-
Maharashtracha Safarnama (महाराष्ट्राचा सफरनामा)
सारेच महाराष्ट्राच्या प्रेमात.. !! महाराष्ट्र हे नाव जरी नुसते उच्चारले, तरी आपण पर्यटनाच्या वेगळ्याच विश्वात जातो. या विश्वात इतिहास, भूगोल, सह्याद्री, मंदिरे, नद्या, जंगले, गड-किल्ले, समुद्रकिनारे, स्मारके, संग्रहालये, गावे, या साऱ्या गोष्टी सामावल्या आहेत. पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्राचे अवकाश खूप मोठे आहे. इतर राज्यांपेक्षा कांकणभर अधिक सरस आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा विविध भागांतली संस्कृती आणि वेगळेपण हासुद्धा एक अनुभवायचा भाग आहे. या राज्याला लाभलेला शिव-छत्रपतींचा इतिहास तर कळसबिंदू ठरावा. कितीतरी गोष्टींनी महाराष्ट्र समृद्ध आहे. एक जन्मसुद्धा अपुरा पडेल हे सारे डोळे भरून पाहायला. संपूर्ण महाराष्ट्र हा पर्यटनाच्या बाबतीत एका पुस्तकात कधीच मावणार नाही. या पुस्तकात विविध भागांतील निवडक ठिकाणांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राचा हा सफरनामा निश्चितच तुम्हाला आवडेल.
-
Enjoy (एंजॉय)
गेल्या ४-५ वर्षांमध्ये कारणपरत्वे वृत्तपत्रांमध्ये आणि हौसेने दिवाळी अंकांमध्ये मी लिहिलेल्या काही लेखांचं संकलन म्हणजे हे पुस्तक होय. ह्या लेखांना सन्मानाने जागा देणाऱ्या संपादक-प्रकाशकांची मी ऋणी आहे. तसंच सध्याच्या थोड्या अवघड वाङ्मयीन वातावरणातही हे पुस्तक प्रसिद्ध करणाऱ्या नावीन्य प्रकाशनाचे श्री. नितीन खैरे आणि त्यांचे सर्व सहकारी ह्यांचीही मी आभारी आहे. लेख मराठी भाषेत, लेखिका मराठी प्रेमी, मग पुस्तकाचं शीर्षक इंग्रजी का असावं? असं विचारणारे कोणी निघतील. त्यांना उत्तर असं की, एकतर आता 'एंजॉय' हा इंग्रजी शब्द मराठी भाषेत अत्यंत प्रचलित झाला आहे. गाणं-खाणं-सभा-संमेलन- प्रवास-निवास ह्यासारख्या सर्व व्यवहारांमध्ये 'एंजॉय करा' असं उच्चरवाने सांगितलं जातं. करताकरता एंजॉय हा नुसता शब्द न राहाता वृत्ती बनत चाललीय. आसपास काहीही, कितीही, अनुकूल- प्रतिकूल असो-नसो जगणाऱ्याने त्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करावा. होणाऱ्या गोष्टी होणारच. मग पुढ्यातला क्षण मनमुराद उपभोगू का नये ? ‘एंजॉय!’ हे पुस्तक वाचणाऱ्यांनी हीच दृष्टी ठेवावी असं मी नम्रपणे सुचवेन. खुलेपणाने स्वीकारल्यास ह्या पुस्तकात दिलखुलास क्षण नक्कीच मिळतील. ते वाचकांनी घेतले, प्रसंगी माझ्याकडे नोंदवले तर मला ह्या लेखनाच्या खटाटोपाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. मग काय, करणार ना 'एंजॉय ?' -- मंगला गोडबोले
-
Bhor, Velhe, Purandhar Parisar Paryatan Margdarshika (भोर, वेल्हे, पुरंदर परिसर पर्यटन मार्गदर्शिका)
भोर वेल्हे तालुका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी नटलेल्या या परिसरात गडकोट किल्ले, शिल्पकला असलेली मंदिरे, धरणे, लेण्या, घळी, धबधबे असे वैभव आहे. याच तालुक्याला लागून वाई, महाड असे तालुके आहेत. या पुस्तकात येथील पर्यटनस्थळांचाही समावेश केलेला आहे. या सर्व पर्यटनस्थळांची माहिती व रंगीत छायाचित्रे आणि नकाशे दिलेले आहेत.
