-
Dharma (धर्म)
कर्ण, अश्वत्थामा आणि एकलव्य हे तिघे निघाले आहेत धर्माच्या शोधात. या विश्वात धर्म कुठे आहे? त्याची खरी व्याख्या काय? अधर्म फक्त कौरवांचा आणि धर्म फक्त पांडवांचा, असं म्हणणं उचित ठरेल का? या प्रश्नांची उत्तरं त्यांना हवी आहेत. या शोधात ते पोहोचले आहेत कोकणातील एका धर्मप्रवण गावात. तिथे काय होईल? त्यांचा शोध पूर्ण होईल का?Immerse yourself in this thought-provoking Marathi novel that explores the profound concept of Dharma through compelling storytelling. The narrative weaves through the complexities of moral duties, righteousness, and the eternal quest for truth in Indian philosophy. Set against a richly detailed backdrop, this literary work delves deep into the intricate relationships between characters and their struggles with ethical dilemmas. The book's evocative storytelling brings ancient wisdom into contemporary relevance, making it a meaningful read for those interested in philosophical fiction. Written in accessible Marathi language, this novel serves as both an entertaining story and a meditation on the timeless principles of Dharma. Perfect for readers who appreciate meaningful literature that bridges traditional values with modern storytelling.
-
Nadi Vahate Ahe (नदी वाहते आहे)
या कथांची मांडणी करताना मधुरा थेट अनुभवाच्या आतल्या गाभ्यालाच जाऊन भिडते. लेखिका एक स्त्री आहे, म्हणून स्त्रीगत काही लेखनमर्यादा स्वतःवर घालून घेणाऱ्या काही लेखिका असतात. कारण त्यांना त्या अनुभवात शिरताना 'स्व'चा विसर पडत नाही. उलट त्या 'स्व'ला अधिकाधिक सुरक्षित ठेवतात. त्यामुळे त्या अनुभवाला त्या भिडूच शकत नाहीत. मधुरा त्या-त्या अनुभवला थेट भिडण्याचा प्रयत्न करते. माणसांना चितारताना पुरेपूर उघडंनागडं करावं, त्याला आतून-बाहेरून सोलून काढावं हा सर्जनशील लेखनाचा जो मूलधर्म आहे, त्याचे ती शिस्तीत पालन करते. म्हणूनच तो अनुभव मग मातृत्वाचा असेल, दैहिक व्याकूळतेचा असेल, प्रणयाच्या उन्नत क्षणाचा असेल किंवा पोटाच्या भूकेचा असेल; त्या अनुभवाला चितारताना ती कुठेही आडपडदा ठेवत नाही. जे सांगायचे आहे, ते सांगून पूर्णपणे मोकळे होणे हा तिचा लेखनधर्म आहे. त्यामुळे तिची कथा आपल्या मनात वरवर रेंगाळत न राहता, आतवर खोल रुतून बसते. तिच्या वाचनाचा संस्कार दीर्घकाळ मनावर कायम असतो. - डॉ. रवींद्र शोभणे
-
Asadharan Hota Hota.. Bhagyashrunkhalanchi Manohar Kahani (असाधारण होता होता... भाग्यशृंखलांची मनोहर कहाणी)
