-
The Kill List ( द किल लिस्ट)
दहशतवादाची समस्या जगातल्या महत्त्वाच्या देशांना भेडसावताना दिसते. अमेरिकेत दहशतवादानं थैमान घातलेलं असतानाच इंग्लंडमध्येही ते थैमान सुरू होतं आणि मग इंटरनेटवरून एक बुरखाधारी इस्लामी पाश्चात्त्य जगाविरोधात अतिविखारी भाषणं देताना, प्रचार करताना आणि पाश्चात्त्यांच्या हत्येचं आवाहन करताना आढळतो. त्याला टोपण नाव दिलं जातं. द प्रीचर. त्याच्या शोधाची जबाबदारी एका अधिकाऱ्याकडे सुपूर्द केली जाते. त्या प्रीचरपर्यंत हा अधिकारी कसा पोहोचतो आणि त्या शोधादरम्यान या दहशतवादाशी संबंधित घटनांची आणि व्यक्तींची संगती कशी लागत जाते, याचं थरारक चित्रण म्हणजे ‘द किल लिस्ट’ ही कादंबरी. दहशतवादाच्या रंदावलेल्या कक्षा, त्याची पाळंमुळं खणून काढण्याचं आव्हानात्मक आणि धाडसी काम, आधुनिक तंत्रज्ञानाचा दहशतवाद्यांकडून होत असलेला गैरवापर आणि या अनुषंगाने येणाऱ्या अनेक बाबींवर ‘द किल लिस्ट’ ही कादंबरी प्रकाश टाकते. त्यातील थरार अनुभवण्यासाठी ती वाचलीच पाहिजे.
-
Never Marry A Woman With Big Feet (नेव्हर मॅरी अ व
स्त्रीचा देह असो वा आत्मा..जगभरच्या म्हणींनी या स्त्रीरूपाचे नानाविध अविष्कार सादर केले आहेत. या म्हणींमधून स्त्रियांचं सामाजिक स्थान अधोरेखित होतं. याचं सखोल चिंतन आणि २४५ भाषांमधील स्त्रीविषयक म्हणी आणि त्यांची विश्लेषणे या पुस्तकात समाविष्ट आहेत. लेखिका मिनेक शिप्पर यांच्या अतिशय रंजक व टीकात्मक संकलन शैलीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यांतील शाश्वत तरीही सतत विकसनशील असलेल्या म्हणींमधून स्त्री व पुरुष दोघेही किती विकसित झाले आहेत, याची एक ढोबळ आकृती वाचकांसमोर स्पष्ट होते.
-
Dharmayuddha (धर्मयुद्ध)
महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेने नानाविध पैलूंमुळे अनेक कलावंतांना भुरळ घातली आहे. कोणालाही लाजवेल अशी क्षमता, योग्यता आणि सामथ्र्य असूनही पदोपदी डावलला गेलेला कर्ण हे तेजोभंगाचे जिवंत प्रतीक आहे. अखंड संघर्षाने जीवनभर होरपळून निघालेल्या या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी आपल्या पद्धतीने केला आहे. कवचवुंÂडले, संजयाची दिव्यदृष्टी, श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र, त्याचा गोवर्धन पर्वत बोटावर उचलण्याचा पराक्रम, द्रौपदीच्या वस्त्रहरणप्रसंगी कृष्णाकडून तिला पुरविण्यात आलेली वस्त्रे अशा अनेक चमत्कृतिपूर्ण घटनांची साखळी महाभारतात आढळते. तरीही तत्कालीन वर्णव्यवस्थेविरुद्ध वेळोवेळी बंड पुकारणारा कर्ण इतर अनेक सामथ्र्यशाली व्यक्तिरेखांच्या भाऊगर्दीत प्रकर्षाने नजरेत भरतो. या कथेतील सर्वच व्यक्तिरेखा मानवी संसारातील सुखदुःखे अनुभवत असल्याची जाणीव होते. ही माणसेही आपल्यासारखीच संसारातील समस्यांना सामोरी जाताना दिसतात. नेमका हाच दृष्टिकोन स्वीकारून आणि पारंपरिक दृष्टी निग्रहाने अव्हेरून कर्णकथेचा वेध घेणारी रवींद्र ठाकूर यांची ‘धर्मयुद्ध’ ही कादंबरी. इतर मराठी कादंबNयांमध्ये चित्रित झालेल्या कर्णापेक्षा ‘धर्मयुद्ध’मधील कर्ण मातीचे पाय असलेल्या व्यक्तिरेखांच्या अधिक जवळचा आहे.