-
Technical Analysis (टेक्निकल ॲनालिसिस)
“Finowings Training & amp; Academy Pvt Ltd” ने संस्थापक, मुकुल अग्रवाल यांनी लिहिलेले हे पुस्तक, स्टॉक, इंडेक्स आणि कमोडिटी मार्केट्समध्ये तुमची एंट्री, एक्झिट आणि एक्झिट करण्यासाठी टेक्निकल अनिलिसिस कसे वापरावे हे स्पष्ट करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करते. मी जे काही शिकलो ते आणि गेल्या 18 वर्षात या मार्केटमधून अनुभवलेले, मी तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून सोप्या भाषेत समजावून सांगण्याना प्रयत्न केला आहे. ज्यांना टेक्निकल ऑनलिसिस शिकायचे आहे त्यांनी हे पुस्तक वाचायला हवे. कारण या पुस्तकाची लेखन शैली सहज समजण्याजोगी आहे. हे पुस्तक ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदारांना अशी सर्व मूलभूत आणि जटिल तंत्रे सोप्या पद्धतीने समजावून सांगेल जी त्यांना टेक्निकल ऑनेलिसिस समजून घेण्यासाठी आवश्यक असतील आणि हे पुस्तक वाचल्याने हे ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदारांना योग्य वेळी योग्य स्टॉक खरेदी करण्याचा पर्याय निवडण्यात देखील उपयुक्त ठरेल जेणेकरून त्यांना त्यांच्या स्टॉकमधून चांगला परतावा मिळू शकेल. यामध्ये समाविष्ट असलेली विविध उदाहरणे ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदारांना ट्रेड करताना सपोर्ट आणि रेझिस्टंस, मूव्हिंग ऑव्हरेज, कैंडलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न इत्यादी सारखी विविध टेक्निकल ऑनलिसिसनी तंत्र समजून घेण्यास आणि ती लागू करण्यासाठी योग्य दिशेने मार्गदर्शन करतील. या व्यतिरिक्त, या पुस्तकामध्ये ट्रेडिंग जर्नलसह पोझिशन साइडिटंग, स्टॉक पिकिंग स्ट्रेटेजीज, आद्याक्षरे सेट अप करणे आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस यासारख्या जोखीम व्यवस्थापनाचा समावेश आहे.
-
Nehruncha Bharat Itihas,Vartman Aani Bhavishya (नेहरूंचा भारत इतिहास, वर्तमान आणि भविष्य)
इतिहास आणि भारताचा सांस्कृतिक भूतकाळ याविषयी नेहरूच्या आकलनावर भर देत हे पुस्तक अशी एक खिडकी उघडतं जिच्यातून आपल्याला सांप्रदायिकतेविषयी नेहरूंची समज काय होती आणि धर्मनिरपेक्षतेविषयी त्यांची बांधिलकी कशी होती ते दिसतं. हे पुस्तक लोकशाही समाजावरील त्यांचा अढळ विश्वास आणि भारतातील लोकशाहीचं पालनपोषण करण्यात त्यांची अमूल्य भूमिका यावर प्रकाश टाकतं. तसंच स्वतंत्र, समतावादी अर्थव्यवस्था उभारत असतानाच त्याच्या जोडीला विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोनयुक्त समाजव्यवस्था उभारण्याच्या नेहरूच्या प्रयत्नांची दखलही घेत. या सर्व प्रयत्नांतूनच विसाव्या शतकातील एका महान व्यक्तिरेखेचे जीवन आणि कार्य यासंबंधी आपल्याला पुष्कळ माहिती मिळते, त्यांच्या निधनानंतर सहा दशके उलटली आहेत, इतका काळ गेल्यावरही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या मूल्यांचं प्रतिबिंच उमटलं होतं आणि त्यातील जी तत्त्वं नेहरूंनी स्वीकारली होती ती तत्त्वं आजही तेवढीच कालसुसंगत आहेत का? हे पुस्तक अतिशय रोखठोक, युक्तिवादपूर्ण आणि विचारप्रवृत्त करणारं असून ते नवभारताची मूलभूत संकल्पना शोधण्यासाठी, तिचा प्रसार करण्यासाठी आणि तिचं संरक्षण करण्यासाठी ज्या माणसाने अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले त्याच्याबद्दल महत्वाची माहिती देत.
