-
Chinmadhala Dr. Jinduo
१९४९ साली चीनमध्ये साम्यवादाची राज्यपद्धती आली. तेव्हापासून चिनी जनतेने फार सोसलंय. साम्यवादाच्या बगलेत पडलेला दहशतवाद भोगलाय. कॉम्रेड्सच्या त्या राज्यात ’जगत राहणे’ म्हणजेही कोणते दिव्य, याची खबर जगाला पोहोचू न देण्याची दक्षता तिथल्या राज्यकर्त्यांनी पुरेपूर घेतली होती. चीनला प्रत्यक्ष भेट देऊन बांबूच्या पडद्याआडचा दहशतवाद कादंबरीरूपात आणणारी ही साहित्यकृती. लेखिका म्हणते, ’आपल्याहाती असलेल्या लोकशाहीच्या ठेव्याची जाणीव व्हावी; लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका, न्यायालयात दाद मिळण्याची सोय, कुणावरही जाहीर टीका करण्याचा परवाना, अशा सोयीस्कर समजुतीत बेपर्वा वागणार्या आपले डोळे उघडावेत, म्हणून ही लिहिली.’ स्वातंत्र्य मिळताच ’लोकशाही’ ऐवजी ’साम्यवाद’ आपल्या कपाळी आला असता तर...?
-
Meera Aani Mahatma (मीरा आणि महात्मा)
मॅडलिन स्लेड. ती होती एका ब्रिटिश अॅडमिरलची मुलगी. रोमा रोलाँ या फ्रेंच साहित्यिकाची मानसकन्या. तिनं वाचलं एक चरित्र, रोमा रोलाँनी लिहिलेलं. महात्मा गांधींचं ते चरित्र वाचून ती भारावून गेली. इतकी की, तिनं उभं आयुष्यच गांधीजींच्या चरणी वाहायचा निर्णय घेतला. महात्माजींनी तिच्या समर्पणभावनेला प्रतिसाद दिला. तिला आश्रमवासिनी व्हायला संमती दिली. तिचं नाव बदललं, ’मीरा’ ठेवलं. त्या दोघांमध्ये विकसित झाले हळवे भावबंध. ते कधी वादळी ठरले, तर कधी हुरहूर लावणारे. त्या जगावेगळ्या नातेसंबंधांची आगळ्या शैलीत सांगितलेली प्रभावी भावकथा.
-
Speed Post (स्पीडपोस्ट)
आई आणि मुलांमधला रक्तबंध आदिम...शरीराने आणि मनानेही काळजाशी घ्ट्ट बांधलेला ! सुंदर, निरामय जीवनमूल्यांना पैशाच्या दावणीशी बांधून मानवी नात्यांमधला प्राणच शोषू पाहाणार्या आधुनिक अर्थसत्तेने आई मुलांच्या नात्याला नवं परिमाण दिलं आहे... हादरे आणि आव्हानही दिलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम लेखिका शोभा डे यांनी आधुनिकतेच्या झंझावातात जगणार्या आपल्या सहा मुलांना लिहिलेली ही पत्रं... जगातल्या कुठल्याही आईला तिचीच वाटतील अशी ! गोंधळून टाकणार्या, जीवघेण्या स्पर्धेत लोटून उद्ध्वस्त करणार्या दुनियेशी टक्कर देणं अपरिहार्यच बनलेल्या आपल्या मुलांसाठी कुणाही आईचं काळीज तुटावं, अशा प्रत्येक विषयाची चर्चा या पत्रांमध्ये आहे - कुटुंबाची चौकट, परस्परांमधल्या नात्यांचे बंध, कौटुंबिक संस्कृती, परंपरा आणि नीतीमूल्यांचा आग्रह... कठोर शिस्त आणि सारंच झुगारून देणारी बंडखोरी...