-
Shubhmangal (शुभमंगल)
< BACKNext > SHUBHMANGAL by B. D. KHER 0 Reviews facebook sharing buttontwitter sharing buttonpinterest sharing buttonwhatsapp sharing buttonlinkedin sharing buttonblogger sharing buttontelegram sharing buttonemail sharing button Previous Next* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately. Availability : Available ISBN : 9789394258877 Edition : 2 Pages : 144 Language : MARATHI Category : NOVEL Quantity 1 INR 220.00+ ADD TO CARTBuying Options: Print Books: Summary(English) Summary(Marathi) Awards Translation Adaptation Youtube ’शुभमंगल’ कथेतील सुनंदाच्या वडिलांचा चमत्कारिक स्वभाव तिला घर सोडून बाहेर पडण्यास भाग पाडतो. आपल्या मर्जीविरुद्ध लग्न करावे लागल्याचा राग ते इतक्या वर्षांनंतर मुलांवर, बायकोवर काढत असतात. त्यांना कुटुंबीयांची कोणतीच गोष्ट पटत नसते. त्यातच मुलीचे- सुनंदाचे लग्न आपल्या बॉसची मर्जी संपादन करण्यासाठी त्याच्या वाया गेलेल्या मुलाशी लावण्याचा प्रयत्न ते करतात, तेव्हा आईला दुःखात ठेवून सुनंदावर घर सोडण्याची वेळ येते. ती आपल्या आपल्या मैत्रिणीच्या आधाराने पायांवर उभी राहते. अशातच योगायोगाने तिची ओळख मुकुंदाशी होते. दोघांची मने एकमेकांशी जुळतात. पण त्याच सुमारास देशातील परिस्थिती बिघडते. सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे मतभेद होतात. संघ त्याविरुद्ध सत्याठाहाचे रणशिंग फुंकतो. त्यावर बंदी घातली जाते. यात मुकुंदाचे लक्ष तिकडे आकर्षिले जाते. देशप्रेमाने भारावलेला मुकुंद त्यात उडी घेतो. सुनंदाचे प्रेम मुकुंद स्वीकारतो का, त्यांचे शुभमंगल होते का, यासाठी वाचावी ’शुभमंगल’ कादंबरी या पुस्तकातील दुसरी कादंबरी ’प्रायश्चित’. यात समीरवर आपल्या विधवा आंधळ्या आईची व पोरक्या मामेबहिणीची जबाबदारी समीरवर असते. मामाने समीरचे वडील वारल्यावर त्या दोघांना आधार दिलेला असल्याने आता त्याच्या पश्चात त्याची मुलगी समीरच्या आधाराने राहत असते. त्यामुळे समीरच्या आईच्या मनात आपल्या भावाचे ऋण फेडण्यासाठी त्याच्या मुलीला- सरोजला आपली सून करून घ्यायचे असते. सरोजही मनाने समीरमध्ये गुंतलेली असते. परंतु दुकान तपासणीच्या निमित्ताने समीर कादरभाईच्या दुकानात 3-4 वेळा जातो, आणि त्याची पुतणी- शिरीनकडे आकर्षिला जातो. ती मुस्लिम असूनही सर्व धर्मांचा तिचा अभ्यास, त्यातील गांधीजी, विवेकानंद यांच्याविषयी तिला वाटणारा आदर अशा गोष्टींनी तो प्रभावित होतो. तिला हिंदू धर्माचीही चांगली माहिती असते. आपला जोडीदार हिंदूच असावा, असा विचारही शिरीन त्याच्याकडे उघड करते. ती आपल्या काकाच्या आश्रयानेच राहत असते. ती समीरकडे ओढली जाते. समीरही शिरीनच्या प्रेमात पडतो. सरोज मनापासून त्याची चाहती आहे व आपल्या आईच्या