-
Hell Mates (हेल मेट्स)
सत्य आठवणी व काल्पनिक प्रसंग यांना विनोदाचा मसाला लावून द्वैअर्थी शब्दांची फोडणी देऊन डॉ. नंदकमुार उकडगावकर यांनी लिहिलेल्या अठरा लेखांचं पुस्तक आहे ‘हेल मेट्स.’ शाब्दिक कोट्या हा या पुस्तकाचा गाभा! रोजच्या वापरातील शब्दांना वेगळे संदर्भ लावून हास्य फुलवता येते हे दाखवण्यासाठी केलेला हा खटाटोप. या लेखसंग्रहाचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे -अर्धा शब्द मराठीतला व अर्धा इंग्रजीतला घेऊन काही नवीन शब्द तयार केले आहेत. त्यामुळे उच्चार जरी सारखा असला तरी त्यातून दोन वेगवेगळे अर्थ निघतात. उदा. बायो व MATRIC • बायोमॅट्रिक. या शिवाय प्रचलित शब्दांना नवे अर्थ लावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. उदाहरणार्थ पाठ्यपुस्तक • पाठीवरचा मजकूर. ‘सवंगडी,’ ‘माझे हेल मेट्स,’ ‘माझं पाषाणयुग,’ ‘माझं पाठ्यपुस्तक,’ ‘आमची स भु’ या लेखांमध्ये शाळेतील आठवणी आहेत. सोबत आत्मचरित्राच्या जवळपास जाणारे ‘माझं ‘कृष्णा’यण,’ ‘आमचं ‘वैद्य’कीय महा ‘विद्या’लय,’ ‘किस्सा एमडीचा’ व ‘मा मा (माझी मास्तरकी)’ लेखही आहेत.
-
Sanvad Parmeshwarashi (संवाद परमेश्वराशी)
मानव परिवाराचं पुनरुज्जीवन करणं, हा संवाद परमेश्वराशी – भाग ३’ या पुस्तकामागचा उद्देश आहे. स्वत:ला जाणून घेऊन नव्या दिशेने कसं जायचं याचं मार्गदर्शन या पुस्तकात केलं आहे. केवळ माणसाच्या जन्माला येणं, जगणं आणि मरणं, एवढीच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता नाही, तर अखंडपणे स्वत:ची उन्नती करत राहणं, हे त्याच्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे, असा विचार या पुस्तकात मांडला आहे. आपण कोण आहोत आणि काय होऊ शकतो याबद्दल हे पुस्तक बोलतं. ते जुन्या आणि नव्या मार्गांबद्दल संगतं, तसंच ते नव्या-जुन्या समजुती, कालबाह्य संकल्पना आणि सदैव उपयोगी संकल्पना यावरही भाष्य करतं. भूत आणि भविष्याच्या मध्यावर उभा राहून माणूस सतत प्रगती कशी करत राहील, नवनिर्मितीच्या दिशेने त्याची पावलं कशी पडतील, याचं विस्तृत विवेचन या पुस्तकातून केलं आहे.
-
Cure ( क्युअर)
सातोशी माचिता या जपानमधील जैवतंत्रज्ञान विषयामधील शास्त्रज्ञाची न्यू यॉर्कमधल्या एका सब वे प्लॅटफॉर्मवर बेमालूमपणे हत्या केली जाते. त्याने स्टेम सेल्सच्यासंबंधी लावलेला एक महत्त्वाचा शोध... जपानच्या क्योटो युनिव्हर्सिटीत मिळालेली वाईट वागणूक... बेन कोरी या अमेरिकेतल्या एका कंपनीच्या सीईओने जपानमधील माफियांच्या मदतीने सातोशीला त्याच्या कुटुंबासकट अमेरिकेत आणून करार करणे... अशी सगळी पार्श्वभूमी आहे सातोशीच्या हत्येमागे...न्यू यॉर्कमधल्या ‘ओसीएमई’ या फॉरेन्सिक विभागात काम करत असलेली लॉरी माँटगोमेरी या हत्येचा तपास करायला लागते आणि सुरू होतो जीवघेणा संघर्ष. या संघर्षाचं थरारक चित्रण करणारी उत्कंठावर्धक कादंबरी आहे-क्युअर.
