-
Fandry Bharatiya Chitrapatatil Mailacha Dagad (फँड्री भारतीय चित्रपटातील मैलाचा दगड)
'फैड्री' हा जात, धर्म, वर्ण, वर्ग, वंशादी भेदांचा अमंगळ चक्रव्यूह भेदून प्रेम फुलवत राहावं, असं स्फुल्लिंग चेतवणारा चित्रपट आहे. 'फँड्री'तील संघर्ष प्रेक्षकाला माणूसपणाच्या चिंतनात रमवतो. स्वतःतील छुप्या पशुत्वावर भिरकावलेला दगड त्याला न्याय्य वाटतो. अनुभव देत, हितगुज करत प्रेक्षकांचे भावनिक उन्नयन साधणाऱ्या 'फँड्री'सारख्या कलाकृती दुर्मीळ असतात. त्यांचा अनेक अंगांनी अभ्यास केला गेला पाहिजे. नेमके हेच काम या पुस्तकाद्वारे हनुमंत लोखंडे यांनी केले आहे. यातील चर्चेची, चिंतनाची मांडणी लेखकाच्या अभ्यासवृत्तीची आणि त्याच्यातल्या समंजस संवादकाची साक्ष देणारी आहे. विविध दृष्टिकोनातून 'फँड्री'चे आकलन करताना, चित्रपट अन् समाज यांच्यातील वीण उलगडून दाखवताना, आजवर आम्ही घडवलेल्या इष्ट-अनिष्ट समजुतींचा ऊहापोह करताना लेखकाने आपल्या ओघवत्या शैलीनं साधलेली सुभगता पुस्तक वाचनीय करते. सोबतच, किशोर कदम यांची समर्पक प्रस्तावना आणि लेखकाने घेतलेली नागराज मंजुळे यांची जिज्ञासू मुलाखत पुस्तकास आणखी समृद्ध करते. समकालीन जातिग्रस्त अवकाशात, प्रागतिक विचारांची पायवाट पाडणाऱ्या सुधारकांची लोभस दिंडी, संवेदनशील माणूसपणानं पुढे नेणारा नागराजसारखा कलाकार आणि त्याच्या कामाचे सौंदर्य उलगडून दाखवत विचारमग्न करणारा हनुमंत लोखंडेसारखा चिंतनशील अभ्यासक, हे दोघेही अप्रूपाचे आहेत.
-
Tata 1968 - 2021 (टाटा १९६८ - २०२१)
"गेल्या काही वर्षात टाटा सन्समधील माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीबाबत बरंच काही लिहिलं गेलंय. त्यातल्या बऱ्याच गोष्टी पुरेशा माहितीअभावी अथवा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून लिहिल्या गेल्या होत्या. पीटरचे पुस्तक मात्र कुठलीही पक्षपाती भूमिका घेताना दिसत नाही." रतन टाटा "टाटांनी एका कौटुंबिक मालकीच्या उद्योगाचे रूपांतर अनेक असंबंधित व्यवसायांच्या महाकाय समूहात करत आज ते ज्या स्थानावर पोहचले आहेत, ते कसे साध्य केले? 'टाटा वे' म्हणजे काय, ज्यामुळे त्यांना मोठा सन्मान आणि आदर मिळाला? पीटर केसी अशा अनेक बाबींचा धांडोळा घेतात." इकॉनॉमिक टाईम्स "जर एखाद्यास जागतिक पातळीवर आघाडीवर असणाऱ्या भारतीय उद्योगसमूहाबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा असेल तर त्यासाठी हे पुस्तक उत्तम सुरुवात ठरेल." फायनान्शियल एक्सप्रेस
-
Washington Diary (वॉशिंग्टन डायरी)