पसंतीची आहे. शिरीन भेटण्यापूर्वी सरोज त्याला आवडत होती; पण आता शिरीनची त्याच्यावर जादू झाली आहे. पण शिरीन मुस्लिम असल्याने हे कसे जमायचे? सरोजला याची कुणकुण लागली आहे. अशातच एकदा शिरीन गायब होते. तिचा ठावाठिकाणाही त्याला लागत नाही. इकडे शिरीनच्या काकाने घात केला आहे. एका तोतया सरदाराला त्याने आपल्या पोरक्या पुतणीला पैशासाठी विकले आहे. त्या कोठडीतील जाफरभाईला तिची दया येते. त्याला तिच्याबद्दल आपलेपणा वाटतो. तो त्या नराधमाच्या तावडीतून तिला सोडविण्याचे ठरवतो. आपण येथे कसे आलो, हे सांगताना त्याने हिंदू-मुस्लिम झगड्याच्या वेळी आपल्या धर्मबांधवांच्या दबावाखाली हिंदू मित्राचा खून केल्याचे सांगतो. त्याबद्दल त्याला फार वाईट वाटत असते. त्यासाठी त्याला तुरुंगातही जावे लागते; मात्र पोलिसाच्या मदतीनेच तो तुरुंगातून पळ काढतो आणि आता या सरदाराच्या ताब्यात सापडतो. शिरीनच्या लक्षात येते, की समीरच्या वडलांचा खून करणारे हे आपले वडीलच आहेत. लहानपणी त्यांचे फोटो पाहिलेले ेतिच्या लक्षात येते. दोघे त्या तोतया सरदाराच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी होतात. शिरीनही आपल्या वडलांना आपली कहाणी व समीरबद्दल सांगते. दोघे समीरकडे येतात. समीर शिरीन व तिच्या वडलांच्या भेटीने आनंदित होतो. समीर शिरीनशी लग्न करतो, की सरोजला स्वीकारतो? ललितरम्य भाषा, चित्तथरारक मांडणी, कथानकाची आकर्षकता आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वभावरेखन हे भा. द. खेर यांच्या कादंबर्यातून दिसणारे लेखनगुण या दोन्ही कादंबर्यांतून प्रकर्षाने प्रकट झालेले दिसतील.
-
Sukhacha Lapandav (सुखाचा लपंडाव)
प्रसिद्ध लेखक भा. द. खेर यांची ‘सुखाचा लपंडाव’ ही कादंबरी प्रेमत्रिकोनाची शोकांतिका म्हणता येईल अशा स्वरूपाची आहे. डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणेने संघकार्यात निष्ठेने भाग घेणारा सुखवस्तू व सुशिक्षित तरुण कुमार आणि चारचौघींसारखी दिसणारी, सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील सुशील, सुस्वभावी कॉलेजयुवती पुष्पमाला तसेच गौर वर्णाचे, बंगाली वाटावेत असे सालस युवक डॉ. सतीश या तिघांची ही प्रेमकहाणी आहे. प्रवासादरम्यान संकटातून सोडवणारा कुमार पुष्पमालेला आपलासा वाटतो; परंतु कुमारची आधीपासूनची मैत्रीण माधुरीसाठी त्याच्या प्रेमाला पुष्पमालेनं नकार दिला; त्यामुळे त्याची दारुण निराशा होऊन तो एकाएकी नाहीसा झाला होता. तसेच तिच्यावर मनापासून प्रेम करणाNया डॉ. सतीशनांही (त्यांच्याविषयी आपल्या मनात केवळ आदरभाव आहे, असे सांगून) त्यांच्याबरोबर जाण्यास पुष्पमालेनं नकार दिला होता; त्यामुळे ते निराश होऊन व्यसनाच्या आहारी गेले होते. अर्थात कादंबरीची नायिका पुष्पमालेनं हे सारं दुःख स्वतःवर बुद्धिपुरस्सर ओढवून घेतलं होतं. आयुष्यात