तासन् तास चालणारे टेलिफोन कॉल्स आणि लठ्ठ बिलांवरून घरात होणार्या हाणामार्या... मध्यरात्रीपर्यंत चालणार्या पार्ट्या आणि इंटरनेटवरचं चॅटींग... वयात येतानाच्या काळज्या, कोवळ्या वयातलं प्रेम, झपाटून टाकणारं शारीरिक आकर्षण आणि मैत्रीची नाजुक गुंतागुंत... जोडीदाराची निवड आणि शारीरिक संबंधांचा तिढा ! देश...देव...धर्म... सामाजिक जबाबदार्या आणि नागरिकत्वाचं भान!- अपरंपार प्रेमाने ओथंबलेली, मायेने जवळ घेणारी, कधी पाठीत धपाटे घालणारी, चिडवणारी, टिंगल करणारी तर कधी धारेवर धरणारी, मनसोक्त हसवणारी आणि हसता हसता अचानक डोळ्यात पाणी उभं करणारी ही सुंदर पत्रं... 'जगण्या'साठी आसुसलेल्या प्रत्येक मनाला स्पर्शून जातील
-
Miraj
मिराज म्हणजे मृगजळ. मैलोगणती पसरलेल्या रुक्ष वालुकामय प्रदेशात अतीप्रखर उन्हाचे वेळी, दूरवर दिसणारा पाण्याचा आभास. ज्याला खरं अस्तित्व नसतंय; पण असल्यासारखं वाटतं. लेखक बंडूला चंद्ररत्न यांनी, वाळवंटी प्रदेशात घडणा-या या कादंबरीला फार समर्पक शीर्षक दिलेलं आहे. खेड्यातल्या शांत, संथ वातावरणातून उपजीविकेसाठी नव्याने विकसित झालेल्या शहरातल्या धबडग्यात येऊन राहणा-या दोन अश्राप जिवांची ही कथा. ते आणि त्यांची स्वप्नं यांची चित्तरकथा अंगावर शहारा आणते. सुख आणि स्वास्थ्य ही त्यांना शेवटपर्यंत मृगजळासारखी चकवत राहतात. पेट्रोडॉलर, उघड्यावर भरणारा सुवर्णबाजार यांच्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी आपण ज्या देशांविषयी ऐकतो, त्या तेल समृद्ध आखातील देशातलं हे दाहक आणि करूण वास्तव. अत्यंत साधेपणाने सरळ, समोर आलेल्या त्या चकचकीत नाण्याची ही दुसरी बाजू. अक्षरश: जगातल्या सगळ्या देशातली माणसं जिथे पैसे कमवायला येतात, तिथल्या स्थानिक माणसांची काय गत होते याचं प्रभावी चित्रण यात वाचायला मिळतं. अशीच मोठी शहरं आपल्याही देशात आहेत. आसपासच्या खेड्यातून येणा-या स्थानिक कुटुंबांची अशीच परवड होत असेल का ? या विचाराने मला ही कादंबरी वाचत असताना झपाटलं आणि म्हणून मी ती अनुवाद करायला घेतली. वाचकांना काय वाटतं ते त्यांनी वाचून ठरवायचं आहे. श्री. सुनील मेहता व त्यांचे सहकारी कर्मचारी, श्री. चंद्रमोहन कुलकर्णी, यांचा मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करते.
-
Postmaster Aani Itar Katha (पोस्टमास्तर आणि इतर कथ
माणूस आहे म्हणूनच या जगात भावनांचा सुंदर गोफ विणला जातो, आणि त्याला साथ असते निसर्गाची. रवीन्द्रनाथांच्या जीवनात 'माणूस' आणि 'निसर्ग' यांना असाधारण स्थान आहे, त्यांच्या कथेत निसर्ग हा फक्त वर्णनाकरिता येत नाही, तर भावभावनांच्या खेळात महत्त्वाची भूमिका बजावतो. निसर्गाची बदलणारी रूपं माणसाच्या बदलणार्या भावनांच्या प्रतिमा असतात. निसर्ग आणि माणूस यांच्या संयोगातून फुललेली विश्वकवीची कथा तो महामानव होता हे नकळत सांगून जाते.