अमेरिकेच्या इतिहासात २०२२ आणि २०२४ या सालांमध्ये सलग दोनवेळा प्रथमच एक मराठमोळी व्यक्ती, मुळची भारतीय, अमेरिकन केंद्र सरकारची खासदार म्हणून निवडून आली. अमेरिकेच्या राजकारणातील हे उच्च पद प्राप्त करणाऱ्या मराठी उद्योजकाचे नाव आहे डॉ. श्री ठाणेदार. अत्यंत बेताच्या परिस्थितीतून आलेला, बेळगावसारख्या छोट्या शहरातील एका सामान्य कुटुंबातील मुलगा; पण त्याची स्वप्ने आकाशाला गवसणी घालणारी होती. अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेणे, त्यानंतर आर्थिक स्थैर्यासाठी चांगली नोकरी करणे, स्वतःचा बिझनेस सुरू करणे आणि प्रचंड मेहनतीने तो यशस्वी करून दाखवणे हा त्याचा प्रवास होता. खरं तर इथेच एखाद्याची गोष्ट संपली असती, पण डॉ. श्री ठाणेदार हे काही वेगळेच रसायन आहे. (त्यांची डॉक्टरेटही रसायनशास्त्रातील आहे !!!) सामान्य माणसाला एका आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याची संधी मिळते. मनस्वी स्वभावाने आणि ठाम ध्येयाने तो ती संधी घेतो आणि त्याचे सोने करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. श्री ठाणेदार. चांगल्या स्थिर असलेल्या बिझनेसवर अचानक प्रचंड आर्थिक संकट आले. पाहता पाहता राजाचा रंक झाला. पण धीर न सोडता श्री ठाणेदार यांनी पुन्हा एकदा फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून भरारी घेतली आणि स्वतःला सिद्ध करून दाखवले. त्यानंतर बिझनेसचा अध्याय बंद करून त्यांनी पुढील झेप राजकारणात घेतली. २०२० मध्ये मिशिगन राज्यातील आमदार, तर २०२२ आणि आता २०२४ अशा सलग दोनवेळा डेट्रॉईट, मिशिगन या विभागातून अमेरिकेचे खासदार म्हणून ते निवडून आले. अमेरिकेच्या केंद्रीय संसदेतील एक सक्षम राजकारणी म्हणून ही भूमिका ते आता सर्व शक्तिनिशी सिद्ध करत आहेत. अमेरिकेतील बिझनेस आणि तिथले राजकारण या दोन्ही पटांवर घडलेला नाट्यमय थरार म्हणजे श्री ठाणेदार यांची नवी गोष्टः 'वॉशिंग्टन डायरी.'
-
Maharaja E Hind Maharaja Yashwantrao Holkar (महाराजा-ए-हिंद महाराजा यशवंतराव होळकर)
"लढाईच्या मैदानांत मी ब्रिटिश तोफखान्याचा सामना करण्याला वा त्यापुढे तगण्याला असमर्थ असलो तरी शेंकडो कोसांचा मुलुख तुडवला, लुटला व जाळला जाईल. तुमच्या सेनापतीला श्वास घेण्यासाठीं एका क्षणाचीही सवड मिळणार नाहीं. समुद्राच्या लाटांप्रमाणें असलेल्या माझ्या फौजेच्या धाडीखालीं लाखों माणसें संकटांत पडतील." महाराजा यशवंतराव होळकर
-
Abhedya (अभेद्य)