पुढे जे जे दुःखोपभोग तिच्या वाट्याला आले, त्याचं बीज तिच्या आणि कुमारच्या पहिल्या भेटीतच रोवलं गेलं होतं. यापुढील कथा तर आणखी हृदयद्रावक आहे. अचानक नाहीसा झालेला कुमार सैन्यात भरती होतो आणि युद्धात मारला जातो तर विवाहित स्त्रीला पूÂस लावून पळवल्याच्या आरोपावरून डॉ. सतीश यांना तुरुंगवास भोगावा लागतो. अर्थात पोलीस अधिकारी दादासाहेब यांनीच सूडभावनेनं डॉक्टरांविरुद्ध हा बनाव घडवून आणलेला असतो, कारण त्यांची मुलगी अचला हिच्या प्रेमाला डॉ. सतीश यांनी नकार दिलेला असतो. या सर्व घटना-प्रसंगांबद्दल विचार करताना पुष्पमालेला असं वाटू लागतं की, ‘या साNया अनर्थाला मुळात मीच कारणीभूत आहे. हाताशी आलेलं सुख गमावण्यात आपण वेडेपणा तर केला नाही? खोट्या अभिमानाला बळी पडून आपण आत्मवंचना तर केली नाही? असे प्रश्नही तिच्या मनात येतात. तीन वर्षांच्या अवधीत कित्येक वेळा खोट्या अभिमानाला बळी पडून हाती आलेलं सुख मी स्वतःहून दूर लोटलेलं आहे. मला आयुष्यात सुख लाभण्याऐवजी माझी आणि सुखाची वारंवार फारकतच होत गेली. जणू काही सुखाचा आणि माझा लपंडावच चालू आहे.’ अर्थात ही या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आहे या कादंबरीतील घटना-प्रसंगांना स्वातंत्र्यपूर्व काळाची पाश्र्वभूमी आहे; त्यामुळे काही राष्ट्रीय चळवळी आणि राष्ट्रीय आपत्ती यांचा प्रासंगिक कथानकात चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतलेला आहे. खेर यांची लेखनशैली सोपी व सुबोध आहे. भवितव्यतेचा खेळ म्हणून आदी आणि अंत विविध प्रकारची वळणे घेत असतानासुद्धा एकाच वर्णनात बसतील असे जुळवले आहेत. कादंबरी वाचताना अगदी अखेरपर्यंत मनोरंजन होत राहाते. मात्र, या कलाकृतीचा परिणाम वाचकाला जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा गंभीरपणे विचार करावयास लावणारा आहे.
-
The Vault of Vishnu (दि व्हॉल्ट ऑफ विष्णू)
अश्विन संघी यांचे हे नेहमीप्रमाणे गूढ आणि उत्कंठावर्धक कथानक आहे, जिथे इतिहास आणि मिथक यांचा मिलाप होतो. `द व्हॉल्ट ऑफ विष्णू` या कादंबरीमध्ये पल्लवाचा राजकुमार कंबोडियाचा राजा होण्यासाठी जातो. सोबत त्याने जपून नेलेली गुपितेच अनेक शतकांनंतर युद्धाची कारणे बनतात. प्राचीन चीन मधील एक बुद्ध साधू एका कोड्याचे धागे शोधत भारतात येतो. ते कोडे सोडवल्याने त्याचा राजा सर्वशक्तिशाली होणार असतो. भारत - चीन सीमेवरील युद्धामुळे ज्ञानसंवर्धनासाठी आदिवासी जमातींनी चालवलेला लढा दुर्लक्षित राहतो. दरम्यानएक शास्त्रज्ञ कांचीपुरम मधील मंदिरातील प्राचीन लिपीचा अर्थ उलगडण्यात यशस्वी होतो. या प्रवासात सिक्रेट एजंट त्याच्या मागावर असतात. या सगळ्या वादळात एक अन्वेषक सापडते. तिचा स्वतःचाही गुंतागुंतीचा भूतकाळ आहे. जगाचा तोल सांभाळला जाण्यासाठी तिला काळ वेळेविरुद्ध शर्यत करावी लागते.
