-
Antaralatil Gammat Jammat (अंतराळातील गंमत जंमत)
भारताने मंगळावर यान पाठवून अवकाश संशोधन क्षेत्रात एक महत्त्वाची कामगिरी केली. या ऐतिहासिक घटनेची नोंद समस्त जगाने घेतली आहे. अंतराळातील घटना, आश्चर्य यांचे कुतूहल मानवाला नवनिर्मितीची प्रेरणा देत असते. अंतराळ हा घटक पूर्वीपासूनच मानवी मनाचा एक अकल्पित गाभा आहे. प्रत्येकजण अंतराळात फेरफटका मारण्याचा विचार करत असतो आणि अंतराळाविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. अंतराळातील अशाच काही रंजक व ज्ञानवर्धक विविध घटना व यानांच्या कार्याची माहिती प्रस्तुत पुस्तकात दिली आहे. विज्ञानप्रेमी वाचकांसाठी या पुस्तकातील कथांचा आस्वाद जणू एक पर्वणीच आहे.
-
Nyaymandir (न्यायमंदिर)
“त्यानं आपले हात पसरले. नीलम त्याच्या कह्यात उभी राहिली. तिच्याभोवती त्याचे अजस्र हात एकत्र आले व तिच्या तोंडून शब्द निघायच्या आत एक दोन पावलं पुढे टाकून त्यानं खालच्या अंधाऱ्या गर्तेत उडी घेतली. शहराचे दिवे गरगरत वर येत आहेत असं नीलमला वाटलं. भीतीनं तिचा श्वास घशात अडकला. तिच्या तोंडून किंकाळी अर्धवटच निघाली... पण त्या दिव्यांची गती मंदावली, थांबली. ते दिवे तिच्या पायाखाली चक्राकार फिरले व दूरदूर जाऊ लागले. जयेंद्रनं आपले प्रचंड पंख मागं उघडले असले पाहिजेत. त्या शक्तिमान पंखाच्या प्रत्येक झडपेबरोबर ती वरवर चालली होती. प्रथम शहराचा विस्तीर्ण, मनोरम प्रदीपित देखावा तिच्या खाली पसरला; पण तोही लहान लहान होत गेला. इवल्याशा पांढऱ्या अभ्रीच्या कवचातून ते वर आले. त्यांच्या पायाखाली ते कापसाच्या रुजाम्यासारखे पसरले होते. त्यांच्याभोवती फक्त रात्रीचा थंड वारा आणि हिऱ्यासारख्या चांदण्या होत्या. नीलमला वाटलं हा विलक्षण आनंद आपल्या मनात सामावणार नाही. डोळे मिटून तिनं त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. त्या कठीण आवरणातून तिच्या कानांना त्याचे छातीचे अति संथ ठोके जाणवत होते. ‘ठक्......ठक्......! ठक्......ठक्...’
-
Aisi Ratne Melavin (ऐसी रत्ने मेळवीन)
गुलशनच्या दारावरील घंटीवर डॉक्टरनी जरासे बोट टेकवले व काढले. आतून संतापाचा आवाज आला व दार एका तरुण स्त्रीने उघडले. आताच्या वेळी ती कोणाही भेटणाऱ्यांची अपेक्षा करीत नव्हती; हे तिच्या कपड्यांवरुन उघड दिसत होते. तिच्या अंगावर एक झिरझिरीत नायलॉनची साडी होती व त्या आत काहीहि नव्हते. डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे ती क्षणभर आश्चर्याने पाहत राहिली. डॉक्टरांनी मनात आणले तर ते आपला चेहरा इतका सरळ व प्रांजळ ठेवू शकतात, की कोणालाही त्यांचा अजिबात संशय येणार नाही.
-
Anolkhi Disha Bhag-3 (अनोळखी दिशा भाग-3)
गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.
