-
Tanviche Abhal (तन्वीचं आभाळ)
‘तन्वीचे आभाळ' हे डॉ. मेधा मेहेंदळे या प्रतिभावान स्त्रीचे चरित्र लिहिलंय तितक्याच प्रतिभावान महिलेने ! डॉ. शुभा चिटणीस यांनी ! शुभाताई सर्व ठाण्याला जवळून परिचित आहेत. त्यांनी विविध क्षेत्रांतील दिग्गजांवर वृत्तपत्रांतून, नियतकालिकांतून व वेगवेगळ्या ग्रंथांतून असंख्य व्यक्तिचित्रणात्मक लेख लिहिलेले आहेत. चरित्रेही लिहिलेली आहेत. त्यांचे लेखन महाराष्ट्रात सर्वत्र गाजले आहे... तेच डॉ. मेधा मेहेंदळेंच्या चरित्रलेखनातून पानोपानी जाणवत आहे...डॉ. मेधा यांनी निसर्गोपचार- प्रसारक म्हणून चिमूटभर सत्त्वातून जे आभाळ उभे केले आहे त्याला तोड नाही. छोट्या मेधा देसाई ते आजच्या जगप्रसिद्ध 'तन्वी' निर्मात्या डॉ. मेधा मेहेंदळे यांचा प्रदीर्घ जीवनप्रवास विलक्षण आत्मीय आणि वाचनीय झालेला आहे. शून्यातून आयुर्वेदासारख्या आभाळाला कवेत घेणे सोपे नाही. ते अवघड कार्य डॉ. मेधा मेहेंदळे यांनी केलेले आहे. त्यांचे कर्तृत्व डॉ. शुभा चिटणीसांनी विलक्षण बोलके केले आहे. मी या चरित्र ग्रंथास शुभेच्छा देतो. वाचकांचे अभिनंदन करतो. 'तन्वी हर्बल्स' चिरायू होवो ! - अशोक समेळ, ज्येष्ठ नाटककार
-
Nivdak Chin.Tra.Khanolkar : Nakshtra Dena (चिं. त्
मराठी साहित्यविश्वात एक अनाम पक्षी थोडाच वेळ फांदीवर बसला आणि उडूनही गेला. पण त्या पक्ष्याने अंत:करणातील सूर आळवले. त्या सुरांमुळे सर्व भावविश्व ढवळून निज्ञाले, इतकी त्या सुरातील आर्तता विलक्षण होती. त्या सुरांनी सर्व साहित्यविश्व गंधित झाले. ते सूर आजही विसरले गेलेले नाहीत. त्या सुरांची मोहिनी आजही सर्वांच्या मनात कायम आहे. आणि त्याने दिलेले 'नक्षत्रांचे देणे' आजही कायमस्वरूपी मनी वसलेले आहे. हा अनामपक्षी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून कोकणाने महाराष्ट्राला दिलेले एक तेजस्वी रत्न ! चिं. त्र्यं. खानोलकर - आरती प्रभु ! त्यांची साहित्यातली काही 'निवडक नक्षत्रे', त्यांच्या काही साहित्यकृतींद्वारे आपल्यासमोर ठेवत आहोत. मनात कृतज्ञतेची भावना दाटून येत आहे "गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणेमाझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने..." --- डॉ. माधवी वैद्य
-
Kala Vidushak Ani Gori Swapnapari (काळा विदूषक आणि
टक्कर भीषण होती. आता दोन्ही गाड्या उडून स्वतः भोवतीच फिरु लागल्या होत्या. सगळ्या खिडक्यांच्या काचा एकाच क्षणी खळ्ळकन फुद्धन त्यांचे तुकडे आसमंतात उडत होते. वेदनेची एक जीवघेणी कळ सेंमीच्या शरीरातून सर्रकन फिरली. पण आपण जिवंत कसे, हेच त्याला कळत नव्हते चार्ली मागच्या सीटवर होता. त्याचे कण्हणे सेंमीच्या कानावर आले. नशीब तोही अजून जिवंतच होता. सॅमीने सुस्कारा सोडत देवाचे आभार मानले. आपल्या चेहऱ्यावरुन रक्ताचे ओघळ वाहात असल्याची त्याला जाणीव झाली. काही क्षणांतच ते त्याच्या डोळ्यांत उत्तरुन त्याला क्षणभर दिसेनासेच झाले. 'चार्ली, तू ठीक आहेस ना बाबा?' त्याने विचारले. तो वळला. चार्ली खालून वर उठण्याचा प्रयत्न करीत होता. सॅमीने दरवाजा उघडला आणि तो त्याच्या मदतीस धावला. मागच्या सीटवर जाऊन त्याने त्याचा दंड पकडला. चार्लीचा जबडा लटकत होता आणि त्याच्या तोंडातून रक्त वाहात होते. 'बापरे। काय रे चार्ली, हे काय झाले रे ? माझ्यामुळे ?' सॅमीने चिचारले.