-
Mohanswami (मोहनस्वामी)
`गे` जीवनाच्या अंधकारमय कोशातून बाहेर पडण्याचा हा अखेरचा मार्ग असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न लेखकांंनी या पुस्तकामधून केला आहे. दोन पुरुषांमधील कामजीवनाचे वर्णन करणाऱ्या या कथा, परंपरागत रूढीमध्ये बंदिस्त असलेल्या समाजातील वाचकांच्या पचनी पडण्यासारख्या नाहीत. त्यामुळे ते चक्रावून जाण्याची शक्यता आहे. या पुस्तकातील मोहनस्वामीच्या कथांमध्ये लैंगिक जीवन, नागरीकरण आणि जातीपातींमधील संघर्ष यांचे रोखठोक आणि काहीशा स्पष्ट शब्दांत केलेले वर्णन वाचकांना अचंबित करण्याची शक्यता आहे.इंग्लिश , तेलुगू, मल्याळम् आणि स्पॅनिश भाषांमधून अनुवादित झालेल्या या पुस्तकाची मराठी आवृत्ती वाचकांसमोर ठेवून कन्नड साहित्याच्या एका महत्त्वाच्या पैलूचा परिचय करून देण्याचा आमचा मनोदय आहे. कार्तिक नावाच्या आपल्या दीर्घकालीन मित्राला मोहनस्वामी पारखा झाला आहे. एका सुंदर मुलीने कार्तिकला त्याच्यापासून हिरावून घेतले आहे. सर्व जुन्या आठवणी चितेप्रमाणे त्याला जाळत आहेत. तसे पाहिले, तर त्याची अपेक्षा काही फार मोठी नाही. एक साधे, सरळ मानाचे जीवन जगण्यासाठी तो धडपडत आहे. पुरुष गणिका, वाघीण अशी घाणेरडी नावे देऊन समाजाने त्याच्या मनावर जखमा केल्या आहेत. गतजीवनातील मनाला झालेल्या जखमा, अपमान, भीती, आतंक आणि वैफल्य हे सर्व विसरून नवीन जीवनाची वाटचाल सुरू करण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठीच आटापिटा सुरू आहे.
-
The Eleventh Commandment (द एलेव्हन्थ कंमांडमेंट)
मेडल ऑफ ऑनर विजेता कॉनर फिट्सगेराल्डची ही अफलातून कथा. कुटुंबवत्सल, सच्चा, फिट्सगेराल्ड अठ्ठावीस वर्षे दुहेरी आयुष्य जगतोय. एका निशान्यात लक्ष साधणारा हा सीआयएचा अतिशय तरबेज गुप्त मारेकरी. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना या दुहेरी आयुष्याला निरोप देण्याची स्वप्नं पाहत आहे. पण तेव्हाच त्याची प्रमुख हेलन डेक्स्टर त्याची शत्रू ठरतेय. डेक्स्टरचं सीआयएतलं भविष्य धोक्यात आलं आहे. आणि त्यातून निसटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फिट्सगेराल्डचा काटा काढणं. फिट्सगेराल्डला रशियाच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या हत्येसाठी नेमलं जातं, पण त्याच मोहिमेत फिट्सगेराल्डचा स्वतःचाच काटा काढण्याची योजना आखली जाते. आणि एक उत्कंठावर्धक नाट्य रंगतं. पानागनिक उत्कंठा वाढवणारं कथानक, दमदार पात्ररचना असलेलं जेफ्री आर्चरचं राजकीय नाट्य.