-
Hoy Hoy Warkari (होय होय वारकरी)
वारकऱ्यांनी सर्व नव्या साधनांचा स्वीकार केला तसा नव्या विचारांचा पण स्वीकार करायला हवा, असं मला वाटायचं. समाजधुरिणांनी सतत जुना विचार नवा करायचा असतो. महात्मा फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, बा. र. सुंठणकर, गं. बा. सरदार, वि. भि. कोलते, भालचंद्र नेमाडे, अरुण कोलटकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, सदानंद मोरे, आ. ह. साळुंखे यांनी वारकरी विचाराच्या संदर्भात वेळोवेळी असे नवे आयाम सादर केले. आधुनिक समजल्या जाणाऱ्या विचार व्युहातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचे वातावरण वारकरी संप्रदायानेही तयार केलेले होते. संत साहित्य म्हणजे केवळ अध्यात्मिक अवडंबर नव्हे, तर संत साहित्य म्हणजे मूल्य रुजवण्याचे प्रभावी माध्यम होते. संतांनी समाजावर, राष्ट्रावर, भाषेवर, माणुसकीवर प्रेम करायला शिकवले. धर्मविचार कधीच कालबाह्य नसतात. तसे असते तर बाबासाहेब निर्धमी राहिले असते. धर्माशिवाय समाज धारणा होत नाही. धर्माला आपली गरज नाही. आपणाला धर्माची गरज आहे. वारकरी चळवळीचा असा सर्वांगाने कुणीतरी विचार करावा असे मला नेहमी वाटायचे. वरील विचारवंतांपैकी सर्वच लेखक, कवी आणि विचारवंत होते. पण मला वाटायचं प्रत्यक्ष वारकरी संप्रदायातल्या एखाद्या कीर्तनकारानेही अशा प्रकारचा विचार करावा आणि वारकरी परंपरेला नवे परिमाण द्यावे. ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांचे ‘होय होय वारकरी’ हे पुस्तक वाचले आणि माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या. अत्यंत कमी वयात ज्ञानेश्वर बंडगर महाराजांनी केलेला व्यासंग आणि कमावलेली मर्मदृष्टी ही त्यांच्या कठोर साधनेची फलश्रुती आहे. बंडगर महाराज यांचे हे लेखन परीवर्तनकारी ठरेल याची मला खात्री आहे.
-
Ishara (इशारा)
माणसातल्या पशुत्वाचं दर्शन घडवणाऱ्या दोन दीर्घकथांचा संग्रह. लेखक माधव दामले यांच्या ओघवत्या लेखनशैलीमुळे ‘प्रतिलिपी’ या ॲपवर अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या दीर्घकथांचा संग्रह वाचकांसाठी पुस्तकरूपात उपलब्ध.