रेव्हेन्यू इंटेलिजन्स ब्युरो जेव्हा स्वतःच्या इतिहासातील सर्वांत धाडसी मोहिमेला आरंभ करतो, तेव्हा त्यांना प्रतिकाराची पूर्ण जाणीव असते. पण ज्याची त्यांनी कल्पनाही केलेली नसते, तो असतो विश्वासघात. मोहिमेच्या अग्रभागी उभे आहेत दोन भिन्न संघर्षांतून घडलेले अधिकारी! कर्तव्याच्या अखंड ध्यासाने पेटलेला सुशांत पवार ... आणि केवळ सामर्थ्यशाली गुन्हेगारांशीच नव्हे, तर संशय आणि दबावाशीही झुंज देणारा तडफदार अधिकारी महादेव माळकर ... कित्येक महिन्यांच्या सूक्ष्म नियोजनातून आणि काटेकोर गुप्ततेच्या आवरणाखाली, आकार घेते एक प्रचंड मोहीम ... अचूक, भेदक आणि कुणीही थांबवू शकणार नाही अशी. चूक होण्याची शक्यताच नव्हती. पण सगळंच चुकतं ... जेव्हा योजनेला तडा जाऊ लागतो आणि विश्वासाची कसोटी लागते, तेव्हा टीम खंबीरपणे उभी राहते. जखमी, पण अढळ ... गुप्त पाळत, शेल कंपन्या, सांकेतिक नोंदी, लपवलेले लॉकर्स आणि दुर्गम भागातील लपण्याच्या ठिकाणांमधून पुढे सरकणारी ही कथा वेळ, दबाव आणि चलाखी यांच्या विरोधात सत्याच्या अखंड पाठपुराव्याची आहे. वास्तववादी तपास पद्धतींवर आधारित ही कादंबरी तपास प्रक्रियेचे बारकावे आणि मानवी भावनांचा संगम साधत प्रत्येक यशामागचे धैर्य, परिश्रम आणि कणखरपणा उलगडते. विश्वासघात, जिद्द आणि पोलादी सत्याची एक थरारक तपासकथा.
-
Lightning Kid (लाइटनिंग किड)
ही विशीची जीवनकथा आहे तेजस्वी कल्पना वेगवान चाली अढळ चिकाटी भारताचे पहिले बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि पाच वेळा विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकणारे विश्वनाथन आनंद यांनी आपल्या तेजस्वी बुद्धिमत्तेने आणि निर्भय खेळाने जगाला थक्क केलंय. चेन्नईमध्ये लहानपणी बुद्धिबळातील बालप्रतिभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशीला, अतिशय वेगाने चाल खेळत असल्यामुळे 'लाइटनिंग किड' म्हणून एक नवीन ओळख मिळाली. तिथपासून ते जगातील सर्वात कठीण प्रतिस्पध्र्थ्यांना सामोरं जात जागतिक दिग्गज बनण्यापर्यंतचा, विशीचा प्रवास थरारक वळणांनी, कुशल डावपेचांनी आणि श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यांनी भरलेला आहे. हे पुस्तक आनंद यांच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील सर्वात नाट्यमय क्षणांमध्ये डोकावतं. तसेच त्यांचा विजय, पराभव, पुनरागमन आणि अद्वितीय चाली यांचा वेध घेतं. बुद्धिबळाच्या पटावरील प्रत्येक घरासाठी एक अशा ६४ छोट्या पण अर्थपूर्ण धड्यांमुळे हे पुस्तक अधिक खास बनतं. दबावाच्या प्रसंगी शांत कसं राहायचं, पराभवानंतर पुन्हा उभं कसं राहायचं किंवा काही चालीच्या पुढील परिस्थितींचा विचार कसा करायचा, हे शिकवणारं हे एका खऱ्या विजेत्याचं कथन आहे. मोठा विचार करण्यासाठी, नम्र राहण्यासाठी आणि तुमचा सर्वोत्तम खेळ खेळण्यासाठी ही एक प्रेरणादायी मार्गदर्शिका आहे.