-
Mahasamrat Jhanjhavat Khand-1 (महासम्राट झंझावात ख
छत्रपती शिवरायांची जीवनगाथा म्हणजे स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जागवणारी धगधगती मशाल. या मशालीच्या ज्वाला महाराष्ट्राला शेकडो वर्षे प्रकाशमान करत आहेत. हाच प्रकाश दीप लोकप्रिय लेखक विश्वास पाटील यांच्या लेखनीतून वाचकांच्या भेटीस येत आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील महासम्राट या कादंबरीमालेतील हा पहिला खंड अर्थात झंझावात. छत्रपती शिवरायांच्या हदयात ज्या घटनांनी स्वराज्याचं स्फुल्लिंग जागवलं, त्या घटनांचा विस्तृत परीघ आणि अवकाश सादर करणारं हे पुस्तक आहे. शिवरायांच्या जन्मापूर्वीच्याही आधीच्या अज्ञात इतिहासावर प्रकाशझोत टाकत नवी ऐतिहासिक मांडणी यात आहे. जिजाऊ आणि शिवरायांचा विजापूर दौरा, शहाजीराजांच्या उपस्थितीतली शिवरायांची तालीम, हा इतिहासाचा पैलू मराठी वाचक प्रथमच वाचतील आणि तो वाचकांना भारावून टाकणारा ठरेल, यात शंका नाही.
-
Reshimgathi ( रेशीमगाठी)
’नाथ हा माझा’ या चरित्रग्रंथामुळे कांचन घाणेकर यांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला झाली. सुलोचनादीदींमुळे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांचा सहवास त्यांना लहानपणापासून लाभला. त्यामध्ये भालजी पेंढारकर, राजा परांजपे, चंद्रकांत, माई मंगेशकर, लता मंगेशकर अशा दिग्गज व्यक्तींचा समावेश होता. अशा सतरा दिग्गजांची भावचित्रं घाणेकर यांनी ’रेशीमगाठी’ या व्यक्तिचित्र संग्रहातून रेखाटली आहेत. त्या व्यक्तींशी कांचनजींचे जुळलेले भावबंध या संग्रहातून अधोरेखित होतात. सुलोचनाजी आणि काशिनाथ घाणेकर या त्यांच्या अत्यंत निकटच्या व्यक्तींंचं भावचित्रही त्यांनी रेखाटलं आहे. या संग्रहातून कांचनजींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलूही उलगडत जातात. शिवाय या व्यक्तींशी त्यांच्या आणि सुलोचनाजींच्या असलेल्या भावबंधाचं हृद्य दर्शन घडतं. या दिग्गजांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल न बोलता त्यांच्या सहवासातील भावक्षणांचं स्मरण कांचनजींनी या संग्रहातून केलेलं आहे. ते स्मरण त्यांच्या ओघवत्या भाषेत वाचणं हा एक अविस्मरणीय अनुभव ठरावा. तेव्हा या अविस्मरणीय अनुभवासाठी ’रेशीमगाठी’ अवश्य वाचलं पाहिजे.
-
Panipatche Ranangan (पानिपतचे रणांगण)
पानिपतची तिसरी लढाई प्रामुख्याने अहमदशहा अब्दाली आणि भाऊसाहेब पेशवे (नानासाहेब पेशवे यांचे भाऊ) यांच्यात लढली गेली. काय होती या लढाईमागची कारणमीमांसा आणि का झाला मराठ्यांचा घोर पराभव, का झाली एवढी मनुष्यहानी, याचा वेध विश्वास पाटील यांनी ‘पानिपतचे रणांगण’ या नाटकातून घेतला आहे. पेशवाईचं समूळ उच्चाटन करण्यासाठी उत्तरेकडील मुस्लीम सत्ताधारी (अहमदशहा अब्दाली हा त्यातील प्रबळ पातशहा) एकवटले. त्यांचा सामना करण्यासाठी भाऊसाहेब पेशवे विश्वासरावांसह पूर्ण सज्जतेनिशी, आत्मविश्वासाने उत्तरेच्या मोहिमेवर गेले; पण नानासाहेब पेशव्यांचा गहाळपणा, मल्हारराव होळकर आणि अन्य सरदारांनी इब्राहिम गारदीच्या गोलाची लढाईला (लढाईची एक पद्धत) ऐन रणांगणात फासलेला हरताळ यामुळे मराठ्यांचा मोठ्या प्रमाणात संहार होऊन त्यांना हार पत्करावी लागली. आपसातील लाथाळ्या केवढा प्रचंड राजकीय, आर्थिक, सामाजिक, भावनिक, मानसिक विध्वंस करू शकतात, हे दाहक वास्तव अधोरेखित करणारं नाटक.
