-
Phirasti (फिरस्ती)
जे न हारता लढत राहतात ... खचलेल्याला उभारी देतात , अशा लोकांमधील ही फिरस्ती
-
Chakrivadal (चक्रीवादळ )
मानवाने कितीही प्रगती केली, तरी निसर्गापुढे तो खुजा आहे. दुष्काळ, भूकंप, वादळ अशा प्रसंगी ते प्रकर्षाने जाणवते. निसर्गाचे रौद्र रूप मानवाला होत्याचा नव्हते करते. याचा अनुभव नोव्हेंबर १९७७ मध्ये आंध्र प्रदेशच्या सागरी किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि एकच हाहाकार उडाला. वादळाबरोबरच मुसळधार पाऊस, सागराच्या लाटांनी उद्ध्वस्त केलेली जमीन, तीस हजार माणसांच्या मृत्यूचे तांडव देशाने पाहिले. त्याचे चित्रण प्रभाकर पेंढारकर यांनी ‘चक्रीवादळ’ या कादंबरीत केले आहे. सत्य घटना, प्रसंग, यामुळे निसर्गाने निर्माण केलेले एक भयाण वास्तव पुढे येते.
-
Congressne Aani Ghandhijinni Akhand Bharat Ka Nak
भारताच्या फाळणीसाठी कॉंग्रेसला व गांधीजींना ‘जबाबदार’ धरायचे की त्यांना फाळणीचे ‘श्रेय’ द्यायचे? ‘गांधीजींमुळेच आम्ही फाळणी स्वीकारली,’ असे नेहरू म्हणाले ते काही खोटे नव्हते. एका टप्प्यानंतर ‘अखंड भारता’चा आग्रह धरल्यास देशातील बहुसंख्य हिंदूंच्या हिताचे रक्षण करणे आणि एक राष्ट्र म्हणून कारभार चालविणे अशक्यप्राय आहे, याची सुस्पष्ट जाणीव गांधीजींसह कॉंग्रेसला पहिल्यापासूनच होती. म्हणूनच भारताची फाळणी कॉंग्रेसने पूर्ण विचारांती स्वीकारली. ..ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी सखोल संशोधन करून ‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ सिद्ध केला आहे. राजहंस प्रकाशनतर्फे तो प्रसिद्ध होत आहे
-
Shivaji The Mangement Guru (शिवाजी द मॅनेजमेंट गुर
हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थापन म्हणजे काय याची सखोल माहिती देतं.हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थापनाची चौदा तत्वे, रत्ने याची माहिती देऊन जगातील सर्वात यशस्वी व्यवस्थापकाने कोणती कामे केलि पाहिजेत याची माहिती देतं.व्यवस्थापनाची साड़ी आवश्यक कौशल्या आणि नियोजन कसे करावे याबाबत हे पुस्तक माहिती देत. नियोजनाचे टप्पे आणि निर्णय प्रक्रिया यावर हे पुस्तक प्रकाश टाकते.आयुष्यात प्रत्येकाला निर्णय हां घ्यावाच लागतो. तेंव्हा अचूक निर्णय कसा घावा हे तुम्हाला शिकायला मिळेल. जग जिंकायचे टार तुम्हाला नेतृत्व हे करावंच लागत येंव्हा नेतृत्व म्हणजे के? नेतृत्वाचे यशस्वी पैलू कोणते आणि ते कसे आत्मसाद करावे याचे मार्गदर्शन तुम्हाला या पुस्तकातून मिळेल. लोकांना कोणत्या प्रकारच्या प्रेरणा दिल्या म्हणजे लोक तुमच्या भोवती गोळा होतात आणि ते कसे हाताळले जातात याची माहिती मिलते. जगावेगली प्रेरणादायी उदहारणे या पुस्तकातून तुम्हाला मिलातिल आणि एक यशस्वी उद्योजक, व्यवस्थापक किंवा नेता म्हणून तुमचं आयुष्य घडविण्यासाठी हे पुस्तक तत्पर असल्याचे प्रथमदर्शानिचे तुम्हाला कळुन येइल. आयुष्याला दिशा देणारे हे पुस्तक एकदा नाहीतर अनेक वेळा वाचुन काढावे आणि अंमलात आणावे असेच आहे. तुम्ही एक महत्वकांक्षी व्यक्ति आहात. जग जिंकण्याची तुमची मानसिकता आहे म्हनुनच तुम्ही हे पुस्तक पाहता क्षणीच खरेदी केलेलं आहे. चल टार आता ते वाचु आत्मसात करू आणि जग जिंकुया.
-
Shivray:Bhag 1 (शिवराय (भाग १ )
छत्रपती महाराजांचा लढायांव्यतिरिक्त खरा इतिहास
-
Shivray:Bhag 3 (शिवराय:भाग ३)
हे आहे स्वराज्याची राजधानी रायागादावारिल जगदीश्वर मंदिर. याला चारही बाजूंनी मशिदिप्रमाने मिनार असून दरवाज्यावर जाळी कोरलेली आहे. मंदिर मशीद ही दोन्ही एकच ठेउन महाराजांनी ईश्वर एक असल्याचं रयतेला जे शिकवलं त्यांचं जिवंत प्रतिक. प्रतिगामी मंत्रिमंडळाने बहुमताने विरोध करूनही महाराजांनी हे जगादिश्वर मंदिर बांधले. अपेक्षा हीच की आम्हीही असेच चंद्र-सूर्य असेपर्यंत गुण्या गोविंदाने नांदावे! शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात एकाही किल्ल्यावरील एकहि मशिद किंवा दर्गा पाडला नाही उलट त्यांची व्यवस्था जावी याची काळजी घेतली. महाराजांनी निर्माण केलेल्या या उदार तत्वाचं आणि जातीय सलोख्याचं रक्षण कारण आपलं कर्त्तव्य आहे.