-
Tukaram (तुकाराम)
‘तुकाराम’ हे पुस्तक वरिष्ठ सनदी अधिकारी व सध्या राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त असलेले तुकाराम मुंढे यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. या धडाकेबाज अधिकाऱ्याचा संपूर्ण प्रशासकीय प्रवास कायम संघर्षाच्या वाटेनेच झाला. बालपण ते आयएएस होईपर्यंत ते अभावानेच जीवन जगले. आयएएस स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा हा प्रवास फारच प्रेरणादायी ठरणार आहे. आयएएस झाल्यावर पारदर्शक प्रशासनाच्या आग्रहामुळे त्यांची २० वर्षात तब्बल २५ वेळा बदली करण्यात आली. त्यांच्या याच संघर्षमय आयुष्याचा वस्तुनिष्ठ आढावा ‘तुकाराम’ या पुस्तकात घेण्यात आला आहे. मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरेल, इतके हे पुस्तक गुणात्मकदृष्ट्या उत्तम झाले आहे.‘तुकाराम’ या पुस्तकाचे लेखक शफी पठाण हे मराठीचे अभ्यासक व नामवंत पत्रकार आहेत. मागच्या २५ वर्षांपासून ते माध्यमात कार्यरत असून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून ‘दैनिक लोकसत्ता’मध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत असताना,तसेच ‘लोकमत’, ‘सकाळ’, ‘देशोन्नती’ या दैनिकांमधून त्यांनी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवर धारदार भाष्य केले. ते एक उत्तम पत्रकार,अभ्यासू वक्ते व संवेदनशील मनाचे कवी आहेत त्यांच्या लिखाणाने आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राच्या मनाचा ठाव घेतला आहे.
-
Vadivasal - Kadambari (वाडीवासल - कादंबरी)
वाडीवासल’ ही सी. एस. चेल्लप्पा लिखित १९४९ साली प्रकाशित झालेली तामिळ भाषेतील अभिजात लघुकादंबरी असून तामिळनाडूच्या एका खेड्यात होणारा जल्लिकट्टू (बैलाला शरण आणण्याचा खेळ) हा खेळ या लघुकादंबरीचा विषय आहे. कादंबरीचा नायक पिक्ची हा एक उमदा तरुण या खेळात तरबेज मानल्या जाणाऱ्या कारी या बैलाविरुद्ध उभा ठाकतो. पिक्चीला कारीशी का झुंज द्यायची असते? जल्लिकट्टूमध्ये त्याला कारीलाच का नमवायचं असतं ? एका पशूवर विजय मिळवून त्याला असं काय मिळणार असतं? असे काही प्रश्न कादंबरी वाचताना वाचकाला पडत राहतात. कादंबरीच्या शेवटी त्याची उत्तरं तर मिळतातच; पण बैलाला नमवण्याच्या पिक्चीच्या अथक प्रयत्नांतून त्याचे धाडस, अभिमान आणि उच्चनीचतेची सामाजिक उतरंड असे अनेक पीळ आपल्याला या लघुकादंबरीत उलगडताना दिसतात. माणसाचे पशुवत समोरच्यावर ईष्र्येने झडप घालणे आणि पशूने माणसागत धूर्त विचारांनी खेळी खेळणे असा एक सूक्ष्मसा विरोधाभासही या कादंबरीत अधोरेखित केलेला आहे. ‘जल्लिकट्टू’ या क्रीडाप्रकाराच्या अतिशय चित्रमय आणि रोमांचकारी वर्णनामुळे ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते. या खेळातील रांगडी ऊर्जा आणि त्याचे सांस्कृतिक महत्त्व या लघुकादंबरीत लक्षणीयरीत्या अधोरेखित केलेले आहे. रानटी पशुत्व, निसर्ग आणि सूडबुद्धीने ग्रासलेले मानवी व्यवहार या कादंबरीत ठळकपणे आविष्कृत होतात.