-
Krushnam Vande Jagadgurum ( कृष्णं वन्दे जगद्गुरूम
श्रीकृष्णाच्या केवळ स्मरणाने अस्तित्वाविषयीचा अहंकार गळून पडतो. ‘कृष्णं वन्दे जगद्गुरूम!’ मधून कृष्णाचे अदृश्य दर्शनही मानवांत फार मोठा बदल घडवते, इथेच श्रीकृष्णाची थोरवी व प्रचिती मिळते. वर्तमानातल्या जगण्यातच हा कृष्ण आपलं सारथ्य करत असतो. या बदल्यात कृष्णाला काही नको असते, फक्त निखळ, निव्र्याज प्रेम व निर्लेप भक्ती हवी असते. सच्चेपण हवे असते; आणि ते त्याला मिळते. ‘महाभारता’तून जणू जीवनाचे नवरस मानवाची पाठराखण करतात. कारण–कृष्ण म्हणजे एक आदर्श आहे, पूर्णत्वाचा आदर्श! शेवटी काळ कोणताही असो, धर्म वा प्रदेश कोणताही असो, विविध काळांतल्या, धर्मांतल्या अथवा प्रदेशांतल्या अखिल मानवजातीला ईश्वराबद्दल जी एक उत्कंठा आहे, आणि जी अत्यंत उत्कट स्वरूपाची आहे, त्या उत्कंठेचा आविष्कार म्हणजेच, ‘श्रीकृष्ण’ होय.
-
Amrutyatra (अमृतयात्रा)
द्रोणाचार्य म्हणजे... ज्यांच्या पत्नीवर दूध मागणाऱ्या मुलास पाण्यात पीठ कालवून देण्याची वेळ येई असे दरिद्री ब्राह्मण...जातीचं कारण पुढे करून कर्णाची विद्यायाचना नाकारणारा आणि न शिकवलेल्या विद्यार्थ्यांकडे (एकलव्य) गुरुदक्षिणा मागण्याचा धूर्तपणा करणारा पक्षपाती गुरू...अर्जुनाच्या गुरुदक्षिणेच्या माध्यमातून द्रुपदाचा सूड उगवणारा, ब्राह्मणधर्म त्यजून क्षत्रियधर्माचा अंगीकार करणारा गरजवंत... मिंधेपणामुळे द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी गप्प राहिलेला हाQस्तनापूरचा पगारदार नोकर... असे द्रोणाचार्यांच्या व्यक्तित्वाचे विविध पैलू... पण द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न आपला अंत करण्यासाठी जन्माला आला आहे हे माहीत असूनही त्यालाच विद्यादान करणारा आचार्य...हा पैलू तसा अज्ञातच... मूळ संहिता सांभाळून त्याबाबत तर्कसंगत अनुमान काढण्याचा लेखकाचा प्रयत्न म्हणजेच ‘अमृतयात्रा.’
