-
Swapnashil (स्वप्नशिल)
कामिनी मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्धीस पावले. जगभरातील शिल्पकारांनी आणि रसिकांनी आचार्य अश्विनीकुमारांच्या कलेची प्रशंसा केली. मात्र कामिनीशिल्प वस्त्राच्छादित होते, त्यामुळे अनेकांची निराशा झाली. कामिनी कुरूप होती, असाही एक समज पसरला. अनेक शिल्पकारांनी कामिनी शिल्पाचे काम पूर्ण करण्याची तयारी दर्शवली, पण कुणालाही ते पूर्ण करणे जमले नाही. अनेकांनी तसा प्रयत्न केला असता त्यांची त्वचा भाजून निघाली. त्या शिल्पाची प्रसिद्धी झाली, ती याच कारणास्तव ! जवळपास दोन तपे निघून गेली. महाराज विक्रमादित्य द्वितीय आता वृद्धत्वाकडे झुकू लागले. त्यांना अजूनही त्या शिल्पकाराची प्रतीक्षा होती, जो कामिनीला पूर्णरूप देणार होता. कोण होती ही कामिनी ? काय होती कामिनी मंदिरामागची कथा ? काय आहे कामिनीशिल्पाचे रहस्य ?
-
Genius Gem.Dr Gem (जीनियस जेम डॉ. जीएम)
सूक्ष्मजीवशास्त्र त्याचबरोबर उद्योजकीय कौशल्य आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदान अशा विविध व्यापक स्तरांवर डॉ. जी. एम. वारके यांचे कार्यचरित्र महत्त्वाचे आहे. साइटोफागा जिवाणूंच्या विविध प्रजातींची ओळख तसेच त्यांचे विलगीकरण यामधील त्यांच्या मूलभूत संशोधनाने सूक्ष्मजीवशास्त्राच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. या जिवाणूंच्या प्रजार्तीच्या लक्षणांचे तपशीलवार वर्णन आणि त्यांच्या विलगीकरणासाठी आवश्यक विशेष मीडिया निर्मितीद्वारे त्यांच्यातील वैज्ञानिकाने आपल्या समर्पित वृत्तीचेच दर्शन घडवले. इतकेच नव्हे तर, त्यांच्या या पायाभूत संशोधनाने भविष्यातील संशोधनाचा आणि औद्योगिक क्षेत्रातील उपयोजनांचा मार्गच प्रशस्त केला. डॉ. वारके यांच्या या कार्यामुळे औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर विज्ञानाच्या व्यावहारिक उपयोजनाच्या क्षेत्रातदेखील नव्या संधींची दालने खुली झाली आहेत. त्यांच्या सर्वस्वी नव्या दृष्टिकोनामुळे अनेक औद्योगिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये सुलभता आल्याने त्याचा आर्थिकदृष्ट्या व्यापक परिणाम दिसून आला आहे. त्यांचे औद्योगिक संशोधन आणि त्याद्वारे निर्मिती झालेले उत्पादन तंत्रज्ञान आजही उद्योजक तसेच उद्योगांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांचे हे चरित्र त्यांच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक यशाचे गमक सांगतानाच भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याचेही काम करते. सूक्ष्मजीवशास्त्र आणि उद्योगविश्वात त्यांनी निर्माण केलेल्या समृद्ध वारशाचा फायदा जागतिक आरोग्य, विज्ञान आणि उद्योग क्षेत्राला झाला असून त्याबद्दल सर्वत्र त्यांच्याविषयी आदराची भावना व्यक्त केली जाते. देशाला, समाजाला आपले अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. जी. एम. वारके यांचे चरित्र तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अवश्य वाचावे. त्यातून प्रेरणा घेत नवनिर्मिती करत देशाच्या समृद्धीला आपलाही हातभार लावावा, असे यानिमित्ताने मी सुचवू इच्छितो.
-
Udyog Yashogatha (उद्योग यशोगाथा)
एखादी कल्पना उद्योगात रूपांतरित करायला एक वेगळी जिद्द, अर्थशास्त्राची थोडी जाणीव वगैरे अनेक गोष्टी लागतात. त्या अनुभवाने शिकता येतात, पण त्याला अनेक वेळा कालमर्यादा मोठी लागते. यातून या नव्या उद्योजकाची दमछाक होते. अनेकदा कल्पना चांगली असूनही तो अयशस्वी ठरतो. यामुळे सरदेशमुखांनी अगदी लहानांपासून मध्यमवर्गीयांमधील काही व्यक्ती आंतरराष्ट्रीय दर्जावर कशा पोहोचू शकल्या, अशी अनेक वेगवेगळी उदाहरणे संवादात्मक शैलीत समजावून सांगितलेली आहेत. यामुळे नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळायला निश्चित मदत होईल. आपण आपापल्या परीने जमेल तशी हळूहळू व्यवसायवृद्धी करत राहावी, असाही संदेश या पुस्तकातून मिळतो. भविष्यकाळामध्ये हे आवश्यक आहे, असाही संदेश यातून मिळतो
-
Ghumakkadi (घुमक्कडी)
सरधोपटता वजा केली, की तुम्हाला थोडं अधिक चांगलं लिहिता येऊ शकतं, हे नोरा एफ्रॉन या विदुषीचं तत्त्वज्ञान कविता महाजन यांनी त्यांच्या कथात्म लेखनकाळातच ओळखलं होतं. अकथनात्मक लेखन, अनुवादासाठी देशाच्या कानाकोपर्यातील लेखक-लेखिकांचं वाचन, संपादन या सर्व बाबींमुळे त्यांच्या लेखणीला धार आलेली दिसते. रा. भि. जोशींच्या प्रवासलेखनकुळाशी बरंचसं जवळचं नातं सांगणार्या ‘घुमक्कडी' या पुस्तकामध्येही आहे प्रवासाच्या गोष्टी आणि गोष्टींचा प्रवास. तो किती खोलवर आहे, याचा अंदाज यातील कोणताही लेख वाचल्यानंतर उमजून येईल. पृथ्वीची उत्पत्ती, सूर्याची, अग्नीची, पावसाची इतकंच नाही, तर मिठाची उत्पत्ती याबद्दलच्या लोककथांचा प्रवास कविता महाजनांच्या प्रवासाशी एकरूप होऊन रूढार्थानं प्रवासवर्णन नसलेलं एक अचंबित करणारं पुस्तक तयार झालंय. ब्लॉगसाठी लिहिल्या गेलेल्या या प्रवासनोंदी, पण अत्यंत गंभीर आणि अनंत तपशिलांना कवेत घेणार्या.
