरड्याच्या शोधयात्रेतील विविध स्तरावरचे यात्री ! गावंढळ मंदण्णा, इरसाल यंग्टा, चलाख 'किवी' कुत्रा पासून ते महान शास्त्रज्ञ कर्वालो ! निसर्गरम्य पाश्र्वभूमीवरील सशक्त, जिवंत, रसरशीत, नर्मविनोदी लेखन शैलीतून साकारलेली... कर्नाटकातील वेगळाच निसर्ग सामोरा आणणारी, पर्यावरणवादी, वैशिष्ट्यपूर्ण, बहुचर्चित कलाकृती !
-
Lajja (लज्जा)
लज्जा’ ही तसलिमा नासरिन यांची वास्तवावर आधारलेली कादंबरी. बांगलादेशातील मुसलमानांनी हिंदूंचा केलेला छळ आणि बांगलादेशावर प्रेम करणार्या हिंदूंची केलेली कोंडी असा या कादंबरीचा विषय आहे. कडव्या मुसलमानांनी लेखिकेची हत्या करण्याचा फतवा काढला. तिच्या बंडखोर वृत्तीचे यथार्थ दर्शन या कादंबरीत घडले आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रप्रेमाने लढलेले सुधामयबाबू, त्यांचा मुलगा सुरंजन, त्यांची कन्या माया (निलोचना), त्यांची पत्नी किरणमयी अशा चारजणांच्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाची ही कथा आहे. धर्म आणि देश या गोष्टींमधून काय पसंत करायचे असा मूलभूत प्रश्न उपस्थित करून या कादंबरीने तत्त्वज्ञानालाच हात घातला आहे. मूलतत्त्ववादी आपल्या कुटुंबाचा छळ करतात तरीही देशप्रेमाने, आदर्शवादाने भारावलेले हे कुटुंब जातीय सलोखा व्हावा म्हणून प्रयत्न करते. पण परिस्थिती विकोपाला गेली, हिंदूंची मानखंडना पाहिली आणि अखेर बांगलादेश सोडून भारतात येण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा प्रकार लज्जास्पद होता.
-
Fera (फेरा)
या अखंड देशातच कल्याणीचा जन्म झाला होता. भारतानं ब्रिटिशांना हाकललं, पण स्वत:चे तुकडे करून हाकललं... ह्या देशातून उर्दू बोलणार्या मुसलमानांना हाकलताना हिंदूंना सर्व गाशा गुडाळून स्वत:च्याच देशातून बाहेर का जावं लागलं ? मुसलमानांची मायभूमी न हाता, हा देश तर शेवटपर्यंत बंगाल्यांचाच राहिला. तीस लाख बंगाल्यांनी स्वत:च्या रक्तातून हा देश उभा केलाय. ज्यांनी भारताचे तुकड केले आणि या देशाला मुसलमानांची मायभूमी केली, ज्यांच्या दुपणामुळं या देशातील लोकांना आपला देश सोडावा लागला, त्यांना एकाहत्तरच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात चांगलीच चपराक बसली. हा देश बंगाल्यांचा आहे, मुसमानांचा नाही; इथं भाषा महात्ताची आहे, धर्म नाही; हेच या युद्धानं सिद्ध केलं. कल्याणीला वाटलं, रिक्षा थांबवून खाली उतारावं, सर्व अंगावर माती माखावी. ह्या मातीचं प्रेम तिला दुसर्या कुठल्याच मातीत आपलं म्हणू देत नव्हतं. माणूस एकाच मातीवर प्रेम करू शकतो, तर! कल्याणी आज तिच्या जन्मगावच्या मातीचा वास घ्यायला आली होती. ह्या मातीतूनच तिचा जन्म झाला होता- कोणा स्त्रीच्या गर्भातून नाही, तर ह्या मातीतून....