-
The Scapegoat (द स्केपगोट)
आता माझं नाव जॉन होतं आणि ते जीन कधीपासून झालं, याचा विचार माझ्या मनात आला. कदाचित तो माणूस मला कुठेतरी ओळखणारा असावा. मी त्याला ओळखावं अशी त्याची रास्त अपेक्षा दिसली. त्याला नाराज करणं माझ्या जिवावर आलं आणि मी फ्रेंचमध्येच म्हणालो 'असाच चाललो होतो इथून. आज रात्री मी परत चाललोय.' तो कोण होता, देव जाणे! 'तुझी आजची भेट फुकट गेली असेल?' तो म्हणाला, 'पण तू घरच्यांना मात्र सांगशील की ती कामाला आली ?' हा भलताच आरोप होता माझ्यावर. त्याला कशानं वाटलं, की माझी सुट्टीतली भेट फुकट गेली म्हणून ? बाकी माझा मूड खराब होता ही गोष्ट खरी होती. पण मी एक अपयशी माणूस होतो. ही गोष्ट त्याला कशी काय कळली ? मग माझ्या लक्षात आलं, की तो एक परका माणूस होता. मी त्याला यापूर्वी कधीच बघितला नव्हता. मी नम्रपणानं झुकलो आणि म्हणालो, 'आय बेग युवर पार्डन. मला वाटतं आपला दोघांचाही काहीतरी गैरसमज झालाय.' पण उलट तो चक्क हसला व त्यानं मला डोळा मारला. मी चकित झालो. 'ठीक आहे बाबा. आपण भेटलोच नाही असं समज. पण पॅरिसमध्ये करता येण्यासारख्या गोष्टी तू इथे मध्ये कशाला करतो आहेस ? हरकत नाही, आपण नाहीतरी पुढच्या रविवारी भेटतोच आहोत! तर तेव्हा उत्तर दे. ठीक आहे?' आणि त्यानं क्लचवर पाय दाबला आणि तो निघालादेखील. जातानादेखील तो हसतच होता.
-
Under Water (अंडर वॉटर)
'अंडरवॉटर' हा शब्द उच्चारताच नजरेसमोर अथांग असा महासागर पसरतो. पाण्याखालील परिसर उभा राहतो. अंडरवॉटर यातील कथांमधील प्रसंग आणि निसर्गातील संघर्ष सत्य घटनेतच सामावलेले आहेत. निरनिराळ्या धाडसी माणसांनी ते अनुभव आपल्या आयुष्यात घेतलेले आहेत. पाण्याखाली काम करणाऱ्यांचे, पाणबुड्यांचे, मच्छीमारी करणाऱ्यांचे, संशोधकांचे तसेच गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांचे ते अस्सल अनुभव आहेत. संपादक फिल हिरच यांनी ते सर्व अनुभव एकत्रित संकलीत केलेले आहेत.
