-
Mohanmaya (मोहनमाया)
मोहनदास करमचंद गांधी ऊर्फ बापूजी यांच्यावर जगात अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. राष्ट्रपिता या नात्याने गांधीजी आपल्याला पूजनीय आहेत. मात्र, ते जन्मतः विचार, आदर्श घेऊन आले नव्हते. आयुष्यात घडलेल्या अन[...]
-
Bangarwadi ( बनगरवाडी )
बनगरवाडी. माणदेशातल्या एका 'लेंगरवाडी' नावाच्यावाडीवर बेतलेली वाडी. १९३८ साली माडगूळकर त्या गांवी होते तेव्हा तिथल्या अनुभवांचे वर्णन कादंबरीरूपात 'बनगरवाडी' या नावाने आपल्यासमोर येते. स्वतः माडगूळकरही त्याच भागातले. ९९साली माडगूळकरांनी कादंबरीत काही रेखाटने करावी असे ठरल्याने ते पुन्हा त्या वाडीत गेले. आणि ३८ सालच्या लेंगरवाडीत जवळजवळ साठ वर्षांनीही काही फरक पडला नसल्याचेच त्यांना जाणवले. व्यंकटेश माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेली बनगरवाडी वाचकाला अद्भूत अनुभव देते. बनगरवाडी या छोट्याच्या गावात भेटतात ते कारभारी, अंजी, दादू, आयाबू, आनंदा रामोशी, रामा, शेकू आणि त्याची उंच बायको. या प्रत्येकाची शरीरवैशिष्ट्ये जशी आहेत, तशी स्वभाववैशिष्ट्ये. प्रत्येकाला एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. हे गाव माडगुळकर यांना जसं दिसलं, तसं ते त्यांनी चितारलं आहे. केवळ लेखणीतूनच नव्हे तर; कुंचल्यातूनही. माडगुळकर यांची रेखाचित्रं हे पुस्तकाच्या खास आकर्षणाचा एक भाग आहे.
-
Hyderabadchee Chittarkatha ( हैदराबादची चित्तरकथा
हैदराबादचे नाव घेतले की आठवतो तो या संस्थानाचा मुक्तिसंग्राम. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही इथल्या उन्मत्त निजामाच्या आडमुठेपणामुळे हैदराबाद स्वतंत्र भारतात विलीन होण्यासाठी १३ महिन्यांचा काळ लागला. सुमारे सव्वाचारशे वर्षांपूर्वी गोवळकोंडा किल्ल्याच्या पायथ्याशी भागानगर या नावाने वसलेल्या या शहराला विविधरंगी इतिहास आहे. याच शहरात जन्मलेल्या धनंजय कुलकर्णी यांनी जन्मगावाच्या आकर्षणापोटी या पुस्तकाचा प्रपंच मांडला आहे. हैदराबादच्या नवाबी ऐश्वर्यापासून सध्याच्या सायबर सिटीपर्यंतचा प्रवास त्यांनी यात प्रभावीपणे मांडला आहे. पुस्तकात छायाचित्रांचाही समावेश असून, त्यातील काही छायाचित्रांमुळे या शहराच्या उंची स्थापत्यरचनेची कल्पना येते. मोत्यांच्या जडणघडणीसाठी व व्यापारासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्धीस आलेले, खानपानात (त्यात बिर्याणी आलीच!) रमलेले, सर्व कलांचा आस्वाद घेणारे हे शहर आजही आपले वेगळेपण राखून आहे, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो.
-
Punha Ekada Aavaghad Afghanistan ( पुन्हा एकदा अवघ
अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधील शीतयुद्धात भरडल्या गेलेल्या अफगाणिस्तानची घडी आजही व्यवस्थितपणे बसलेली नाही. पत्रकार निळू दामले यांनी २००३ मध्ये या देशात फिरून त्याचे रिपोर्ताज ‘अवघड अफगाणिस्तान’ या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले होते. याच सुमारास तालिबान्यांचा पाडाव झाल्याने तेथे शांतता नांदेल, अशी अटकळ जगभरात व्यक्त होत होती. मात्र, अनेक जमातींमध्ये विभागल्या गेलेल्या आणि सांस्कृतिक-धार्मिक कल्पनांमध्ये रूतलेल्या अफगाणिस्तानवर आजही तालिबान्यांचा प्रभाव आहे, हे दामले यांना त्यांनी २००७ साली केलेल्या या देशाच्या दुसर्या यात्रेत आढळले. या यात्रेदरम्यानचे अनुभव आणि अफगाणिस्तानवरील अन्य मजकुराचा अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. तालिबानींच्या अस्तित्वामुळे अमेरिकी फौजांना तेथून पूर्णपणे माघारी जाणे अशक्य असल्याने अफगाणिस्तानचे आणि तालिबान्यांच्या प्रभावाखाली असलेल्या पाकिस्तानचे भवितव्य काय, हे सांगणे कठीण आहे, हा त्यांनी काढलेला निष्कर्ष अस्वस्थ करतो.