-
Kay Khau Kiti Khau (काय खाऊ किती खाऊ)
कुठल्याही आजारासाठी उपचारासोबत योग्य तो आहार घेणे अतिशय आवश्यक असते. ह्या त्यांच्या पुस्तकात पचनसंस्थेचे आजार, हृदयविकार व मधुमेह, कावीळ, अतिसार, अतिआम्लता, जीवनसत्त्वे व खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे आजार, गाऊट, मूतखडे, हायपोथायरॉयइडीझम, गरोदरपणातील व स्तनपानाच्या वेळेस योग्य असा आहार, विविध वायोगटातील व्यक्तींसाठी आहार, परीक्षार्थी मुलांसाठीचा आहार व बाजारात मिळणारी प्रथिनांची उत्पादने अशा इतर अनेक आहाराशी निगडीत विषयावर विस्तृत माहिती आहे. या पुस्तकात डॉ. वैशाली जोशी या आहारतज्ज्ञ डॉक्टरांनी अनेक महत्त्वाच्या आहारविषयक प्रश्नांना साध्या व सोप्या भाषेत मुद्देसूद उत्तरे दिली आहेत. पुस्तकाचे प्रथम जाणविणारे वैशिष्ट्य म्हणजे अनेकाविद्य विषयावरील आहारविषयक माहितीचा समावेश. वजन घटविणे, हृदयविकार, बद्धकोष्ठता अशा नेहेमी विचारणा होणाऱ्या विषयांबरोबरच परीक्षार्थीनी काय खावे, मांसाहार कसा असावा, रोजोनिवृत्ती नंतरचा आहार अशा विविध विषयावर डॉ. वैशाली जोशींनी विचार मांडले आहेत. इतक्या विविध विषयावर एकाच पुस्तकातून माहिती दिल्याबद्दल डॉ. वैशाली जोशींचे अभिनंदन करावयास हवे.
-
Dnyanmurti Govind Talwalkar (ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर)
आमचे वडील, श्री. गोविंदराव तळवलकर, यांना सिद्धहस्त, अभिजात लेखक, द्रष्टा इतिहासकार, प्रभावी व द्रष्टा संपादक व समाजसुधारक या नात्याने सर्वजण ओळखतात. ऐसा पुरुष धारणेचा। तोचि आधार बहुतांचा।। अशी त्यांच्याबद्दल लोकभावना होती. मराठी पत्रकारितेत टिळकयुगानंतर तळवलकरयुग हे महत्त्वाचे समजले जाते. त्यांनी अग्रलेख, लेख, ग्रंथ यांद्वारे इतिहास, जुने व नवे विचार, साहित्य आणि कल्पना यांची विशाल, जागतिक संदर्भातून वाचकांना ओळख करून दिली, विश्लेषण केले, वेगळी प्रमेये मांडली. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रांत वेळोवेळी मार्गदर्शन केले. भ्रष्टाचार व समाजविघातक प्रवृत्तींना पायबंद घालण्याचे कार्य केले. तथापि त्यांच्या व्यक्तित्त्वाचे अनेकविध पैलू लोकांना माहित नाहीत. लहानपणापासून अखेरपर्यंत बाबांना अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी कधीच त्यांची वाच्यता केली नाही आणि त्यांचे भांडवलही केले नाही. त्यामुळे लोकांना त्या अडचणींची कल्पनाही नाही. धैर्य, त्याग, सत्यवादी निस्पृहवृत्ती, औदार्य, क्षमाशीलता, सततोद्योग, प्रसिद्धीपराङ्मुखता, अगत्यशीलता, सौजन्य, कुटुंबवत्सलता या त्यांच्या गुणांची आणि काव्यशास्त्रविनोद, चित्रशिल्पकला, संगीत, बागकाम, पशुपक्षी, निसर्ग, पर्यावरण, प्रवास यांच्या अभिरुचीविषयी लोकांना माहिती नाही. हे सर्वांना माहित व्हावे या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे.