सुखी, आनंदी आयुष्याचं प्रमाण हे दिशादर्शक असतं. 'किती' पेक्षा 'कुठल्या दिशेने' यावर ते अवलंबून असतं. विनोद आलकरी हे पेशाने इंजिनियर असल्यामुळे त्यांना यातील गाभा बरोबर उमजेल. 'टेल्स ऑफ ग्रोइंग लेस ऑर्डीनरी' हे विनोद आलकरी यांचे अनुभव आहेत, मंद गतीने चालणाऱ्या छोट्या शहरातील साधारण आणि मर्यादित आयुष्यातून सुटलेला त्यांच्या करियरचा बाण युनाइटेड नेशन्सच्या जागतिक पदाकडे कसा निर्देशित झाला हे या पुस्तकात अत्यंत रोचकपणे वाचायला मिळते. रिगवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या या इंजिनीयरने आपला प्रत्येक चित्तथरारक अनुभव आपल्यासमोर जिवंत केला आहे. नंतर तो युनिसेफचा अधिकारी या त्याच्या बदललेल्या भूमिकेत आपल्याला भेटतो आणि त्याच्याबरोबर आपण नायजेरिया आणि इराकच्या भूमीत घडलेल्या प्रसंगांमध्ये सामील होतो. कार्लाइल या लेखकाने म्हटल्याप्रमाणे 'जगाचा इतिहास म्हणजे फक्त थोरामोठ्यांच्या चरित्रगाथा!' खरंच असं असतं का ? त्या महान लेखकाची माफी मागून असं म्हणावं लागेल की बऱ्याचदा या गाथा असत्य घटनांनी मढवलेल्या असतात. महानतेचा बुरखा पांघरलेल्या या कथा, 'काय' मिळवलं या विषयाभोवतीच घोटाळत राहतात. ते महान लोक जीवन 'कसं' जगले याचा मागमूसही त्यात नसतो. विनोद आलकरी यांचं 'टेल्स ऑफ ग्रोइंग लेस ऑर्डीनरी' हे कथन या महानतेच्या सापळ्यात न अडकल्यामुळे 'असाधारण' झालं आहे
-
Nave Nitisar (नवे नीतिसार)
मूल जन्माला आल्यापासून त्याचा खऱ्या अर्थाने माणूस बनण्यासाठी आई, वडील, गुरू व उन्नत समाज यांच्या मार्गदर्शनाची, सुदृढ व भक्कम पायाची त्याला नितांत आवश्यकता असते. हे खांब त्याच्या जीवनाला आकार देतात. मानवतेचा धर्म शिकवतात. संस्कारांचा त्याच्यावर योग्य तो परिणाम होतो. फक्त त्यासाठी श्रवण, वाचन, मनन याची गरज असते. मनात आले अनेक माणसांशी आलेल्या संबंधातून, घडलेल्या घटनांतून जे दिसले, मनात राहिले ते पुस्तकरूपात शब्दबद्ध करावे. विद्यार्थ्यांनी यातले थोडे फार नीतिसार उचलले किंवा त्यांच्या मनात राहिले तरी खूप काही मिळवल्यासारखे होईल.
-
Suvarnkan - Bhag 2 (सुवर्णकण - भाग 2)
खरे तर त्या काळात शिक्षकांची आर्थिक स्थितीही हालाखीची असे. अशा काळात संगेवार सर जेव्हा सांगतात, 'मनात प्रश्न साठवून ठेवू नका, शिकवताना काही समजले नाही तर केव्हाही मला विचारा, शाळेनंतर घरी येऊन विचारलेत तरी चालेल.' तेव्हा गणिताची भीती घालवून जगण्याची अगणित जिद्द देणारे संगेवार सर मात्र प्रातःस्मरणीय वाटतात. आज तुलनेने शिक्षकांची स्थिती पूर्वीहून बरी आहे. पण ते समर्पण आज क्वचित दिसते. 'सुवर्णकण' भाग २ वाचताना तो समर्पणाचा परीस आपणास लाभो ही शुभेच्छा! हे पुस्तक कोल्हापूर भागापुरते न राहता सर्वत्र जायला हवे. नेटके व महत्त्वाचे पुस्तक संपादन केल्याबद्दल संपादक डॉ. विजया वाड, शिल्पा खेर आणि मनीषा कदम यांचे अभिनंदन! -- श्री. प्रविण दवणे
-
Be Dune Panch ! (बे दुणे पाच!)
