-
Gappa Goshti (गप्पागोष्टी)
`माझा कै. वृत्तपत्रव्यवसाय` मधला नायक आपल्या बौद्धिक बाणेदारपणामुळे आपली पत्रकारिता कशी कैलासवासी` झाली हे स्वत:च सांगतो... शहरात राहणाऱ्यांना खेडेगावाबद्दल किती गैरसमज असतात याचा उपरोधिक शैलीत समाचार `खेड्यातील एक दिवस` मध्ये आढळतो... भिकू इंगळे कारकून होण्यापेक्षा मास्तरकी करण्याचं ठरवतो आणि त्याचा `एका वर्गातील पाठ` आयुष्यभराचा धडा ठरतो!... आणि पुण्यातल्या जलप्रलयाने हळहळलेली भोकरवाडीतली मंडळी मदत मागायला निघतात आणि त्यांनाच `मदत` करायची पाळी येते... केस हरणार असं ठाऊक असूनही केवळ प्रतिष्ठेकरिता केस लढणारा, दिलदार पण इरसाल `गणपत पाटील` शेवटी सखूला माफ करतो, तर गणपत वाघमोडे वेगळीच शक्कल लढवून `निकाल` आपल्या बाजूने लावून घेतो... मानवी स्वभाव, त्यातली विसंगती, इरसालपणा आणि यांमधून होणारी विनोदनिर्मिती या विषयांभोवती या संग्रहातल्या कथा गुंफलेल्या आहेत. सहज व उस्फूर्त कथनशैलीमुळे यातल्या कथा या `गप्पागोष्टी`च वाटतात.
-
Sindhu Te Krushna (सिन्धु ते कृष्ण)
"आम्ही सिंधी लोक भारताच्या वायव्य प्रांतातून उद्योगी संस्कृतीचा नाईलाजाने त्याग करून आलो. मला आश्चर्य वाटते की, माझ्या छोटया आयुष्यात परिस्थितीचा एवढा मोठा झोका त्या टोकापासून या टोकापर्यंत कसा काय घेतला गेला? मला भोवाळ कधीच आला नाही. श्रद्धा आणि श्रम यांचे दोर दोन्ही हाती मी घट्ट पकडले होते."
-
Khup Dur Pohochlot Apan (खूप दूर पोहोचलोत आपण)
साहित्यसंमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या या कवितासंग्रहात 37 कविता आहेत. या संग्रहातील पहिलीच कविता "खूप दूर पोहोचलोत आपण' वाचकाला अस्वस्थ करते. देशातील लोकशाहीची वाटचाल आणि ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत, त्यावरचं मार्मिक भाष्य या कवितेत आहे. पहिल्या कवितेपासूनच हा काव्यसंग्रह वाचकाच्या मनाची पकड घेतो. "गाव शोधतं लोकशाही' ही कवितादेखील प्रचलित राजकारणावर जळजळीत भाष्य करते. जागतिकीकरणावर भाष्य करणारी कविता किंवा राबणाऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देणारी आणि समाजातील विषमतेवरही प्रहार करणारी "राबणाऱ्यांचा विठ्ठल' हीही कविता अस्वस्थ करून जाते. "ओठ', "मुक्तिगान', "जीव', "शोध', "वेगळा असा उरलोच नाही' या कवितांमधील प्रेमाची भावना आणि त्यातील आशय यामुळे या कविता वेगळ्याच विश्वात नेतात.