-
Khajinyachi Shodhyatra (खजिन्याची शोधयात्रा)
खजिन्याची शोधयात्रा साधारण आठशे/नऊशे वर्षांपूर्वीपर्यंत आपला देश हा जगातला सर्वात समृद्ध, संपन्न आणि ज्ञानवान देश होता. जगातला एक तृतीयांश पेक्षा जास्त व्यापार फक्त आपण करायचो. हे सर्व करत असताना आपण अनेक नवनवीन शोध लावले. मानवी मनाला थक्क करणारी अनेक मंदिरं, अनेक वास्तू, अनेक राजप्रासाद उभारले. समरस समाजासाठी, न्याय पद्धतीसकट, अनेक उन्नत आणि प्रगल्भ व्यवस्था निर्माण केल्या. गणितातल्या गमती केल्या. अनेक उत्तमोत्तम खेळ शोधून काढले. कलेच्या क्षेत्रात भरारी घेतली. असं बरंच काही ... दुर्दैवानं भारतीय ज्ञानाचा हा खजिना आमच्यापर्यंत फारसा कोणी आणलाच नाही. या खजिन्याचा शोध आणि वेध घेण्याचा हा मनस्वी प्रवास ..! 'खजिन्याची शोधयात्रा' हे श्री. प्रशांत पोळ या उद्योजकाचे पुस्तक वाचायला घेतले तेव्हा एक समृद्ध आणि अक्षय खजिनाच गवसला असे वाटले! -डॉ. गो. बं. देगलूरकर
-
Shabdancha Dhan (शब्दांचं धन)
१९६० साली मारुती चितमपल्ली पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे वनाधिकारी होते. वडगावपासून जवळच असलेल्या तळेगावी गो. नी.दांडेकर राहात असत. एके दिवशी मारुती चितमपल्ली यांनी गोनीदांच्या घरी जाऊन त्यांची ओळख करून घेतली. या ओळखीचं रूपांतर पुढं स्नेहात झालं. लेखनाचा श्रीगणेशा त्यांच्याच प्रेरणेनं केला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली थोडंफार लेखन करण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्यांच्यामुळं 'शब्दांचं धन' करण्याचा छंद लागला. 'शब्दांचं धन' हे पुस्तक म्हणजे मारुती चितमपल्ली यांच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांशी झालेल्या भेटीगाठींचे चित्रण आहे. या मध्ये माडगूळकर, डॉ. सलीम अली, जी. ए. कुलकर्णी, जॉय अॅडम्सन, जेन गुडाल, जे कृष्णमूर्ती यांसारख्या जेष्ठ मान्यवरांच्या समवेत निसर्गविषयक, प्राण्यांविषयक झालेल्या चर्चांचा, गप्पांचा लेखाजोखा विविध लेखस्वरुपात मांडला आहे.
-
Vatsalavahinincha Adhunik Advice (वत्सलावहिनींचा आधुनिक ॲडव्हाइस)
जुन्या काळातल्या मासिकांमधल्या वत्सलावहिनी आणि त्यांचे सल्ले तुम्ही वाचलेच असतील. त्यातले काही छापील सल्ले आता ऑनलाइन मिळतील. 'व्वा!' हेल्पलाइनवर. 'वत्सलावहिनींचा आधुनिक ॲडव्हाइस' ऊर्फ..., 'व्वा!' अशी हेल्पलाइन आणि आधुनिक जीवनात खटकणाऱ्या छोट्या गोष्टींवर सल्ले मागणारे लोक. बघायला कुठे मिळेल काय विचारता? या पुस्तकातच. मंगला गोडबोले या लोकप्रिय लेखिकेचा भन्नाट कल्पनाविलास! समाजजीवनावरचं मिश्कील आणि मार्मिक भाष्य! वाचल्यावर तुम्हीही म्हणाल, “व्वा!''