विविध दिवाळी अंकांतून वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ललित कथा लिहिणाऱ्या लेखिका म्हणून सारिका कुलकर्णी प्रसिद्ध आहेतच. साप्ताहिक मार्मिकमध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या बे दुणे पाच या लेखमालेतून त्या, विनोदी लिखाण देखील तितकंच उत्तम करू शकतात हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. सारिका कुलकर्णीच्या लेखणीतून उतरलेला विनोद हा अस्सल मध्यमवर्गीय मराठी मातीत जन्मलेला आहे. तो ओढूनताणून आणलेला नाहीये, तो खुलविण्यासाठी थिल्लरपणाची रासायनिक खते वापरली नाहीयेत, तो बहरण्यासाठी सवंगतेची कीटकनाशके फवारली नाहीयेत. आजच्या पिढीचा शब्द वापरायचा तर त्यांचा विनोद अगदी ऑरगॅनिक आहे. सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यातील घटना, सण-उत्सव, त्यातील गमती, विसंगती ह्यांचं सूक्ष्म अवलोकन आणि त्यावर लेखिकेने केलेली मार्मिक नर्मविनोदी मल्लिनाथी वाचकांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आणते आणि बहुतेक सर्वच लेखांचा समारोप करताना त्यांनी केलेलं भाष्य वाचकांना अंतर्मुख करायला लावते हेच या पुस्तकातील लेखांचे यश आहे. मराठी साहित्यात सकस विनोदी लिखाणाला वाचकांकडून मागणी खूप असली तरी त्यामानाने पुरवठा अगदीच कमी आहे. विनोदी लिहिणाऱ्या लेखिकांची तर अक्षरशः वानवाच आहे. या पार्श्वभूमीवर दर्जेदार, निर्विष विनोदाच्या शोधात असणारे मराठी वाचक, सारिका कुलकर्णीींच्या 'बे दुणे पाच' या लेखसंग्रहाचे जोरदार स्वागत करतील अशी आशा आहे. --- सॅबी परेरा
-
Jagavegala Lindbergh (जगावेगळा लिंडबर्ग)
'तुमच्या वयांमध्ये अंतर बरंच आहे गं,' आईनं मुलीला विचारलेल्या प्रश्नाला बगल देत तिनं लग्न केलं पण आईची शंकाच खरी ठरली. विसंवादी असलेल्या (लिंडबर्ग) दांपत्याचा मुलगा पुढली अनेक वर्षे एकाकी आयुष्याचा 'भागीदार' ठरला. बालवयात त्यानं आकाशात उडणारं चिमुकलं विमान पाहिलं... काही वर्षांनी विमानांच्या स्पर्धा पाहिल्या. विमानविषयक प्रेमाचं बीज तेव्हाच त्याच्या मनात अंकुरलं... सुरुवातीच्या काळातील वेड्या साहसकृत्यांमुळे तो 'उडता वेडा' (Flying Fool) ठरला. त्याच वेडापायी त्यानं उत्तुंग झेप घेतली आणि तो जगातील सर्वोत्कृष्ट साहसवीर ठरला...सुखसमृद्धीची सोनेरी पहाट उगवली, मनाजोगती सुविद्य, सुसंस्कृत सहचारिणी मिळाली, संसार बहरला आणि एक दिवस वीजप्रपात झाला... आयुष्यानं नवं वळण घेतलं, नवी आव्हानं समोर ठाकली त्यांनाही तो पुरून उरला..पुन्हा नव्यानं जन्मला, पुनःपुन्हा जन्मला, खंडप्राय मातृभूमीच्या राष्ट्राध्यक्षांना आव्हान देत दंड ठोकून तो उभा राहिला. आयुष्याच्या मध्यावर उभा असताना प्रत्यक्ष युद्धाच्या धुमश्चक्रीत त्यानं पुन्हा एकदा 'साहसवीर' हे बिरुद सार्थ ठरवलं. सेनेमधला सर्वोच्च मान- 'ब्रिगेडियर जनरल' - मिळवला. पण ही तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाची केवळ एक बाजू... अनेक अंगांनी त्याचं व्यक्तिमत्त्व झळाळून उठलं. विमानक्षेत्रात भरीव कामगिरी करणारा कुशल प्रशासक, एक वैज्ञानिक, एक लेखक, एक पर्यावरणप्रेमी ही त्याची आणखी काही लोभस रूपं... असा हा कोण जगावेगळा पुरुषोत्तम ?
