-
Apghat Te Aavishkar (अपघात ते आविष्कार)
या पुस्तकामध्ये अशा ५० शोधांचा समावेश आहे जे शोध अपघाताने लागले आहेत. शास्त्रज्ञ दुसऱ्याच कुठल्यातरी वस्तूच्या किंवा रसायनाच्या शोधात असताना काहीतरी वेगळे घडले आणि हे शोध लागले. सुरुवातीला कदाचित प्रयोग फसल्यासारखे वाटले असले, तरीही नंतर याच शोधांनी मोठी क्रांती केली आणि जगाला मोठी दिशा दिली. कोणत्याही फसलेल्या प्रयोगामधून नवीन क्रांती घडण्यामागील मुख्य कारण होते त्या शास्त्रज्ञांची चिकाटी, सातत्य, चिकित्सक वृत्ती आणि समर्पण. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे याची लेखनशैली अतिशय सहज सोपी आहे आणि अतिशय मनोरंजक पद्धतीने हे शोध मांडले आहेत. या पुस्तकामुळे आपल्या सर्वांमध्ये दडलेल्या शास्त्रज्ञाला नक्कीच एक नवीन दृष्टी मिळेल आणि कदाचित आपल्यापैकीच कोणीतरी रोज घडणाऱ्या गोष्टींमधून जगाला नवीन दिशा देणारा एखादा शोध लावू शकेल. काही आविष्कार पेनिसिलीन, कॉर्नफ्लेक्स, आईसक्रीम कोन, काडेपेटीच्या काड्या, भूलशास्त्र, मायक्रोवेव्ह ओव्हन, कोका कोला, सुरक्षा काच, विद्युत चुंबक, स्टेनलेस स्टील, झेरॉक्स मशीन, सुपर ग्लू
-
Vithobha Missing In Pandhurpar (विठोबा मिसिंग इन पंढरपूर)
विनायक होगाडे हा आधुनिक जाणिवेतून परंपरेचा नवा अन्वयार्थ लावत आजचा खारवटलेला काळ पकडू पाहणारा तरुण लेखक आहे, याचा प्रत्यय ‘विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ या त्याच्या कादंबरीतून येत राहतो. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानला जाणारा विठ्ठल एके दिवशी अनपेक्षितपणे गायब होतो आणि सर्वत्र एकच गहजब उडतो, या भन्नाट कल्पनेचं बोट पकडून विनायक होगाडेने या फॅन्टसीसदृश कादंबरीची रचना केली आहे. काळाची सरमिसळ करत एकाच वेळी केलेले ऐतिहासिक आणि आधुनिक काळातील व्यक्तिरेखांचे कल्पक उपयोजन, तसेच ओघवत्या शैलीत सहजपणे येणारा विठ्ठल, पंढरपूर यांसह वारकरी संतांचा इतिहास, त्यांविषयी लोकमानसात रुजलेली मिथके, कहाण्या, ही या कादंबरीचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणता येईल. या अद्भुत कथनाच्या माध्यमातून त्याने मराठी समाज आणि संस्कृतीच्या लाजिरवाण्या भूतकाळाची आणि त्याचबरोबर सडत चाललेल्या वर्तमानाची सालपटं काढून आपल्यासमोर मांडली आहेत. हे जितकं धाडसाचं आहे, तितकंच ते समकालाची चिकित्सा करण्याच्या दृष्टीने आवश्यकही आहे. संत विचारांचा आजच्या काळाने केलेला पराभव, त्यातून जाणवणारे नैतिक मूल्यांचे स्खलन आणि संवेदना जिवंत असलेल्या एखाद्या विठोबाची यामुळे होणारी घुसमट, हे सगळे वाचकाला विलक्षण अस्वस्थ करते. आपल्या लेखकत्वाचे भान असलेल्या आणि संत परंपरेतून गवसलेल्या शब्दांचे व मूल्यांचे सामर्थ्य जाणून असलेल्या या लेखकाची ही कादंबरी मराठी कादंबरीच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, हे निश्चित. - प्रवीण दशरथ बांदेकर.
