-
Andhshraddha Vinashay ( अंधश्रद्धा विनाशाय )
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच हे पुस्तक अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचं दर्शन घडवितं. श्रद्धा तपासून पाहण्याच भान डॉ. दाभोलकर या पुस्तकातून देतात. 'विज्ञानाच्या विकासाचा सारा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे' असं ते म्हणतात. समाजात वर्षानुवर्षे ज्या चुकीच्या रुढी-परंपरांचा पगडा आहे, त्या रुढी हद्दपार करण्यासाठी 'अंनिस' ने केलेल्या आणि करीत असलेल्या लढायांची समग्र माहिती या पुस्तकातून मिळते. प्रवाहाविरुद्ध पोहत असताना होणाऱ्या त्रासाचं, येणाऱ्या अडचणीचं अस्वस्थ दर्शन त्यांतून घडतं. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज यांसारख्या समाजसुधारकांचे विचार प्रत्यक्षात यावेत, हाच या चळवळीमागचा हेतू असल्याचं ते पुस्तकातून सिद्ध करतात. 'हि देशातील दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे' हि भूमिका हि ते मांडतात..
-
Soniya Gandhi Ek Annanyasadharan Jeevanpravas ( सो
भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर सोनियांचा उदय कसा झाला आणि त्यांनी लक्षावधी भारतीयांची हृदये कशी जिंकली, याची ही मनोवेधक कहाणी. सोनियांची हि कहाणी गेल्या चार दशकांमधील कोणत्याही जागतिक पातळीवरील नेत्याच्या परिवर्तनाच्या प्रवासाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. वैयक्तिक स्वरूपाच्या राजकीय महत्वकांक्षेपेक्षा प्राप्त परिस्थिती आणि आयुष्यात घडलेली दारूण शोकांतिका या दोन गोष्टीमुळे राजकारणाच्या मार्गावर सोनियांची वाटचाल सुरु झाली. एक परंपराप्रिय, मध्यमवर्गीय, इटालियन कुटुंबात वाढलेल्या सोनिया, केंब्रिजला येऊन इग्रंजी शिकता- शिकता राजीव गांधीच्या प्रेमात पडल्या. हे राजीव गांधी म्हणजे जवाहरलाल यांचे नातू इंदीरा गांधी यांचे सुपुत्र होते. आपल्या सासूबाई - इंदीराजी आणि पती राजीव गांधी यांच्या अमानुष हत्येनंतर सोनियांचे व्यक्ती महत्व बदलून गेले. त्या खंबीर, कणखर व ठाम विचारांनच्या बनल्या, पण त्या पूर्वीपासून अत्यंत मितभाषी होत्या आणि तशाच राहिल्या. आत्ता त्या आघाडी सरकारच्या अध्यक्ष बनल्या आणि सर्वांत मोठया लोकशाही राष्ट्राच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करू लागल्या आहेत. सरकारमधील वरिष्ट पदाधिकारी ( माजी आणि आत्ताचे), सोनियाचे पक्षातील सहकारी, राजकीय विरोधक आणि त्यांच्या परिवारचे निकटवर्तीय यांच्या मुलाखती आणि संशोधनामधून राणी सिंग यांनी सोनियांवर एक नवीन प्रकाशझोत टाकला आहे. लेखिकेने समर्थ lekhanimadhun धीरोदत्त आणि आकर्षक व्यक्तीमहत्व असणा-या सोनियांच्या आयुष्याचा प्रवास वाचकांसमोर मांडला आहे. सोनियांचे संपूर्ण जीवन आणि त्याचा वारसा याचे भारताच्या दृष्टीने काय महत्व आहे, याचेही विश्लेषण केले आहे .
-
Swabhavala Aushad Ahae (स्वभावाला औषध आहे)
सध्या सभोवतालच्या सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा चालू आहे. त्यामुळं अनेक जण चिंतेनं आणि काळजीनं ग्रासलेले आहेत.यामुळं मानसिक व्यथा आणि विकार उद्भवतातच; पण ज्यांना सायकोसोमॅटिक डिसीजीस् (Psychosomati[...]
-
Hach Maza Marg...(हाच माझा मार्ग...)
बालकलाकार ‘मास्टर सचिन’... सहजसुंदर अभिनय करणारा ‘हिरो’... जबरदस्त परफॉर्मन्स देणारा... नवोदितांना आपुलकीने मार्गदर्शन करणारा ‘महागुरू’... हिंदी चित्रपटसृष्टीत अभिमानाने ‘मराठी मुद्रा’ उमटवणारा कलावंत... आजवर आपण सचिनला अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक, निर्माता, गायक, संगीतकार अशा भूमिकांमध्ये मोठ्या, तसेच छोट्या पडद्यावर पाहिलं आहे. अशा विविध क्षेत्रांत काम करताना त्याला कोणकोणते अनुभव आले, त्याची सुवर्णमहोत्सवी कारकिर्द कशी बहरली, मुलगा-भाऊ-पती-वडील-मित्र या भूमिका त्याने कशा पार पाडल्या, त्याचं पडद्यामागचं आयुष्य कसं आहे, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल! म्हणूनच सचिन शरद पिळगांवकर याच्या आयुष्याच्या प्रवासाची ही पटकथा...
-
Smart Mull (स्मार्ट मूल )
डॉ. सुनील गोडबोले, डॉ. अश्विनी गोडबोले यांनी लिहिलेलं "स्मार्ट मूल' हे पुस्तक आजच्या काळाशी अतिशय सुसंगत आहे. मुलांमध्ये किमान आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता लपलेल्या असतात. त्या शोधणं हे पालकांचं आणि शिक[...]
-
Kuthe Na Kuthe (कुठे ना कुठे)
'कुठे ना कुठे' नित्यनूतन अनुभवांनी भरलेलं हे जीवन प्रवाही असतं. ते एका ठिकाणी न थांबता वळणावळणाने पुढे, पुढे जात असतं. अशाच ब-याचशा वळणांवर भेटलेले जाणवलेले आणि भावलेले हे माझ स्मरणबंध खचितच तुम्हालाही, आयुष्यातील वाटांवर घेऊन जातील. आपण सदर पुस्तकात निश्चत भावेल, असा विश्वास वाटतो.
-
Thembatl Abhal (थेंबातलं आभाळ)
आजच्या सुखवस्तू जगात, वस्तू सुखी आहेत, आणि माणसं मात्र दु:खी; नेमकं काय चुकतंय? आंनदी असणं आणि आनंदाचा मेकअप यातला फरक माणसं विसरली आहेत का? अविरत परिश्रमाने, आई- बाबांनी जे आयुष्य उभ केलं, त्याची किंमत रेडीमेड चंगळवादी युगातल्या मुलांना केव्हा कळणार आहे? सुखामागे धावता धावता दमून गेलेली आजची घरं कधीतरी अंतर्मुख होणार आहेत की नाही ? संवेदनांना साद घालणारा एक तरल अनुभव - 'थेंबातल आभाळ !"
-
Ekantacha Doh (एकांताचा डोह)
कोलाहातून कधीतरी दूरच्या आतल्या गावात जावसं वाटतं ना ? शहरी गजबजाटातून मनातल्यालाल कौलारु घरात नारळी पोफळीच्या बागेत बिलगणा-या गारव्यात कधीतरी सर्वांच्या नकळत गुणगुणावसं वाटतं न द्या टाळी! अशाच मनाच्या गार सावलतीच असतो तो एकांताचा डोह! तिथे कविता, गाणं, नृत्य, चित्र इतकंच काय ह्या एकांत डोहाकाठीच आपण आपल्याला नव्याने सुचत जातो.