-
Shivachi Saat Rahasye (शिवाची सात रहस्ये)
शिवशंकराच्या कहाण्या, चिन्हे आणि कर्मकांड यांमध्ये आपल्या पूर्वजांची रहस्ये बंद आहेत. त्यांपैकी सात रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयन्त देवदत्त पट्टनायक यांनी या पुस्तकातून केला आहे. पाहिल्या प्रकरणात शिवलिंगाचा खरा अर्थ सांगितला आहे. दुसऱ्या प्रकरणातून मानवसमूहाच्या प्रादेशिक वर्तणुकीबद्दल शिवाला वाटणारा संताप व तिरस्काराबद्दल लिहिले आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रकरणात शिवला जगाकडे दयार्द नजरेने पाहायला देवी कसे शिकवते याबद्दल माहिती आहे. पाचव्या व सहाव्या प्रकरणात शिवाचे दोन पुत्र गणेश व मुरुगन यांच्यासंबधात माहिती आहे, तर अखेरच्या प्रकरणात शिव नृत्यकलेमधून ज्ञानप्रदान करणारा जाणकार शिक्षक कसा आहे, ते सांगितले आहे.
-
Vishnuchi Saat Rahasye (विष्णूची सात रहस्ये)
हिंदू धर्मात भगवान विष्णू हा देव केंद्रस्थानी आहे. सृष्टीचे नियमन करणाऱ्या विष्णूबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. विष्णूची प्रतीके व संस्काराच्या कर्मकांडाबद्दल सातत्याने सांगितले जाते. जगाच्या कल्याणासाठी जे नऊ अवतार होऊन गेले ते विष्णूचेच असल्याचे मानले जाते. विष्णू देवतेचे महत्व, कथा, प्रतीके, त्याचे संसारी रूप देवदत्त पटनायक यांनी 'विष्णूची सात रहस्ये 'मधून उलगडली आहेत. यात विष्णू, ब्रह्मा, इंद्र या देवांची निर्मिती, त्याच्या मानवाशी निगडीत संदर्भ दिले आहेत. नारदाची जन्मकथाही आहे. विष्णूचे मत्स्य, कूर्म, वामन, नरसिंह, राम, कृष्ण आदी अवतार, त्यांची कथा, त्यांचे कार्य, मनुष्याची निर्मिती, त्यांच्या मदतीसाठी धावून आलेला विष्णू, माणसांमध्ये पूजल्या जाणाऱ्या विष्णूची विविध रूपे, बलरामाचे महत्त्व, शुभ्र घोड्यावर बसलेला आणि हातात तलवार घेतलेला योद्धा म्हणजे साऱ्या गोष्टींचा नाश करणारा विष्णूचा कल्की अवतार व या सर्वांचे मनुष्याच्या आयुष्याशी व वर्तनाशी जोडलेला संबंध यांचे रहस्य आपल्यापुढे यातून मांडले आहेत.
-
Living Music
Living Music conversations with Pandit Dinkar Kaikini, is the dialogue between a sincere guru and earnest disciple, in which a realised soul explains his philosophy of Hindustani ragsangit and his personal journey to becoming a consummate performer, composer scholar, and guru. In a very Intimate portrait of the man and the musician, Living Music explores pandit Kaikini's theories of sound, melody, rhythm, and creativity, while simultaneously following him during his life of courage, uncompromising devotion of music and constant spiritual inquiry. About the Author Priya Purshothaman is a young Hindustani Vocalist based in Bangalore. Since 2003, she has been training with Smt Adit Kaikin Updadhya. Her tutelage was supplemented with advanced training from stalwart musician and scholar, Pandit Dinkar Kaikini, in Mumbai. Before studying Hindustanin Ragsangit, Priya trained extensively in both Carnatic Vocal music and Western classical violin. Whe has performed in noted venues around India and the United States, and is committed to increasing awareness about Hindustani music through Performance, teaching and educational outreach. Priya was raised in New York and graduated for Columbia University with a degree in Economics, Philosophy and Creative Writing.