-
Andharyug Bhartatil British Rajvat (अंधारयुग भारतातील ब्रिटिश राजवट)
लोकप्रिय लेखक शशी थरूर यांनी या स्फोटक पुस्तकामध्ये ब्रिटिश राजवट भारताकरिता किती विनाशकारी होती हे तीक्ष्ण युक्तिवाद, अचूक संशोधन, आणि ते ज्याकरिता प्रसिद्ध आहेत ते बुद्धिचातुर्य यांच्या साहाय्याने उलगडून दाखवले आहे. देशातील साधनसंपत्ती ब्रिटनमध्ये नेण्यापासून ते भारतीय वस्त्रोद्योग, लोखंड उद्योग आणि जहाजबांधणी उद्योगाचा विनाश, आणि कृषी उद्योगातील नकारात्मक परिवर्तनापर्यंत, वसाहतकारांनी जितक्या विविध मार्गांनी भारताचे शोषण केले त्याची तपासणी करण्याबरोबरच, त्यांनी ब्रिटिश राजवट भारतासाठी कशी चांगली होती हे मांडणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या समर्थकांचे युक्तिवादही हाणून पाडले आहेत. ब्रिटिश राजवटीने भारताला लोकशाही आणि राजकीय स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य आणि रेल्वे या गोष्टी दिल्या आणि म्हणून ती भारतासाठी फायदेशीर होती, या मुद्द्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. जे थोडे खरोखरच फायदे म्हणता येतील इंग्रजी भाषा, चहा आणि क्रिकेट त्यांचा प्रत्यक्षात भारतीयांना फायदा होणे अभिप्रेतच नव्हते, तर ते मुख्यतः वसाहतकारांच्या हितासाठीच होते, हे सांगायला ते विसरत नाहीत. अत्यंत प्रभावीपणे केलेली मांडणी आणि उत्कटतेने केलेला युक्तिवाद यामुळे ‘अॅन एरा ऑफ डार्कनेस’ हे पुस्तक भारतीय इतिहासाच्या सर्वांत वादग्रस्त कालखंडापैकी एक असलेल्या ब्रिटिश कालखंडाबद्दलचे अनेक चुकीचे समज दूर करेल यात शंका नाही.
-
House Of Chhatrapati Shivaji (हाऊस ऑफ छत्रपती शिवाजी)
छत्रपती शिवाजी महाराज फक्त धार्मिक किंवा निव्वळ लुटारू अगर हल्लेखोरही नव्हते, कारण कोणताही धार्मिक, लुटारू किंवा हल्लेखोर एका सार्वभौम राज्याची स्थापना करू शकत नाही. हे फक्त एक मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकारणीच करू शकतो. त्यांनी केलेल्या लढाया आणि डावपेच यांचा परिणाम म्हणून त्यांनी सार्वभौम, स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना केली आणि ते स्वतः सार्वभौम राजा झाले- ते छत्रपती झाले. म्हणूनच प्राचीन ग्रीक लोक ज्याला ‘पुरुषांमधील राजा’ म्हणजे अलौकिक बुद्धिमत्तेची दैवी देणगी लाभलेला पुरुषोत्तम राजा म्हणत, तसे शिवाजी महाराज होते, याविषयी शंका घेण्यास मुळीच जागा नाही.
-
Mumbai : Ek Dantkatha (मुंबई : एक दंतकथा)
प्रदर्शनीयता आणि भग्नावशेष यांना सामावून घेणारी मुंबई, ही खऱ्या अर्थाने बहुसांस्कृतिक महानगरी आहे. भारताच्या कानाकोपऱ्यांतून आणि विविध देशांतून आलेले, वेगवेगळ्या वांशिक, भाषिक आणि धार्मिक पार्श्वभूमीचे लाखो लोक, त्यांच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा घेऊन या शहराच्या किनाऱ्यावर येऊन विसावले आहेत. ‘मुंबई : एक दंतकथा’ हे पुस्तक येथील रहिवाशांच्या, पत्रकारांच्या, नगररचनाकारांच्या, लेखकांच्या, कलाकारांच्या, चित्रपट-निर्मात्यांच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनांतून या दंतकथा बनलेल्या शहरातील पुराणकथेसमान भासणाऱ्या जीवनाचा शोध घेते.