-
Jwel Thief (ज्वेल थीफ)
सकाळी साडेसात वाजता तो उठला. तोसुद्धा धडधडा जिना चढल्याच्या आवाजाने. बघतो तो पेनेलपी धावत त्याच्याकडे येत होती. 'पपा, पपा, हिरा चोरीला गेलाय !' ती किंचाळली. 'काय वेड लागलंय का तुला ?' 'अहो, खरंच सांगते, गेलाय. अजिबात दिसत नाहीये तिथे तो. कसा गेला, कुठे गेला, कुणी नेला, कुणालाच माहिती नाही.' तिनं त्याला रेचेलच्या सिटिंग रुममध्ये ओढत नेलं. बेडरुमच्या दरवाजातच ती उभी होती. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. तिच्या इंडियन कॅबिनेटचे दोन्ही दरवाजे सताड उघडे होते. त्यातला एक ड्रॉवरही बाहेर खेचलेला होता. 'हे खरं आहे, मिस ?' बेटरएजने विचारलं. तिनं निर्जीवपणे मान हलवली. 'होय, तो हिरा गेलाय !' हे बोलून ती बेडरुममध्ये गेली आणि तिनं दरवाजा आतून घट्ट बंद करुन घेतला.
-
Patanjalyogdarshan (पातंजलयोगदर्शन )
उपनिषदांचा काळापासूनच भारतीय तत्त्वचिंतकानी मानवी अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा गंभीर प्रयत्न सातत्याने केला आहे. भौतिक जगापलिकडे असलेल्या गूढ अशा सृष्टीच्या परमतत्त्वापर्यंत मानवी अस्तित्व पोहोचू शकते का? विस्तारू शकते का, याचा शोध घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे योगसाधना! याची जाणीव झाल्यावर भारताच्या आध्यात्मिक इतिहासाचा फार मोठा भाग योगसाधनेच्या अनेक मौलिक प्रणालींनी व्यापला आहे. पातंजल महाभाष्याबरोबरच योगसूत्रांचेही कर्तृत्व ज्यांच्याकडे जाते ते पतंजली इसवीसनापूर्वी सुमारे दीडशे वर्षे होऊन गेलेले महापंडित. त्यांचे योगदर्शन म्हणजे भारतीय योगविषयक तत्त्वाचिंतनाचा सर्वमान्य आणि सर्वाधिक प्रमाण मानला गेलेला ग्रंथ आहे. पूर्वाभ्यासांच्या आधारे या योगसूत्रांचे साधे आणि आकलनसुलभ असे विवेचन इथे केले आहे. साधनेच्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्या सर्वांना योगशास्त्राची ओळख करून देण्याचे काम या पुस्तकाने केले आहे असे लक्षात येते. एक महत्त्वाचा योगविषयक ग्रंथ सर्वसामान्यांच्या आकलन कक्षेत यावा ही या पुस्तकामागची प्रेरणा अभिनंदनीय आहे. - डॉ. अरुणा ढेरे
-
Aho Kharach 480 Takke (अहो खरंच ४८० टक्के )
ह्या संग्रहात सहा कथा असून बहुतेक दीर्घ कथाच आहेत. ह्या दीर्घकथा आहेत कारण आपण आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त अनुभव सांगून समाजाचे प्रबोधन करावे, ही तळमळ लेखकास आहे. पुढे काय होणार? पुढे काय होणार? याची वाचकांना उत्सुकता निर्माण होते,तो वाचतच राहतो आणि लेखक त्या प्रश्नाचेही समाधान करतो आणि लगेच कथेला नवे वळण देऊन नवीन प्रश्न, नवीन समस्या निर्माण करतो. घटनांमधून घटना घडत जाणे आणि या घटनांचे एकमेकांशी नाते निर्माण होणे, हे कोणत्याही कथा-कादंबरीमध्ये अपेक्षित असते. नेमके हेच ह्या कथांमधून घडते आहे.