-
Karvalo (कर्वालो)
सह्याद्रीच्या दक्षिण टोकाकडील निबिड अरण्यात चाललेल्या अद्भुतरम्य शोधयात्रेची रोमहर्षक कथा ! उडता सरडा ! एक दुर्मिळ प्राणी ! निसर्गाच्या कोट्यावधी वर्षांच्या वाटचालीत घडलेला एक 'अपघात' ! या उडत्या सरड्याच्या शोधयात्रेतील विविध स्तरावरचे यात्री ! गावंढळ मंदण्णा, इरसाल यंग्टा, चलाख 'किवी' कुत्रा पासून ते महान शास्त्रज्ञ कर्वालो ! निसर्गरम्य पाश्र्वभूमीवरील सशक्त, जिवंत, रसरशीत, नर्मविनोदी लेखन शैलीतून साकारलेली... कर्नाटकातील वेगळाच निसर्ग सामोरा आणणारी, पर्यावरणवादी, वैशिष्ट्यपूर्ण, बहुचर्चित कलाकृती !
-
Lajja (लज्जा)
लज्जा’ ही तसलिमा नासरिन यांची वास्तवावर आधारलेली कादंबरी. बांगलादेशातील मुसलमानांनी हिंदूंचा केलेला छळ आणि बांगलादेशावर प्रेम करणार्या हिंदूंची केलेली कोंडी असा या कादंबरीचा विषय आहे. कडव्या मुसलमानांनी लेखिकेची हत्या करण्याचा फतवा काढला. तिच्या बंडखोर वृत्तीचे यथार्थ दर्शन या कादंबरीत घडले आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रप्रेमाने लढलेले सुधामयबाबू, त्यांचा मुलगा सुरंजन, त्यांची कन्या माया (निलोचना), त्यांची पत्नी किरणमयी अशा चारजणांच्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाची ही कथा आहे. धर्म आणि देश या गोष्टींमधून काय पसंत करायचे असा मूलभूत प्रश्न उपस्थित करून या कादंबरीने तत्त्वज्ञानालाच हात घातला आहे. मूलतत्त्ववादी आपल्या कुटुंबाचा छळ करतात तरीही देशप्रेमाने, आदर्शवादाने भारावलेले हे कुटुंब जातीय सलोखा व्हावा म्हणून प्रयत्न करते. पण परिस्थिती विकोपाला गेली, हिंदूंची मानखंडना पाहिली आणि अखेर बांगलादेश सोडून भारतात येण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा प्रकार लज्जास्पद होता.
-
Fera (फेरा)
या अखंड देशातच कल्याणीचा जन्म झाला होता. भारतानं ब्रिटिशांना हाकललं, पण स्वत:चे तुकडे करून हाकललं... ह्या देशातून उर्दू बोलणार्या मुसलमानांना हाकलताना हिंदूंना सर्व गाशा गुडाळून स्वत:च्याच देशातून बाहेर का जावं लागलं ? मुसलमानांची मायभूमी न हाता, हा देश तर शेवटपर्यंत बंगाल्यांचाच राहिला. तीस लाख बंगाल्यांनी स्वत:च्या रक्तातून हा देश उभा केलाय. ज्यांनी भारताचे तुकड केले आणि या देशाला मुसलमानांची मायभूमी केली, ज्यांच्या दुपणामुळं या देशातील लोकांना आपला देश सोडावा लागला, त्यांना एकाहत्तरच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात चांगलीच चपराक बसली. हा देश बंगाल्यांचा आहे, मुसमानांचा नाही; इथं भाषा महात्ताची आहे, धर्म नाही; हेच या युद्धानं सिद्ध केलं. कल्याणीला वाटलं, रिक्षा थांबवून खाली उतारावं, सर्व अंगावर माती माखावी. ह्या मातीचं प्रेम तिला दुसर्या कुठल्याच मातीत आपलं म्हणू देत नव्हतं. माणूस एकाच मातीवर प्रेम करू शकतो, तर! कल्याणी आज तिच्या जन्मगावच्या मातीचा वास घ्यायला आली होती. ह्या मातीतूनच तिचा जन्म झाला होता- कोणा स्त्रीच्या गर्भातून नाही, तर ह्या मातीतून....