-
Good Energy (गुड एनर्जी)
*वैद्यकशास्त्र आज केवढं प्रगत झालंय पण तरीदेखील आधुनिक मानव निरोगी नाही. असं का ? *पूर्वीचे लोक जितके आरोग्यसंपन्न असायचे तितके आत्ताचे लोक का नाहीत ? याचं कारण, सध्या जी औषधोपचार पद्धती वापरली जाते त्यामध्ये दुर्दैवाने आजाराच्या मूळ समस्येकडे लक्ष दिलं जात नाही. वरवरच्या लक्षणांवरच उपाय केला जातो. मुळात, कोणताही आजार पेशींमधील उपयुक्त ऊर्जा कमी होऊन उपद्रवी ऊर्जा वाढल्यामुळे होत असतो. या मूळ समस्येकडे लक्ष दिलं गेलं नाही, तिचं निराकरण केलं गेलं नाही तर आपलं आरोग्य सुधारणं अवघड आहे. यावर लेखिकेने सखोल संशोधन केले आहे. या आधुनिक आरोग्य समस्यांवरील उपाय त्यांनी शोधून काढला आणि तो पुस्तकरूपाने आपल्यासमोर मांडला आहे. त्यांनी पेशीविज्ञानाचा अभ्यास करून "गुड एनर्जी अर्थात उपयुक्त ऊर्जा"ची संकल्पना मांडली आहे. आपल्या पेशींचं कार्य सुधारलं, त्यातील बिघाड दुरुस्त झाला तर आपलं शरीर आणि मन दोन्हीही आरोग्यसंपन्न राहतं, ते कसं याबद्दल या पुस्तकात सांगितलं आहे. *गुड एनर्जी म्हणजे काय आणि ती कशी टिकवायची ? *मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, संधिवात.... अशा असंख्य आजारांची सखोल माहिती व त्यावरील उपाय *आरोग्य क्षेत्रातील अनेक व्यावसायिकांकडून (औषध कंपन्या, फुड प्रॉडक्टस् कंपन्या, डॉक्टर्स) होणारी दिशाभूल *स्वतःचे मेडिकल रिपोर्ट (लिपिड प्रोफाईल, शुगर रिपोर्ट वगैरे...) कसे समजून घ्यावेत. *गुड एनर्जी वाढवणारा आहार *झोप, जैविक घड्याळ आणि चयापचय यांच्यातील महत्त्वाचे दुवे *उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात सहज चालता-बोलता करता येण्याजोगे व्यायाम प्रकार
-
Karjamukta Vha! (कर्जमुक्त व्हा!)
कर्ज : संधी की संकट? तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहात का? कर्ज तुम्हाला तुमच्या स्वप्नांकडे नेत आहे की तणावाच्या गर्तेत ढकलत आहे? जर हे प्रश्न तुम्हाला सतावत असतील, तर ‘कर्जमुक्त व्हा!’ हे पुस्तक तुमच्यासाठी आहे! या पुस्तकात कर्ज लवकर फेडून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे सुलभ, व्यावहारिक आणि परिणामकारक मार्ग सहज भाषेत आणि प्रेरणादायी उदाहरणांसह दिले आहेत. कर्ज स्वतः वाईट नसते — त्याचा उद्देश, वापर आणि नियोजनच ठरवते की ते तुम्हाला प्रगतीकडे नेईल की पतनाकडे! आजच ‘कर्जमुक्त व्हा!’ वाचा आणि कर्जाच्या जाळ्यातून मुक्त होऊन तुमच्या आर्थिक भविष्याला नवा आकार द्या. संपत्ती निर्माण करा, आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका! समाधानाने भरलेले चिंतामुक्त जीवन जगा!