जीवनातील सतत संघर्षमय अनुभवांमुळे लेखकाला या समस्यांमय प्रसंगाची कमतरता भासत नाही. लेखक समाजातील फक्त नकारात्मकतेचे चित्रण करत नाही, तर समाजातील सकारात्मक बाजूही तो हिरीरीने मांडतो. समाजातील दृष्ट वृत्तीचा तो निषेध करतोच, पण समाजातील चांगुलपणावरही त्याचा विश्वास आहे. आणि म्हणूनच या संग्रहातील सर्वच कथा सुखान्त झाल्या आहेत. अशाप्रकारचे पारंपरिक पद्धतीने केलेल्या वर्णनातून लेखकाचे मराठी भाषेवरील प्रभुत्व लक्षात येते. कथा बरेचदा संवादातून पुढे जाते, तेव्हा पात्रांप्रमाणे ग्रामीण बोलीतही लेखकाने संवाद लिहिण्याची काळजी घेतली आहे. लेखकाची निरीक्षण शक्ती दांडगी आहे, हे या कथा वाचताना प्रत्ययास येते. समर्पक शब्दयोजना, भाषेवरील प्रभुत्व आणि दांडगी निरीक्षणशक्ति यामुळे कथांतील पात्रांच्या व्यक्तिचित्रणात आणि एकामागून एक येणाऱ्या घटनांमध्ये जिवंतपणा आढळतो. एखादा चित्रपट पाहत आहोत, असे आपल्यास वाटते, व ह्या उत्कंठावर्धक कथा आपण केव्हा वाचून संपवतो, ते आपणांस कळतही नाही. डॉ .मारुती नलावडे या लेखकाकडून मराठी साहित्याला फार मोठ्या अपेक्षा निर्माण होऊ शकतात.
-
Modi 3.0 Avval,Uttung,Abhedya (मोदी ३.0 अव्वल,उत्त
मोदी ३.0 अव्वल ,उत्तुंग,अभेद्य प्रदीप भंडारी अनुवादक - रोहन अंबिके दिलीप राज प्रकाशन पुणे दिलीपराज घेऊन येत आहे.रिपब्लिक भारत, झी न्यूज, इंडिया न्यूज चे ज्येष्ठ पत्रकार, जन की बात चे संस्थापक आणि बेस्टसेलर लेखक प्रदीप भंडारी यांचे नवीन पुस्तक आयोद्ध्या मतदारांचे मर्मस्थळ.२०२४ च्या निवडणुकीचे संपूर्ण विश्लेषण.मोदींचा करिष्मा आणि भारताची पुढील वाटचाल जाणून घ्या.
-
Pratiksha Shivachi (प्रतीक्षा शिवाची)
● (प्रतीक्षा शिवाची) हे काशीच्या या महाकाव्यावर अधिकारवाणीने भाष्य करणारे, वस्तुनिष्ठ, तथ्यांचा परामर्श घेणारे आणि तरीही भावनेने ओतप्रोत भरलेले दाहक पुस्तक आहे. डॉ. आनंद रंगनाथन, लेखक आणि शास्त्रज्ञ ● ज्ञानवापीची कित्येक काळ दडपून ठेवलेली गुपिते अगदी निगुतीने प्रकाशझोतात आणली गेली असल्याने हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे. अॅड. श्री हरि शंकर जैन ● इथला बारीक सारीक तपशीलही पुराव्यानिशी मांडला आहे. या विषयाशी संबंधित सर्व कागदपत्रांचे नीट संपादन केल्यामुळे या विषयाला पूर्ण न्याय मांडला आहे. ॲड.ए.एस. श्री विष्णु शंकर जैन ● सर्वसामान्य वाचकापासून आजवर झाकून ठेवलेली सगळी तथ्ये डॉ. संपत अतिशय उत्कंठावर्धक, सहज आणि कोणताही अभिनिवेश न बाळगता, तरीही नेटकेपणाने आणि स्पष्टपणे प्रकाशात आणतात. डॉ. H.R. मीरा, संशोधिका आणि लेखिका ● भारतातील धर्म निरपेक्षतावाद आणि सांप्रदायिक सलोखा याचे आधुनिक युगाच्या संदर्भाने असणा महत्त्व आणि काशी विश्वनाथ मंदिराची सखोल रुजलेली संस्कृती आणि अध्यात्मिक वारसा समजून घेणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे.