-
How Sachin Destroyed My Life
In How Sachin Destroyed My Life, Vikram Sathaye chronicles the story of his life and how he accidently entered the world of stand-up comedy and became a cricket humorist. Moreover, he got the amazing opportunity to travel and spend time with the members of the Indian Cricket squad for more than a decade. This book presents his incredible journey as he takes us inside the dressing rooms, hotels and introduces us to the leading cricketers of India. The book comes with a foreword by Sachin Tendulkar and is replete with humor and interesting anecdotes, insights, photographs and quotes by cricketing legends like Sachin Tendulkar, Dravid, and Yuvraj Singh. This book will be thoroughly enjoyed by cricket enthusiasts. About Vikram Sathaye Vikram Sathaye is a well-known stand-up comedian and has performed in over 1200 corporate events across the world over the last 11 years. He completed his MBA from Symbiosis Institute of Business Management and worked for 7 years with companies like MTV and PMG. He got the opportunity to be part of Extra Innings on Set Max as a cricket humorist. He has been a presenter on Set Max during the World Cup in 2003 and Champions Trophy 2004. He is an entrepreneur and the Director of White Copper Entertainment Pvt. Ltd., a sports and entertainment company.
-
The Live Well Diet (द लिव्ह वेल डाएट)
'द लिव्ह वेल डाएट' ही जीवनशैली आहे. अधिक चांगलं जगण्याची गुरुकिल्ली. ज्यांच्या दृष्टीने निरोगी, सुडौल आणि चैतन्यपूर्ण असणं अपरिहार्य आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. 'द लिव्ह वेल डाएट' हे पुस्तक डाएटविषयीचे सगळे गैरसमज निश्चितपणे दूर करेल कारण हे पुस्तक योग्य आणि अयोग्य खाण्यातला फरक नेमका समजावून सांगतेच पण त्याहूनही जास्त निरोगी आणि आनंदी जगण्याविषयी सांगते. डॉ. डावरे यांनी अनुभवातून सांगितलेले सोपे, व्यवहार्य आणि लवचिक डाएट आणि व्यायामाचे योग्य तंत्र यांच्या साथीने मास्टर शेफ संजीव कपूर यांनी पारखलेले अतिशय चविष्ट आणि तरीही पौष्टिक, कमी केलरीचे पदार्थ ही या पुस्तकाची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. सोप्या, स्वादिष्ट, पोषक, झटपट आणि सहज उपलब्ध होणाऱ्या सामग्रीपासून बनणाऱ्या या पाककृती आहेत. थोडक्यात म्हणजे आपले रोजच्याच जेवणात किंचित बदल करून आपण आपले आरोग्य किती सांभाळू शकतो हे या पाककृतींवरून लक्षात येईल.
-
Kadhitari Kothetari (कधीतरी कोठेतरी)
संगीताच्या जादूने भरलेले अद्भुतरम्य वातावरण, अप्रतिम गाणारी एक षोडशवर्षे'गानभरि' तरुणी आणि गायानिकालेवर लुब्ध असलेला एक सुसंकृत नागर तरुण………प्रेमाच्या ठराविक त्रीकोणाहून निराळा असलेला हा त्रिकोण जगाच्या पाठीवर कुठेही, केव्हाही एक निराळीच समस्या उभी करू शकतो - त्यात भर पुन्हा जादूच्या शंखाच्या प्रतापाची! संगीत, तारुण्य थोडीशी ' फनन्टासी' आणि कल्पनारम्यता, प्रेम आणि कलह किव्हा विरोध या सर्व घटकांच्या मिश्रणातून सिद्ध झालेले हे रसायन कुठलाही संदेश वैगेरे देण्याच्या भानगडीत न पडता सहजपने एक सार्वकालिक सत्य सांगून जाते. त्याला एक स्थालकालातीतातेचा, कल्पनारम्यतेचा स्पर्श आहे आणि रुचिर मनोरंजन हाच या नाटकाचा आत्मा आहे. पकिस्तानी टोळीवाल्या गायिकेच्या रेश्माच्या-कथेवरून स्फुरलेले वसंत कानेटकरांचे हे नवीन नाटक मोहक शब्दकळेने नटलेले, रसिकांना भावे असे!