-
Lords Of Earth And Sea (लॉर्डस ऑफ द अर्थ ॲण्ड सी)
चोळांचं महान साम्राज्य अनपेक्षितरीत्या निर्माण झालेलं होतं. कावेरीच्या गाळाच्या मैदानात इ.स. सुमारे ८५०च्या आसपास अचानक त्याची उत्पत्ती झाली, तोपर्यंत शतकानुशतकं या प्रदेशात स्वयंशासित ग्रामपंचायतीच होत्या. इथूनच चोळांनी एक विशाल साम्राज्य स्थापन केलं. दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या प्रदेशातील साम्राज्य हे भारतीय उपखंडातील सर्वांत प्रवळ सत्ता बनण्याची ही पहिली आणि एकमेव वेळ होती; हे स्थान तोवर सहसा दख्खन किंवा उत्तर भारतातील साम्राज्यांनीच राखलेलं होतं, चोळ राजे जितके सृजनशील आणि कल्पनाशील होते तितकेच ते अनपेक्षित कृती करणारेही होते. त्यांनी इजिप्तच्या पिरॅमिडखालोखाल पृथ्वीवरील सर्वात उंच, स्वतंत्रपणे उभी असलेली भव्य मंदिर बांधली. चोळ राण्यांनी नटराजासारखे देव, आणि देवासमोर तमिळ कवितांचे गायन असे उपासनेचे नवीन प्रकार लोकप्रिय केले. त्याचबरोचर, चोळ हे आश्चर्यकारकपणे धाडसी होते. त्यांनी केवळ शक्तिशाली दख्खन आणि उत्तर भारतावरच नव्हे; तर आग्नेय आशिया आणि श्रीलंकेवरही हल्ले केले. हे राजघराणं इतके प्रभावशाली आणि आज इतकं लोकप्रिय असूनही त्याची खरी ऐतिहासिक कामगिरी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत विसरली गेली हेही एक आश्चर्यच कारण त्या सगळ्या गोष्टी मिथक आणि दंतकथेत विरून गेल्या. या पुस्तकात पुरस्कार विजेते इतिहासकार अनिरुद्ध कनिसेट्टी चोळांच्या या जगाला जिवंत करतात. केवळ राजे आणि राण्या, सेनापती आणि ‘सेवा लवाजम्या तल्या खिया यांच्याविषयी लेखक आपल्याला सांगत नाही, तर सर्वसामान्य म्हणजे लहान लोकांच्या कथादेखील सांगतात, ज्यांची आयुष्यं मोठमोठ्या घटनांमुळे हेलकावे खायची तर कधी उध्वस्त व्हायची. तमिळ किनाऱ्यावरून आग्नेय आशिया आणि चीनकडे जाणाऱ्या व्यापारी जहाजांवरचं जीवन कसं असायचं? मंदिरांमध्ये भक्तांना आणि युद्धाच्या वेळी सैनिकांना कोणत्या प्रकारचं जेवण दिलं जायचं? रागाच्या भरात आपल्या भावाची हत्या करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्याचं पुढे काय झालं? एक श्रीमंत घराण्यातली खी डोक्यावर लिंबू ठेवून सती का गेली? हजारो शिलालेख आणि शेकडो दुय्यम स्त्रोतांवर आधारित, सखोल संशोधन केलेलं हे पुस्तका केवळ राजे आणि राण्यांच्या चमकदार कथा आपल्याला सांगत नाही, तर ते आपल्याला हजारेक वर्षांपूर्वीच्या शेतकरी वस्त्यांमध्ये घेऊन जाणाऱ्या प्रवेशद्वाराचंही काम करतं. या पुस्तकात कनिमेट्टी तथ्य आणि काल्पनिक गोष्टी यांना वेगळं करण्याचं महत्त्वाचं काम करतात, आणि आपल्याला मानवी इतिहासातील एक असामान्य अशी कहाणी सांगतात.
-
Tine Gilile Suryashi (तिने गिळिले सूर्याशी)
लक्ष्मी मुडेश्वर-पुरी लिखित ‘तिने गिळिले सूर्याशी’ ही कादंबरी म्हणजे प्रीती, शौर्य आणि भारतीय स्वातंत्र्यलढा यांचा तीन पिढ्यांतील स्त्रियांच्या विशेषतः धाडसी व संस्मरणीय तरुण नायिका मालतीच्या नजरेतून घेतलेला अद्भुत शोध आहे. ही कादंबरी आधुनिक भारतीय इतिहासाच्या कोलाहलपूर्ण काळातील उत्साहवर्धक आणि निराशाजनक स्पंदनांचा वेध घेते. निर्भयता आणि अटळ निर्धार या गुणांच्या जोरावर मालती तत्कालीन समाजात प्रचलित असलेल्या, स्त्रियांना जखडून ठेवणाऱ्या, पितृसत्ताक चालीरीतींना झुगारून तिला दडपून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रखर विरोध करते उत्कृष्टपणे सांगितलेली, कल्पनारम्य व लक्षवेधी असणारी ‘तिने गिळिले सूर्याशी’ ही कादंबरी अस्सल व रोमांचक आहे. खेरीज मागील काही वर्षात पदार्पणातच अत्यंत संस्मरणीय ठरलेल्या कादंबऱ्यापैकी ती एक आहे.