-
Tamil Tigress
Two days before Christmas in 1987, at the age of 17, Niromi de Soyza found herself in an ambush as part of a small platoon of militant Tamil Tigers fighting government forces in the bloody civil war that was to engulf Sri Lanka for decades with her lifelong friend, Ajanthi, also aged 17. Leaving behind them their shocked middle-class families, the teenagers had become part of the Tamil Tigers' first female contingent. Equipped with little more than a rifle and a cyanide capsule, Niromi's group managed to survive on their wits in the jungle, facing not only the perils of war but starvation, illness and growing internal tensions among the militant Tigers. And then events erupted in ways that she could no longer bear. How was it that this well-educated, mixed-race, middle-class girl from a respectable family came to be fighting with the Tamil Tigers?
-
Paper Cranes
Drawing on Cheryls diary from the time, Paper Cranes tells the story of Jonathans extraordinary courage and the Koenig familys unceasing drive to help him defy the ominous predictions. Set against the backdrop of Cheryls heartfelt grief, denial and anger, the book outlines their desperate search for knowledge in the area of recovery from traumatic brain injury. At the same time she and her husband were forced to deal with the trials and tribulations of the legal system, in their search for justice for their son. This inspirational and uplifting story demonstrates that with the right attitude it is possible to determine your own destiny regardless of what life throws in your path.
-
Sthulatela Kara Tata (स्थूलतेला करा टाटा )
डॉ. आशिष बोरकर आणि डॉ.गौरी बोरकर यांचे 'स्थूलते' वरील संशोधन पुस्तकरूपाने येत आहे. आपली प्रकृती आणि व्यवसाय यांना अनुरूप आहार, योग्य उपचार आणि नियमित व्यायाम ही त्रिसूत्री अंगिकारल्यास स्थूलतेवर विजय[...]
-
Novgorod Diary
his is a piquant, science fiction spoof of the sacred cows of the twenty-first century. It seems someone tries stealing 350 million high quality Russian souls from Hades Limited, by electing the wrong man to the Kremlin. An old diary exists in Novgorod proving Nick Rubowski, a high-ranking KGB officer, the Hades candidate, being the rightful heir to the Russian throne. If this became public, he'd lose the election. Therefore, Luce (Lucifer), the Hades Limited CEO sends George to Earth, to protect the firm's interests by fixing the Russian elections. The CIA, the KGB, the royalists and the mafia have adverse interests, and George must negotiate.
-
Ruchira Part 2 (रुचिरा भाग २ )
रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २ सिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय पेहराव चढवून रुचिराच्या पद्धतीनुसार वाटीचमच्याच्या प्रमाणात सिद्ध केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. पहिल्या भागाप्रमाणेच परंतू स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवत रुचिरा - भाग २ नेही यशाच्या पायर्या वेगाने चढल्या आहेत.
-
Ruchira Part 1 (रुचिरा भाग 1)
३० वर्षात अडीच लाख प्रतींच्या विक्रमी खपाचा उच्चांक गाठणारा पाकशास्त्रावरील एकमेव अजोड ग्रंथ रुचिरा ! पाककलेचे जणू दुसरे नाव. रुचिरात बघून कोणताही पदार्थ करायला घ्यावा म्हणजे जो हमखास चांगलाच होणार ! याचे रहस्य काय ? तर रुचिरामध्ये पदार्थांच्या साहित्याचे प्रमाण तोळे-मासे ग्रॅम्समध्ये न देता खुद्द स्वयंपाकघरत प्रचलित असलल्या वाटी चमच्याच्या घरगुती मोजमापात दिलेले आहे आणि स्वत: कमलाबाईंनी हेच वाटी चमच्याचे घरगुती प्रमाण वापरून प्रत्येक पदार्थ करून पाहिलेला आहे आणि मुख्य गोष्ट म्हणजे हातचे काहीही राखून न ठेवता पदार्थाची साद्यन्त आणि सविस्तर कृती दिली आहे. काही विशेष कल्पना व वैशिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून कमलाबाईनी 'रूचिरा'चे लेखन केले आहे. शाळाकॉलेजमध्ये शिकणार्या व नव्याने संसारात पडलेल्या मुलींना स्वयंपाकाची सवय नसते. त्यासाठी रोजच्या जेवणातले तसेच इतरही साधे व सुलभ असे पुष्कळ पदार्थ रुचिरामध्ये दिले आहेत. तसेच निरनिराळ्या पाककृतींचे व इतर संबंधित विषयांचे योग्य वर्गीकरण करून व त्या त्या प्रमाणे पुस्तकाचे भाग पाडले आहेत. तसेच सजावट, मुलांना गंमत वाटेल असे पदार्थ, महाराष्ट्राबाहेरील पदार्थ, पानसुपारी विडे, संसारोपयोगी आणि व्यावहारिक उपयुक्त सूचना या महत्वाच्या व वैशिष्ट्यपूर्ण बाबींबद्दल मार्गदर्शन केले आहे. तसेच 'स्वयंपाकाला सुरवात करण्यापूर्वी' असा स्वतंत्र भाग घालून अत्यंत उपयोगी अशी वेगवेगळे पाक, मसाले, पनीर, आधुनिक साधनांची माहिती दिलेली आहे. भरपूर रेखाचित्रे, साधी व रंगीत छायाचित्रे व अकारविल्हे अनुक्रमणिका याने हा ग्रंथ सजला आहे. प्रत्येक गृहिणीच्या , क्वचित पुरूषांच्याही मदतीला सदैव तत्पर असलेला स्वयंपाकघरातला इष्ट मित्र म्हणणे रुचिरा ग्रंथ.