-
Vadal Mansalatay (वादळ माणसाळतय)
" श्री बाबा आमटे यांच्यासारखे महान झंझावती व्यक्तिमहत्व आणि श्री वसन्तराव कानेटकरांसारखे आजचे अग्रगण्य, प्रतिभाशाली नाटककार, या माणिकांचन योगातून ही नाटयकृती जन्माला आली आहे. सूर्याचे किरण शोधणारा, टिपणारा आणि त्यावर निर्वाह करणारा एक पक्षी ग्रीकपुराणात आहे. त्या पक्षाप्रमाणे वसन्तरावांच्या प्रतिभेनेही आज सर्वत्र कोंदटलेल्या काळोखातील प्रकाशकिरण टिपले आहेत, आणि त्यातून एक संस्मरणीय कलाकृती मराठी रंगभूमीला सादर केली आहे. अनुईच्या बेकेटप्रमाणे बाबांनाही आपले पूर्वीचे साहसी, स्वच्छंदी आणि विलासी जीवन, खांद्यावरील उत्तरीय फेकून द्यावे इतक्या सहजतेने फेकून दिले आणि कुठलेही तडजोड न मानणा-या एका ध्येयधुंद, संन्यस्त जीवनाचा सर्वस्वाने स्वीकार केला. एका किळसवाण्या कुष्टरोग्यला पाहून आपण घाबरलो, याची ती जळजळीत प्रतिक्रिया होती. हे नाटक चरित्रामक नाही; पण चरित्रावरून स्फुरलेले आहे बाबांच्या कर्तृत्वचा समुद्र तीन अंकात आणि तीन तासांच्या प्रयोगात बंदिस्त करणे प्राय: अशक्यच. ती लेखीकाची प्रतिज्ञाच नाही ; कधी नसतेही. वास्तवातील घटना आणि माणसे लेखकाच्या मनात उतरतात, राहतात, रुजतात आणि त्याच्या प्रतिभेने दिलेली नवीन रूपे, नवीन अस्तिव घेऊन प्रगट होतात. भाई म्हणजे पूर्णत: बाबा नव्हेत. फुलांचे जे अत्तराशी जे नाते असते, ते बाबांचे भाईशी आहे. मूलभूत नीती प्रस्थापित करू पहाणारयां प्रस्थापित नीतीचा विरोध नेहमीच सहन करावा लागतो. प्रस्थापित नीतीच्या (म्हणजे अनीतीच्या) पहारेकरयांशी झुंज देतच जगातल्या सर्व बाबांना आणि भाईना आपला मार्ग काढावा लागतो. वसन्तरावांचा 'भाई ' म्हणजे एक साशात वादळ आहे राघूशेटसारख्या जबरदस्ताला शरण आणणारे आणि शिवरामदादासारख्या सत्तांधांना अगतिक करणारे हे वादळ मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास निर्माण करील, असंख्य प्रेक्षकांना आणि वाचकांना झपाटून टाकील आणि मानवी जीवनाचा सुभग अर्थ त्यांचाकडे पोचता करील असा मला विश्वास वाटतो."
-
Himalayachi Savali (हिमालयाची सावली)
या नव्या नाटकात तुम्ही एका चांगल्या विषयाला हात घातला हे फार बरे झाले. वाईट आणि चांगले यांच्या संघर्षा पेक्षा चांगले आणि अधिक चांगले यांचा संघर्ष अधिक नाजूक असतो. तो रंगविणे ही कठीण असते. पण मराठी कथा, नाटक, कादंबरी यांनी आता या वाटा चोखाळल्या पाहिजेत. असे नाटक आपोआपच उत्कट स्वभावनिष्ठ होते. त्यामुळे नाट्याचा कृतीमपणा कमी होतो. ड्रिंकवॉटर, शेरवूड वैगेरेंच्या लिंकनवरल्या नाटकाचा हा अनुभव मी घेतला आहे. या नाटकात अनुषागाने सुचलेला एक विचार मी तुमच्या पुढे मांडतो, चरित्रात्मक नाट्य किव्हा कादंबरी लिहिणे हे एक प्रकारची कसरत अहे. मूळचि माणसे घेतली कि काल्पिताला, रचना कौशल्याला आणि संस्कार सामर्थ्याला मर्यादा पडतात. तुम्ही नावे, माणसांची नाती, व्यवसाय इत्यादी गोष्टी बदलल्या आहेत तरी तेवढ्याने फार मोठा बदल घडून येत नाही. मुळच्या माणसांच्या संबंधितांच्या हळव्या भवनांना अकारण जपावे लागते. अशा वेळी ज्या चरित्रा पासून आपल्याला आशयसंपन्न विषय मिळत असेल त्याचा आत्मा तेवढा कायम ठेवून बाकीचे सारे मूळ चरित्रापासून दूर नेणे अधिक हितकारक होणार नाही काय? या प्रश्नाचे उत्तर काहीही असो. वृद्ध नायक व नायिका यांच्याभोवति गुंफलेली कथानके आपल्याकडे फार थोडी असतात त्या दृष्टीने तुमचे नाटक एक नवीन पायंडा घालीत आहे. रामचंद्राची सीता आणि तुकारामाची जिजाई यांचे मिश्रण असलेली नायिका सुदैवाने तुम्हाला लाभलेली आहे. तिचे चित्रण तुम्ही फार कैशाल्याने केले आहे . वि. स. खांडेकर
-
Udhvastha Dharmashala (उध्वस्त धर्मशाळा)