-
Dabholkar Hatya Aani Mi (दाभोलकर हत्या आणि मी)
विक्रम भावे यांना नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणात खोटेपणाने गोवले गेले. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबाला काय भोगावे लागले, तपास यंत्रणांची दमन तंत्रे, खोटे पुरावे तयार करण्याची परिसीमा आणि चाललेला खटला, यांचा लेखाजोखा…
-
Arunoday (अरुणोदय)
हे पुस्तक म्हणजे अभ्यासपूर्ण प्रबंधच आहे. भारतीय सैन्य, त्याचे कामकाज, अरुणाचल प्रदेशातील चीन सीमा या सर्वांकडे पाहण्याचा एक नवीन आणि व्यापक दृष्टिकोन वाचकांसमोर येतो. आजच्या काळाशी सुसंगत असे लेखन आणि कादंबरी लिहून लेखकाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे (सेवानिवृत्त)
-
Shadow House (शॅडो हाऊस)
शॅडो हाऊस... मेळघाटाच्या घनदाट अरण्याच्या मधोमध उभा असलेला एक प्राचीन, आलिशान बंगला. हा बंगला एका धनाढ्य उद्योगपती जगदीश पारेखच्या नजरेत येतो आणि तो त्या बंगल्यावर वर्षाअखेरीची पार्टी आयोजित करण्याचे ठरवतो. या पार्टीला जगदीशची बायको आणि हाऊसमेड यांखेरीज आणखी चार आमंत्रित येऊन पोचतात. सगळेजण चीअर्स करण्यासाठी ग्लास उचलतात, आणि नेमकं तेव्हाच अकल्पित घटना घडण्यास सुरुवात होते - बंगल्याच्या दारात स्वतःला वाईल्डलाईफ फोटोग्राफर म्हणवून घेणारा एक गूढ पाहुणा येणं; काहीच वेळात बंगल्यातील दिवे एकाएकी जाणं आणि पार्टीचा यजमान जगदीश याचा गोळी झाडून खून होणं...! खुनी बंगल्यात शिरलेला अनाहूत पाहुणा आहे का? की तो जमलेल्या आमंत्रितांपैकीच एक आहे? त्याच्या कचाट्यातून कोण वाचणार आणि त्याचा बुरखा कोण खाली खेचणार? अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारी क्लासिक् मर्डर मिस्ट्री
-
Tukobanche 51 Preranadayi Jeevansutre Bhag 5 (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे भाग ५)
तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे भाग ५ - नवनाथ जगताप संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा सागर अथांग आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरणारी त्यांची अभंगवाणी ही खऱ्या अर्थाने माणुसकीची आणि विवेकाची पाठशाळाच आहे. 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' या मालिकेतील पाचवा भाग, वाचकांना अधिक प्रगल्भतेकडे नेणारा आहे. या भागात आम्ही तुकोबांच्या अशा अभंगांची निवड केली आहे, जे विशेषतः मनाची एकाग्रता, अहंकाररहित जगणे आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्यावर प्रकाश टाकतात. कठीण प्रसंगात डगमगून न जाता धैर्याने उभे राहण्याचे बळ तुकोबांच्या या सूत्रांतून मिळते. हे पुस्तक केवळ आध्यात्मिक ग्रंथ नसून, हे एक जीवनशिक्षण आहे, जे आपल्याला स्व-ओळख करून देते आणि जगण्याचे तत्त्वज्ञान समजावून सांगते. तुकोबांच्या शब्दांचा हा ठेवा आपल्या वैचारिक जडणघडणीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या प्रवासात सहभागी व्हा आणि जीवनाकडे पाहण्याचा एक नवा, सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करा.
-
Tukobanche 51 Preranadayi Jeevansutre Bhag 4 (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे भाग ४)
तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे ! भाग २ लेखक - नवनाथ जगताप तुकोबांच्या वाणीतील साधेपणा, विचारातील गूढता आणि जीवनाला दिशा देणारी ताकद यांचा संगम म्हणजे "तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे भाग २". या पुस्तकात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून उलगडणारी जीवनतत्त्वे, आत्मविश्वास, कर्तव्य, संयम आणि भक्ती यांचे प्रभावी मार्गदर्शन दिले आहे. प्रत्येक सूत्र हे केवळ विचार नाही, तर जगण्याची दिशा आहे. आधुनिक जीवनातील ताणतणाव, संभ्रम आणि स्पर्धेमध्ये मार्ग हरवलेल्या मनाला हे पुस्तक नवचैतन्य देईल. तुकोबांच्या शब्दांतून स्वतःला शोधण्याचा आणि अधिक समृद्ध, शांत आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.