-
Don Chak Jhapatleli (दोन चाकं झपाटलेली)
२००० सालापुर्वीचा - 'इंटरनेट, सेलफोन' जमान्यापुर्वीचा काळ असला म्हणून काय झालं ? आमची 'दोन चाकं' जेव्हा गरुडभरारीची झाली तेव्हा देशोदेशींचे रस्ते जणू आकाशासारखे मुक्त झाले. 'आयफेल टॉवर','नायगारा', 'ऑक्सफर्ड प्युनिव्हर्सिटी' तर हॉटेलांत मुक्काम करणारे सारेच पर्यटक पाहतात.आअम्च मुक्काम तंबू ठोकून वा युथ होस्टेल्समध्ये वा मोटेल्समध्ये झाला. देशोदेशींची पर्यटकप्रिय स्थळं, निसर्गनिर्मित नि मानवनिर्मित चमत्कार आम्ही पहिलेच. पण त्याहीपलीकडे…१८६७ साली बनलेली आदिम सायकल, शतकापूर्वी मातीत सोन्याचा अंश सापडल्याने जी 'सुवर्णभूमी ' झाली होती,तिची सुवर्णांश ओसरल्यानंतर झालेली ओसाड 'भूतनगरी';'न्यूडबीच' वरचं नग्नविश्व; नाशबाजांच्या सुयांच्या खचांमुळे,झाडाफुलांच्या उद्यानाचं झालेलं 'निडल पार्क';आदी अनवट चीजा त्या ३२० दिवसांच्या भ्रमंतीत आम्हाला पाहता आल्या. हॉलंडमधल्या गुरुद्वारात खलिस्तानी पासपोर्ट -व्हिसा नि खलिस्तानी चलनाच्या प्रतिकृती पाहताना आम्ही क्षोभग्रस्त, शोकग्रस्त झालो. जगातले २४ देश सायकलींवरून फिरताना; भिन्नभिन्न संस्कृती, भाषांचे अडसर आणि परदेशस्थ भारतीयांची स्वदेशओढीमुळे होणारी अखंड काळीजकुरतड आम्हाला अनुभवता आली. 'सायकल वापर : प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी' हा जिवंत संदेश,शब्दांशिवाय कृतीने नि भारत देशाच्या वतीने देत फिरताना आमचे देशोदेशी सत्कार झाले. पण त्याहून महत्वाचं हे होतं,की-५ते +४८ अंश सेल्सिअस अशा भयकारी तापमानातून, क्रूर वादळवाऱ्यातून दिवसातले कित्येक तास सलगपणे सायकल चालवताना आम्हाला आमच्या क्षमता तपासून पाहता आल्या. मोहिमेच्या आखणीतल्या आव्हानाने आणि त्या ३२० दिवसांच्या आंतरराष्ट्रीय सायकलसफारीने आम्हाला हयातभराची समृद्धी दिली.