-
Mahapratapi Subhedar Malharrao Holkar (महाप्रतापी सुभेदार मल्हारराव होळकर)
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार हिंदुस्थान आणि हिंदुस्थानाबाहेर करणारे आणि मराठेशाहीचा इतिहास घडवणारे काही शूरवीर होते. त्यामध्ये अग्रस्थानी असणारे सुभेदार मल्हारराव होळकर हे अत्यंत पराक्रमी, शूर, बुद्धिमान आणि धाडसी असे सुभेदार होते. धर्म, आचार, विद्या, व्यापार आणि युद्धकला या सर्वात ते पारंगत होते. सामर्थ्य, न्याय, नीतिमत्ता, महत्वकांक्षीपणा आणि स्वतःच्या मनगटाच्या बळावर या सामान्य मेंढपाळ व्यक्तीने दिल्लीचा बादशाह कोण व्हावा हे ठरवण्यापर्यंत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र राज्याच्या राजासारखे ते आयुष्यभर वागले. पण छत्रपती शाहू महाराज आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्यावरील निष्ठा त्यांनी अखंड जपली. एकूण ७४ परगणे मल्हाररावांच्या ताब्यात होते. प्रत्येक युद्धात मल्हाररावांनी भीम पराक्रम केला. आपल्या कारकिर्दीत ते एकूण ५२ लढाया लढले आणि त्या सर्वांमध्ये त्यांनी यश मिळवले. मराठेशाहीच्या उत्कर्षात मल्हारराव होळकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मराठेशाहीचा भगवा झेंडा अटकेपार फडकवण्यात मल्हाररावांचा सिंहाचा वाटा होता. उत्तर हिंदुस्थानात मराठेशाहीचा पाया मल्हाररावांनी बळकट केला. आपल्या राज्यात प्रशासन, शेती, जलव्यवस्था, न्याय, धार्मिक बाबी, स्थैर्य, शांतता राबवून त्यांनी शिवरायांचा लोककल्याणकारी राज्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. रघुराज मेटकरी हे प्रतिभावंत साहित्यिक आहेत. त्यांनी अनेक पुस्तके, दुमिर्ल कागदपत्रे धुंडाळून मल्हारराव होळकर यांचे हे चरित्र लिहिलेले आहे. मल्हाररावांचे हे चरित्र प्रेरणादायी आहे. मराठी वाचकांना ते नक्कीच आवडेल, असा विश्वास आहे. डॉ. देवीदास पोटे (ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक, मुंबई)
-
Avakash Peltana (अवकाश पेलताना)
कादंबरीकार प्रियांका कर्णिक यांचा हा पहिला कथासंग्रह. संघर्ष आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक द्वंद्वांचं वैविध्यपूर्ण चित्रण असणारा कथासंग्रह
-
Menduchi Mashagat (मेंदूची मशागत)
‘मेंदूची मशागत’ या देवा झिंजाड लिखित पुस्तकात गावाशी जोडलेले अनुभव, संघर्ष आणि ज्वलंत विषय मांडले आहेत. शहरात राहत असूनही त्यांच्या लेखनाची नाळ गावाशी जोडलेली आहे. वाचनसंस्कृतीचे महत्त्व ते वारंवार अधोरेखित करतात. मेंदूच्या विकासासाठी वाचन गरजेचे असून, हे पुस्तक छोट्या प्रकरणांतून अनुभवांद्वारे मौल्यवान संदेश देते. आजचा मेंदू मोबाइलमध्ये अडकला असून, तो पुन्हा डोक्यात आणण्यासाठी अशी ‘मेंदूची मशागत’ आवश्यक आहे, असे मत शरद तांदळे यांनी व्यक्त केले. – शरद तांदळे
-
Krudhyati Ek Thararak Mahasangram (कृध्यती एक थरारक महासंग्राम)