-
Dharmanmadhil Bandhutvachya Margavar (धर्मांमधील ब
जगभर धार्मिक हिंसेच्या वाढत्या घटनांकडे पाहता धर्माधर्मांमधील संवाद काळाची गरज बनला आहे. परमपूज्य बौध्द धर्मगुरू दलाई लामा अशा धर्मांतर्गत संवादासाठी विशेष प्रयत्नशील आहेत. धर्मांमधील बंधुत्वाची गरज अधोरेखित करताना ते सर्वधर्मीय शिकवणींचा समग्र मागोवा घेतात. या त्यांच्या चिंतनात्मक पुस्तकात सर्व धर्मांमधील एकसूत्रता आणि सहिष्णुतेची शिकवण अधोरेखित होते.
-
Te 127 Taas (ते १२७ तास !)
अॅरन हा साहसी गिर्यारोहक एकदा कॅन्यनलँड्स या वाळवंटात गिर्यारोहणासाठी गेलेला असताना एका दगडाखाली अडकतो. त्याचा उजवा हात मनगटापासून कोपरापर्यंत चिरला जातो. त्याचा तो जखमी हात दगडाखाली अडकतो. जवळ मोजकंच खाद्य आणि पाणी...अशा परिस्थितीत सुरू होतो वेदनामय संघर्ष...त्या दगडापासून हात सोडवण्यासाठी त्याचे चालू असेलेले विविध प्रयत्न... पूर्वी केलेल्या साहसी मोहिमांच्या मनात दाटलेल्या आठवणी... एका बाजूला प्रचंड वेदना... जवळ असलेल्या व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे आपल्या प्रियजनांबद्दल व्यक्त केलेल्या भावना... अॅरनच्या वेदनामय संघर्षाची थरारक, हलवून सोडणारी कहाणी ‘ते १२७ तास...’
-
HMS Ulysses (एच एम एस युलिसिस)
ही कहाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहे. रशियाचे जर्मनीशी युद्ध सुरू असते, आणि एफआर ७७ या मालवाहू आणि तेलवाहू जहाजांच्या ताफ्यामार्फत रशियाला जर्मनीशी लढण्यासाठी अत्यंत निकड असलेले युद्धसाहित्य पोचवण्याची योजना असते. एचएमएस युलिसिस ही ब्रिटिश आरमारातील एक क्रूझर जातीची युद्धनौका या ताफ्याची फ्लॅगशिप असते. तिच्या साथीला आणखी छत्तीRस जहाजे या ताफ्यात असतात. भयंकर थंडी, बर्फवृष्टी, प्रचंड वादळे, चिडलेले व निराश झालेले नौसैनिक, त्यांची झालेली प्रचंड उपासमार, थकवा, झोपेचा अभाव, आणि ताफ्याने रशियापर्यंत पोचता कामा नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारी जर्मन बॉम्बर विमाने, युद्धनौका आणि यू-बोटी, अशा पार्श्वभूमीवरील या ताफ्याच्या– आणि पर्यायाने युलिसिसच्या– प्रवासाची ही कहाणी आहे. या सगळ्या विपरीत परिस्थितीला युलिसिसवरील सगळे अधिकारी आणि नौसैनिक ज्या असीम धैर्याने आणि शौर्याने तोंड देतात त्याचे भेदक वर्णन ‘एचएमएस युलिसिस’ या कादंबरीत आहे.