-
Aaji Aajobanchya Goshti (आजी आजोबांच्या गोष्टी)
गोष्टी मनोरंजनाबरोबर आपल्याला संस्कृती, इतिहास, नैतिक मूल्ये यांची ओळख करून देत असतात. तसेच संस्कार करण्याचे एक उत्तम माध्यम म्हणजे गोष्टी. या पुस्तकात काही निवडक गोष्टींना सुगम भाषेत आणि सुंदर चित्रांसहित सादर करण्यात आलं आहे. चला टी.व्ही. आणि कॉम्प्युटरने व्यापलेल्या आपल्या भावविश्वातून जरा बाहेर पडून या गोष्टींद्वारे आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची ओळख करून घेऊ या. या गोष्टी आपल्या बुद्धीचा विकास तर करतातच; पण त्याचबरोबर आपल्याला स्वतःचीदेखील नव्याने ओळख करून देतात.
-
Tenaliramachya Goshti (तेनालीरामच्या गोष्टी)
१६ व्या शतकातील तेनाली रामकृष्णन् म्हणजेच तेनालीराम अनेक शतकांपासून मुलांचा मित्र आहे. आंध्र प्रदेशातील तेनाली जिल्हयात जन्मलेले रामकृष्णन् म्हणून त्यांचे तेनालीराम असे नामकरण करण्यात आले. बुद्धिमत्ता, चातुर्य समयसूचकता आणि विनोदीशैली या वैशिष्ट्यांमुळे कृष्णदेवराय महाराजांच्या दरबारात त्यांना नवरत्नांपैकी एक म्हणून स्थान मिळाले. राज्यावर कोणतेही संकट आले, तरी ते त्यावर त्वरित उपाय सांगत. त्यांचे चातुर्य आणि बुद्धिमत्तेमुळे ते दरबारात ईर्षेचे मुख्य लक्ष्यही बनत; पण महाराजांच्या नजरेत त्यांचे स्थान हे कायम महत्त्वाचे आणि जवळचे होते. तेनालीरामच्या १६ व्या शतकातल्या गोष्टी आजही मुलांना सांगितल्या जातात. त्यांच्या गोष्टीतील चातुर्य, बुद्धिमत्ता, समयसूचकता मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी साहाय्यभूत ठरतात. छोट्या-छोट्या घटनांतून मोठ-मोठे संदेश आणि शिकवण देणाऱ्या या गोष्टी आहेत. बुद्धीला चालना देणाऱ्या तेनालीरामच्या या १६ गोष्टी प्रकाशित करीत आहोत.
-
51 Bodhapar Goshti (५१ बोधपर गोष्टी)
आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यानं खूप मोठं व्हावं हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं; पण प्रत्यक्षात या प्रक्रियेत अनेक समस्या, अडचणी येतात. मूल जसजसं मोठं होत जातं तसतसं त्याचं वागणं आपल्याला समजणं अवघड जातं आणि आपलं म्हणणं त्याला या वयात प्रेमानं कसं समजावून सांगावंहेदेखील कळत नाही. अशा वेळी गरज असते ती मुलांवर योग्य संस्कारांची आणि मार्गदर्शनाची. त्यासाठी मुलांची वाचनाची आवड जोपासण्याकडे पालकांनी डोळसपणे बघून त्यांच्या हाती संस्कारक्षम साहित्य देणं गरजेचं असते. बोधपर आणि रंजक गोष्टींमुळे मुलांचा भावनिक, बौद्धिक आणि नैतिक विकास तर होतोच; शिवाय मुलांची कल्पनाशक्तीही वाढते. म्हणून आम्ही मनोरंजक, बोधपर, कथांचा संग्रह खास छोट्या दोस्तांसाठी घेऊन आलो आहोत. जीवनाचे सार सांगणाऱ्या आणि मुलांना नीतिमूल्यांची शिकवण देणाऱ्या गोष्टींचा खजिना या संग्रहात आहे. कथेच्या शेवटी जीवनासाठी उपयुक्त ठरेल असा संदेश दिलेला आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या बोधकथांचे वाचन उत्तम संस्कारांचे काम करू शकते. मुलांचं मनोरंजन करतानाच त्यांना सुज्ञ व चौकस बनवण्यासाठी या बोधपर संस्कारकथा आवर्जून वाचायला हव्यात.