-
Aapuliya Bale Nahi Mi Bolat ( आपुलिया बळे नाही मी बोलत)
शताब्दीच्या उंबरठ्यावरचे दादा' गेली 50 वर्षे मी दादांना पाहातो आहे, ऐकतो आहे, आणि वाचतो ही आहेच, दादा म्हणजे मराठी साहित्यातले ज्येष्ठ लेखक-समीक्षक श्रीराम कृष्णाजी बोरकर, राष्ट्रीकृत बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी. दादांचे कुटुंब साक्षात गोकुळच. दादा त्यातले आदर्शवत कर्ता पुरुष. दादांची पहिली कादंबरी ते मॅट्रीकला असताना प्रसिद्ध दार्दाचे विविधांगी, विपुल लेखन लोकप्रिय मासिकांतून आणि प्रतिष्ठित वृत्तपत्रांमधून सातत्याने प्रसिद्ध, दैनिक महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार पुरवणीतून सुरवातीपासून सतत 18 वर्षे दार्दानी असंख्य ललित ग्रंथाची परीक्षणे करून साक्षेपी समीक्षक म्हणून नाव मिळविले. दादांनी कविता, लघुकथा, लघुनिबंध, कादंबरी, समीक्षा, चरित्र आणि इतिहास असे वेगवेगळे वाडमय प्रकार स्वतःच्या ललित मधुर शैलीत समर्थपणे हाताळले. त्याचीच पुढे अनेक पुस्तके निघाली. डेमिसाईज आकारातला सुमारे 750 छापील पृष्ठाचा दादांचा श्रीमहाभारत' नामक भारदस्त संशोधनपर ग्रंथ विशेष लोकप्रिय आहे हा ग्रंथ दादांच्या वाङ्मयीन कार्यकर्तृत्वाचा एक चिरस्थायी ठेवा समजला जातो. "आपुलिया बळे नाही मी बोलत" या नावाचे दादांचे आत्मकथन पर नवे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. दादांच्या आयुष्याचे व समग्र जडण-घडणीचे एक नितळ, प्रांजल दर्शन त्यातून घडते, ते मनोवेधक आहे, मनाने अतिशय निर्मळ, निगर्वी असणारे दादा स्वभावानेही तितकेच निष्कपट आणि निर्मत्सरी आहेत. शताब्दी वर्षातल्या त्यांच्या प्रवेशाची सारीजण आतुरतेने वाट पाहाताहेत, दादांनी शतायु व्हावे हीच सर्वाची शुभकामना !
-
Ase He Runanubandha (असे हे ऋणानुबंध)
'असे हे ऋणानुबंध' या कथासंग्रहातील सगळ्या कथा वाचल्या. यातील अनेक कथा सत्य घटनांवर आधारित आहेत. काळ, स्थळ, व्यक्तिंची नावे बदललेली आहेत. कथा साध्या व सोप्या भाषाशैलीत लिहिलेल्या आहेत. त्यामुळे पुढे काय ? याची उत्सुकता लागून राहते. कथेचा शेवट गोड केलेला आहे.
-
Suranchi Samaradnee : Lata Mangeshkar (सुरांची सम्राज्ञी : लता मंगेशकर)
लताचा आवाज ‘पल्याडच्या' दुनियेशी आपलं नातं जोडील अशा विलक्षण मधुर ताकदीचा होता. संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी. पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, तिच्या सुरांनी. एकेका स्वराचा, लयीचा, तालाचा आनंद घेत आणि मुक्तहस्तांनी आनंद वाटून देत आली लताची गाणी.. राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप, वात्सल्य, हर्ष, खेद... अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं मूर्तरूप दिलं. या दैवी आवाजाची ना कुणाला व्याख्या करता आली, ना तो संगीताच्या कुठल्या गणिती मोजपट्टीत किंवा व्याकरणात बसवता आला. त्या अपूर्व स्वरलेण्याला ही विनम्र आदरांजली, लताबाईंच्याच निवडक पंचवीस गीतांच्या शब्द-सूर-अर्थ-आस्वादाच्या साथीने..
-
Navrasancha Jadugar Mohammad Rafi (नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी)
मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब.. प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या... रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार ! संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य ! अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रहण... क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधाही आहे...