-
khara sambhaji (खरा संभाजी)
जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतू बांधणारा आदिलशाही, कुतुबशाहीची एकजूट करणारा आणि त्याचवेळी सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रजांना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा , त्याच वेळी मोघलांचा कर्दनकाळ ठरलेला दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन करणारा उत्तरप्रदेशापासून दूर तामिळनाडू कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा इतर धर्मांचा मान सन्मान राखणारा धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा बाल मजुरी व वेठबिगारी विरुद्ध कायदा करणारा शिवप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधराव्या दिवशीच दूर मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरवर छापा घालणारा स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा देहू ते पंढरपूर आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबविणारा सैनिकांच्या उत्पन्नाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातुन तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा स्वतःचे आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा खरा संभाजी....
-
Perfect Reciepies(परफेक्ट रेसिपीज् )
स्वयंपाक रुचकर करणे ही जशी एक कला आहे. त्याचप्रमाणे तो झटपट व पाहणार्याच्या नजरेला आकर्षित करून घेणारा हवा, ही सुद्धा एक कला आहे. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन परफेक्ट रेसिपीज् मधल्या पाककृती लिहिल्या गेल्या आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीला फळफळावळ, धान्ये, मासे, मटण यांच्या खरेदीविषयी आणि टिकविण्यासंबंधी सांगितले गेले आहे. कोणत्याही पदार्थाची चव तिच्या ताजेपणावर अवलंबून असते, हे लक्षात घेऊन विशेषतः मासे, मटण खरेदीविषयी दिलेल्या सूचना स्वयंपाकात रुची असणार्या सर्वांनाच मार्गदर्शन करतील. मसाले, तेल, तूप यांच्या स्वयंपाकातील वापराविषयीच्या सूचनाही महत्त्वाच्या आहेत. डाएटसाठी करावयाचे पदार्थही रुचकर करण्यासाठी दिलेल्या सूचना डाएट करणार्या व्यक्तींना दिलासा देतील. व्हेज-नॉनव्हेज स्नॅक्स, भात, पुलाव, चटणी, कोशिंबिरी, भाकरी, परोठे, नान, पुर्या, डेझर्टस्, पक्वान्ने, फराळाचे गोड व चमचमीत पदार्थ, बेकिंग, आईस्क्रीम, ज्यूस, मिल्कशेक इत्यादी प्रांतीय व परप्रांतीय शाकाहारी पदार्थांबरोबरच मासे-मटण-चिकन, विशेषतः आजचे लोकप्रिय मालवणी पद्धतीचे मांसाहारी पदार्थ, चायनीज पदार्थ इत्यादी पाककृती या पुस्तकातून दिलेल्या आहेत. या पाककृतींचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक पाककृती स्वतःबनवून बघितल्यानंतर तिचा परफेक्ट स्वाद जमल्यानंतरच त्या-त्या पदार्थांत वापरलेल्या वस्तूंचे प्रमाण लक्षात घेऊन ती-ती पाककृती लिहून काढली आहे, नव्याने स्वयंपाक शिकू पाहणार्या तरुणींनाही पाककृती करणे/शिकणे सोपे जावे म्हणून वाटी-चमच्यांची मापे दिलेली आहेत. स्वयंपाकाविषयीचे हे परफेक्ट पुस्तक सुगृहिणींना तसेच स्वयंपाक शिकणार्या सर्वांनाच मोलाचे साहाय्य करेल असा विश्र्वास आहे.
-
Annpurana(अन्नपूर्णा )
विद्वान लेखक कै. स. आ. जोगळेकर यांच्या कन्या आणि प्रसिद्ध साहित्यिक अच्यत बर्वे यांच्या पत्नी. माहेरची माणसे चवीची चोखंदळ, तशीच सासरचीही. त्यामुळे नित्य नवनव्या पाककृती आत्मसात होत गेल्या. थोडे वैविध्य हवे, म्हणून केटरिंग कॉलेजचे शॉर्ट कोर्सेस्ही केले. गेली अनेक वर्ष निरनिराळ्या मासिकांतून आणि वर्तमानपत्रांतून विविध प्रकारच्या पाककृतींविषयी सातत्याने लेखन. महिलांच्या वेगवेगळ्या संस्थांमार्फत आणि नियतकालिकांतर्फे भरलेल्या पाककलास्पर्धामध्ये परीक्षक. याच विषयावर इतरत्रही लेखन व प्रात्यक्षिके. विषयाचा प्रदीर्घ व्यासंग, विस्तृत अनुभव आणि कणाकणाने गोळा केलेले ज्ञानाचे समृद्ध भाण्डार यांच्या आधाराने सिद्ध झालेला हा ग्रंथ नव्या-जुन्या गृहिणींनी सतत हाताशी ठेवावा, असाच आहे.