-
Kahani Londonchya Aajibainchi
राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात जन्माला आली. परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली. तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा, इतिहास, काही माहीत नव्हतं. इथंही ती निरक्षरच होती; त्यामुळे लंडन हे गावाचं नाव आहे की देशाचं, असा संभ्रमही बरेच दिवस तिच्या मनाला असायचा! पण कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती झाली. तिनं भरपूर पैसे मिळवले. भरपूर खर्चही केले. आपली माणसं, आपला धर्म, आपली जीवनपद्धती यांचं एक मूर्त चित्र स्वतःच्या आयुष्यात तिनं दाखवून दिलं. तिनं जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या शवावर वाहण्यासाठी लंडनच्या गोर्या मेयरनं - मेयर ऑफ बारनेटनं फुलं पाठवली आणि लंडनमधल्या तिच्या भारतीय मुलांनी तिची शवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून नेली !
-
Shivray M (शिवराय)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आतापर्यंत कोणी केलेला नव्हता. लढायांव्यतिरिक्त महाराजांचे अनेक क्रांतीकारी निर्णय अत्यंत दूरदर्शी आणि समाजमनावर शेकडो वर्षे प्रभाव टाकणारे आहेत. आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक क्रांती करताना अंधश्रद्धा निर्मूलन करून लोकशाही राज्यव्यवस्था आणि पंचायत राज ही संकल्पना अस्तित्वात आणली. जातीपातीच्या अभेद्य भिंती पाडून समतेची मुहूर्तमेढ वयाच्या पाचव्या वर्षी रोवली. उद्धवस्त पुणे शहरातील जमिनीवर सोन्याचा फाळ लावलेला नांगर चालवून हाती असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा लोक कल्याणासाठी कसा उपयोग करावा याचा आदर्श दाखवून दिला. अर्थात जिजाऊसाहेबांच्या सर्व गोष्टीच्या कर्त्या धर्त्या होत्या हे वेगळे सांगणे नको. महाराजांनी वतनदारांच्या ताब्यात असलेल्या खाजगी जमिनीचे राष्ट्रीयकरण करून गरीब श्रीमंत यातील दरी कायमची बुजविण्याचा कांतीकारक प्रयोग केला. महाराजांनी महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी प्रयत्नपूर्वक जलनियोजन केले. पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेबरोबर विहीरी, तलाव, तळे, बंधारे बांधले. याशिवाय अतिक्तित उपलब्ध पाण्याचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी फळबागांना पुरेसे प्रोत्साहन दिले. किल्यावर पावसाळ्यात उपलब्ध होणार्या पाण्याचे रेन हार्वेस्टिंग करून थेंब थेंब पाण्याचा उपयोग केला. त्याचाच परिणाम असा की महाराष्ट्रातील कोणताही किल्ला पाण्याच्या अभावामुळे शत्रूला जिंकता आला असे कधीच झाले नाही.
-
Krosha Vinkam (क्रोशा विणकाम)
बाहेर कुठेही विणलेले टेबलमॅटस्, पडदे, रूमाल पाहिले, की त्यांचे मनमोहक डिझाईन आपले लक्ष वेधून घेतात. आणि हे डिझाईन कसे केले असेल असा प्रश्न मनात येतो. एका सुईवर दोर्याने केलेले क्रोशाकाम पाहताक्षणी सर्वांनाच आवडते. या पुस्तकात अशीच अनेक डिझाईन्स पहायला मिळतील. सुई हातात कशी धरायची, टाक्यांची माहिती इथपासून विविध लेस, फुले, टेबलमॅटस्, टोप्या, कॉलर्स इ. साठी सुंदर डिझाईन कसे विणावे याची सचित्र माहिती या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. पुस्तकाच्या मदतीने स्वत: कलाकुसर करा आणि आपले घर सजवा.
-
Mahanayak (महानायक )
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणी! अडतीस कोटी देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी!
-
नाझी भस्मासुराचा उदयास्त
जर्मनीत सरकार उरले नाही. शास्ता उरला नाही. लक्षावधी सैनिक व सर्वसामान्य नागरिक बेघर झाले. अन्न नव्हते, निवारा नव्हता, सर्वत्र पडलेली घरे होती. चिंध्या पांघरून अर्धपोटी अवस्थेत पुढचा हिवाळा जनतेला काकडत काढवा लागणार होता. पुढे फक्त अंधार होता, भीषण अंधार. मृत्यू-दरीसारखा. तिसरे राईश इतिहासजमा झाले होते. या तिसर्या राईशच्या उदयास्ताची कहाणी.