-
Let Her Fly (लेट हर फ्लाय)
समानतेच्या लढ्यात आपल्या मुलीच्या जीवाची बाजी लावावी लागली, पण तरीही एका पित्याने हार मानली नाही. पाकिस्तानातल्या एका लहानशा खेड्यात जन्मलेल्या एका मुलाची आणि नोबेल पुरस्कारप्राप्त मलाला युसफजाई हिच्या पित्याची ही कहाणी. ज्यात त्यांच्यावरच्या पारंपरिक संस्कारांपासून ते पाकिस्तानातील आजची स्थिती आणि स्त्रीसक्षमीकरणाच्या चळवळीच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
-
Kahani Pahilya Aagingadichi (कहाणी पहिल्या आगीनगाड
भारतात १८५३मध्ये पहिली रेल्वे धावली. या शोधाने भारतीय जनजीवनाचा चेहरामोहरा बदलला. या पहिल्या आगीनगाडीच्या आगमनाची कहाणी अनेकानेक रोचक गोष्टींनी भरलेली आहे. . रेल्वेच्या विस्तारित जाळ्याबरोबरच अनुषंगिक प्रसंग,रेल्वे स्थानकाच्या निर्मितीचा इतिहास आणि त्या संदर्भातील छोटे उपकथानक या सर्वांचा रोचक, ऐतिहासिक वृत्तान्त या पुस्तकात समाविष्ट आहे. मुंबईतलं पहिलं वाफेचं इंजिन,आगगाडीला भुताटकी समजणारा भोळा समाज आणि त्यावेळच्या गमतीजमतींसह तत्कालीन अद्भुत व चित्ताकर्षक तपशीलवार गोष्टींमुळे त्या सोनेरी दिवसांचं चित्रच जणू डोळ्यांसमोर उभं राहातं.
-
Bhalya Dilacha Manus (भल्या दिलाचा माणूस)
सातेक वर्षांच्या बिट्टूच्या घरी एक दिवस अनोळखी पाहुणा अवतरतो. भारदस्त शरीरयष्टी आणि डोक्यावर रूबाबदार हॅट असणारा घोडेस्वार (शेन) बिट्टूच्या घरच्या पाहुणचाराने जणू कुटुंबाचा सदस्यच होऊन जातो. पण तरीही त्याच्याभोवतीचं गूढ वलय तसंच असतं. हा पाहुणा त्या घरच्या सुखदु:खांसोबत तिथली संकटंही स्वत:च्या खांद्यावर पेलतो. बिट्टूच्या कुटुंबाच्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्या जमीनदाराची त्या कुटुंबप्रमुखावर मारेकरी घालण्याची योजना तो हाणून पाडतो आणि त्या जमीनदारालाही संपवतो. बिट्टूसोबत तर त्याचं खास जिवाभावाचं नातं जडतं. अभिजात अमेरिकन साहित्यातील सर्वांत रोमॅन्टिक हिरो ठरलेला हा शेन आणि बिट्टूच्या कुटुंबाच्या नितळ स्नेहाची ही हृद्य कहाणी... मनाला भिडणारी.
-
Devachi Manse (देवाची माणसे)
फादर लतूर आणि फादर जोसेफ व्हेलट यांच्या आयुष्यावर आधारित कादंबरी आहे ‘देवाची माणसे.’ न्यू मॅक्सिको इथं खिश्चन धर्माच्या प्रसारासाठी मुख्य बिशप यांनी निवडलेला फादर लतूर सँता फेला फादर जोसेफ व्हेलटसोबत पोहोचल्यावर तिथले धर्मगुरू त्याचा अधिकार मानण्यास नकार देतात. ड्युरँगोच्या धर्मगुरूंच्या अखत्यारीतील या चर्चला फादर लतूरच्या निवडीची अधिकारपत्रेच पोहोचलेली नसतात. तीन सहस्त्र मैलांचा प्रवास करून फादर लतूर ड्युरँगोच्या बिशपला भेटायला जातात. अधिकारपत्रे मिळवून पंधराशे मैलांचा प्रवास करून सँता फेला परत येतात. तोपर्यंत फादर जोसेफ व्हेलटनं स्थानिक चर्च अधिकाऱ्यांची मर्जी संपादन केलेली असते. त्यामुळे कोणताही वैरभाव न ठेवता फादर लतूरचं स्वागत होतं. धर्मप्रसाराच्या कामाबरोबरच तो सँता फेमध्ये नवं चर्च उभारण्याचं कामही हाती घेतो. या दोन धर्मगुरूंचं काम आणि नव्या वातावरणाशी जुळवून घेतानाचा संघर्ष या कादंबरीतून प्रत्ययास येतो.