-
Periplus Of Hindusthan Khand 2 (पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान - हिंदुस्थानची प्रदक्षिणा खंड २)
अज्ञाताचा शोध ही मानवाची आदिम काळापासूनची प्रेरणा. क्षितिजापारच्या अवकाशाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून आपली वस्ती, आपली माणसं, आपला प्रदेश आणि सारं काही मागे ठेवून तो निघतो.... जग जिंकायच्या ईर्ष्यने खैबर खिंड ओलांडून आलेला अलेक्झांडर सिंधू नदीच्या खोऱ्यात उतरून परततो. त्यानंतर कुणी मेगॅस्थेनिस चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात सेल्युकस निकोटरचा ग्रीक राजदूत म्हणून राहतो आणि तत्कालीन भवताल 'इंडिका' नावाने नोंदवून ठेवतो. मेगॅस्थेनिसचा 'इंडिका', अज्ञात नाविकाचा 'पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी', अल्बेरुनीचा 'तहकिक-ए-हिंद' किंवा अफानासी निकितीनच्या 'नोटस'... अशा मूळ ग्रीक, लॅटिन, पर्शियन, अरबी, चिनी, रशियन दस्तावेजांतून सुमारे दोन हजार वर्षांचा तत्कालीन हिंदुस्थानचा सांस्कृतिक इतिहास नोंदवला गेला... खरं तर, फक्त सांस्कृतिक व्यवहारच नव्हेत तर सुमारे दोन हजार वर्षांतील तत्कालीन लहानमोठी राज्ये, राजेरजवाडे, शेतीवाडी, समाज, सणवार, चालीरीती, व्यापार, चलने... अगदी खाद्यसंस्कृतीपासून लढायांपर्यंत त्यांनी जे-जे काही पाहिले ते नोंदवून ठेवले, आपल्या देशात परतल्यावर इतरांना सांगितले, त्यातून पुढे ते ग्रंथरूप झाले. सुनंदा भोसेकर यांनी या परदेशी प्रवाशांच्या ग्रंथांमधून परिश्रमपूर्वक शोधून त्या त्या काळातील हिंदुस्थान या पुस्तकातून आपल्यासमोर ठेवला आहे. हा सारा दस्तऐवज हिंदुस्थानाचा इतिहास नक्कीच म्हणता येणार नाही, पण आपल्या आजच्या भारताचा इतिहास शोधणाऱ्यांसाठी तुकड्यातुकड्यांनी विणलेला सुंदर कोलाज आहे. सव्वीस जगप्रवाशांना दिसलेल्या हिंदुस्थानाची सुनंदा भोसेकर यांनी आपल्या कॅलिडोस्कोपमधून केलेली ही 'पेरिप्लस' म्हणजेच अक्षरप्रदक्षिणा!
