-
Gas Chamber (गॅस चेंबर)
रत्नाकर मतकरी हे रुढार्थाने ललित लेखक असले तरी त्यांच्यामध्ये एक राजकीय निरीक्षक जागता असे. आपल्या भवतालातील गुंतागुंतींचा विचार करणं आणि तो विचार ललित कलाकृतींतून निर्भीडपणे वाचकांसमोर मांडणं ही लेखक म्हणून आपली सामाजिक बांधिलकी आहे , असं ते मानत. ‘गॅस चेंबर' मधल्या कथा वाचताना ही गोष्ट पुन्हा एकदा जाणवते.या संग्रहातील कथा अस्वस्थ वर्तमानाचं प्रतिबिंब टिपत भविष्यकाळाचं सूचन करणाऱ्या आहेत. या कथांना आजच्या काळाचा संदर्भ आहे. त्यापलीकडे या कथा एकुणात एकाधिकारशाही आणि तिच्या पकडीखाली दबल्या गेलेल्या समाजाबद्दलही बोलतात.
-
Shetkari Jevha Jaga Hoto (शेतकरी जेव्हा जागा होतो)
या पुस्तकाचा नायक आहे पुंजाबाबा गोवर्धने. स्वातंत्र्यानंतर लगेचच झालेल्या भात उत्पादक शेतकरयांच्या लढ्याचा सेनापती. पुंजाबाबांचं हे चरित्र वाचत असताना मला अनेकदा असं वाटून गेलं. की पुंजाबाबांचं नेतृत्व माझ्यापेक्षाही अधिक गुणवत्तापूर्ण आणि कष्टाळू असं होतं. पुंजाबाबांची पार्श्वभूमी खेडेगावातील अशिक्षित शेतकऱ्याची होती,तरीही त्यांनी विचाराची मोठी झेप घेतली आणि अलौकिक कार्य करून ठेवलं. पुंजाबाबांचं हे चरित्र म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या एका पर्वाचा इतिहासच आहे!
-
Vaidyakacha Bajar (वैद्यकाचा बाजार)
डॉ. श्रीराम गीत यांनी या पुस्तकात एका वेगळ्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. सध्या वैद्यकीय क्षेत्रात ज्या गैरप्रवृत्ती शिरल्या आहेत त्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. हल्ली आजारी पडणं हे महाखर्चिक झालं आहे असं सर्रास बोललं जातं. याच मुद्द्याचा त्यांनी सविस्तर वेध घेताना विविध आजार, त्यावरील उपचार पद्धती, तसंच कोणत्या बाबींमुळे खर्च वाढतो, याची चर्चा केली आहे. आपल्या वैद्यकीय व्यवसायातील निरीक्षणे, विविध सेमिनारमधील सहभाग, त्यानंतर एका रुग्णालयाच्या व्यवस्थापनात सहभागी झाल्यावर घेतलेला सहभाग यातून आलेला अनुभव याआधारे त्यांनी काही निष्कर्ष या पुस्तकात नोंदवले आहेत. वैद्यकीय व्यवसायाची चिकित्सा, त्याचबरोबर आपलं शरीर कसं चांगलं राखलं पाहिजे व काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी नेमकं मार्गदर्शन व जागरूक करणारं हे पुस्तक आहे.
-
Kunya Ekachi Dharangatha (कुण्या एकाची धरणगाथा)
नाशिक जिल्ह्यातला बागलाण तालुक्याचा परिसर हा वर्षानुवर्षे पाण्यासाठी तहानलेला भाग. इथल्याच गोपाळ मोरे नावाच्या गरीब शेतक-याने हा भाग पाण्यात भिजवण्याची इच्छा मनात धरली आणि तिचा चिवट वृत्तीने पाठपुरावाही केला. या इच्छेपोटी आमदारापासून पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांचा पिच्छा पुरवला...आणि शेवटी आपल्या दुर्दम्य आकांक्षा आणि परिश्रमांनी धरण मिळवलंच. त्याची ही गोष्ट..इतिहासातले तुटक धागेदोरे जुळवत पन्नास वर्षांच्या अज्ञातवासातून बाहेर काढलेली...
-
Learning To Live Again
After the success of the Marathi book ?Muktangan Chi Goshta?, the story of Muktangan De-addiction Centre in Pune, narrated by its founder Anil Awachat, we bring you this bestseller book in English . This book talks about the efforts taken by this institute to cure those with addiction and to enable them to lead a normal life again. Muktangan which has completed 25 years is a path-breaking experiment which factored in the Indian social milieu while arriving at rehabilitation methods. It was a formula that presupposed the co-operation of the families of the affected patients. It placed the human being at the center of the treatment, thereby relying less on medical aid.