मानवतेच्या कल्याणासाठी महाभारतासमान विध्वंस पुन्हा होऊ नये, हे गरजेचे होते. याच उद्देशाने श्रीकृष्णाने दैवी अस्वे सुरक्षित ठेवण्याची सोय केली होती; परंतु सत्तेच्या लोभापायी मनुष्य कोणताही थर गाठू शकतो, हे कृष्णमृत्यूपश्चात सातशे वर्षातच समजले. कृथ्यति, हा दैवी शक्तीने भरलेला एक असा विक्षिप्त गुन्हेगार उठ्यास आला, ज्याचे लक्ष्य शत्रू राज्यातील गर्भाचा वध करणे, हे होते. हा योद्धा जर 'विद्यधुरंधर स्पर्धा जिंकून इंद्रपदी बसला, तर समग्र आर्यावर्ताचा सर्वनाश होणार हे निक्षित. या दैवी शक्तीने उन्मत्त विक्षिप्त गुन्हेगाराला छोट्याशा राज्याचा सेनापती वीरसेन रोखू शकेल का? डॉ. ऋषिकेश बोधे यांसारख्या लेखकांनी 'कृथ्यती'सारखी गहिराई असलेली साहित्यकृती साकारून मराठी फिक्शनला एक नवे परिमाण दिले आहे. या कादंबरीचे साहित्यिक मूल्य अत्यंत ठोस आहे. तिचं भाषिक सौंदर्य, मनाच्या गुंतागुंतीचा सुक्ष्म येध आणि अंतःप्रेरणेला भिडणारी तिची शैली यामुळे ही कादंबरी एक दीर्घकाळ आठवणीत राहील अशी ठरते. खरे सांगायचे तर, बऱ्याच काळानंतर एवढं शुद्ध, विचारप्रवृत्त आणि संवेदनशील साहित्य वाचायला मिळाल्याचा आनंद झाला. मराठी साहित्यात अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या सशक्त कल्पनाविष्काराच्या अभावाची जाणीव होती; पण 'कृध्यती मुळे त्या पोकळीची भरपाई झाल्याचे समाधान वाटते. आगामी काळात ह्याचे पुढील भागही येवोत, अशा शुभेच्छा.
-
Pimpalpan Part -16 (पिंपळपान भाग-१६)
आशयसमृद्ध, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका'चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणाऱ्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका'चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणाऱ्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Khaki Stories Part 1 (खाकी स्टोरीज भाग १)
पोलिसी तपासकथा उत्कंठावर्धक असतातच, परंतु डिजिटल युगात गुन्ह्यांचा सारीपाटच बदलला गेलाय. अर्थात, तपासाचं तंत्रही बदलून गेलंय. गुन्ह्याची शस्त्रं आणि क्लृप्त्या बदलल्या, तसा त्यांचा माग काढण्याच्या पद्धतीतही आमूलाग्र बदल झाला. गुन्हेगारीच्या विकृतीला आता अत्याधुनिक गॅजेट्सची साथ लाभलेली आहे. मनोरंजन आणि उपयुक्तता असलेली गॅजेट्स प्रत्येकाच्या हातात आल्यामुळे त्यांच्यावर जाळं फेकण्याऱ्यांची कमी नाही. स्मार्ट फोन वापरणाऱ्यांना हातोहात 'मामा' बनवण्याचे फंडे विकसित झालेले आहेत. या गुन्ह्यांचं स्वरूप चक्रावणारं आणि विजेच्या वेगानं कवेत घेणारं आहे. तपासयंत्रणांच्या बुद्धीचा कस पाहणाऱ्या या गुन्ह्यांचं आव्हान आक्राळविक्राळ आहे. या पार्श्वभूमीवर गुंतागुंतीच्या केसेसचा लीलया फडशा पाडणाऱ्या इन्स्पेक्टर किरण देशमुख आणि त्यांच्या टीमच्या कौशल्याचा चित्तथरारक वेध घेणाऱ्या खाकी वर्दीतल्या तपासकथा एक कडक सॅल्यूट ठोकायला भाग पाडतील.