-
Dagalbaj Shivaji (दगलबाज शिवाजी)
अर्जुन 'बगलबाज' होता. कर्तव्याला बगल मारून पळत होता. पण शिवाजी तसा नव्हता. तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पडणारा 'दगलबाज' होता.'दगलबाज' आणि दगाबाज यातील भेदच लोकांना समजत नाही. 'दगलबाज' म्हणजे 'डिप्लोमॅट'. दगाबाज म्हणजे 'ट्रेचरस'.इरसाल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो. कळले?....('माझी जीवनगाथा' तून) बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजीय तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समरभूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझुलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो. काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून, विहित कर्तव्याला बगल मारून पळू पाहणारा बगलबाज अर्जुन पहा आणि भेटीचे ढोंग करून दगा देण्यास आलेल्या दगलबाज अफझुलखानाला त्याच्याच युक्तीने गारद करणारा कर्तव्यतत्पर सवाई दगलबाज शिवाजी पहा. म्हणजे कर्तव्याकर्तव्याचे कोडे थोडे तरी सुटेल. ('दगलबाज शिवाजी' तून)
-
Agresar (अग्रेसर)
अग्रेसर म्हणजे भाऊ पाध्ये यांनी काढलेला साठोत्तरी मुंबईची आंतरिक संरचना दाखवणारा विलक्षण एक्सरे आहे. बकाल चाळींपासून उच्चभ्रू वर्तुळांपर्यंतची सांस्कृतिक वस्तुस्थिती तिच्यातील गुंतागुंतीच्या पेचांसह भाऊ पाध्ये यांनी मार्मिकपणे टिपली आहे. वैजू हे या कादंबरीतील प्रमुख पात्र आहे. तिने स्वतः च्या आयुष्याचे केलेले कथन, वाचकाच्या आकलनाशी तिने मांडलेला लपंडाव, तिच्या संभाषिताचा अस्सलपणा या सर्व गोष्टी मराठी कादंबरीच्या इतिहासात वैशिष्ट्यपूर्ण ठराव्यात अशा आहेत. दांभिकता, संधीसाधूपणा, स्वतः ची व इतरांची केलेली फसवणूक, होरपळ, आकांत, वस्तुनिष्ठा, व्यवहारीपणा अशा अनेक छटांसह समोर येणारी अग्रेसर वैजू मराठी कादंबरीमधील एक अपवादात्मक पात्र आहे.
-
Chirantanacha Gandha (चिरंतनाचा गंध)
'सोलेदाद' आणि 'आतंक' या दोन संग्रहांनंतरचा 'चिरंतनाचा गंध' हा विलास सारंग यांचा मराठीतील तिसरा कथासंग्रह. वर्तमानातील एकाकीपणा, आत्मदुरावा, असंगतता, व्यक्तीच्या मनातील अनाकलनीय काळोख, या सर्व गोष्टींचा वेध घेणारी सारंगांची कथा 'चिरंतनाचा गंध' मध्ये समूहापर्यंत पोहोचली आहे. अगोदरच्या खास आधुनिकवादी आशयसूत्रांमधील ताणतणाव या संग्रहातील कथांनी टिकवून ठेवले आहेतच; त्यांच्या बरोबरीने सारंगांच्या कथेमध्ये आता भूतकाळाला आणि सांस्कृतिक अर्थनिर्णयनाला कळीचे महत्व येऊ लागले आहे. 'चिरंतनाचा गंध' मधील कथांमध्ये आदिम मिथ्यकथा आणि वर्तमान परिस्थिती यांचे अद्भुत मिश्रण आहे. अस्तित्वाच्या कडेलोटापर्यंत येऊन पोहोचलेल्या नैतिकतेचा कस पाहणाऱ्या घटना आहेत. वास्तवापासून अतिवास्तवापर्यंतचे भव्य परिप्रेक्ष्य आहे. या सर्व घटकांना वेधून असणारी सारंगांची विलक्षण तीव्र, अंतर्भेदी अशी कल्पनाशक्तीही आहे. 'चिरंतनाचा गंध' यामुळेच लक्षणीय ठरतो. मराठी कथेला वेगळी परिमाणे देण्याची क्षमता या कथांमधून खात्रीने प्रत्ययाला येते.
-
Karanta (करंटा)
स्वातंत्र्योत्तर कालखंडामधील अनेक स्तरांवरील नैतिक अधः पतनाची कथा भाऊ पाध्ये यांच्या करंटा या कादंबरीतून साकार होते. या कादंबरीमधून मुंबईसारख्या औद्योगिक शहरातील कामगार युनियनचे जग त्याला असलेल्या अनेक परीमानांसह उभे राहते. स्वार्थाचा स्पर्श न झालेला कार्यकर्ता आझादचाचा, परवड झालेले त्याचे कौटुंबिक आयुष्य, मूल्यनिष्ठ माणसांची ससेहोलपट करणारे युनियनमधील राजकारण, या साऱ्याला असलेले आर्थिक संदर्भ या सर्व गोष्टींचा लेखाजोखा भाऊ पाध्ये अत्यंत तटस्थपणे मांडतात. कामगार चळवळीचे आतून चित्रण करताना त्यांची मानुस्पनावरची नजर किंचीतशीही हटत नाही. -हरिश्चंद्र थोरात
-
Char Bhinti Ek Chappar (चार भिंती एक छप्पर)
प्रदीर्घ संसारिक जीवनातील कडू-गोड अनुभवांचा चिंतनगर्भ अविष्कार.