-
Options Trading Handbook (ऑप्शन्स ट्रेडिंग हँडबुक)
ऑप्शन्सवर तुम्ही हजारो पुस्तकं वाचाल; पण या पुस्तकात जेवढे ज्ञान दिलेले आहे तेवढे इतर कोणत्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही. सगळे लेखक तुम्हाला ऑप्शन्सची माहिती, ऑप्शन्स ग्रीक्स वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र कोणत्याही पुस्तकातून तुम्हाला ऑप्शन्स तंत्रांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते सांगितले जात नाही, ज्याद्वारे एखादा अत्यंत तुटपुंजे उत्पन्न असणारा माणूसही ऑप्शन्स ट्रेडिंग करून श्रीमंत होऊ शकेल. अद्ययावत माहिती असलेल्या या पुस्तकात ऑप्शन्सच्या बाराखडीपासून ते ऑप्शन्स ग्रीक्सपर्यंत सगळे काही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहे. भारतीय स्टॉक मार्केट या विषयावर लिहिणार्या महेश कौशिक यांची पुस्तकं सर्वाधिक वाचली जातात. हेही त्यांनी लिहिलेले एक अप्रतिम पुस्तक आहे. कौशिक क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावून सांगतात. हे पुस्तकदेखील त्यांनी एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात लिहिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला ते वाचताना कुठेही कंटाळा येणार नाही. एक सामान्य वेटर असलेला घिसूभाई या गोष्टीचा नायक आहे. प्रस्तुत पुस्तकात कौशिक घिसूभाईला ऑप्शन ट्रेडिंग कसे शिकवतात याचे उत्तम सादरीकरण केलेले आहे. विज्ञान शाखेतून पदवीधर झालेल्या महेश चंद्र कौशिक यांनी आपल्या करिअरची सुरुवात खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून केली होती. त्यानंतर राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारा राजस्थानमधील वाणिज्य कर विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या पदावर पाच वर्षे कार्य केल्यानंतर त्यांची नियुक्ती महसूल विभागात टी. आर. ए. पदी झाली. या पदावर त्यांनी 2001 ते 2017 पर्यंत कार्य केले. त्यानंतर त्यांना सहायक महसूल लेखा अधिकारी म्हणून बढती मिळाली. सध्या ते सिरोही येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत.
-
Stock Market Madhun Mi 10 Koti Kase Kamavale (स्टॉ
निम्म्या मिलियन डॉलर्सच्या बातमीने मला विलक्षण आत्मविश्वास मिळाला. मी हे कसं साध्य केलं, ते मला व्यवस्थित माहीत होतं आणि मी पुन्हा हे करू शकेन याची मला खात्री होती. मी एकप्रकारे या कलेत प्रावीण्य मिळवलं होतं, यात शंका नव्हती. टेलिग्राम संदेशांच्या दुनियेत काम करत असतानाच मी एकप्रकारे सहावं इंद्रिय विकसित केलं होतं. एखाद्या जाणत्याप्रमाणे मी माझ्या शेअर्सविषयी सर्वकाही अनुभवू शकत असे. स्टॉक्स कसे चालतील याविषयी मी अचूक सांगू शके. जर आठ अंक पुढे सरकलेला शेअर चार अंकापर्यंत घसरला तरी मी अस्वस्थ होत नसे. माझ्या अपेक्षेप्रमाणे ते ठीकच असे. जर एखादा शेअर मजबूत व्हायला लागला तर त्याची वाढ कोणत्या दिवशी होणार याचा मला पुरेपूर अंदाज येई. हे एक रहस्यमय आणि न उलगडता येणारं सामर्थ्य नि:संशय माझ्यामध्ये होतं. त्यामुळे एका जबरदस्त शक्तीच्या भावनेनं मी भारला गेलो होतो. - याच पुस्तकातून प्रस्तुत पुस्तक निकोलस डरवास यांची असफलता, संघर्ष आणि अखेर अभूतपूर्व यश या प्रवासाविषयी सांगते, जिथे त्यांनी केवळ साडेसहा वर्षांच्या काळात दहा कोटींपेक्षा अधिक रुपये कमावले. लक्षात घ्या, ही 1950च्या दशकातली कमाई आहे. स्टॉक मार्केटमधल्या असामान्य यशाची ही अद्वितीय कहाणी गुंतवणूकदारांना आत्मविश्वास देते. सुयोग्यरीत्या गुंतवणूक करून आपली कमाई वाढवण्याचे व्यावहारिक सूत्र सांगते.