-
Ek Pay Jaminivar (एक पाय जमिनीवर)
लेखिकेनं आपली जीवनकहाणी स्वत:च्या ‘शरीराच्या’ लोलकामधून पृथक करून सांगितली आहे. म्हणून तर पुस्तकाचं उपशीर्षक - 'अ लाईफ टोल्ड थ्रू द बॉडी' असं आहे. या जीवन कहाणीमध्ये लेखिकेचं ‘शारीर भान’ हा मुख्य कथेकरी आहे. लेखिका असं मानते की माणूस त्याच्या शरीराच्या माध्यमातून अस्तित्वात असतो. हे माध्यम त्याला नाकारताही येत नाही आणि बदलताही येत नाही. शरीर हे अंतिम जड सत्य आहे. विविध प्रसंगांमधून शरीर आपलं व्यवधान त्याच्याकडे खेचून घेतं. माणूस आपल्या विचारांमध्ये, मतांमध्ये, श्रद्धांमध्ये फेरफार करू शकतो, पण वैद्यकशास्त्राच्या मदतीनं शरीरात वरकरणी कितीही फेरफार केले, तरी आतून ते रोगप्रवण राहतंच. आपल्या मनानं, बुध्दीनं कितीही भराऱ्या घेतल्या, तरी अंतिमत: आपली उडी किती उंच जाणार हे काही अंशी तरी आपलं शरीरच ठरवतं. म्हणूनच, वयाच्या ७८व्या वर्षी लेखिका आतापर्यंत जगलेलं आयुष्य तळहातावर ठेवलेल्या आवळ्यासारखं सर्व बाजूंनी निरखत त्यातील कोणत्या वाटा शरीरानं आखून दिल्यामुळे तुडवाव्या लागल्या यांचा तटस्थपणे मागोवा घेते. - करुणा गोखले
-
Dhulakshare Te Shalyakaushalya (धुळाक्षरे ते शल्यकौशल्य)
त्याच्याजवळ ना पैसा होता, ना कुणाचे पाठबळ. हातावरचे पोट असलेले आईवडील अन् गरिबीच्या उन्हात उभे राहिलेले घर. पण तो फक्त नावापुरता ‘ज्ञानेश्वर' नव्हता. आपल्या बुद्धिमत्तेला त्याने चिकाटीची धार चढवली. विलक्षण जिद्द अन् अभ्यासाच्या सातत्यातून तो प्रख्यात शल्यविशारद झाला. हा अवघड वळणाचा प्रवास सांगणारी एका समर्पित सर्जनची संघर्षकहाणी...
-
Done That Been There (डन दॅट बीन देअर)
हे भुयार आहे की विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का ? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का लिहिणं वगैरे ? लिहिणाऱ्या समोर ठाकणारे असे अनेक प्रश्न.. ज्यांची उत्तरं लिहिणाऱ्याला लिहिता लिहिताच उमगत जातात. दुसरे आपल्याला समजतात, तितके मूर्ख आपण खचितच नसतो. पण आपण स्वतःला समजतो, तितके शहाणेही आपण क्वचितच असतो ! लिहिताना आणि लिहिल्यावर काय काय झालं, यातली तथ्यं मी मांडताना हे शक्य आहे, की 'या तथ्यांच्या जबड्यातून निसटून, सत्य कदाचित् दूर कुठेतरी एकटंच बागडत असेल!'
-
Godan (गोदान)
'गोदान' हे हिंदी गद्यातील एक महाकाव्य आहे. हे मुन्शी प्रेमचंद यांचे सर्वात प्रसिद्ध काम आहे. 'गोदान' हे लेखकाच्या हयातीत भारतीय शेतकऱ्यांच्या स्थितीचे स्पष्ट चित्रण करते. ग्रामीण लोकांच्या समस्या अजूनही अस्तित्वात असल्याने ही कादंबरी आजही प्रासंगिक आहे. शेतकऱ्यांचे सामान्यतः सावकार, सरकारी अधिकारी आणि अंधश्रद्धाळू समुदायातील सदस्यांकडून शोषण केले जाते. एक श्रीमंत शेतकरी, होरी, या शोषकांवर अवलंबून राहिल्यामुळे तो त्रास सहन करतो. तो खूप कष्ट करतो, विविध पिके घेतो, तरीही त्याच्या कुटुंबासह उपाशी राहतो कारण त्याची जवळजवळ सर्व पिके कर्जदारांच्या देणी फेडण्यासाठी दिली जातात. त्याच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याचे त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात कारण त्याचे सतत शोषण होत होते.
