-
Tai Mi Collector Vhayanu ! (ताई, मी कलेक्टर व्हयनू
प्रतीक्षा करणार्या आम्हा सर्वांना गेटच्या बाहेर काढण्यात आले. निकाल चार-पाच नोटीस बोर्डांवर लावल्यानंतर गेट उडण्यात आले. मोठा कोलाहल झाला व निकालासाठी ताटकळत बसलेले सर्वजण नोटीस बोर्डांवर मधमाशांसारखे जाऊन चीपकले. मी बोर्डासमोर उभ्या असलेल्या मुलांच्या कंबरांमधून जागा करून माझे मुंडके मध्ये घुसवले आणि मान वर करून तालिकेकडे बघू लागलो. तालिकेत माझे नाव बघितले तेव्हा माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. माझ्या हृदयाचे ठोके काही सेकंदांसाठी बंद झाले! तालिकेत दिसणाऱ्या माझ्या रँककवरून मला आय.ए.एस. मिळणार हे निश्चित झाले होते. जे मी अनुभवत होतो त्यावर माझा विश्वास बसत नव्हता.मी घरी आतुरतेने वाट बघत असलेल्या स्मिताला आणि नंतर माझ्या माऊलीला-ताईला-आनंदाची बातमी कळवण्यासाठी उतावीळ झाले होतो. त्यांना फोन करतोपर्यंत माझा कंठ दाटून आला होता व डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ताईने फोन उचलताच मी जोराने ओरडलो, "ताई, मी कलेक्टर व्हयनू!"
-
Rangmudra( रंगमुद्रा)
हे सारेच जण मोठे कलावंत. प्रत्येकानं आपल्या कर्तृत्त्वानं कलेच्या क्षेत्रात ठसा उमटवलेला. या कलावंतांचं व्यक्तिमत्त्व, त्यांची जडणघडण, त्यांचं योगदान यांचा वेध घेत घेत रंगभूमीचं प्रयोजन, समाजाच्या अभिरुचीची घडण, सर्जनशील निर्मितीची प्रक्रिया यांचाही शोध.
-
Rashtirya Swayamsewak Sanghane Gamawaleli Varse( र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या डॉ. संजीव केळकर यांनी संघाच्या कार्यपद्धतीचे या पुस्तकात विश्लेषण केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडलेल्या काही मंडळींपैकी दोघा-तिघा मंडळींनी जी पुस्तके लिहिली त्यापेक्षा हे पुस्तक वेगळे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाबद्दल आस्था असतानाही केळकर यांनी येथे कठोर चिकित्सा केली आहे. संघाला गोळवलकर यांच्या मार्गाने यश मिळणार नाही, तर देवरस यांच्या सर्वसमावेशक पद्धतीनेच उज्ज्वल काळ असेल, असे मत लेखक मांडतात. गोळवलकर यांनी संघाच्या कामाची दिशा बदलली. त्यामुळे संघटनेचे बरेच नुकसान झाले. केळकर यांनी अनेक पुस्तकांचे संदर्भ घेऊन, विविध पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून केळकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. अशोक पाध्ये यांनी मराठी अनुवाद केला आहे. अभ्यासक आणि सामान्य वाचक दोघांनाही हे पुस्तक आवडेल.
-
Stri Virudh Purush?(स्त्री विरुद्ध पुरुष?)
त्री आणि पुरुष या दोघांचे अस्तित्वच मुळी एकमेकांशिवाय अशक्य असताना परस्परांमध्ये सामंजस्याऐवजी संघर्षच जास्त का, भेदाभेदांचे निमित्त करून विषमता का, अशा अनेक प्रश्नांचा निखळ मनुष्यवादी दृष्टिकोनातून ऊहापोह करणारे हे पुस्तक संवेदनशील वाचकांच्या मनातील असंख्य समजुतींना धक्का देते. स्त्री-पुरुष नात्याचे नर आणि मादी याखेरीजही किती लोभस फुलोरे आहेत, हे पटवून देत नव्या सहजीवनाच्या मार्गाकडे सहजपणाने घेऊन जाते. नकळत परिवर्तन घडवून आणते.
-
Eklavya(एकलव्य)
श्री दासबोध' ह्या लोकोत्तर ग्रंथात सच्छिष्याची लक्षणं विस्तारानं विशद करताना श्रीसमर्थ रामदास म्हणतात : ऐसे सच्छिष्यांचें वैभव । सद्गुरुवचनीं दृढभाव । तेणें गुणें देवराव । स्वयेंचि होती॥ (दशक पाचवा, समास तिसरा) ... असं सच्छिष्याचं वैभव असतं. सद्गुरुस्वरूप प्राप्त करून घेतलेला पहिला सर्वोत्तम शिष्य एकलव्य. त्याची ही चरितकहाणी आद्य एकलव्याच्या कापल्या अंगठ्यातून गळणार्या रक्ताच्या कणाकणांतून कधी जात, कधी धर्म, कुठं रक्तशुद्धी, कुठ वर्ण अशा कोणत्या ना कोणत्या कारणानं रोज नवनवे एकलव्य जन्माला येत आहेत; आणि आयुष्यातील छोट्या-मोठ्या संघर्षाला भिणारे, पोटासाठी लाचार झालेले द्रोणाचार्यही पावलोपावली भेटत आहेत. महाभारत-काळापासूनच ज्ञान आणि पोटभरू विद्या यांची गत सुरू झाली. ज्ञानोपासक आत्मकेंद्रित, अहंमन्य, लाचार व पोटार्थी बनले. त्यामुळं ज्ञान व समाजाची नैतिक घसरगुंडी झाली. स्वार्थप्रेरक, पक्षपाती आणि उच्च जीवननिष्ठा न देणारं ज्ञान हेच व्यक्तीच्या आणि समीच्या र्हासाचं व अपकर्षाचं मुख्य कारण होत गेले. या चरितकहाणीचा मूलस्त्रोतच हा आहे. प्रत्येक ज्ञानपिपासूनं वाचायला हवीच, अशी ही कथावस्तू आहे.