माराठी रंगभूमीवर 'उध्वस्त धर्मशाळा' हे सर्व थौंव आगळेवेगळे असे नाटक! गो. पु देशपांडे यांनी या नाटकातून एक करारी, तत्वनिष्ठ मर्किस्ट नेत्याच्या (पराभूत थोरवीची गाथा) या नाटकातून रंगवलेली आहे. राजकारण मध्ये जी तत्व प्रणाली स्वीकारलेली आहे. ती कितीही कालबाह्य व अपयशी ठरो, तिलाच निर्धाराने चिटकून राहण्याची वृत्ती व त्यातून शेवटी निर्माण होणारी अटळ शोकांतिका स्वीकारण्याची जिद्द कुलकर्णी घराण्यात तीन पिढ्यापासुन चालत आलेली आहे. प्रत्येक पिढीची तिची स्वतःची विचारसरणी आहे, ह्या विचारसरणीला सवंग लोकप्रीयातेसाठी तत्वशुन्य तडजोड ठावूकच नाही. राजकीय तत्वाप्रनालीची एकच धार तिन्ही पिढ्यात हस्तांतरित होईल असेहि नाही.बाप से बेटा सवाई या न्यायाने बापापेक्षा बेट्याचे तत्वज्ञान वेगळेच आढळते. स्वीकारलेल्या तत्वाशी प्रामाणिकता एवढी कणखर, कि नाटकामध्ये पित्याचा प्रचारसभा पुत्र उधळून लावीत असल्याचे उल्लेख आढळतात. राजकीय ध्यायाच्या प्राप्तीसाठी झालेल्या व प्रथापितांच्या कळपात जाऊ पाहणाऱ्या आपल्या पत्नी कडून अथवा प्रेयासिकडून अव्हेरले जाण्याची तयारीहि कुलकर्णी कुटुंबातील दोघांनी दाखवली आहे. समान राजकीय विचारसरणी च्या धाग्यांनी दोन जीव एकत्र येतात आणि त्या ध्येयाच्या मार्गात तडजोडीची अपरिहार्य वेळ आली, की हे दोन पुरुष आपल्या साथिदारणीचा कायमचा निरोप घेतात. बापाची शोकांतिका तीच मुलाची! रंगभूमीवरिल अने लोकप्रिय नाटकांच्या प्रकृती धर्माशी ह्या नाटकाचे नाते जुळणारे असूनदेखील हे नाटक विशेष यशस्वी झाले नाही; त्याचे कारण ह्या नाटकातील निकाल वैचारिकता. रंगभूमीवरिल ह्या नाटकाचे व्यावसायिक अपयश गृहीत धरूनही महाराष्ट्रच्या वैचारिक जगात खळबळ माजाविलेली आहे. निखळ वैचारिक नाटके मराठीत तशी दुर्मिळच!
-
Vegetarian Recipes From Around the World
n Vegetarian Recipes from around the World, Chef Kapoor brings favourite dishes from Mexico, Europe, the Middle East, the Far East and America to your table. Dine on Mexican Quesadillas; Middle Eastern Fattoush; Italian Roasted Tomato Farfalle, Swiss Cheese Fondue and Thai Green Curry. Wash it all down with a steaming Moroccan Mint Tea or an icy Strawberry Granita. In other words Chef Kapoor offers you the whole world on a plate! About the Author Sanjeev Kapoor is the most celebrated face of Indian cuisine today. Chef Extraordinaire, TV show host, author of nine best-selling cookbooks, restaurant consultant and winner of several culinary awards, he recently started amongst the most famous chefs of the world on Richard Quest’s show on CNN. Driven by a dream of making Indian cuisine the number one cuisine in the world, his passion drives everything he explores on national and international platforms. He hosts Khana Khazana, the longest running and highly rated cookery show on Zee TV that is being aired non-stop since 1993. The show has been awarded he Best Cookery Show by the Indian Television Academy (ITA) a record five times in a row since it’s inception. His first book Khazana of Indian Recipes published by Popular Prakashan has sold more than a million copies and is in now in it’s 12th reprint. His other books Khazana of Healthy Tasty Recipes, Khana Khazana: Celebration of Indian Cookery, Low Calorie Vegetarian Cookbook, Any Time Temptations, Best of Chinese Cooking, Simply Indian, Microwave Cooking Made Easy, and Konkan Cookbook have received rave reviews. His recently released CD ROM titled Ode to Indian Food has created ripples in the market.