-
Periplus Of Hindusthan Khand 1 (पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान - हिंदुस्थानची प्रदक्षिणा खंड १)
अज्ञाताचा शोध ही मानवाची आदिम काळापासूनची प्रेरणा. क्षितिजापारच्या अवकाशाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून आपली वस्ती, आपली माणसं, आपला प्रदेश आणि सारं काही मागे ठेवून तो निघतो.... जग जिंकायच्या ईर्ष्यने खैबर खिंड ओलांडून आलेला अलेक्झांडर सिंधू नदीच्या खोऱ्यात उतरून परततो. त्यानंतर कुणी मेगॅस्थेनिस चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात सेल्युकस निकोटरचा ग्रीक राजदूत म्हणून राहतो आणि तत्कालीन भवताल 'इंडिका' नावाने नोंदवून ठेवतो. मेगॅस्थेनिसचा 'इंडिका', अज्ञात नाविकाचा 'पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी', अल्बेरुनीचा 'तहकिक-ए-हिंद' किंवा अफानासी निकितीनच्या 'नोटस'... अशा मूळ ग्रीक, लॅटिन, पर्शियन, अरबी, चिनी, रशियन दस्तावेजांतून सुमारे दोन हजार वर्षांचा तत्कालीन हिंदुस्थानचा सांस्कृतिक इतिहास नोंदवला गेला... खरं तर, फक्त सांस्कृतिक व्यवहारच नव्हेत तर सुमारे दोन हजार वर्षांतील तत्कालीन लहानमोठी राज्ये, राजेरजवाडे, शेतीवाडी, समाज, सणवार, चालीरीती, व्यापार, चलने... अगदी खाद्यसंस्कृतीपासून लढायांपर्यंत त्यांनी जे-जे काही पाहिले ते नोंदवून ठेवले, आपल्या देशात परतल्यावर इतरांना सांगितले, त्यातून पुढे ते ग्रंथरूप झाले. सुनंदा भोसेकर यांनी या परदेशी प्रवाशांच्या ग्रंथांमधून परिश्रमपूर्वक शोधून त्या त्या काळातील हिंदुस्थान या पुस्तकातून आपल्यासमोर ठेवला आहे. हा सारा दस्तऐवज हिंदुस्थानाचा इतिहास नक्कीच म्हणता येणार नाही, पण आपल्या आजच्या भारताचा इतिहास शोधणाऱ्यांसाठी तुकड्यातुकड्यांनी विणलेला सुंदर कोलाज आहे. सव्वीस जगप्रवाशांना दिसलेल्या हिंदुस्थानाची सुनंदा भोसेकर यांनी आपल्या कॅलिडोस्कोपमधून केलेली ही 'पेरिप्लस' म्हणजेच अक्षरप्रदक्षिणा!
-
Lokshahi Aani Hukumshahi (लोकशाही आणि हुकूमशाही)
आदरणीय नरेंद्रजी चपळगावकर यांचा आपल्या सर्वांचे प्रबोधन करणारा एक ग्रंथ आपल्या भेटीसाठी येत आहे. ते लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे पुरस्कर्ते व अभ्यासक आहेत. विचारस्वातंत्र्यासाठी आपल्या लेखणीने व वाणीने त्यांनी लढा दिला आहे. साहित्यसंमेलनातील विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे त्यांचे भाषण अविस्मरणीय होते. अनेकांना हे भाषण ऐकून कै. दुर्गाबाई भागवतांच्या प्रसिद्ध भाषणाची आठवण झाली. चपळगावकर यांचे लेखन व त्यांची भाषणे अतिशय संयत व समतोल असतात. ते विचार स्पष्टपणे मांडतात, पण त्यात अभिनिवेश नसतो. ते कधीही दुसर्यााच्या मताचा अनादर करीत नाहीत. सध्याचा काळ हा आक्रस्ताळेपणाने विचार व्यक्त करण्याचा व न पटणार्यास विचारांचा अवमान करण्याचा काळ आहे, असे कधीतरी वाटते. या काळात चपळगावकरांचे लेखन व त्यांची भाषणे फार आशादायक वाटतात. लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे ते नुसतेच पुरस्कर्ते नाहीत, तर ते विचार ते प्रत्यक्षपणे आचरणात आणतात. लोकशाही संस्कृतीचा पुरस्कार करणार्यांेना त्यांचे लेखन आशेच्या किरणासारखे वाटते. न्या. अभय ओक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सशक्त लोकशाहीसाठी अत्यावश्यक असलेले विचारमंथन लोकशाही आणि हुकुमशाही