-
1948 ch Agnitandav (१९४८ चं अग्नितांडव)
कित्येक गावांतून ब्राह्मणांची घरं जाळली, त्यांना एका रात्रीत देशोधडीला लावलं असं असलं तरी...काही गावांमध्ये लोकांनी ब्राह्मणांना मदतीचा हात पुढं केला. त्यांचे जीव, त्यांचे संसार वाचवले. जातीजातींमधल्या भांडणांनी आपण आपलं आणि आपल्या देशाचं किती मोठं नुकसान करतो याची जाणीव ठेवून सामान्य माणसाने जगलं पाहिजे, हे अधोरेखित करणारं... १९४८चं अग्नितांडव...!
-
Yogache Vishwa-Vishwatla Yog (योगाचे विश्व- विश्वातला योग)
२१जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हायला लागून दहा वर्षे झाली. प्राचीन भारतीय ज्ञान, परंपरा , सौम्य संपदा म्हणून योग जगमान्य होत आहे. त्याचबरोबर काही आव्हाने सुद्धा आहेत. आज जगातला योग कसा आहे व योगाचे जग कसे असायला हवे याबद्दलचा महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक. योग हा व्यवसाय म्हणून बाजारपेठेच्या आधीन होणे ,अशा आव्हानांची चर्चा सुद्धा हे पुस्तक करते.. भारतासमोर उभ्या असलेल्या योग अपहरणाच्या धोक्याची स्पष्ट जाणीव सुद्धा या पुस्तकातून होते . वैश्विकरणाच्या युगात योगाचा आर्थिक, सांस्कृतिक , मुत्सद्देगिरी व सौम्य संपदा म्हणून वेध घेणारे मराठी मधले किंबहुना भारतातले हे पहिलेच पुस्तक आहे. म्हणून याचे विशेष महत्त्व. नक्की आपल्या संग्रही ठेवावे, वाचावे इतरांनाही वाचण्यासाठी प्रवृत्त करावे असे हे पुस्तक
-
Kanya Zali Ho (कन्या झाली हो)
भारतीय समाजाने स्त्रियांवर हजारो वर्षे अनन्वित अत्याचार केले. याविरूद्ध राजाराम मोहनरॉय, महात्मा फुले वगैरेंनी आवाज उठवला आणि स्त्रियांच्या प्रगतीचा मार्ग हळूहळू मोकळा होत गेला. मात्र विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात असं लक्षात आलं की स्त्रियांवर अन्याय फक्त भारतातच होतात असं नाही, युरोप/अमेरिकासारखे प्रगत देशसुद्धा याला अपवाद नाहीत. ही वस्तुस्थिती लक्षात घेत संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५-१९८५ हे 'स्त्रीमुक्तीचे दशक' म्हणून घोषित केले. यामुळे स्त्रीमुक्तीला जागतिक आयाम प्राप्त झाला. याचे जगभर परिणाम झाले तसेच पडसाद उमटले. असेच पडसाद मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या, एका विवाहित, मध्यमवयीन, लेकुरवाळ्या, ब्राह्मणेतर, प्राथमिक शाळेत शिकवत असलेल्या स्त्रीच्या जीवनात उमटले. स्त्रीमुक्तीच्या या जागतिक वाऱ्यांनी तिच्या आयुष्याची दिशाच बदलली. त्याची ही कहाणी.
-
Bharat Pakistan yudha -1965(भारत पाकिस्तान युद्ध -१९६५ )
1965 साली झालेलं भारत पाकिस्तान युद्ध इस्लामिक स्टेट ऑफ पाकिस्तानने भारतीयांवर लागलेल्या अनेक युद्धांपैकी एक युद्ध होतं. या युद्धात आपल्या सेना दलाने अत्यंत पराक्रम आणि सर्वोच्च बलिदान करून लष्करी विजय मिळवला. भारतीयांचं मनोबलही काही पटीने उंचावण्यास हातभार लागला हे त्रिवार सत्य आहे. त्यावेळी पंतप्रधान असलेल्या आदरणीय लाल बहादूर शास्त्रीजी आणि संरक्षण मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी पाकिस्तानी इस्लामिक स्टेट च्या सशस्त्र आक्रमणाला सशस्त्र प्रतिकाराने उत्तर देण्याचा निर्णय घेतला हेही उत्तमच झाले. त्याच 1965 च्या युद्धाची तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. सर्वांच्या संग्रही असावे असे हे ५७६ पानी पुस्तक.
-
Jungle Lor Aani Tree Tops (जंगल लोर आणि ट्री टॉप्स)
आता माझ्यापासून वीस यार्डांवर एक वाघ उभा होता. त्याच्या त्या सुंदर, चमकदार त्वचेवर हिवाळ्यातलं ऊन पडून ती आणखी चमकत होती. असं छायाचित्र मिळवण्यासाठी मी एरवी कुठेही गेलो असतो आणि काहीही दिलं असतं. मी अनेकदा तासन्तास किंवा दिवसच्या दिवस वाघाच्या मागावर राहिलो आहे आणि तो दिसल्यावर रायफल उंचावून, काळजीपूर्वक नेम धरून ती तशीच खाली घेतली आहे. नंतर त्या वाघाचं लक्ष वेधून घेऊन, डोक्यावरची टोपी उचलून त्याला अभिवादन केलं आहे. मला त्याला पाहण्याचा मिळालेला आनंद मी या पद्धतीने व्यक्त केला आहे. रूढार्थाने ‘शिकारी’ असणार्या या माणसाचा प्रवास म्हणूनच शूटिंगपासून शूटिंगपर्यंत (शिकारीपासून चित्रीकरणापर्यंत) पोहोचल्याचं लक्षात येतं. शिकार करण्याने त्याला सावध, अभ्यासू आणि चिकित्सक केलं असलं, तरी हे सजगपण त्याला केवळ निसर्गाचा उपभोग घ्यायला शिकवत नाही... उलट ही त्याच्या निसर्गात विरघळत जाण्यासाठीची नांदी ठरते.