-
Dadlela Itihas (दडलेला इतिहास)
‘दडलेला इतिहास’ (HIDDEN HISTORY) हे पुस्तक पहिल्या महायुद्धास जबाबदार असणाऱ्या लोकांना वैशिष्ट्यपूर्ण रीतीने उजेडात आणते. लंडनमधील धनाढ्य आणि प्रभावशाली अशा व्यक्तींनी अगदी गुप्तपणे एक कंपू करून हेतुत: सिक्रेट सोसायटीची स्थापना केली व त्याद्वारेच मानवतेविरुद्ध घडवून आणलेला अतिशय क्रूर पाशवी गुन्हा म्हणजे पहिले महायुद्ध. जगापासून आपली गुन्हेगारी लपवून ठेवण्यासाठी या लोकांनी जाणूनबुजून युद्धाच्या उगमांची खोटी व दिशाभूल करणारी कारणे कशी तयार केली व ती खोट्या इतिहासाद्वारे जगासमोर कशी मांडली हे या पुस्तकाने उघड करून दाखविले आहे. (हाच खोटा इतिहास गेल्या शतकभर शाळा-कॉलेजांतून व विद्यापीठांतून शिकविला जातो आहे.) या पुस्तकातून एक खेचून घेणारे आव्हान उभे केले आहे व लेखकद्वयाचे एवढेच सांगणे आहे की, त्यांनी तुमच्यासमोर मांडलेल्या पुराव्यातले सत्य वाचकांनी पडताळून पाहावे.
-
Pratishruti Smaranyatra Bhishmanchi (प्रतिश्रुती स
शरपंजरी पडलेले भीष्म आपला जीवनपट पाहत आहेत. कुरुकुलासमोर आता राजगादीला वारस कोण, असा प्रश्न उभा राहिला त्या वेळी त्यांनी प्रतिज्ञा मोडण्यास दिलेला नकार... द्रौपदीला राज्यसभेत फरपटत आणलं तो प्रसंग... कौरव-पांडव युद्ध इ. प्रसंगांना त्यांची प्रतिज्ञाबद्धता कारणीभूत होती, असा आरोप त्यांच्या जवळच्याच व्यक्तींकडून त्यांच्यावर केला गेला...हे सगळं त्यांना आठवतंय... भीष्मांवरच्या या आरोपाची आणि शरशय्येवर त्यांनी केलेल्या आत्मचिंतनाची नाट्यमय गाथा आहे ‘प्रतिश्रुती : स्मरणयात्रा भीष्मांची.’
-
Vadachya Zadakhali (वडाच्या झाडाखाली)
एक बंडखोर तरुण त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या लहानपणी पूर्वापार कुठल्यातरी देवळात जाऊन केलेला जुना नवस फेडण्याचा आदर करण्याऐवजी त्यांना नकार देतो... एक चलाख, चुणचुणीत दिसणारा तरुण मुलगा सगळ्यांवर छाप पडून विश्वास संपादन करतो आणि नंतर एका दुकानदाराचे दिवाळे काढतो... एक शिक्षक पालकांनी लाडावलेल्या लहान मुलाकडून अभ्यास करून घ्यायला येतो, पण तो मुलगा त्या शिक्षकाला अजिबात दाद न देता दुसऱ्याच गोष्टीत भरकटत ठेवतो...खुसखुशीत विनोदाची फोडणी असणाऱ्या आणि भोवतालाशी घट्ट वीण सांगणाऱ्या मालगुडीस्टाइल रम्य कथांचा संग्रह ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा.’