-
Bandhavarchya Babhali (बांधावरच्या बाभळी)
गीतारामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पद्मश्री, कथा, चित्रकथा, नाटक, कांदबरी, आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते, भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना, निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निर्व्याज भावनांनी नटलेली बालगीते, गंगाकाठी, कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि गीतरामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न, मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले. गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त, कवी, कथाकार, नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली. आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, ललितलेख, लघुकथा, दीर्घकथा, प्रवासवर्णन, चित्रपटकथा, काव्य आदी साहित्यकृती वाचकांच्या मनाची ठाव घेणारी आहे, हे निश्चित!
-
Ikmai (इकमाई)
या झाडांच्या जंजाळात कोणीतरी आहे. नुसतंच कोणीतरी नाही...कोणीतरी ओळखीचं...श्री! चारी बाजूंनी त्याला झाडांनी वेढून टाकलं होतं. श्रीचा सुंदर, प्रिय चेहरा आता भांबावल्यासारखा घामाघूम झाला होता. ‘श्री!’ माझ्या अगदी अंतर्मनातून ती हाक घुमून उठली. श्रीची मान एकदम वर आली. माझ्या दिशेने वळली. त्याच्या चेहऱ्यावरचा सर्व संभ्रम एका क्षणार्धात नाहीसा झाला....त्याच्या चेहऱ्यावर एक ओळखीचं हास्य उमलायला लागलं आणि सर्वकाही अदृश्य झालं! माझ्याभोवती अंधारी खोली होती. अंधार नि:शब्द होता. धडधड ऐकू येत होती, ती माझ्याच काळजाची होती. हातापायांना घाम आला होता. शरीर थरथरत होतं. तो भयंकर भास नाहीसा झाल्याची मी पुन्हा खात्री करून घेतली आणि मगच माझा श्वास मंदावला. माझ्या स्वत:च्या दु:खावरून लक्ष काही काळ उडालं होतं. आणि आताच्या या अद्भुत दर्शनाचा विचार मनात येत होता. आताच्या या दृश्याला काही सांकेतिक अर्थ होता का? माझ्याभोवतीच्या असह्य परिस्थितीलाच मनाने एक सांकेतिक रूप दिलं होतं का? मनाची जखम इतकी खोल होती का, की जी मेंदूलाही चाळवील? - प्रस्तुत कथासंग्रहातून
-
Shaducha Shap (शाडूचा शाप)
नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठया दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा भय या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणार्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीचे, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भूत घटनांचे तर्कातील मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.
-
Tikasvayamvara (टीकास्वयंवर)
डॉ. भालचंद्र नेमाडे यांना १९९१चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचे समजले. टीकास्वयंवर हा समीक्षालेखांचा ग्रंथ १९९० साली प्रसिद्ध झाला. त्यातील लेखांवरून व मुलाखतीवरून डॉ. भालचंद्र नेमाडे यांची साहित्यविषयक भूमिका नेमकेपणाने समजण्यास मदत होते. त्यांची मते किती मूलगामी आणि प्रक्षोभक असू शकतात, याची आता मराठी वाचकांना चांगली कल्पना आलेली आहे... आज त्यांचे टीकालेखन महत्त्वाचे काम करीत आहे. एकूण डॉ. भालचंद्र नेमाडे साहित्य व्यवहाराकडे अत्यंत गांभीर्याने पाहणारे समीक्षक आहेत. त्यांचे विचार प्रक्षोभक, बंडखोर, प्रस्थापितांचे वेळोवेळी वस्त्रहरण करणारे असले तरी आजच्या वाङ्मयीन संस्कृतीचे कुंठितपण घालविण्यासाठी आणि तिला योम्य दिशा कोणती व का हे समजावून देण्यासाठी त्यांचा फार मोठा उपयोग होणार आहे, यात शंका नाही. त्यांना अभिप्रेत असलेली भाषिक कृती डॉ. नेमाडे आपल्या कादंबऱ्यांतूनच नव्हे तर आपल्या समीक्षाविचारांतून जबाबदारीने व चोखपणे करीत आहेत. - म. द. हातकणंगलेकर रविवार सकाळ, २२ डिसेंबर १९९१ रा. श्री. जोग स्मृति पुरस्कार १९९० ह. श्री. शेणोलीकर पुरस्कार १९९० साहित्य अकादमी पुरस्कार १९९१
