-
Dhyas Ani Pravas (ध्यास आणि प्रवास)
सुलभा वर्दे १९६२ साली मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये मेडिकल सोशल वर्कर म्हणून रुजू झाल्या. विविध प्रकारच्या रुग्णांची काळजी वाहताना तिथल्या अतिविकलांग रुग्णांची दारुण अवस्था त्यांच्या मनाचा ठाव घेत होती. जगण्याची आस हरवलेल्या या रुग्णांमध्ये आत्मनिर्भरतेतून आत्मविश्वासाची ऊर्जा निर्माण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यातूनच सुरु झाला पॅराप्लेजिक फौंडेशनचा प्रवास.
-
Safiya Begum (साफिया बेगम)
एका ओळीत एक शब्द; त्या शब्दांतून आणि न लिहिलेल्या शब्दांतून काव्यसंग्रह फुलत जाते. चार आवर्तनांतून विलक्षण शब्दसाम्राज्य निर्माण करणारा अरुण शेवते यांचा हा अंतर्मुख करणारा काव्यसंग्रह.
-
Aabhal Majha (आभाळ माझं)
भाषावार प्रांतरचना झालीच; पण स्त्रीचं प्रांतवार जोखडही किती घट्ट होत गेलं याच्या अनुभवाच्या या कथा. यात आहेत मराठी-कानडी संयुक्त संस्कृती जगताना सहवासातून, भेटलेल्या मित्रमैत्रिणींतून, नात्यागोत्यातून निकट आलेल्यांची सुखदु:खं आणि अनुभवलेले प्रसंग...
-
Changlya Chalicha Manus
भारतीय चित्रपटाच्या सुवर्णकाळात दत्ता कोरेगावकर यांचे नाव संगीतकार म्हणून अग्रणी होते. विद्यार्थी असल्यापासूनच त्यांना संगीताची गोडी लागली. वेगवेगळी गीते, श्लोक, यांना चाली लावण्याचा छंद त्यांना जडला. त्यातूनच त्यांच्यातील संगीतकार घडत गेला. १९३८ पासून त्यांची कारकीर्द सुरु झाली. बारा मराठी चित्रपट व १८ हिंदी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे चित्रपट कमी असले तरी त्यांच्या संगीताचा दर्जा अत्यंत श्रेष्ठ होता; पण तरी त्यांच्या वाट्याला काहीशी उपेक्षा आली. लोकांसमोर त्यांचे नाव, सांगीतिक कार्य गिरिजा कीर यांनी 'चांगल्या चालीचा माणूस' मधून आणले आहे. त्यातून एका श्रेष्ठ संगीतकाराचा जीवनप्रवास आपल्या समोर येतो..
-
Parajay Navhe Vijay (पराजय नव्हे विजय)
स्वतःचे जीवन अत्यंत कष्टाचे गेले. पुढे सांसारिक जीवनातही मुलाचा मृत्यू पाहावा लागला. मात्र हे दुःख विसरून अनाथ मुलांचा सांभाळ करून त्यांना प्रेमाची सावली दिली विजय फळणीकर यांनी. चित्रपटात शोभेल अशी थरारक; पण खरीखुरी जीवन काहाणी फळणीकर यांनी 'पराजय नव्हे विजय' या आत्मचरित्रात सांगितली आहे. अनाथ, निराधार मुलांसाठी त्यांनी 'आपलं घर' वसविले. यात मुलांना सर्व सोई पुरविल्या जातात. चांगले शिक्षण दिले जाते. माणूस म्हणून आवश्यक मूल्य त्यांच्यात रुजविली जातात. स्वतःचे दुःख विसरून माणुसकीवर विश्वास ठेवून फळणीकर पतीपत्नीने स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले. आता वृद्धांचा सांभाळही ते आपुलकीने करतात. त्यांच्या या चरित्रकथेतून सामन्य माणूस काय करू शकतो याचे उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.
-
Dhund Swachand (धुंद स्वच्छंद)
गिरीभ्रमण छ्न्दातील आनंद आणि त्याचे पैलू व कंगोरे टिपणारा अनोखा ललित लेखसंग्रह
-
Mazya Kaljachi Gosht -Nisargopcharachi Kimaya Ek S
ही कहाणी आहे आधुनिक काळातील, 'र्हुमॅटिक हार्ट डिसिज' या काही हजारांत एखाद्याला होणाऱ्या दुर्धर रोगावर चालू असलेले अॅलोपॅथी उपचार सोडून, फक्त निसर्गोपचार करून जीवदान मिळवणाऱ्या एका वीस वर्ष्यांच्या मुलीची! ह्या मुलीसाठी आईने जीवाची पर्व न करता केलेल्या परिश्रमांची आणि निसर्गोपचारमहर्षी डॉ. जयनारायण जायस्वाल यांच्या शंभर टक्के खात्रीशीर निसर्गोपचाराची! - डॉ. कुमुद बेदरकर (निसर्गोपचारतज्ञ)