-
Tharar Katha Part 1 (थरार कथा भाग १)
थरार कथा भाग एक यात बारा थरार कथांचा समावेश आहे. प्रत्येक कथा रहस्य आणि थरार यांनी परिपूर्ण आहे. प्रत्येकाने या नाविन्यपूर्ण कथांचा एकदातरी आस्वाद घ्यावा.
-
Muktai (मुक्ताई )
उत्कृष्ट लेखन आणि वाचकांना वाचनात बेधुंद करणारे लेखन हीच मंदाताईंची खासियत, मुक्ताई बद्धल ताई जे बोलल्या त्यातील हे चार शब्द... मुक्ताई लिहिताना मी त्यात इतकी रंगून गेले होते कि वाटायचं, मी या चार [...]
-
Aflatoon Avliyae (अफलातून अवलिये )
द्वारकानाथ संझगिरी यांना आयुष्यातील विविध टप्प्यांवर काही सुप्रसिद्ध तर काही अपरिचित असे अविलीये भेटले आणि त्यांची अफलातून व्यक्तिमत्वं संझगिरींच्या मन:पटलावर कोरली गेली ती कायमचीच! या अफलातून अवलियांची ही लोभसवाणी व्यक्तिचित्रं.
-
...Ho Kinai ?(…हो किनई ?)
सहज-सोपे-हळुवार-बोलके सवांद, मिश्किल विनोदबुद्धी, चाणाक्ष निरीक्षणशक्ती आणि थोडासा खटयाळपणा देखील … या सर्वांचा समन्वय 'हो किनई ?' या कथासंग्रहात इतक्या सहजपणे घडून आलाय की लेखिकेच्या लेखणीने तिच्याच हातून चितारलेल्या कुंचल्याला प्रश्न करावा किंवा कुंचल्याने लेखणीला सवाल करावा - वाचकाला "कोण आवडणार तू का मी ?" वाचक म्हणतील "दोन्ही!!!" … 'हो किनई ?'
-
Ranmitra (रानमित्र)
माणूस आणि प्राणी यांच्यातील अनोख्या नात्याची आगळीवेगळी गोष्ट सांगणारे डॉ. प्रकाश आमटे यांचे हे देखणे पुस्तक आहे. हेमलकशाच्या दुर्गम जंगलात जंगली प्राण्यांच्या सहवासात एक वेगळंच जगणं घडलं. त्या जगण[...]
-
Badal Havach ( बदल हवाच )
हिरा दामले यांच्या ३६ कथा फारच सुंदर असा हा कथा संग्रह विविध विषय आणि विविध कल्पना यांनी नटलेला आहे. प्रत्येकाने एकदा तरी जरूर वाचवा असाच आहे.
-
Rangresha ( रंगरेषा )
या कादंबरीचा ' महाराज ' हा नायक शिवमंदिराच्या बाजूला हिरवळीवर , एका झाडाखाली बसून आपल्याला निसर्गतः प्राप्त झालेल्या सिद्धीने कस लोकांच्या निकडीच्या अडचणी , समस्या , संकट यांचं निराकरण करतो ते प्रत्यक्ष वाचण्यासारख! सगळच अघटीत ! अद्वितीय !
-
Nyayasan ( न्यायासन )
लंडन शहराला सर्प दंशचि का भीती वाटत होती? काय परिणाम होणार होता विशिष्ठ जाहिरातीचा ज्यात फक्त घरातील कोणी तरी शास्त्रज्ञ हवे असा मजकूर प्रसिद्ध झाला होता .
-
Maitra ( मैत्र )
माधवी कुंटे यांचा हा तेरा कथांचा कथासंग्रह ज्यात स्त्री मनाचे चित्रण केले आहे. विविध भावना प्रसंग याचे प्रसंगानुरूप लेखन वाचनीय आहे.