-
Pimpalpan Part -15 (पिंपळपान भाग-१५)
Madhuri Shanbhag Vrunda Bhargav Suman Phadke Mandakini Godse Kalpana Bhagwat Pravin Davane Prakash Pathak Rajesh Belhekarआशयसमृद्ध, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका'चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणाऱ्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका'चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणाऱ्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Santaji Ghorpade Japhatan Mulukh (संताजी घोरपडे जफतन मुलूख)
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचं राज्य बुडालं या औरंगजेबाच्या भावनेला संताजींनी जोरदार तडाखा दिला. चार साडेचार वर्ष ब्रम्हपुरी या ठिकाणच्या काळ्या मातीत औरंगजेब बादशहा राहिला. त्याला कारण म्हणजे मराठ्यांचा सेनापती संताजी घोरपडे यांनी बादशहाला निर्माण केलेला धोका होय. वडू कोरेगावच्या बादशाही छावणीवर सन १६८९ साली जो धाडसी छापा संताजी यांनी घातला त्यांने बादशहाची झोपच उडाली, बादशहा मरता मरता त्या रात्री वाचला. संताजीला ठार केल्याशिवाय बादशहाला ब्रम्हपुरीच्या छावणीतून बाहेर पडता येईना. औरंगजेब बादशहा आणि मोगल राजवट ही आशिया खंडातील बलाढ्य राजवट होती. संताजी घोरपडे यांचा अलौकिक पराक्रमाचा दरारा या राजवटीवर एवढा पडला होता की मोगल सरदार संताजी घोरपडे यांच्या बरोबर युध्द प्रसंग पडल्यावर ते युध्द टाळण्याचा प्रयत्न करत. अशा या नर शार्दुल रणधुरंधरास स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांकडून मुजऱ्यास न येणे पासून ते ममलकतमदार ह्या पदवी पर्यंतचा प्रवास म्हणजे संताजी बाबा. संताजी घोरपडे यांच्या जीवनावर आधारित असलेली, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडणारी कादंबरी म्हणजे संताजी घोरपडे जफतन मुलूख.
-
Sheel (शीळ)
शीळ, कैफियत आणि खलनिग्रहणाय.... अगदी वेगळ्या विषयावरच्या तीन दीर्घकथा ◆ प्रियकराच्या विशासावर लग्न करून शलाका सासरी येते. दिराच्या कारस्थानांना बळी न पडता शलाका युक्तीनं त्यालाच जन्माचा धडा शिकवते. कसा? ◆ गौरव आणि कामिनी दोघंही स्वार्थी उपभोगाला चटावलेले. सरळसाधी कावेरी आयुष्यभर वाट्याला आलेली कर्तव्यं प्रेमानं पार पाडत राहते. शेवटी कोण जिंकतं ? ◆ आपल्या वडलांवर, शाळेतल्या बाईंवर झालेला अन्याय साधना विसरू शकत नाही. योग्य वेळ येण्याची ती वाट पाहते आणि योजनाबद्धरीतीनं दुष्टांचा काटा काढते.
-
Atrupta (अतृप्त)
सिनेसृष्टीतील गाजलेले चित्रकार आणि संवेदनशील लेखक श्रीकांत धोंगडे यांनी मीनाकुमारीच्या जीवनावर ‘अतृप्ता’ हे नवे पुस्तक लिहिले आहे. खरं तर मीनाकुमारीच्या जीवनावर अनेक भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित झाली आहेत. परंतु, श्रीकांत धोंगडे यांचे हे पुस्तक लक्षणीय आहे. कारण तिच्या जन्मापासून अखेरपर्यंतचे हे शोधचरित्र आहे. मीनाकुमारी राहत असलेल्या दादर परिसरातील रहिमाबाई चाळीपासून श्रीकांतजींनी शोधकार्य सुरू करून सलग साडेतीन वर्षे तिच्या जीवनाचा धांडोळा घेतला आहे. अन् अनेक दुर्मिळ फोटो शोधून काढले आहेत. त्यामुळे या पुस्तकात एक हजार फोटोंचा दुर्मिळ साठा तिच्या चाहत्यांना पाहायला मिळेल. “शिवाय या पुस्तकात पेन, पेन्सिल व चारकोलने श्रीकांतजींनी केलेले मीनाकुमारीचे १६ पोर्टेटस् आहेत,” त्यांच्या काळजाला भिडलेली, मनात शिरलेली आणि मेंदुत भिनलेली मीनाकुमारी त्यांनी या पुस्तकात उभी केली आहे.