-
Harit Vasaicha Ladha (हरित वसईचा लढा)
वेगवेगळ्या राजवटी पाहिलेली वसई आणि परिसर हा मुंबईलगतचा निसर्गरम्य प्रदेश. त्याचं हे निसर्गसौंदर्य अबाधित राखण्याचं भान परकीयांनीही ठेवलं. त्याला 'हरित संरक्षित भाग' असा दर्जा दिला. तो प्रदेश तीस वर्षांपूर्वी धनदांडगे, बिल्डर आणि सरकारी धोरणांच्या वक्रदृष्टीत सापडला. पैसा आणि दहशतीच्या जोरावर इथली हिरवी शेतं बांधकामांच्या वाळवीनं गिळंकृत व्हायला लागली. भ्रष्टाचारामुळे प्रदेशाला अवकळा येऊ लागली. या निसर्गरम्य परीसराचं अस्तित्व टिकविण्यासाठी उभी राहिली हरित वनराई संरक्षण समिती' फादर फ्रान्सिस दिब्रिटोंसारख्या धर्मगुरूंपासून सर्व थरांतील लहान-थोरांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या लढ्याला विजय तेंडूलकर, माधव गडकरी, कुसुमाग्रज, मेधा पाटकर, ज्युलिओ रिबेरो, उल्हास जोशी अशा अनेक दिग्गजांचा पाठींबा मिळाला. या संघर्षातील एक अग्रणी मार्कुस डाबरे यांनी मांडलेली ही संघर्षकहाणी.
-
Nrutyasaudamini Damyanti Joshi(नृत्यसौदामिनी दमयंत
ज्या काळात पार्वतीकुमार, गोपीकृष्ण, रोशनकुमारी यांच्यासारखी नर्तक मंडळी सिनेमाकडे वळली त्या काळात दमयंती जोशी यांनी कथक नृत्यसाधनेची विशुद्ध कास धरली आणि त्यामध्ये नवनवीन प्रयोग सिद्ध केले. दमयंती जोशी यांनी कथक नृत्यप्रकारास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली, तर भरतनाट्यम हा नृत्यप्रकार दक्षिणेतून मुंबईत येऊन रुजण्यास त्या कारणीभूत झाल्या. बालपणापासून नृत्याचीच ओढ असलेल्या दमयंती जोशी यांचे कलाजीवन कृतार्थ ठरले तरी व्यक्तिगत जीवन मात्र अशांत राहिले...
-
Pahila Bhartiya Vaimanik (पहिला भारतीय वैमानिक)
दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन - पहिले भारतीय वैमानिक. पहिल्या महायुद्धात ब्रिटिश हवाई दलातून लढताना त्यांनी वैमानिक म्हणून मानाचे स्थान मिळवले. रत्नागिरीच्या या तरुणाचे आयुष्यच भन्नाट! त्याने प्रत्येक साहसात उडी घेतली व तो जिंकत गेला. त्याने आपल्या लष्करी प्रशिक्षणाचा लाभ स्वातंत्र्यचळवळीतील भारतीय तरुणांना करून दिला. त्याची चरित्रकथा सांगता सांगता लेखकद्वय ह्या पुस्तकात उभा करतात तो त्या विशिष्ठ संदर्भातील कालपट...