-
Rahasya Naganche ( रहस्य नागांचे )
आज तो देव आहे चार हजार वर्षापूर्वी तो फक्त एक पुरुष होता . शोध सुरूच आहे. अशुभसुचक नाग योध्याने त्याच्या मित्राला बृहस्पतीला ठार मारले आणि आता त्याच्या पत्नीच्या मागे तो हात धुवून लागला आहे. तिबेट हून आलेला शिव हा स्थलांतरित सैतानाचा संहार करणार असल्याचे भाकीत आहे. आपल्या राक्षसी शत्रूचा शोध घेतल्याशिवाय तो मुळीच थांबणार नाही , मित्राच्या मृत्यूचा सूड घेण्याची तळमळ आणि सैतानापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा शोध या दोन गोष्टी आपल्याला नागांच्या दारापर्यंत पोहोचवतील, याची त्याला खात्रीच होती . द्वेषी सैतानाच्या उद्याचा पुरावा सर्वत्रच आढळतो . एका जादुई औषधावर अवलंबून असल्यामुळे एक राज्य मृत्यू पंथाला लागते . एका अन्भिशीक्ता राजकुमाराचा खून होतो . शिवाचे तत्वज्ञान विषयक मार्गदर्शक असलेल्या वासुदेवावर शिवाचा गाढ विश्वास असतो . मात्र द्रुष्टांचे सहाय्य घेऊन ते त्याचा विश्वासघात करतात . अगदी परिपूर्ण साम्राज्य वाटणारे मेलूहा सुद्धा जन्माचे शहर म्हणून ओळखल्या जाणऱ्या मैकाम मधील भयानक रहस्यामुळे मलिन झालेले असते. शिवाला अज्ञात असलेला मुख्य सुत्राधर एक मोठाच खेळ खेळत असतो. प्राचीन भारताच्या संपूर्ण सीमारेषांपर्यंत नेणारा प्रवास केल्यावर शिवाला प्रचंड गूढ गोष्टीनी भरलेल्या प्रदेशातील सत्याचा शोध लागतो आणि त्याला समजते की , जसे वाटत होते तसे तिथे काहीच नव्हते. भयानक युद्ध खेळली जतिल. आश्चर्यजनक फसव्या युती केल्या जातील . शिवावरील तीन पुस्तकांच्या मालिकेतील ' मेलुहाचे मृत्युंजय ' हे पहिले पुस्तक . त्याचाच पुढचा भाग असलेल्या या पुस्तकात अविश्वसनीय वाटणाऱ्या रहस्यांचा भेद होईल .
-
Timiratuni Tejakade Samagra Andhashraddha Nirmul
अंधश्रद्धानिर्मुलनाचे अथक कार्य केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे दिशादर्शक पुस्तक. अंधश्रद्धानिर्मुलनाशी संबंधित सर्व विषयांची अभ्यासपूर्ण, सखोल, तात्विक मांडणी या पुस्तकात केली आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन, फलज्योतिष विज्ञानाच्या कसोटीवर, वास्तू (श्रद्धा) शास्त्राचा अर्थ आणि अनर्थ, स्यूडोसायन्स अर्थात छद्मविज्ञान, मन मनाचे आजार: भुताने झपाटणे, देवीचे अंगात येणे, संमोहन, भानामती, बुवाबाजी, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा हिंदू धर्मालाच विरोध का? या प्रकरणांमध्ये डॉ. दाभोलकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विचार, आचार, उच्चार, संघर्ष आणि सैद्धांतिक मांडणी या पाचही आघाड्यांवर त्यांनी आणि त्यांच्या समितीने काम केले आहे. या कार्याचं आणि विचारांचं महत्व पुस्तकातून अधिक ठळक होत. तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे तीन विभाग केले आहेत. पहिला विभाग अंधश्रद्धा निर्मुलनाशी संबंधित थेट बाबींच्याबद्दल आहे. दुसरा विभाग सर्व बाबींच्या संदर्भात अंनिसने जी कृतीशील झुंज दिली त्याबद्दल आहे. यामुळे वैचारिक मांडणीला प्रत्यक्ष कार्याचा भरभक्कम पाया मिळतो. त्यानंतरचा तिसरा विभाग हा सैद्धांतिक आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयाशी संबंधित जे विषय सतत चर्चिले जातात, त्यांची मांडणी केली आहे. याप्रमाणे पहिल्या विभागात वैज्ञानिक दृष्टिकोन, फलज्योतिष विज्ञानाच्या कसोटीवर, मनाचे आजार. भुताचे झपाटणे, भानामती या विषयांची सर्वांगीण मांडणी केली आहे. तर दुसऱ्या विभागात बुवाबाजीच्या संदर्भातील 'साहिबजदीजी करणी', 'कमरअली दरवेशचा चमत्कार', 'लंगरचा चमत्कार', 'गोडबाबा', 'कुशीऱ्याचा दैवी उपचार' यांची माहिती आहे. अशा माहिती सोबतच काही रंजक व उद्बोधक घटना वाचकांना मिळतील.
-
Mati - Bhanamati ( मती - भानामती )
आपोआप फाटणारे, पेटणारे कपडे, अंगावर बिब्याच्या फुल्या, अन्नात विष्ठा, डोळयातून निघणारे खडे- असे गूढ, भीतिदायक प्रकार म्हणजे भानामती-काळी जादू. त्यातून समाजात पसरतो गैरसमज- ही सारी विज्ञानापलीकडची अतर्क्य शक्ती ! मराठवाडयातील भानामती तर आणखी निराळी. फक्त स्त्रियांनाच छळणारी. मग त्या घुमतात, लोळतात, भुंकतात, बेभान अवस्थेत 'भानामती' करणा-याचे नाव सांगतात. ज्या व्यक्तीचे नाव उच्चारले जाते, त्याचे जगणे अवघड बनते. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने गेल्या पंचवीस वर्षांत शेकडो भानामती प्रकरणे शंभर टक्के यशस्वीरीत्या हाताळली. भानामती घडते, तेव्हा ती दूर करण्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची, उपहासापेक्षा आपुलकीची गरज असते- हे भान देणारे रहस्यकथेहून रोमांचक वाटेल असे.