-
Mazi Shipaigiri (माझी शिपाईगिरी)
" गेल्या शतकात कोल्हापूर संस्थानातील शेतकरी कुटुंबातील एक मुलगा हिंदी लष्करातील सर्वोच्च अधिकारपदावर जातो, ही काही आपोआप सहजगत्या घडून आलेली घटना नसून तिला एक ऐतिहासिक व सामाजिक कारणपरंपरा होती आणि त्या परंपरेचा उद्गम बिंदू होता कोल्हापूरचा लोकराजा रावर्षी शाहू छत्रपती. त्यांच्या राजाश्रयाने वडगावच्या चिमणाजी पाटलांचा मुलगा, पांडुरंग, हा उच्चविद्याविभूषित झाला आणि भारतातील थोर कृषितज्ज्ञ म्हणून रावब. डॉ.पी.सी.पाटील या नावाने प्रसिद्धी पावला! या रावबहादुरांचे चिरंजीव शंकरराव म्हणजे प्रस्तुत चरित्र नायक ले.ज.एस.पी.पी.थोरात. हे सर्व इथं आठवले एवढ्यासाठी की सन १८९९ मध्ये शाहू छत्रपतींनी पांडुरंग पाटील नावाचा मुलगा मॅट्रिक पास झाल्याचे कळाल्यानंतर त्याच्या गावी खास घोडेस्वार पाठवून त्याला बोलावून घेतले नसते व पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केले नसते तर 'रावबहादूर डॉ.पी.सी. पाटील'च नव्हे तर जनरल एस.पी.पी. थोरातही देशाला मिळाले नसते. अशा ऐतिहासिक व सामाजिक घटनांची कारणपरंपरा इतिहास आपणास सांगत असतो. इतिहासाची खरी फलश्रुती हीच आहे." " गेल्या शतकात कोल्हापूर संस्थानातील शेतकरी कुटुंबातील एक मुलगा हिंदी लष्करातील सर्वोच्च अधिकारपदावर जातो, ही काही आपोआप सहजगत्या घडून आलेली घटना नसून तिला एक ऐतिहासिक व सामाजिक कारणपरंपरा होती आणि त्या परंपरेचा उद्गम बिंदू होता कोल्हापूरचा लोकराजा रावर्षी शाहू छत्रपती. त्यांच्या राजाश्रयाने वडगावच्या चिमणाजी पाटलांचा मुलगा, पांडुरंग, हा उच्चविद्याविभूषित झाला आणि भारतातील थोर कृषितज्ज्ञ म्हणून रावब. डॉ.पी.सी.पाटील या नावाने प्रसिद्धी पावला! या रावबहादुरांचे चिरंजीव शंकरराव म्हणजे प्रस्तुत चरित्र नायक ले.ज.एस.पी.पी.थोरात. हे सर्व इथं आठवले एवढ्यासाठी की सन १८९९ मध्ये शाहू छत्रपतींनी पांडुरंग पाटील नावाचा मुलगा मॅट्रिक पास झाल्याचे कळाल्यानंतर त्याच्या गावी खास घोडेस्वार पाठवून त्याला बोलावून घेतले नसते व पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केले नसते तर 'रावबहादूर डॉ.पी.सी. पाटील'च नव्हे तर जनरल एस.पी.पी. थोरातही देशाला मिळाले नसते. अशा ऐतिहासिक व सामाजिक घटनांची कारणपरंपरा इतिहास आपणास सांगत असतो. इतिहासाची खरी फलश्रुती हीच आहे."