-
Vatchal Fergussionchi (वाटचाल फर्ग्युसनची )
IN 1879 TILAK AND AGARKAR STAYED IN THE SAME ROOM WHILE IN THE DECCAN COLLEGE HOSTEL. WHILE TALKING ABOUT THOSE DAYS HE SAYS; “BOTH OF US WERE COMPLETELY CAPTIVATED. WE COULD THINK OF NOTHING ELSE BUT THE CONDITION OF OUR COUNTRY. AFTER MUCH BRAIN STORMING WE BELIEVED THAT ONLY EDUCATION COULD RESCUE US FROM THE BAD SITUATION.” THIS BRAIN STORMING LATER RESULTED INTO A SCHOOL PROJECT. THE NEW ENGLISH SCHOOL WAS ESTABLISHED ON 1ST JANUARY 1880 UNDER THE ABLE LEADERSHIP OF VISHNU SHASTRI CHIPLUNKAR. THE DECCAN EDUCATION SOCIETY WAS ESTABLISHED ON 24TH OCTOBER 1884 WHILE FERGUSSON COLLEGE CAME INTO EXISTENCE ON 2ND JANUARY 1885. FERGUSSON COLLEGE COMPLETED 125 YEARS ON 2ND JANUARY 2005. FERGUSSON COLLEGE HAS ALWAYS BEEN ONE OF ITS OWN TYPES. IT WAS A COMPLETELY NEW VENTURE. IT IS A COMBINATION OF CONTRARY ASPECTS. IT ALLOWS FREEDOM OF THOUGHTS. IT HAS AIMED AT SELFLESSNESS. PERSISTENCE HAS BEEN AT ITS CORE. SINCE, IT WAS FIRST IN THE ROW, THERE WERE MANY TYPES OF PROBLEMS AND HURDLES LIKE IN ANY OTHER INSTITUTION. DIFFERENCE OF OPINION, GOVERNMENT OPPOSITION, ECONOMIC AND ADMINISTRATIVE CHALLENGES, EXTREME EFFORTS TAKEN IN AN ATTEMPT TO RUN THE INSTITUTION, THE TEACHERS’ CONTRIBUTION TO TAKE THE EDUCATION TO DEFINITE HEIGHTS, THE HONEST EFFORTS BY THE STUDENTS, THEIR LOVE FOR THE INSTITUTION, THEIR CONTRIBUTION IN DIFFERENT AREAS OF LIFE INCLUDING POLITICS, ECONOMICS, SOCIAL COMMITMENT, LITERATURE AND ART AND THE CONTINUOUS SUPPORT FROM THE SOCIETY HAD ALWAYS BEEN A PART AND PARCEL OF THE INSTITUTION. THIS BOOK TRIES TO FATHOM THESE VARIOUS ASPECTS. THIS BOOK IS DIVIDED INTO THREE PARTS: ESTABLISHMENT TO GOLDEN JUBILEE YEAR: 1885-1935; GOLDEN JUBILEE TO CENTURY: 1935-1985 AND CENTURY TO POST CENTURY SILVER JUBILEE: 1985-2010.
-
The Art Of Creative Thinkng (द आर्ट ऑफ क्रिएटीव्ह
सर्जनशीलतेचा रूढ अर्थ बदलवून टाकून, एका अगदी अभिनव संकल्पनेद्वारे सर्जनशीलतेचे अगणित पैलू लेखकानं या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत. ही सर्जनशीलता – रुळलेली वाट नाकारणारी, खडतर वाटेवर चालायला लावणारी, साहसपूर्ण प्रवासातून नवनिर्मितीच्या शोधाचा शुद्ध आनंद देणारी आहे. सर्जकता ही केवळ कलावंतांची मिरासदारी नाही, ती तुमच्या-आमच्यात, साध्यासुध्या माणसांत दडलेली असते. जगात आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण करणारे चित्रकार, शिल्पकार, नाट्यकर्मी, चित्रपटनिर्माते, अभिनेते, लेखक, वास्तुरचनाकार, संगीतकार, संशोधक... या सर्व लोकांनी दैनंदिन घटनांमधील वेगळेपण सदैव टिपलं आणि त्यातूनच नवनिर्मिती केली. प्रत्येक व्यक्तीत कल्पकता आहे, सर्जनशीलतेचा स्फुलिंग आहे, असा दिलासा देणारी असंख्य उदाहरणं या पुस्तकात जागोजागी विखुरलेली आहेत. लेखक स्वत:च एक अत्यंत प्रतिभावान कलाकार आहे. कलाक्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तींच्या उदाहरणांसह त्यांनी सर्जनशीलतेबद्दल मार्गदर्शन केलं आहे.