-
Mahatma Gandhi Ani Tyancha Bhartiya Sangharsh (महा
‘महात्मा गांधीं आणि त्यांचा भारतीय संघर्ष’ (ग्रेट सोल महात्मा गांधी) हे पुस्तक गांधींच्या जीवनाचा सर्वांगीण वेध घेतं. गांधींनी पाहिलेली मोठ्या कार्याची स्वप्ने, सामाजिक मूल्यांचे त्यांना आलेले भान आणि अहिंसक प्रतिरोधाचे त्यांचे तत्त्वज्ञान परक्या उपखंडात (दक्षिण आफ्रिकेत त्यांनी घालविलेल्या दोन दशकांत) कसे फुलले, पोसले गेले आणि त्यांना ‘महात्मा’ म्हणून डोक्यावर घेणाऱ्या भारताने त्यांची तत्त्वं कशी पायदळी तुडवली, याचे वर्णन या पुस्तकात आहे. महात्मा गांधी एक प्रतिाQष्ठत वकील, जो राजकीय आणि सामाजिक कृति-कार्यक्रमांना स्वत:ला वाहून घेताना पंचा गुंडाळलेला संन्यासी कसा होतो याचे मनोज्ञ दर्शन या पुस्तकातून घडते. या नेत्याने दीर्घ काळापासून उभारलेल्या अहिंसक चळवळीचे पर्यवसान शेवटी भारताच्या विभाजनात, पाकिस्तानच्या निर्मितीत कसे झाले आणि जातिसंहाराच्या रक्तपाताने डागाळलेला हा प्रवास अखेरीस त्यांच्या स्वत:च्या हत्येपाशी जाऊन कसा थांबला, याचे वर्णनही या पुस्तकात आहे.
-
Pratibhecha Indradhanu (प्रतिभेचा इंद्रधनू)
कल्पनाशक्ती ही दैवी देणगी नसून, तिला विज्ञानाचा आधार आहे, हाच विषय चर्चिला गेला आहे ‘प्रतिभेचा इंद्रधनू’ या पुस्तकातून. सुबक वैज्ञानिक प्रयोग आणि अभ्यासांतून, हा विषय स्पष्ट केला आहे. शिवाय, वास्तव जगात क्रिएटिव्हिटीचे पडसाद कसे उमटतात, बॉब डिलनची लिखाणाची पद्धत आणि कवींच्या अमली पदार्थांच्या सवयी, रसायनशास्त्रज्ञासारखा विचार करणारा बार टेंडर, ऑटिस्टिक असलेला भन्नाट सर्फर, अशक्यप्राय वाटणाऱ्या समस्या सोडविणारी वेबसाईट, पिक्सार स्टुडिओजच्या पडद्यामागच्या गमती याकडेही लक्ष वेधलं आहे. यो-यो मा ‘इम्प्रूव्हाइज’ कसं करतो आणि सतत नवनवीन कल्पनांना वास्तवात आणणाऱ्या कंपन्यांचं गुपित काय, याचंही विवेचन केलं आहे. न्यूरॉन ते घासूनपुसून तयार झालेली सिम्फनी आणि मेंदूतलं सर्किट ते एखादं यशस्वी प्रॉडक्ट– यादरम्यान असलेले असंख्य पदर या पुस्तकातून उलगडून दाखवले आहेत.
-
Cheharyamagchi Reshma (चेहऱ्यामागची रेश्मा)
सतरा वर्षांच्या नाजूक देखण्या रेश्मा कुरेशीला तिच्या एका नातलगानं भर रस्त्यात पकडून जमिनीवर पाडून तिच्या चेहऱ्यावर अॅसिड ओतलं. जिवंत प्रेताप्रमाणे काही क्षणांतच तिचं शरीर जळू लागलं. पण ते अॅसिड तिच्या हृदयातील जगण्याची ठिणगी मात्र विझवू शकलं नाही. दुर्दैवाच्या गर्तेतून रेश्माने झेप घेतली ते थेट जागतिक सन्मानाच्या पातळीवर. न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करणारी, अॅसिड हल्ल्यातून वाचलेली पहिली मुलगी म्हणून तिचं नाव जगभरात गाजलं. रेश्माच्या जिद्दीची प्रेरणादायी आणि सकारात्मक जीवनसंदेश देणारी ही कहाणी.