-
Antaralatil Netradipak Mahila (अंतराळातील नेत्रदीप
जगाच्या अंतराळ संशोधनातील कामगिरीचा मागोवा घेताना मानवी इतिहासातील या महत्त्वाच्या क्षेत्रांत आपल्यालाही सहभाग नोंदवता यावा यासाठी प्रदीर्घ लढा दिलेल्या महिलांच्या चरित्रात्मक कथांच्या माध्यमातून आपण जणू अवकाशाचीच सफर करणार आहोत. या पुस्तकातील दहा चरित्रकथांची सुरुवात झाली कित्येक वर्षांपूर्वी. आकाशातील तारकापुंजांचा नकाशा तयार करण्याच्या कामात सहभाग घेणार्या, अवकाशातील परिस्थितीचा मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतो हे तपासणार्या सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये सहभाग नोंदवणार्या आणि अवकाशात पाऊल ठेवत इतिहास घडवणार्या अशा अनेक अवकाशनायिकांना तुम्ही या पुस्तकात भेटाल. या महिलांनी तारकांपर्यंत पोहोचण्याचं जे झगमगतं स्वप्न पाहिलं, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी कशा चित्तथरारक मोहिमा हाती घेतल्या, त्यात त्यांना कोणती आव्हानं पेलावी लागली, यामधून त्यांच्या अंतराळविषयक ज्ञानात कशी भर पडत गेली, अवकाशातील गमतीजमती त्यांना कशा अनुभवता आल्या याची वेधक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल.
-
Doglapan (दोगलापन)
माझ्या आयुष्यात नायक, खलनायक, चरित्र कलाकार आणि अशा बऱ्याच जणांचा वाटा आहे. ही माझी खरी जीवन कहाणी आहे, जिने मला अनुभवसमृद्ध केले, अकाली पांढरे केस दिले, माझे खरे मित्र आणि हितचिंतक कोण याबद्दल सावध केले आहे; अपयशात यश आणि यशात अपयश यांचे 'दोगलापन' याविषयी बरेच काही शिकवले आहे; त्याचबरोबर जीवनात खरोखर काय महत्त्वाचे आहे याची सखोल समज दिली; आणि हे सांगण्याची खरं तर गरज नाही, पण जीवनाने अनपेक्षितरीत्या भिरकावलेल्या अनेक चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्याची पुरेशी संधी दिली. - अश्नीर ग्रोव्हर दिल्लीच्या मालवीयनगरमध्ये वाढलेला, 'निर्वासित' म्हणून संबोधला गेलेला एक तरुण शैक्षणिक उत्कृष्टतेच्या शिखरावर असणाऱ्या भारतातील आयआयटी दिल्लीमध्ये रँक - होल्डर बनून परिस्थितीवर मात करतो. आयआयएम अहमदाबादच्या अत्यंत आदरणीय संस्थेमधून एमबीए केल्यावर एमएक्स, कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये गुंतवणूक बँकर म्हणून तो करिअर घडवतो आणि ग्रोफर्सचा सीईओ तसेच भारतपेचा संस्थापक म्हणून या दोन कंपन्यांना युनिकॉर्न बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. अश्नीर यांच्या आयुष्यात उलथापालथ होत असतानाही शार्क टँक इंडिया या लोकप्रिय टीव्ही शोमधील एक परीक्षक या नात्याने त्यांचे नाव घराघरात पोहोचले आहे. विवाद, मीडिया स्पॉटलाइट, सोशल मीडियावरील वाचाळवीरांमुळे काल्पनिक गोष्टींपासून सत्य वेगळे करणे कठीण असते. स्टार्टअप इंडियाचा आवडता आणि गैरसमज झालेला पोस्टर बॉय अश्नीर ग्रोवर यांची ही नि:संदिग्ध कथा आहे. निर्मळ प्रामाणिकपणाने आणि अतिशय मनापासून सांगितलेल्या कथेचा हा उत्कृष्ट नमुना आहे.