-
Criminals In Uniform (क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म)
देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ माजवणाNया घटनेचा ‘आंखो देखा हाल’रंजक अविष्कारात...प्रत्यक्ष कुबेराचाच वरदहस्त असलेला कुबेर... ‘कुबेरिया’ या त्याच्या अलिशान निवासासमोर एक अज्ञात स्कॉर्पिओ आढळते आणि सुरू होतं उत्सुकता आणि थरारानं भरलेलं नाट्य... तरुण मुंबई पोलीस आयपीएस अधिकारी महावीर तोमर आयुक्तपदाच्या अति महत्त्वाकांक्षेपोटी, पैशांच्या हव्यासापोटी पैसा वसुलीतंत्र अवलंबतो. हाताखालच्या पोलीस कर्मचाNयांची गुन्हेगारी टीमच बनवतो...कायदा, सुरक्षायंत्रणांनाही न जुमानता राक्षसी कल्पना अवलंबतो...एकही पुरावा मागे न ठेवता तो मगरूरपणे जगत असतो... अखेर एके दिवशी पर्दाफाश होतोच... हा पोलीस आयुक्त कायद्याच्या अक्राळ-विक्राळ जबड्यात सापडतोच...! कसा...? कुठे...? जाणून घेऊ या... ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’मधून.
-
Krushnasakha (कृष्णसखा)
कृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. कृष्ण एकमेव असे आहेत जे जीवनाला पूर्णत्वाने स्वीकारतात. म्हणूनच सामान्य माणसालाही ते परिपूर्णतेने जगायला शिकवतात आणि जीवनरूपी द्वंद्वाला भिडायलाही शिकवतात. ओशोंच्या मते विरक्त होणं, शांतीचा मार्ग धरणं हे चुकीचं नसलं तरी त्यातून जीवनापासून पळण्याची एक वृत्ती दिसते. त्याउलट कृष्ण जीवनाला निर्भयपणे सामोरं जायला सांगतात. कृष्णांचं इतर संत-महात्म्यांच्या तुलनेतील वेगळेपण ओशोंनी विविध उदाहरणांतून, विवेचनातून या पुस्तकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
-
Pidhi Dar Pidhi (पिढी दर पिढी)
ही कादंबरी वांग युआन या तरुणाच्या जीवनाभोवती फिरते. त्याचे वडील टायगर वांग सरदार असतात. सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळेत राहून शिकणारा युआन अचानक घरी येतो; कारण क्रांतिकारकांच्या सैन्यामध्ये जाऊन स्वतःच्या वडिलांविरुद्ध त्याला लढायचं नसतं. त्यानंतर आजोबांच्या जुन्या मातीच्या घरात रमलेल्या युआनला टायगर पुन्हा घरी बोलावतो, तेव्हा युआन रागानं घराबाहेर पडतो आणि आपल्या सावत्र आईकडे जातो. तिथे त्याला आय-लान ही बहीण, तसेच जमीनदार वांग आणि व्यापारी वांग हे दोन थोरले काका आणि त्यांची बायका-मुलं असा गोतावळा भेटतो. शिक्षणासाठी युआन परदेशी जातो. मोठ्या विद्यापीठात शेतकी शास्त्राचं शिक्षण घेऊन सहा वर्षांनंतर मायदेशी परत येतो. आईने आश्रमातून सांभाळायला आणलेली, डॉक्टर होऊ इाQच्छणारी मी-लिंग युआनला आवडते. मात्र, तिला प्रथम शिक्षण पूर्ण करायचे असते. युआनही वडिलांचे कर्ज फेडणे आपले कर्तव्य आहे असे मानून नोकरी करू लागतो. वास्तवता-भावपूर्णतेचा अनोखा संगम.