-
Rang Tya Nabhache (रंग त्या नभाचे)
पुनः प्रत्यय देणाऱ्या आश्वासक कथा डॉ. नितीन करमरकर यांचा पाच कथांचा संग्रह 'रंग त्या नभाचे' या नावाने प्रकाशित होत आहे. याआधी त्यांचा 'समर्पण' हा पुरस्कारप्राप्त कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्या संग्रहातील आणि यातील अशा दोन्ही कथांचा विचार केला तर या कथांची प्रकृती दीर्घत्वाकडे झुकणारी अशी आहे. म्हणजे या कथा एका अर्थाने दीर्घ स्वरूपाच्या आहेत. त्यांना आपल्या कथांमधून जाणिवेपेक्षा अधिक काही वेगळे, अलक्षित असे सांगायचे असते, ते विस्तृत स्वरूपात सांगायचे असते, असे त्यांच्या कथा वाचून ठरवता येईल. मानवी जगण्याचे, सत्याचे दर्शन सर्जनात्मक पातळीवरून घडविणे हा सर्जनशील लेखकाचा धर्म असतो. आणि या धर्माला जगणारे लेखक म्हणून डॉ. नितीन करमरकर यांच्याकडे पाहावे लागते. आपल्याला आलेली अनुभूती ते कथेच्या माध्यमातून सांगता सांगता जीवनाच्या काही अलक्षित, काही लक्षित बाबींकडे, प्रश्नांकडे वाचकांचे लक्ष वेधतात. त्या प्रश्नांची आच आपल्याला कशी आणि किती लागली, याचे पुनःप्रत्यंतर ते आपल्या लेखनातून दर्शविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यामुळे ही कथा आपली वाटते, आपलीशी वाटू लागते. हेच या कथांचे खरे मर्म आहे, असे म्हणावे लागते
-
Ek Patra Aaicha (एक पत्र आईचं)
जगायचे व लढायचे बळ देणारा मध्यमवर्ग ही माझ्या वैचारिक लेखनाची प्रेरणा आहे. सत्त्वपरीक्षेच्या क्षणी मूल्यसंस्कार निग्रहाने जपणारी आई-वडिलांची पिढी मी अनुभवली आहे. गरिबीतही स्वाभिमानाची श्रीमंती मला आई-वडिलांकडून मिळाली. त्यांच्या कष्टांचे सार्थक करणे हीच ईश्वरपूजा, हे मला संतांच्या साहित्याने शिकवले. श्रेष्ठ साहित्यिक, थोर कलावंतांनी मानवतेचा विचार दिला. अपार कष्टाला पर्याय नाही हे सांगणारे चरित्रग्रंथ नंदादीपाप्रमाणे आयुष्यात आले. माझ्या लेखनामागे आणि जगण्यामागे बळ आहे ते त्या चिरंतन मूल्यश्रद्धांचे ! म्हणूनच 'एक पत्र आईचं!' हे माझे पुस्तक खरे तर 'एक पत्र लेखकाचं!' असंही आहे. हे लेखन आपल्या हाती सोपवताना आपणास होणाऱ्या आनंदातून पत्रोत्तर मला मिळणार आहे! आपला प्रवीण दवणे
-
Tya Tithe Rakhatali (त्या तिथें रुखातळीं)
लेखक गोपाळ नीळकंठ दांडेकर यांनी त्यांच्या वाघरू आणि त्या दशमांश रुखताली या दोन कादंबऱ्या एकत्र करून ‘एक वाघरू त्या तिथे रुखातळीं’ या पुस्तकात साकारल्या आहेत. वाघरूमध्ये, लेखकाने राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका परिसराचे प्रेम वर्णन केले आहे - बाबुडा टायगर क्लबकडे. दुसरीकडे, भिवगडच्या पायथ्याशी असलेल्या ३०० वर्ष जुन्या आंब्याच्या झाडाखाली घडलेल्या काही वास्तविक घटनांचे वर्णन त्या तिथी रुखातळींमध्ये केले आहे. त्यामुळे या दोन गो.नी.दांडेकरांच्या छोट्या कादंबऱ्या म्हणून वर्गीकृत करता येतील.