-
Warren Buffett (वॉरन बफे)
खेळण्या-बागडण्याच्या वयात एखादं मूल कोकच्या बाटल्या विकतं, घरोघरी वर्तमानपत्र टाकतं. एवढंच नव्हे तर यांसारखे अनेकविध व्यवसाय करून मिळवलेल्या रकमेतून अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदी करतं… लवकरच जमीन विकत घेतं आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करून हशारीने आपली मिळकत व खर्च यांचा हिशेबही मांडतं… ही कोणतीही काल्पनिक कथा नव्हे तर हे आहे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या बालपणाचं वर्णन… जगाला स्तिमित करणारं गुंतवणुकीचं साम्राज्य उभं करणारे वॉरन जितके श्रीमंत आहेत तितकेच मूल्यसंपन्नही. सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक तत्त्वं आणि अफाट दानशूरता हे त्यांच्या लखलखत्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू. व्यवस्थापनातील आदर्श असलेल्या वॉरन यांनी आपल्या यशाची सूत्रं वेळोवेळी सर्वांसमोर खुली केली आहेत. त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीकडे बघण्याचा विवेकी दृष्टिकोन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांसमोर आदर्शही ठेवला आहे. त्यांच्या याच दृष्टिकोनातून आकाराला आलेले हे अनोखे गुंतवणूक मंत्र वाचकांसाठी दीपस्तंभ ठरतील.
-
Doctors Form Hell (डॉक्टर्स फ्रॉम हेल)
दुसऱ्या महायुद्धात नाझी राजवटीने मानवतेवर केलेले भीषण अत्याचार सांगणारी ही अधिकृत सत्यावर आधारलेली कहाणी आहे. न्यूरेम्बर्ग येथे नाझी डॉक्टरांवर युद्धगुन्ह्यांसाठी जो खटला चालवला गेला त्याचे अमेरिकी लष्करातर्फे वार्तांकन करणाऱ्या स्त्रीने ही डोळ्याने पाहिलेली कहाणी सांगितलेली आहे. शास्त्रीय संशोधन अन् देशभक्ती यांच्या बुरख्याखाली निरपराध व्यक्तींचा छळ आणि खून करण्यात आले. डॉक्टर्स फ्रॉम हेल यामध्ये काही आम जनतेला उपलब्ध नसलेली खटल्याची कागदपत्रेही समाविष्ट केलेली आहेत; तसेच या खटल्यात पुरावा म्हणून सादर झालेले, आजवर प्रकाशात न आलेले फोटोही दिलेले आहेत. यात लेखिकेने बॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या, धोकादायक असलेल्या युद्धानंतरच्या न्यूरेम्बर्ग शहरात राहतानाचे अनुभव सांगितलेत. खटल्यावर काम करताना तिचे तिथे अठरा महिने वास्तव्य होते. एकदा एका नाझी माथेफिरूने ती राहत असलेल्या हॉटेलवर बॉम्ब टाकला. काही क्षणातच ती तिथे जेवण्यासाठी पोहोचणार होती. या पुस्तकात ती आपल्याला प्रत्यक्ष खटले चालू असलेल्या न्यायालयाच्या सभागृहात नेते, साक्षीदारांनी दिलेले जबाब ऐकवते, बळींच्या प्रतिक्रिया, त्यांचे राग-लोभ आदी भावना शब्दांतून आपल्यापर्यंत पोहोचवते. तिथे नरसंहारातून वाचलेले कैदी आपल्यावर केलेल्या प्रयोगांच्या कहाण्या सांगतात, त्यांना प्राणवायूपासून वंचित केले गेले, बर्फात ठेवले गेले, त्यांना मलेरिया, टायफस, कावीळ आदी रोगांचे जंतू टोचले गेले, त्यांचे निरोगी हातपाय कापले गेले. त्यांना सक्तीने दिवसेंदिवस फक्त समुद्री पाण्यावर ठेवले गेले. असे अनेक अत्याचार केले गेले. या ऐतिहासिक खटल्याची परिणती म्हणून नंतर न्यूरेम्बर्ग कोड लिखितस्वरूपात अस्तित्वात आले. मानवावर वैद्यकीय संशोधन करताना कोणती नीतिमूल्ये पाळावित याची मार्गदर्शक तत्त्वे त्यात ठरवलेली आहेत. ही कादंबरी दुसऱ्या महायुद्धावरील साहित्यात महत्त्वाची भर घालते; तसेच नरसंहार, मानवी हक्क, वैद्यकीय नीतिमूल्ये आणि एकूणच मानव किती पशुत्वाच्या पातळीवर घसरू शकतो याबद्दलही सांगते.