-
Aahe Kattar Tari (आहे कट्टर तरी)
धार्मिक मूलतत्त्ववादाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात ‘द गुड मुस्लिम’ची कथा आकार घेते. सोहेलच्या जीवनात एक बलात्कारपीडित महिला येते आणि अचानक गायब होते. त्याची डॉक्टर बहीण माया युद्धपीडित महिलांवर उपचार करत असते. जेव्हा दशकभरानंतर ती घरी परतते तेव्हा सोहेल त्याच्या क्रांतिकारक आदर्शांपासून दूर गेल्याचे तिच्या लक्षात येते. युद्धात नवरा मारला गेलेल्या सिल्व्हीशी त्याने केलेला विवाह, तिच्या धार्मिक गोष्टींचा सोहेलवर पडलेला प्रभाव, तिच्यापासून झालेल्या सोहेलच्या झैदी या छोट्या मुलावरही कडव्या धर्मांधतेचा असलेला अंमल, सिल्व्हीच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर सोहेलचा झैदला मदरसामध्ये पाठवण्याचा निर्णय, यातून बहीण-भावामध्ये उभा राहतो संघर्ष, त्यात मायाच्या आईला झालेला कॅन्सर. जॉय हा सोहेलचा मित्र मायाशी लग्न करू इच्छितो. या सगळ्या परिस्थितीत माया जॉयशी लग्न करते का? झैदचं काय होतं? युद्धाच्या पार्श्वभूमीवरील एक जबरदस्त कादंबरी.
-
Twelve Red Herrings (ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज).
तुरुंगात खितपत पडलेल्या एका कैद्याची खात्री असते की, ज्याच्या खुनाचा त्याच्यावर आरोप आहे, तो माणूस जिवंत आहे... एक चंचल सुंदरी चतुराईनं नवरा आणि नवीन धनिक सावजाकडून वाढदिवसाची भेट मिळवते... वडिलांच्या सांगण्याप्रमाणे नौकानयनपटूने बोटक्लब हाउसला भेट म्हणून दिलेल्या ऐतिहासिक वस्तूचीच चोरी होते... कथा-कादंबरी लेखकाला स्तंभलेखन करणारा त्याचा मित्र भोजनादरम्यान जी कल्पना ऐकवतो त्यावर लेखकाने आधीच कादंबरी लिहिलेली असते... एक धोकादायक वाटणारा माणूस एका महिला-ड्रायव्हरचा हायवेवर पाठलाग करतो... एका तरुण कलावतीला आयुष्यातली सर्वांत मोठी संधी मिळते... चतुर मांडणी, अनोखी व्यक्तिमत्त्वं, कल्पक कथानक आणि अनपेक्षित शेवट असलेल्या बारा कथांचा संग्रह ‘ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज.’
-
Aage Badho (आगे बढो)
नॅट अर्थात बो-डिचची ही जीवनकहाणी. लहानपणापासूनच गणित विषयाच्या आवडीमुळे त्याच्यात हार्वर्ड विद्यापीठात शिकून पदवी मिळवण्याची इच्छा रूजलेली. पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला शाळा सोडावी लागते. जहाजावर हिशेबनीस म्हणून काम करताना सागरी प्रवासाच्या अनुभवविश्वाशी नॅटची ओळख होते. या प्रवासात त्यानं मिळवलेलं ज्ञान आणि त्याची अपार इच्छाशक्ती त्याला त्याच्या इच्छित साध्यापर्यंत पोहोचवते. नौकानयन शास्त्रात नॅटनं केलेल्या विलक्षण कामाचा हा एक अर्थी साहित्यिक दस्ताऐवजच होय.
-
Eka Lalasene (एकालालसेने)
तीन मुलांची आई असलेली स्त्री लग्नापूर्वीच्या तिच्या प्रियकराबरोबर संबंध ठेवून आहे, तिच्या तरुण मुलीला आईचा हा व्यभिचार बघवत नाही...एक नेपाळी नोकर ज्या कुटुंबात काम करत असतो, त्या कुटुंबातील चौघांचा खून करून पळून जातो आणि कसं बदलतं त्याचं जीवन... धरणाच्या बांधकामाच्या एका साइटवरच्या कंत्राटदाराच्या मनामध्ये एका आदिवासी स्त्रीबद्दल जबरदस्त लालसा निर्माण होते, तो तिला घरी आणून आपल्या निगराणीखाली ठेवतो – ती `दुसऱ्याची बायको` असते तरी. अभिलाषा, जवळीक व प्रेमावर आधारित, मनोव्यापाराचे सूक्ष्म विभ्रम दर्शविणाऱ्या आणि भारताच्या विविध भागांत घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रांतांतील वैशिष्ट्यांचा, सामाजिक रूढी-परंपरांचा अचूक मागोवा म्हणजे ‘एका लालसेने’ हा कथासंग्रह.