-
Akhand Sherlock Holmes -Nishabd Part-5 (अखंड शेरलोक होम्स नि:शब्द भाग -५)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Akhand Sherlock Holmes -Adhure Tari Atut Part -4 (अखंड शेरलोक होम्स अधुरे तरी अतूट भाग -४)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Akhand Sherlock Holmes- Shubhasanket Part -3 (अखंड शेरलोक होम्स शुभसंकेत भाग -३)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Akhand Sherlock Holmes-Tarkashaktiche Ayudh Part -2 (अखंड शेरलोक होम्स - तर्कशक्तीचे आयुध भाग- २)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Akhand Sherlock Holmes-Ek Avaliya Part-1 (अखंड शेरलोक होम्स-एक अवलिया भाग -१)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Aabhalache Tukade (आभाळाचे तुकडे)
या विस्तीर्ण आभाळखालचा माणूस इथून तिथून जरी एकच असला तरी या आभाळाखालील निसर्ग, पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती यातून त्यानं आपलं जगणं कसं समृद्ध केलं, विकसित केलं किंवा बरबाद केलं. या सगळ्याचा धांडोळा म्हणजे जगण्याचा प्रवास ! या प्रवासात कळत नकळत आजूबाजूच्या वातावरणाचे, घटनांचे, मानवी जीवन, नातेसंबंध, नियतीचे खेळ, कला, साहित्य, विनोद किंवा राजकारण या सर्वांचे ठसे मनावर उमटत राहतात. त्यातूनच जे मनात खोलवर मुरलेलं असतं ते या ना त्या निमित्ताने शब्दांत उमटतं. प्रख्यात कादंबरी लेखक, नाटककार, अभिनेता आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या अशाच काही ललित लेखांचा संग्रह...
-
Trio (ट्रायो)
भीती ही गोष्ट माणसाच्या जन्माबरोबरच त्याच्या आयुष्याला चिकटून आलेली आहे. भीतीपेक्षा मृत्यू बरा असे म्हटले जाते; कारण मृत्यू एकदाच तुमचे प्राण हरण करतो, पण भीती पदोपदी तुम्हाला मरणाच्या दारात उभी करत असते. अशा विषयांशी निगडित कथा लिहिणाऱ्या कथाकाराकडे वेगळे कौशल्य असावे लागते ते वातावरणनिर्मितीचे. त्यात राजीव तांबे यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कथांमध्ये ते आरंभापासून असा काही माहोल निर्माण करतात की वाचक त्या भीतीच्या डोहाच्या काठापर्यंत कधी येऊन पोहोचतो ते त्यालाच समजत नाही. सकस कथाबीजातून अज्ञाताच्या त्या विश्वामध्ये ते वाचकांना घेऊन जातात. मग गूढतेचे एकेक पापुद्रे उलगडायला लागतात. इथे वाचकांवरची कथाकाराची पकड थोडी जरी ढिली झाली तरी अपेक्षित परिणाम साधता येत नाही. 'ट्रायो' या कथासंग्रहातील सर्व कथा वाचल्यानंतर राजीव तांबे या कथांमध्ये वाचकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत याची साक्ष पटते.
-
Detective Alpha Aani Blue Moor Che Rahasya (डिटेक्टिव अल्फा आणि ब्लू मूरचे रहस्य)
भारतीय गुप्तचर संघटनेच्या हेडक्वार्टरमधून अत्यंत गोपनीय कागदपत्रांची चोरी झाली आहे. ती कागदपत्रे चोरणारा 'रॉ'चाच एक गद्दार एजंट मनीषकुमार बेदी हा इंग्लंडमध्ये जाऊन धडकतो. बेदीला 'रॉ'चे इतर एजंट्स ठाऊक असल्याने त्याला पकडण्यासाठी 'रॉ'ला हवाय कोणीतरी त्रयस्थ गुप्तहेर आणि पहिलं नाव समोर येतं अल्फाचं ! अल्फा इंग्लंडमध्ये पोचतो आणि तिथे केंब्रिज विद्यापीठात संशोधन करणाऱ्या त्याच्या प्रिय मित्राला प्रभवला सोबत घेतो. आणि मग सुरू होतं अॅडव्हेंचर ! अल्फा आणि प्रभव बेदीपर्यंत पोचतात, पण त्याच्या खोलीत तो मरून पडलेला आढळतो. त्याने चोरलेली कागदपत्रे गायब आहेत आणि त्याच्या मोबाइलवर एक गूढ मेसेज टाइप केलेला आहे 'फाईंड ब्लू मूर'! बेदीकडची कागदपत्रे कोणी चोरली? शत्रू राष्ट्रांच्या हातात पडण्याआधी अल्फा ती कशी मिळवणार? आणि बेदीने पाठवलेल्या गूढ मेसेजचा अर्थ काय आहे ?