-
You Are The Best Wife (यू आर द बेस्ट वाइफ)
ही गोष्ट त्या दोघांची ज्यांचे विचार आणि आदर्शवादी तत्त्व परस्परविरोधी असतात; पण एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर दोघेही बदलतात, जास्त छान बनतात. जगाकडे बघायची त्यांची दृष्टी एकमेकांमुळे बदलून जाते. दोघे सुखात, आनंदात असतात ; पण दैवाची योजना काही वेगळीच असते. लेखकाची ही स्वत:ची आत्मकथा आहे. संसाराच्या सुखी प्रवासात प्रिय पत्नीचा हातातला हात अर्ध्यावरच सुटून गेल्यावर एकटं जगताना त्याने आयुष्याशी केलेला संघर्ष यात आहे. सोबत असतात केवळ जाताना तिने तू सर्वोत्तम पती आहेस, हे काढलेले उद्गार. तिचे हे शब्द त्याला बळ पुरवतात. आपलं 'प्रेम करण्याचं' वचन ती गेल्यावरही पूर्ण करायला. अत्यंत प्रामाणिकपणे, विनोदाचा प्रसन्न शिडकावा करत सांगितलेली ही एका उबदार प्रेमाची गोष्ट आहे. तो आणि ती, प्रेमात आलेले सगळे अडथळे कसे पार करतात, एकमेकांच्या साथीने कडू-गोड अनुभवांना कसे सामोरे जातात, अजय आपलं प्रेम कसं निभावतो हे वाचताना आपलाही प्रेमावरचा विश्वास पुन्हा एकदा पक्का होतो.
-
Chanakyaniti (चाणक्यनीती)
मगध देशाच्या नंद राजाच्या राजसत्तेचा सर्वनाश करून त्या जागी तीव्र बुद्धिमत्तेच्या शूर चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवणारे आचार्य विष्णुगुप्त चाणक्य हे कुशल राजनीतिज्ञ, आचार-विचारांचे मर्मज्ञ आणि कूटनीतीतील सिद्धहस्त म्हणून प्रसिद्ध आहेत. अभिजात संस्कृत साहित्यातील नीतिपर चाणक्यनीती समाज, राजकारण, धर्म आणि कर्माविषयी मार्गदर्शन करते. प्राचीन काळी लिहिलेल्या चाणक्यनीतीतील जीवनमूल्ये आजही तितकीच कालसुसंगत आहेत. वर्तमान परिस्थितीचे भान ठेवून चाणक्यनीतीतील ३२५ सूत्रांवर केलेले हे भाष्य आधुनिक युगातील मानवासाठी पथदर्शक ठरते.
-
Mosad (मोसाद)
जगातील अन्य कोणत्याही देशाची गुप्तचर यंत्रणा इस्रायलच्या मोसादइतकी मिथक आणि रहस्यांनी वेढलेली नाही. सीआयएने 'जगातील सर्वोत्कृष्ट गुप्तचर संस्था' असे मोसादबद्दल उद्गार काढलेले आहेत. मोसादचे नाव निघाले की, इस्रायलचे मित्र आदराने बघतात तर शत्रूच्या मनात भय उत्पन्न होते. खरंतर १९४०मधील इस्रायलच्या निर्मितीपासून, मोसाद हे त्यांच्या जगण्याच्या सततच्या संघर्षातले महत्त्वाचे शस्त्र आहे.