-
Pasang (पासंग)
"पासंगालाही पुरत नाही" या अर्थाची म्हण मराठीत आहे. 'क्षुल्लक' या अर्थाने ती वापरली जाते. तराजूच्या दांड्याला दोन तागडी समतोल रहावीत, म्हणून जे छोटेसे वजन लावले जाते, ते म्हणजे 'पासंग'. आंबेडकरी चळवळीत कळू लागल्यापासून ऐकत आलो आहे, की दलितांचे राजकारण हे पासंगाचे राजकारण आहे. याचा अर्थ असा की, समाज समतोल ठेवायचा असेल, तर दलितांनी पासंगासारखे राहावयास हवे. समाजाचे एकारलेपण दलितांमुळेच समतोल होऊ शकते, हा बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय विचार होता. अनेक 'पासंगात' जातीधर्मनिरपेक्ष अशा अनेक घटना आणि व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. केवळ दलितांचे, त्यांच्या चळवळीचे उदात्तीकरण केले नाही, तर त्यांच्या चळवळीवर कठोर आघातही केले आहेत. समाजाच्या सर्व थरात ज्या घटना किंवा व्यक्ती 'फूटनोट' म्हणून आजवर दुर्लक्षित ठेवण्यात आल्या, त्यांचा शोध घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
-
Tarphula (टारफुला)
...टारफुला ही या प्रवृत्तीची आणखी एक अप्रतिम कादंबरी आहे. हिचे आशयसूत्र मराठी कादंबरीच्या परंपरागत साचेबंदपणाला आव्हान देणारे होते. त्यातल्या एका गावाच्या बेबंदशाहीतून, सुरक्षिततेच्या प्रश्नातून आपल्या सबंध समाजाला रूपकात्मक अर्थ देण्याचे सामथ्र्य आहे. हे खरे तर 1964 च्या सुमारास सबंध देशाचेही रूपक होते. त्यामुळे स्थान प्रधानतेच्या बाहेर कृतीकडे वळणारे नौतिक तपशील ह्या कादंबरीत भरपूर होते. एका जबर शासनाच्या अस्तित्वाशिवाय असा समूह नीट चालत नाही हे एका जबर पाटलाच्या अस्तित्वाने आणि त्याच्या मृत्यूनंतरच्या भीतिदायक बेबंदपणाने नानाविध सूचक तंत्रांनी दर्शविले आहे. आबा कुळकण्र्याला हे विघटित समाजीवन सांभाळता येत नाही हे कुळकर्णी कुटुंबातल्या अस्थिर, दुर्बळ वातावरणातून शंकर पाटलांनी ज्या अल्पशब्दकतेतून चितारले आहे ते 1964 साली अपूर्व होते. गावातल्या विविध कुटुंबांतील नवरा-बायकोचे संवाद, गावातल्या गुंडांचे संबंध इ. प्रत्येक तपशिलातून दबावदार नेतृत्वाची गरज सुचवण्यात लेखकाने दाखवलेला निग्रह अभिजात मराठी कथनशौलीचा नमुना आहे. सबंध गावातील व्यवहारांचा भेदरलेल्या समाजजीवनातून विशाल पट दाखवत ही कादंबरी नव्या पाटलाने जम बसवेपपर्यंत चिरेबंद रूप मांडते...