-
Man Main Hai Vishwas (मन में है विश्वास)
ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक 'एकलव्यां'ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.
-
Lok Maze Sangatee (लोक माझे सांगाती)
४०० पानी या पुस्तकात पवारांनी आपला राजकीय प्रवास उलगडला आहे. त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते, देशीविदेशी स्नेही, मोठ्या व्यक्तींबाबतची त्यांची मते, भावना व्यक्त केल्या आहेत. बारामती ते मुंबई व मुंबई ते दिल्ली असा हा दीर्घ राजकीय प्रवास ह्या पुस्तकातून वाचायला मिळेल. गेली साडेपाच दशकं देशाच्या जडणघडणीत, महत्वपूर्ण सहभाग असणाऱ्या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध....!